Saturday, 1 October 2022

प्रज्ञा विकसित करण्याचे प्रशिक्षण

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_प्रज्ञा विकसित करण्याचे प्रशिक्षण_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _शील किंवा समाधि हे भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचे वैशिष्ट्य नव्हते. या दोन्हीचा अभ्यास बुद्ध-पूर्व भारतातही मोठ्या प्रमाणात होत असे. इतकेच काय, पण गौतमांनीही आपल्या निर्वाणप्राप्तीपूर्वीच्या मार्गक्रमणेत दोन आचार्यांकडून या समाधिचे प्रशिक्षण घेतले होते. त्याचा अभ्यास केला होता. शील, समाधिचा पुरस्कार करताना भगवान बुद्धही त्या काळातील सांप्रदायिक शिक्षकांशी सहमतच होते. *सर्व संप्रदाय शीलपालनावर भर देत. तसेच प्रार्थना, निरनिराळे विधि, उपास-तापास, कठोर व्रतवैकल्ये किंवा निरनिराळ्या ध्यानप्रक्रिया यांच्या सहाय्याने समाधितील उच्चतम ध्यानावस्था गाठण्याची शक्यताही दर्शवीत. ह्या सर्वांचे ध्येय मनाची अत्यंत उच्च दर्जाची तल्लीनता प्राप्त करणे हेच असते. हाच तो आध्यात्मिक गूढवाद्यांनी सांगितलेला 'अत्यानंद' होय.*_

        _*अशा प्रकारची एकाग्रता, जरी ती आपल्याला उच्च ध्यानावस्थात नेण्यापर्यंत विकसित झालेली नसली तरी फार उपयोगी असते. त्यामुळे आपले मन नेहमीच्या अभिलाषा व तिटकारा या प्रतिक्रियांपासून बाजूला होऊन शांत होते.* आपल्याला प्रचंड क्रोध आल्यावर एक ते दहा अंक मोजणे हा देखील अविकसित समाधिचाच एक प्राथमिक प्रकार आहे. *समाधिचे दुसरे सहज दिसणारे प्रकार म्हणजे मंत्राचा जप किंवा मूर्तीचे ध्यान हे होते. हे सारे त्याज्य नाहीत. त्यांचाही उपयोग होतोच. जेव्हा मन दुसऱ्या गोष्टीकडे वळवून एकाग्र केले जाते, तेव्हा ते निवांत व शांत होते.*_

            _*अशा प्रकारे मिळालेली शांती ही काही खऱ्या मुक्तीची स्थिती मात्र नाही हं! ह्या एकाग्रतेच्या अभ्यासामुळे फायदे मात्र बरेच होतात. पण ही एकाग्रता बहिर्मनापुरतीच (conscious_mind) मर्यादित असते. आधुनिक मानसशास्त्राच्या संशोधनाच्या सुमारे पंचवीस शतके आधी भगवान बुद्धांना सुप्त अंतर्मनाचे (unconscious mind) अस्तित्व आढळले होते व त्याला त्यांनी 'अनुशय' असे नाव दिले होते.* बहिर्मनाच्या पातळीवरील राग व द्वेष यांना परिणामकारकरित्या हाताळण्याचा, मनाला वळवून दुसऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, हा एक मार्ग त्यांना आढळला पण त्यामुळे त्यांचे [राग-द्वेषांचे] निर्मूलन न होता उलट हे संस्कार अंतर्मनात खोलवर ढकलेले जातात. तेथे ते सुप्त अवस्थेत असले तरी त्यांचे तेथील अस्तित्व हे तितकेच धोकादायक असते. मनाच्या पृष्ठभागावर जरी सुखशांतीचे वास्तव्य जाणवले, तरी आतील भागात दबलेल्या विकारांचा ज्वालामुखी सुप्तावस्थेत असतो. त्याचा केव्हाना केव्हा उद्रेक झाल्याशिवाय कसा राहणार?_ 

*_भगवान बुद्ध म्हणत :-_*

             *_'एखाद्या कोलमडलेल्या वृक्षाची मुळे जर जमिनीतून न काढता तशीच ठेवलीत, तर त्यातून नवीन फांद्या फुटणारच. त्याचप्रमाणे मनात खोलवर रुजलेली ही रागद्वेषाची मुळे जर आपण उखडून फेकली नाहीत तर ती पुनः पुन्हा दुःखाला जन्म देणारच._*

           _जोपर्यंत अज्ञानाचा व संस्कारांचा पगडा अंतर्मनात शिल्लक आहे, तोपर्यंत त्यांना जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा, त्याक्षणी, त्याची नवीन नवीन रूपे बाहेर प्रकटून आपल्याला दुःख निर्माण करणारच. आणि म्हणूनच बोधिसत्व गौतमांना लाभलेल्या उच्च अष्टसमाधिच्या अवस्थेनंतर, त्यांना पुनः पुन्हा आलेल्या अनुभूतिनंतरही मुक्तावस्था प्राप्त झाल्याचे आढळले नाही. त्यांनी पुढेही दुःख मुक्तीचा व परमसुखाचा मार्ग शोधण्याचे आपले प्रयत्न चालूच ठेवले._

