Tuesday, 4 October 2022

अनाथापिण्डिकाचा पुत्र काल

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


 *अनाथापिण्डिकाचा पुत्र काल* 

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_बुद्धानी धम्मपदात  एक गाथा सांगितली -_*

                     *_धम्मपद -१७८_*

*_पथव्या एकरज्जेन सग्गस्स गमनेन वा।_*
*_सब्बलोकाधिपच्चेन सोतापत्तिफलं वरं।।_*

            *_एकट्याने पृथ्वीचा राजा होण्यापेक्षा, स्वर्गात (सुखाच्या साम्राज्यात) जाण्यापेक्षा, सर्व जगाचा अधिपती होण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, सोतापत्ति-सैद्धांतिक जीवनपथाचे फळ..._*

                    _अनाथपिंडिक खुप दानी मनुष्य होता, त्याचे नाव अनाथपिंडक असण्याचे एक कारण म्हणजे तो अनाथांचा मोठा आधार होता. लोकांना मोकळ्या मनाने दान देत होता. अनाथपिण्डीक म्हणजे दान देणारा, अनाथांना आधार देणारी अशी व्यक्ती. त्याला काल नावाचा मुलगा होता. काल हा शब्दसुद्धा खूप चांगला आहे!  अनाथाना साथ करणारा व्यक्ती आणि काल म्हणजे वेळ किंवा मृत्यू. काळ आणि मृत्यु या दोघांनाही बुद्धांचे धम्मोपदेश ऐकण्याची इच्छा नसते, कारण दोघांनाही बुद्धांची भीती वाटते._

             _अनाथपिंडिक बुद्धाचे उपदेश  ऐकायचे पण त्याचा पुत्र काल ​​बुद्धांचे उपदेश ऐकायला कधिच जात नसे.  अनाथपिंडिक हा भगवान बुद्धांचा अनन्य असा अनुयायी-भक्त होता. त्याच्या आयुष्यात सर्व सुख त्याच्या अवती भोवती लोटांगण घालत होती, परंतु एकच गोष्ट त्याला दु:ख देत होती. ती म्हणजे त्याचा मुलगा ‘काल’. कालची प्रवृत्ती सामान्य श्रीमंत मुलांसारखी होती. थोड्याश्या पैशासाठी तो कोणताही धोका पत्करण्यास तयार होता. अनाथपिण्डीकालासुद्धा वाटायचे की, आपल्या मुलाने बुद्धांचे उपदेश ऐकण्यासाठी जावे, त्यांची सेवा करावी अशी त्यांची इच्छा होती. पण मुलाने वडीलांचे कधीच ऐकले नाही. वडिलांच्या सांगण्याकडे सतत दुर्लक्ष करायचा.  अनाथपिण्डिकाने असा विचार केला कि, जर माझा मुलगा अशाच प्रकारे वागला तर तो नरकात जाईल,  माझा मुलगा माझ्या नजरेसमोर अविची नरकात गेला तर मला अत्यंत दु:ख होईल असा विचार करुन अनाथपिण्डीकाने आपली हि व्यथा बुद्धांकडे सांगितली._ 

           _बुद्ध म्हणाले, - ‘अनाथपिण्डीक तु तुझ्या मुलाच्या प्रवृत्तीने दु:खी नाहीस. त्याच्या कमजोरीलाच तु त्याच्या परिवर्तनाचे माध्यम बनव. जर संपत्ती हे तुझ्या मुलाचे कमकुवतपणाचे माध्यम असेल, तर त्याला संपत्तीनेच त्याचे परिवर्तन कर. भगवंतांची ही कल्पना अनाथपिण्डीकाच्या लक्षात आली._

              _घरी परत आल्यावर त्याने कालला आपल्याजवळ बोलाविले, आणि म्हणाला, “पुत्र काल, मी तुला रोज उपोसथ दिनी शंभर सुवर्ण मुद्रा देऊ इच्छीतो. परंतु यासाठी तुला उपोसथ शिल ग्रहण करुन शीलाचे पालन करुन भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी जावे लागेल. पित्याच्या या बोलण्याने काल चिंतीत झाला, बुद्धांचे प्रवचन ऐकण्याची त्याची इच्छा नव्हती, परंतु शंभर सुवर्णमुद्राचा लोभ त्याच्या डोक्यावर बसला होता, काल या सुवर्ण मुद्रांच्या लोभाला वश झाला. त्या सुवर्णमुद्रांच्या लोभाने तो बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी तयार झाला आणि बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी बुद्धांकडे गेला._ 