*_अभ्यासाचे दोन मार्ग_*

               _भगवान बुद्धांना त्याकाळी प्रचलित असलेले दोन मार्ग आढळले. पहिला मार्ग हा सगळ्या प्रकारचे मनसोक्त उपभोग स्वतः घेण्याचा. यात सगळ्या प्रकारच्या इच्छा, विकारांचे समाधान करणारा मुक्त परवानाच दिलेला असतो. कळत वा नकळत भौतिक जगातील सर्व माणसे याच मार्गाचा अवलंब करीत असतात. परंतु असा एकही माणूस असू शकत नाही की ज्याच्या आयुष्यात सर्व गोष्टी त्याच्या इच्छेप्रमाणेच होतात व एकही गोष्ट त्याच्या इच्छेविरुद्ध घडत नाही. जे लोक या मार्गाचा अवलंब करतात त्यांची इच्छा पूर्ण न झाल्यास निराशा व असमाधान यामुळे नक्कीच दुःखी होतात पण ज्यांच्या इच्छा पूर्ण होतात ते देखील भीतीमुळे दुःखीच असतात._

                 _आपल्याला जो भोग मिळत आहे तो संपणार तर नाही ना? आपल्याला जे समाधान मिळते ते अल्पजीवी तर ठरणार नाही ना? याची विवंचनाच त्यांना दुःखी करते आणि घडतेही असेच. कामना करतांना, ती पूर्ण होत असतांना वा ती पूर्ण झाली नाही तरी देखील ही माणसे प्रक्षुब्ध असतात. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी संन्यासी होऊन आपले घरदार सोडण्यापूर्वी या मार्गाचा स्वतःच अनुभव घेतला होता आणि म्हणूनच हा मार्ग आपल्याला दुःखमुक्त करू शकणार नाही त्यांची पूर्ण खात्री होती._

*_पर्यायी मार्ग_*

              _याला पर्यायी मार्ग होता. दमनाचा, बळजबरीने आपल्या इच्छा आकांक्षा मारण्याचा विकार दडपण्याचा. पंचवीसशे वर्षापूर्वीच्या भारतात स्वतःच्या इच्छा मारण्याच्या मार्गाने कळस गाठला होता. तेव्हा लोक आपल्या सर्व सुखाचा त्याग करून आपणास जास्त दुःखकारक अनुभव कसे येतील यासाठी प्रयत्नशील असत._

                _स्वतःस दुःखकारक अनुभव देण्यामागचा उद्देश एकच की, यामुळे तरी आपल्या मनाची रागाच्या व द्वेषांच्या अंध प्रतिक्रिया करण्याची सवय जाऊन ते शुद्ध होईल. शरीराला अशा खडतर मार्गाने नेण्याचे प्रयोग जगातील सर्वच पंथाची मंडळी करीत असत. बोधिसत्वाने देखील आपल्या घरादाराचा त्याग केल्यावर अशा प्रकारच्या खडतर मार्गाचा अवलंब मोठ्या निष्ठेने केला होता. त्यांनी वेगवेगळ्या खडतर मार्गाचा अभ्यास करून पाहिला होता. त्यात त्यांचे शरीर कातडी पांघरलेला सापळाच झाले होते. तेव्हा त्यांना कळले की, इतके होऊनदेखील आपण दुःखमुक्त झालो नाही. *तेव्हा त्यांच्या लक्षात आले की शारीरिक यातनांनी मनाचे शुद्धीकरण होत नाही.* अशा प्रकारचे प्रयोग एका टोकापर्यंत ताणण्यात येऊ नयेत हे खरे असले तरी देखील त्यांच्या मर्यादित प्रयोगाने, अशा इच्छा की ज्यांपासून संतोष मिळवितांना अहितकारी कृत्यांचा अवलंब करावा लागतो, अशा इच्छांवर नियंत्रण ठेवावे. असे स्व-नियंत्रण है स्वतःलाच स्वैराचाराचा मुक्त परवाना देण्यापेक्षा अधिक चांगले आहे. कारण याच्या उपयोगाने आपण कमीतकमी अनैतिक कर्मे तरी टाळतो._

                     _परंतु असे संयमन हे जर स्वतःच्या दमनाचे फलित असेल तर मात्र मनावरचा ताण हा वाढत-वाढत धोकादायक पातळीवर येऊ शकतो. आपल्या वासना एका नकाररूपी धरणाच्या मागे साठलेल्या महापूराच्या पाण्यासारख्या साचून राहातील व त्या दबावाखाली आपले मन राहील. एक ना एक दिवस भिंत फुटून ह्या विध्वंसक महापुराला मार्ग मोकळा करून द्यावा लागेलच._

                   _*जोपर्यंत मनावरील पूर्व संस्कारांचा पगडा दूर होत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित व शांत राहू शकत नाही.* शील हे कितीही लाभदायक असले तरीही ते केवळ दबावाने वा बळजबरीने पाळता येत नाही. समाधिच्या अभ्यासाने थोडाफार फायदा जरूर होईल. पण समस्येची मुळे खोलवर दडलेली असतात. तेथेच अशुद्धतेचीही बीजे असतात. समाधितूनही आपण त्या खोलीपर्यंत जाऊन काम करू शकत नाही. जोपर्यंत अंर्तमनात ही मुळे अस्तित्वात आहेत, तोपर्यंत खऱ्या अर्थी मुक्ती आपण मिळवूच शकणार नाही._

               _पण विकारांची, संस्कारांची मुळेच आपण अंतर्मनातून उखडून टाकली मात्र दुष्कृत्ये व उपभोगात अडकण्याची भीती आपल्याला राहणार नाही. दमनाची पण गरज लागणार नाही. कारण दुष्कृत्य निर्माण करणारी मूळ प्रेरणाद नष्ट झालेली असेल. राग व द्वेष, पाहिजे वा नको यांच्या ताणापासून मुक्त व शांत जीवन आपण जगू शकू._

                _ही मुळे उखडून टाकण्यासाठी अशा साधनाविधिची गरज आहे की जिच्या मदतीने अशुद्धतेचे. दुष्कृत्याचे बीज जिथे जन्मते, त्या खोल बरात शिरून आपण त्याला तिथेच नष्ट करू शकू अशीच एक पद्धती, भगवान बुद्धांनी शोधून काढली या विधिच्या सहाय्यानेच, प्रज्ञा जागृतीनेच सिद्धार्थ गौतम बुद्धावस्थेला पोहचले. निर्वाणाचे धनी झाले. मुक्त झाले. याच विधिला 'विपश्यना-भावना' असेही म्हणतात. थोडक्यात, *स्वतःच्या मूळ स्वभावाचा शोध घेण्यासाठी विकसित करावयाची अंतर्दृष्टी की जिच्या मदतीने दुःखाचे खरे कारण शोधून आपण ते दूर करू शकू.*_

*_प्रज्ञा विकास_*

               _*प्रज्ञा विकास हाच सिद्धार्थ गौतमांचा शोध होता.* याचाच उपयोग त्यांनी स्वतःला दुःखमुक्त करण्यासाठी केला व त्याचीच शिकवण त्यांनी आयुष्यभर इतरांना दिली. हेच त्यांच्या शिकवणुकीतील अद्वितीयत्व आहे व त्यालाच त्यांनी सगळ्यात जास्त महत्त्व दिले आहे. त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले की *'समाधि जर शील सदाचाराच्या भक्कम पायावर उभी असेल तर ती उपयुक्त व फलदायी ठरते. जर प्रज्ञेला समाधिचे सहाय्य मिळाले तर ती फारच उपयुक्त व फलदायी होते. प्रज्ञेच्या सहाय्याने मन हे सगळ्या प्रकारच्या अशुद्धतेपासून मुक्त होते."*_

                  _सदाचार व एकाग्रता, शील व समाधि ह्या दोन्ही गोष्टी मौल्यवान तर आहेतच पण त्यांचा खरा उद्देश प्रज्ञा जागृती हाच आहे. स्वैराचार व स्वतःवर लादलेली कठोर बंधने-दमन यातील खरा मध्यम मार्ग हा प्रज्ञेच्या विकासाचाच आहे. नैतिकतेचे पालन करून मनाला ढोबळ मानाने प्रक्षुब्ध करणाऱ्या सर्व कर्मापासून आपण परावृत्त करतो. मनाच्या एकाग्रतेने आपण त्याला आणखी शांत करून स्वतःच्या परीक्षणाचे योग्य असे हत्यार बनवतो. म्हणून प्रज्ञेचा विकास हाच एक असा मार्ग आहे की ज्याच्या मदतीने आपण अंतर्मनात शिरून त्यातील सत्याचा ठाव गाठून, स्वतःला अज्ञानातून व मायाजाळातून मुक्त करू शकतो._

         _*आर्य अष्टांगिक मार्गाच्या दोन भागांचा समावेश प्रज्ञा विकसनाच्या प्रशिक्षणात येतो. पहिला 'सम्यक् संकल्प' व दुसरा 'सम्यक् दृष्टी'.*_

*_सम्यक संकल्प_*

              _विपश्यना भावना सुरू करण्यापूर्वी मन पूर्णपणे निर्विचार होणे आवश्यक नाही. सुरुवातीला जरी मन निर्विचार करता आले नाही तरी क्षणाक्षणातील जाणीवेची स्पष्टता वाढणे मात्र जरूरीचे आहे._

              _विचार असले तरी चालतील, पण विचारधारेची पद्धती बदलणे मात्र जरूरीचे आहे. *श्वासोच्छ्वासाच्या सजगतेमुळे मनातील राग व द्वेष यांचे प्रमाण खाली येऊन मन निवांत झालेले असावे व धर्म प्रविष्ट होऊन दुःखमुक्त कसे व्हावे याबद्दल विचार करावयास लागलेले असावे.* श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करण्याच्या सुरुवातीला येत असणाऱ्या अडचणी, होणारे त्रास आता बंद झालेले असावेत. कमीतकमी त्याची प्रखरता तरी थोड्या फार प्रमाणात कमी झालेली असावी व पुढील सम्यक् दृष्टीची पायरी चढण्याची मनाची सिद्धता झालेली असावी._

*_सम्यक् दृष्टी_*

             _*सम्यक् दृष्टी हीच खरी प्रज्ञा आहे. शहाणपण आहे. सत्याचा नुसता विचार करून उपयोग नाही. सत्य हे आपल्या अनुभूतिवर उतरले पाहिजे.* घटना अगर गोष्टी अशा आहेत हे भासण्यापेक्षा त्या मुळातच खऱ्या कशा आहेत त्या स्वरूपात आपल्याला दिसल्या पाहिजेत. वरवर दिसणारे हेदेखील सत्य आहे पण वास्तविक *सत्याच्या अंतरंगात, त्याच्या गाभ्यात शिरणे आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. त्याच्या मदतीनेच अंतिम सत्य आपल्या अनुभूतिवर उतरवून आपण खऱ्या अर्थी आपल्या दुःखाचा नाश करू शकू.*_