              *_लक्षात ठेवा की आपण जेव्हा पहिल्यांदा धर्माच्या संपर्कात येतो, तेव्हा आपण काहीना काही लोभामध्ये धम्माकडे गेलेलो असतो.  लोभ हा कोणत्याही प्रकारचा असेल, की मला मनाची शांती मिळावी, अशांततेपासून मुक्त होऊ या, थोडासा आत्मविश्वास वाढेल, जीवनात यश अशा मार्गाने मिळू शकेल,  की दुकान निट चालत नाही तर ते ध्यान  केल्याने निट चालेल,  कारण लोक असे म्हणतात की जर तुम्ही ध्यान केले तर तुम्हाला परमधन म्हणजे मोठी संपत्ती मिळते, जर तुम्ही आजारी असाल तर ध्यान करून बरे होऊ शकता; जर  पती किंवा पत्नीमध्ये जमत नसेल, वारंवार झगडे होत असतील तर कोणी असा विचार करतो कि, कदाचीत ध्यान केल्याने आपले झगडे मिटतील, अशा प्रकारच्या लोभातून माणसे बुद्धांकडे, धम्माकडे वळु लागतात.  अनाथपिण्डिकाच्या पुत्राचे, कालचे पण असेच झाले. त्याला सुवर्ण मुद्रांचा लोभ झाला. आणि तो त्या लोभाने बुद्धांकडे जाण्यास तयार झाला._*

               _अशाप्रकारे अनाथपिण्डीकाचा पुत्र काल हा शंभर सुवर्णमुद्रांच्या लोभापायी उपोसथ शील ग्रहण करुन बुद्ध जेथे होते त्या जेथवन विहारात बुद्धांचे प्रवचन ज्या ठिकाणी असायचे तेथे जाऊ लागला आणि एका आरामदायी सुखद ठिकाणी जाऊन बसायचा व त्याच ठिकाणी झोपी जायचा. बुद्धांचे प्रवचन ऐकायला जायचा, परंतु लक्ष असायचा शंभर सुवर्णमुद्रांकडे. काल तर सुवर्णमुद्रांकरीताच भगवंतांकडे जात होता, प्रवचन ऐकण्यासाठी नाही. बुद्धांची देसना ऐकत असतांनाही तो मनात मुद्रा मोजत असे.  असा विचार करत होता असेल की, आपले वडील सुवर्णमुद्रा देणार नाहीत किंवा वडीलांनी आपली फसवणूक तर केली नसेल ना. मुद्रांच्या बहाण्याने मला प्रवचनाला पाठविले तर नाही ना. या विचारातच त्याचा सगळा वेळ गेला.  भगवंतांच्या उपदेशाकडे त्याचा लक्षच नव्हता. त्यामुळे बुद्धांनी काय सांगितले हे त्याला कधी कळलेच नाही._

             _प्रवचन संपल्यानंतर घरी आला आणि वडीलांकडे जाऊन शंभर सुवर्ण मुद्रांची मागणी केल्यावर वडील म्हणाले, “प्रथम भोजन करुन घे, नंतर सुवर्णमुद्रा देतो.”  काल म्हणाला, “शंभर सुवर्णमुद्रा घेतल्याशिवाय मी भोजन करणार नाही, कारण मला कोणावर विश्वास नाही.” अशाप्रकारे त्याने प्रथम सोन्याची नाणी वडिलांकडुन घेतली आणि नंतरच अन्न खाल्ले._ 

         _आता काल दररोज नियमीत तथागतांचे प्रवचन ऐकायला जायचा आणि परत आल्यावर पित्याकडुन शंभर सुवर्ण मुद्रा मिळवायचा.  अशाप्रकारे एक महिना उलटला.  एक दिवस अनाथपिण्डिकाने त्याला सांगितले, “पुत्रा, आता मी तुला एक हजार सुवर्णमुद्रा देऊ इच्छितो.  फक्त तुला भगवंतांची वाणी फक्त ऐकायचीच नाही तर ती नीट ऐकुन स्मरणात - लक्षात ठेऊन घरी येऊन माझ्यासमोर ती जशी भगवंतानी सांगितली तशीच पुन्हा मला सांगावी लागेल. कालने हजार सुवर्णमुद्रांच्या लालचीने हि अटसुद्धा मान्य केली._