                _*प्रज्ञेचे तीन प्रकार आहेत. ऐकून मिळविलेली प्रज्ञा [श्रुतमयी प्रज्ञा], बौद्धिक प्रज्ञा [चिंतनमयी प्रज्ञा] व अनुभूतिवर उतरलेली प्रज्ञा [भावनामयी प्रज्ञा] श्रुतमयी प्रज्ञेचा शब्दशः अर्थ दुसऱ्याकडून शिकलेले शहाणपण असा आहे. ही प्रज्ञा पुस्तकाचे वाचन, भाषणे किंवा धर्मोपदेश यापासून उत्पन्न होते. खरी म्हणजे ती प्रज्ञा दुसऱ्या माणसाची असते व ती आपली म्हणून स्वीकारण्याची आपण तयारी दाखवीत असतो. हा स्वीकार कदाचित अज्ञानामुळेही असू शकतो.* उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखादी विशिष्ट तत्त्वप्रणाली आचरणाऱ्या समाजात जन्म घेतो, वाढतो, तेव्हा समाजाच्या म्हणून काही समजूती, किंवा इतर काही चालीरीती असतातच, त्याचा आपण विचार न करता स्वीकार करतो. कदाचित हा स्वीकार अभिलाषेमुळे देखील असू शकतो. समाजातील नेत्यांनी दाखविलेल्या प्रलोभनामुळे व उज्ज्वल भविष्यासाठी आपण या परंपरागत गोष्टी स्वीकारतो. इतकेच काय पण त्यांच्या अवलंबनात मृत्यूनंतर मिळणाऱ्या स्वर्गसुखाचेहीप्र प्रलोभन दाखविलेले असते. स्वर्गसुखाचे प्रलोभन स्वाभाविकच आपल्याला या परंपरा स्वीकारावयास लावते. बऱ्याच वेळा या परंपरांचा स्वीकार आपण भीतीपोटीही करीत असतो. समाजात जेव्हा नेत्यांना असे वाटते की आपल्या परंपरांना लोक आव्हान देतील, त्याबद्दल प्रश्न विचारतील. तेव्हा ते सामान्य माणसांना या परंपरा पाळल्या नाहीत किंवा त्याबद्दल शंका घेतल्या, गैरविश्वास दाखविला तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, त्या परंपरा मान्य केल्या नाहीत तर मृत्यूनंतर नरकातील यातना भोगाव्या लागतील, अशी भीतीही दाखवतात व त्यामुळे समाज त्यांचा स्वीकार करतो. कारण स्वाभाविकच नरकात जाणे कोणाला आवडणार नाही._

             _*एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण अंधपणे स्वीकार करतो, मग तो अभिलाषेमुळे असो किंवा दडपणामुळे येणाऱ्या भीतीपोटी असो, त्यामुळे आपली स्वतःची प्रज्ञा विकसित होत नाही किंवा ती आपल्या अनुभूतिवरही उतरलेली नसते. आणि म्हणून ती उसनीच राहते.*_

                _*प्रज्ञेचा दूसरा प्रकार म्हणजेच बौद्धिक स्तरावरचे आकलन. दुसऱ्याकडून ऐकलेल्या व पुस्तकात वाचलेल्या गोष्टींबद्दल माणूस विचार करतो. त्या पडताळून पाहतो. त्या तर्कसंगत आहेत ना ? त्या फायद्याच्या आहेत ना? याची तपासणी करतो. बौद्धिक पातळीवर जेव्हा समाधान होते तेव्हाच तो त्यांची सत्यता स्वीकारतो. तरी पण हे स्वतःचे ज्ञान नसते तर दुसऱ्यांच्या ऐकीव ज्ञानाचे बौद्धिक मूल्यमापन असते.*_

              *_तिसऱ्या प्रकारची प्रज्ञा म्हणजे आपल्या स्वतःच्या अनुभूतिवर उतरलेले ज्ञान होय. हीच स्वतःला झालेली सत्याची प्रचीती होय. या ज्ञानाच्या. शहाणपणाच्या आधारे आपण आपले आयुष्य जगू शकतो. हीच खरी प्रज्ञा की जिच्या आधारे आपल्या मनाच्या नैसर्गिक स्वभावात स्थित्यंतर घडवून आपण आपल्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो..._*

               _भौतिक जगात स्वानुभवावर आधारित शहाणपणाची नेहमीच गरज किंवा जरुरी असते असे नाही. विष किंवा अग्नी अपायकारक आहे अशी इतरांनी दिलेली ताकीद किंवा सूचना पुरेशी आहे. फार तर तार्किक सिद्धांतावर आपण त्याची सत्यता पडताळून पाहू शकतो. हे खरे मानण्यापूर्वी जर कोणी आगीत हात घालून खरेच भाजतो का हे पाहण्याचा हट्ट धरणार असेल तर तो केवळ मूर्खपणा ठरेल नाही का? परंतु धर्माच्या बाबतीत मात्र स्वतःच्या अनुभूतिवर उतरलेल्या शहाणपणाची, प्रज्ञेचीच महती आहे, जरुरी आहे. कारण तीच आपल्याला मनाच्या पूर्व संस्कारांच्या पगड्यातून वाचवणार आहे. मुक्त करणार आहे._

             _*वाचन प्रवचनापासून मिळवलेली प्रज्ञा स्वतःच्या बौद्धिक संशोधनातून निर्माण झालेली प्रज्ञा जेव्हा स्वतःच्या अनुभूतितन निर्माण होणाऱ्या प्रजेच्या विकासासाठी प्रेरक वा मार्गदर्शक ठरेल तेव्हाच त्याचा खरा उपयोग होतो.* जर आपण ऐकीव प्रज्ञेचा तर्कसंगत विचार न करता किया तिचा स्वतःच्या बुद्धीवर कस न लावता स्वीकार केला तर त्यामुळे मात्र आपण आपल्यापुढे एक पिंजरा किवा अटकावाची भिंतच निर्माण करतो व स्वानुभवावर आधारित ज्ञानापासून वंचित राहतो. त्याचप्रमाणे *ऐकीव प्रज्ञेला नुसते बुद्धीच्या स्तरावर उत्तरवून सत्याबद्दल खोलवर विचार करण्यातच आपण समाधान मानले व त्यास प्रत्यक्ष अनुभूतिवर उतरविण्याचा प्रयत्न देखील केला नाही तर मात्र आपले बौद्धिक आकलन हे मुक्तीच्या मार्गावरचे मार्गदर्शक न ठरता. एक बंधनच ठरेल. तो एक निरर्थक बुद्धिविलासच होईल.*_

*_प्रत्यक्ष अनुभूति महत्त्वाची_*

             _*भावनेच्या अभ्यासाने आपण प्रत्येकाने प्रत्यक्ष अनुभूतिवरील सत्यच जगले पाहिजे. केवळ हा जिवंत अनुभवच आपल्या मनाला मुक्त करू शकेल. दुसऱ्याला झालेल्या सत्याचा साक्षात्कार आपल्याला मुक्त करू शकणार नाही.* भगवान बुद्धांना झालेले ज्ञानदेखील फक्त एकाच माणसाला, सिद्धार्थ गौतमालाच मुक्त करू शकले. *फार तर एकाला झालेले ज्ञान हे इतरांना मार्गदर्शक होऊन त्या मार्गावरून वाटचाल करण्यास प्रेरणा देऊ शकेल. पण शेवटी आपणा सर्वांना स्वतःच आपल्या मार्गाने जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. परिश्रम करावे. लागतील.*_ 

_भगवान बुद्ध नेहमी सांगत :-_

       *_“आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न-कष्ट तर तुमचे तुम्हालाच करावे लागतील. तथागत ज्यांनी हे ध्येय गाठले आहे ते तुम्हाला फक्त मार्ग दाखवू शकतील."_*

              _*आपल्या साडेतीन हाताच्या शरीरातच सत्याचे जीवन जगता येते. सत्याची स्पष्ट व प्रत्यक्ष अनुभूति घेता येते. जे काही त्या बाहेर असते ते नेहमीच आपल्यापासून दूर असते. फक्त आतच आपण सत्याची खरी, स्पष्ट, प्रत्यक्ष व जिवंत अनुभूति घेऊ शकतो.*_

              _तीनही प्रज्ञापैकी पहिल्या दोन प्रज्ञा काही भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचे वैशिष्ट्य म्हणता येणार नाही. दोन्ही प्रज्ञांचे प्रकार बुद्धपूर्व काळात प्रचलित होते... इतकेच काय पण बुद्धांच्या काळातही त्यांनी शिकविलेल्या या प्रज्ञा माहित असल्याचा अनेकांचा दावा होता. *या मार्गातील भगवान बुद्धांची अद्वितीय देणगी, त्यांनी जगाला दिलेली महत्त्वाची ठेव म्हणजे सत्याला स्वानुभवावर उतरविण्याचा मार्ग व त्यामुळे येणारे 'स्वानुभवात्मक शहाणपण भावनामय प्रज्ञा' होय. अशा प्रकारे प्रत्यक्ष सत्य स्वानुभूतीवर उतरविण्याचा मार्ग म्हणजेच 'विपश्यना-भावना' होय.*_

_*विपश्यना - भावना*_

                            _*विपश्यनेचे वर्णन बऱ्याच वेळा 'अंतर्दृष्टीची चमक' किंवा सत्याचा अचानक साक्षात्कार असे करतात, हे वर्णन ठीक आहे. पण वस्तुतः ही टप्याटप्प्याने प्रगती करणारी ध्यानाची एक पद्धती आहे. जी आपल्याला प्रगतीच्या अशा ठिकाणी घेऊन जाते जिथे विशिष्ट प्रकारचे साक्षात्कार करण्यास आपण समर्थ होतो. अशी आहे विपश्यना भावना, अंतर्दृष्टी विकसनाची पद्धत. ती सामान्यपणे 'विपश्यना साधना' म्हणूनच ओळखली जाते.*_

                    _*पश्यना याचा अर्थ आहे 'बघणे'. सर्वसाधारण बघणे की जे आपण उघड्या डोळ्याने [करू] बघू शकतो. विपश्यना म्हणजे एका विशेष पद्धतीने बघणे. आपल्यातल्या सत्याचे यथार्थ दर्शन-अवलोकन करणे. आपण स्वतःच्या शारीरिक संवेदनांचे साधन करून आंतरिक सत्याचे अवलोकन वा दर्शन करू शकतो. हा साधना विधि म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या संवेदनांचे पद्धतशीर व निःपक्षपातीपणे निरीक्षण होय. निरीक्षणामुळे आपल्या शरीराचे व मनाचे संपूर्ण सत्य आपल्यापुढे प्रकटते. उलगडले जाते.*_