              _आता काल बुद्धांच्या वचनांना काळजीपुर्वक ध्यान देऊन ऐकु लागला.  जसजसे बुद्धांच्या वचनाना ध्यान देऊन ऐकु लागला, तसतसे त्याच्या अंतर्चेतनात सुवर्णमुद्रांचे तेज कमीकमी होऊ लागले,  त्या फिक्या पडु लागल्या. सुवर्णमुद्रांची आसक्ती कमी होऊ लागली._

           _शेवटी तो दिवससुद्धा आला, ज्यावेळी तो संपुर्णपणे बुद्धत्वात डुबकी मारली, बुद्धांमध्ये समावला गेला. त्या संध्याकाळी प्रवचन संपल्यानंतर तो आपल्या घरी गेलाच नाही. घरची कुटुंबीय चिंतेत पडले. कालचे काय झाले असेल या भितीने अनाथपिण्डिक घाबरुन बुद्धांजवळ आला.  तेथे जाऊन पाहतो, तर अपला पुत्र काल हा एका बाजुला डोळे मिटुन ध्यानस्थ बसला होता. त्याचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, परंतु काल आपल्या आसनावरुन थोडाही डळमळला नाही. विचलीत झाला नाही.  अनाथपिण्डिकाने त्याला हलवुन सोन्याच्या हजार मुद्रांचे आमिष दाखवुन घरी नेण्याचा प्रयत्न करताना म्हणाला, “ काल बाळ, हजार सुवर्णमुद्रा तुझी प्रतिक्षा करीत आहेत. घरी चल आणि त्या सुवर्णमुद्रा तुला घे.”.  काल म्हणाला,  त्या सुवर्णमुद्रा आता आपणच सांभाळुन ठेवा, आणि या मला दिलेल्या सर्व सुवर्णमुद्रा्सुद्धा तुम्ही परत घेऊन जा._
             _*अनाथपिण्डीक खूपच आश्चर्यचकित झाला.  कारण त्यांने यापुर्वी बुद्धांना अनेक वेळा ऐकले होते.  बुद्धांना मानत होता, दानसुद्धा देत होता परंतु बुद्धांना त्याने जसे पुत्र कालने ऐकले होते त्याप्रकारे ऐकले नव्हते.*_    
          
            *_बहुतेकदा असे घडते की तरुणात जे  ऐकून ग्रहण करता येते ते म्हातारपणात ग्रहण करता येत नाही. कारण म्हातारपणी मन थकलेले असते. किंवा आधीच त्यांचे मनाचे गोदाम पुर्ण भरलेले असते, त्यामुळे त्यात आणखी अधीक गोष्ठी साठवु शकत नाही.  कालच्या वडिलांनी खुप काही समजावून सांगितले, परंतु काल म्हणाला पिताजी जे आपण अपेक्षीत होतात तेच झालेले आहे.  त्यामुळे घरी येण्याचा आग्रह करु नका.  त्यावर अनाथपिण्डीक म्हणाला, मी फक्त याची आशा करीत होतो की, माझा पुत्र समजदार होईल, धार्मिक होइल, प्रतिष्ठित होईल, परंतु हे थोडे जास्त होत आहे.  पुत्र तुझा इरादा काय आहे.  *त्यावर काल म्हणाला, आता कसला आला इरादा, आता आम्ही बुद्धांचे पुत्र झालो आहोत._*

             *_तेव्हा बुद्ध अनाथपिण्डीकाला समजावतांना म्हणाले, “त्याला आता तु तिन्ही लोकांतील वैभव त्याच्या पायाजवळ आणुन दिले तरी तो घरी परत जाणार नाही.  कारण तो आता सोतापन्न झालेला आहे.  हा ध्यानाच्या नदी प्रवाहात डुबकी घेऊन आला आहे.  हा आता तुझा पुत्र राहिला नाही.  तो आता माझा पुत्र झाला आहे.  जो कोणी माझे ऐकतो तो माझा होतो.  आता याला तुम्ही चक्रवर्ती राजाची संपत्ती दिली तरी तो गृहस्थी होणार नाही.  तुम्ही त्याला देवलोकांचा सम्राट बणविले, इंद्र बनविले तरीसुद्धा तो घरी परत फिरणार नाही. तेव्हा अनाथपिण्डीकाला हे स्पष्ट कळले की, कोणत्याही सजिव सत्वाला आपल्या मुळस्त्रोतात जाऊन राहण्यापेक्षा काहिही श्रेष्ठ वाटत नाही._* 

*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*

*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक ०४/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_4.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼



No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...