                        _*संवेदनाच का? कारण संवेदनांच्या आधारेच आपल्याला प्रत्यक्ष सत्याची अनुभूति होते. जे आपल्या भौतिक ज्ञानेंद्रियांच्या वा मनाच्या द्वारे आपल्या संपर्कात येत नाही ते आपल्यासाठी अस्तित्वात नसतेच. याच इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला जगाचे ज्ञान होते. हीच आपल्या सर्व अनुभवांची क्षेत्रे आहेत. आणि जेव्हा सहा ज्ञानेंद्रियांच्या संपर्कात काहीही येते त्याच वेळेला संवेदना प्रकटतात. भगवान बुद्धांनी याबद्दलचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे.*_

                    _*जर कोणी दोन काठ्या घेतल्या व त्या एकमेकावर जोरजोरात घासल्या तर त्यांच्या घर्षणाने उष्णता निर्माण होते आणि ठिणगी पडते. त्याचप्रकारे ज्ञानेंद्रियांचा संपर्क एखादा हव्या हव्या वाटणाऱ्या गोष्टीशी आला तर सुखद संवेदना निर्माण होतात. ग्रहणेंद्रियांच्या क्षेत्रात नावडत्या गोष्टी आल्या तर त्याचा परिणाम दुःखद संदेवनांच्या निर्मितीत होतो. या संपर्कात जर तटस्थ गोष्ट आली तर तिच्यामुळे आपल्या शरीरात असुख-अदुखद [तटस्थ] संवेदना निर्माण होतात.*_

                *_कोणत्याही गोष्टींचा शरीर व मनाशी संपर्क आला, संबंध आला की. संवेदना उत्पन्न होते. अशा प्रकारे संवेदनांच्या माध्यमातून आपण जगातील प्रज्ञा विकसित करण्याचे प्रशिक्षण भौतिक व मानसिक घडामोडीचा अनुभव घेतो. प्रज्ञा विकसित करण्याकरिता अनुभवीत आहोत याची जाणीव आपणाला होणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच संवेदनांच्या सजगतेचा विकास करणे आपल्याला आवश्यक आहे._* 

                            _तसेच शारीरिक संवेदनांचा मनाशी जवळचा संबंध आहे, व श्वासोच्छ्वासाप्रमाणेच मनाच्या वर्तमान स्थितीचे प्रतिबिंब संवेदनांवर ताबडतोब पडते. जेव्हा मनात विचार, कल्पना, तर्क, भावना, आठवणी, आशा किंवा भीती यांची निर्मिती होते तेव्हाच शरीरावर संवेदना उमटतात. *प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक मानसिक कर्माबरोबरच शरीरावर त्या त्या प्रकारच्या संवेदनांचा_ जन्म होतो. म्हणूनच अशा शारीरिक संवेदनांच्या निरीक्षणाबरोबरच आपण आपल्या मनाचेही निरीक्षण करू शकतो.*_

                        _*सखोल संशोधनासाठी संवेदनांचे निरीक्षण अपरिहार्य आहे. जगातील प्रत्येक गोष्टीचे पडसाद आपल्या शरीरावर संवेदनांच्या स्वरूपात उमटतात. संवेदना हा मन व शरीर यांना एकत्र जोडणारा दुवा आहे. संवेदना जरी शारीरिक स्वरूपात असल्या, तरी मनाच्या चार प्रक्रियांपैकी ती एक प्रक्रियाच आहे.*_

                        _*संवेदना जरी शरीरावर प्रकटत असल्या तरी त्यांची जाणीव मनालाच होते. मृत शरीरात किंवा निर्जीव वस्तूत संवेदना नसतातच. कारण त्यात मनाचे अस्तित्वच नसते. संवेदनांच्या अनुभूतिबद्दल आपण जागृत नसलो तर आपले सत्य संशोधन अर्धवट व वरवरचेच राहील.* जसे माळ्याला आपल्या बागेची उत्तम निगा राखण्यासाठी त्यात वाढणाऱ्या गवताची आणि त्याच्या लपलेल्या मुळ्यांच्या महत्त्वाच्या कार्याची चांगलीच जाण असावी लागते, त्याप्रमाणे आपल्याला संवेदनांची ज्या बहुतांशी आपल्याला माहीत नसतात, त्यांची ओळख करून घेतल्यावरच आपल्या खऱ्या स्वरूपाची माहिती करून घेऊन त्याला योग्य प्रकारे हाताळावयाचे काम आपल्याला करता येईल._

                    _*आपल्या सर्व शरीरात सदैव संवेदना प्रकट होतच असतात. शरीराचा आणि मनाचा प्रत्येक स्पर्श हा संवेदनांना जन्म देत असतो. प्रत्येक जीव-रासायनिक क्रिया संवेदनाच निर्माण करते. सर्वसामान्य आयुष्यात बहिर्मन फक्त तीव्र संवेदनांचेच आकलन करू शकते. कारण सूक्ष्म संवेदना ग्रहण करण्याची त्याची क्षमताच विकसित झालेली नसते. पण 'आनापान सती' या साधनेच्या अभ्यासाने जर आपले मन धारदार बनविले तर सूक्ष्म संवेदनांचे आकलन करण्याची आपली क्षमता विकसित होऊन आपण त्यांचा अनुभव घेण्यास पात्र ठरतो. मग आपल्यातील प्रत्येक संवेदनेचा अनुभव आपले बहिर्मन करू शकते.*_

                            _*श्वासोच्छ्वासाच्या सजगतेचा अभ्यास करताना नैसर्गिक श्वासाचे निरीक्षण करण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यात आपण सुसूत्रपणा आणण्याचा किंवा नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत नाही. त्याचप्रमाणे विपश्यना भावना वा अभ्यासातही आपण शारीरिक संवेदनांचे फक्त निरीक्षण करावयाचे असते डोक्यापासून पायापर्यंत व पायापासून डोक्यापर्यंत, एका टोकापासून दुसऱ्या टोक्यापर्यंत शरीराच्या सगळ्या भागांत आपले लक्ष पद्धतशीरपणे फिरवावयाचे असते. पण हे करीत असताना आपल्याला एखाद्या विशिष्ट संवेदनेच्या मागे लागावयाचे नाही. किंवा एखाद्या विवक्षित संवेदनेला वगळूपण द्यावयाचे नाही. संवेदनांचे केवळ निःपक्षपाती निरीक्षण हाच आपला प्रयत्न यावेळी हवा. शरीरात ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रकारच्या संवेदना प्रकट होतात त्याबद्दल फक्त सजगता हवी. मग संवेदना पुढील कोणत्याही प्रकारच्या का असेनात उष्णता, गारवा, जडपणा, हलकेपणा, खाज, धडधडणे, आकुंचन प्रसरण, दाब, पीडा, मुंग्या येणे, स्पंदन, कंपन किंवा अन्य कोणताही प्रकार...*_


_*निरीक्षण, केवळ निरीक्षण*_

                        _साधकाने कोणत्याही विशिष्ट वा असामान्य गोष्टीचा शोध घेऊ नये वा त्याची अपेक्षा करू नये. *शरीरावर उत्पन्न होणाऱ्या सर्वसामान्य नैसर्गिक संवेदनांचे फक्त निरीक्षण करावे....*_

                    _संवेदनांची उत्पत्ती कोणत्या कारणाने होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. संवेदना कदाचित हवामानाच्या परिस्थितीमुळे निर्माण होत असतील. आपल्या विशिष्ट आसनामुळे असतील. शरीरातील जुना रोग किंवा कमकुवतपणा त्याला जबाबदार असेल किंवा आपण घेतलेल्या आहाराचा तो परिणाम असेल. संवेदना निर्मितीचे कारण गौण आहे. त्यांची आपण दखल घेण्याची जरूर नाही. *आपण लक्ष केंद्रित केलेल्या शरीराच्या भागावरच्या त्या क्षणाला निर्माण होणाऱ्या संवेदनांची स्पष्ट जाणीव ठेवणे हेच फार महत्त्वाचे आहे.*_

                        _आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा शरीराच्या काही भागावर संवेदनांची जाणीव आपल्याला होते, काही भागावर होत नाही याचे कारण संवेदना ग्रहण करणारी आपली क्षमता अजून पूर्णपणे विकसित झालेली नाही. आणि म्हणूनच फक्त तीव्र संवेदनाच आपल्याला जाणवतात. तरल किंवा सूक्ष्म संवेदना आपल्या पकडीत येत नाहीत. तरी देखील आपण शरीरात इतरत्र होणाऱ्या जास्त तीव्र संवेदनांकडे दुर्लक्ष करून, त्यांना महत्त्व न देता आपल्या ठरलेल्या क्रमाने शिस्तबद्ध निरीक्षण करीतच रहावे. आपण जेव्हा एकाग्रतेचा प्रज्ञा विकसित करण्याचे प्रशिक्षण अभ्यास केला तेव्हा एका जाणीवपूर्वक निवडलेल्या आलवनावर सर्व लक्ष केंद्रित केले. त्याच क्षमतेचा उपयोग करून आपले सगळे लक्ष आपण शरीराच्या एका भागावरून दुसऱ्यावर नेत नेत सगळ्या शरीराचे निरीक्षण पद्धतशीरपणे पूर्ण करावयाचे. अशा प्रकार हळूहळू आपण अशी अवस्था गाठू की, शरीराच्या प्रत्येक भागात आपल्याला कोणत्या ना कोणत्या संवेदनेची अनुभूति होतच राहील._

                    _जेव्हा आपण श्वासोच्छ्वासाच्या सजगतेचा अभ्यास केला त्यावेळी केव्हा केव्हा आपला श्वास फार खालीवर व अनियमित भासत असे. नंतर तो टप्याटप्याने शांत, हलका, मंदमंद होत गेला._

                    _त्याप्रमाणे जेव्हा विपश्यना भावनेचा अभ्यास आपण सुरू करतो तेव्हा आपल्याला अतिशय स्थूल, तीव्र, क्लेशकारक संवेदना जाणवतात व त्या फार काळ टिकतात असे वाटते. त्याच वेळेला तीव्र भावनिक किंवा फार जुन्या आठवणी किंवा विचार उत्पन्न होऊन मानसिक वा शारीरिक अस्वस्थता, शारीरिक पीडा निर्माण करतात. श्वासोच्छ्वासाच्या अभ्यासाच्या वेळेस आला होता तसाच अडथळा येथेही येतो. राग, द्वेष, आळस, प्रक्षुब्धता व संशय या अडथळ्यामुळे आपली प्रगती रोखली जाते. हे अडथळे इतके बळावतात की संवेदनांबद्दल जागरूक राहणे शक्यच होत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आपल्याला परत श्वासोच्छ्वासावर लक्ष देण्यास सुरुवात करण्याशिवाय गत्यंतरच नाही. त्यानेच मनाची शांती वाढेल व मन परत तीक्ष्ण व धारदार होईल._

                        _एकाग्रता भंग झाल्यास पराभवाची जरादेखील भावना न आणता एकाग्रता पुन्हा प्रस्थापित करा. हे पण लक्षात घ्या की, या साऱ्या अडचणी आपल्याला मिळालेल्या यशामुळे उद्भवलेल्या आहेत. आत खोलवर दडून राहिलेले काही संस्कार चालना मिळाल्यामुळे उफाळून वर आले व बहिर्मनावर उमटू लागले. हळूहळू चालू ठेवलेल्या प्रयत्नामुळे आणि कोणत्याही प्रकारच्या तणावाशिवाय काम चालू ठेवल्याने मनात परत शांती व एकाग्रताही प्रस्थापित होईल. तीव्र भावना, विचार उत्पन्न होतील व निघून जातील. आपण संवेदनांची जाणीव पुन्हा प्रस्थापित करू शकू. या सतत अभ्यासाने स्थूल संवेदनांची परिणती एकसारख्या व सूक्ष्म संवेदनांत होईल, आणि अखेरीस वेगाने उदय व व्यय होणाऱ्या कंपनांचाच अनुभव येईल._

                    _*पण संवेदना तीव्र आहेत वा सूक्ष्म आहेत, सुखद आहेत वा दुःखद, एकसारख्या आहेत की भिन्न आहेत, याला ध्यानाच्या दृष्टीने फारसे महत्त्व नाही. आपले काम फक्त त्यांचे निःपक्षपाती निरीक्षण, अवलोकन करणे हेच राहिले पाहिजे.* दुःखकारक संवेदनांमुळे येणारी अस्वस्थता असो वा सुखद संवेदनांचे आकर्षण असो, आपण आपले काम अखंडपणे चालूच ठेवले पाहिजे. आपण आपके मन विचलीत होऊ देता कामा नये. आपले काम हे ज्याप्रमाणे आपल्या प्रयोगशाळेत तटस्थ निरीक्षणात व्यग्र असतात त्याच तटस्थतेने संवेदनांकडे बघत राहणे हेच असले पाहिजे._

_*अनित्य, दुःख व अनात्मबोध*_

                            _आपण चिकाटीने ध्यानाचा पाठपुरावा केल्यास आपल्या संवेदना, ह्या सतत बदलत असतात ही स्वाभाविक गोष्ट आपल्या लक्षात येईल. प्रत्येक क्षणी.. शरीराच्या प्रत्येक भागात संवेदना ह्या उत्पन्न होत असतात व प्रत्येक संवेदना ही सतत होणाऱ्या बदलाचेच प्रतीक असते. प्रत्येक क्षणी शरीराच्या प्रत्येक भागात सतत बदल होत असतात. विद्युतचुंबकीय वा जीवरासायनिक क्रिया चालूच असतात. तसेच याहीपेक्षा शीघ्रगतीने मनात प्रक्रिया घडत असतात व त्यांचाच परिपाक शेवटी शारीरिक बदलामध्ये होत असतो._

                            _सतत बदलत जाणे, अनित्यता वा क्षणभंगुरत्व हेच मन व शरीर यांचे अंतिम सत्य आहे. त्यांचा स्वभाव आहे. यालाच पाली भाषेत 'अनिच्च' असे म्हणतात. ज्या परमाणू कणांनी आपले शरीर बनलेले आहे ते क्षणाक्षणाला निर्माण होतात व लय पावत असतात. प्रत्येक क्षणाला मनातदेखील एका मागोमाग एक विचार येतात व नष्ट होतात. शारीरिक असो वा मानसिक, आतील असो वा 'बाहेरील सर्व जग सारखे बदलतच असते. प्रतिक्षण बदलतच असते. पूर्वीदेखील ही गोष्ट आपल्याला माहिती असेल, बौद्धिक स्तरावरही कदाचित ही गोष्ट आपल्याला समजलेली असेल, पण आता विपश्यना भावनेच्या अभ्यासामुळे क्षणभंगुरत्व व अनित्यत्वाची प्रत्यक्ष अनुभूति आपण स्पष्टपणे आपल्या शारीरिक चौकटीतच घेऊ क्षणिक संवेदनांचा स्पष्ट अनुभव आपल्या नाशवंत स्वभावाचाच पुरावा नाही का ?_

                        _शरीरातील प्रत्येक कण, मनातील प्रत्येक क्रिया, गतिमान आहे, सतत परिवर्तनीय आहे. क्षणाच्या पलीकडे अशा कणाचे अस्तित्वच राहत नाही. ज्याला माझे म्हणून बिलगून रहावे असे काही नाहीच. ज्याला मी किंवा माझे म्हणावे असे काही नाहीच. हा 'मी' म्हणजे सर्वत्र नित्य बदलणाऱ्या क्रियांचे एकत्रीकरणच नाही. का ?_

                           _अशा प्रकारे साधकाच्या लक्षात दुसरे एक सत्य येऊ लागते. 'अनात्म'. वस्तुतः खरा असा मी नाहीच. नित्य असा 'मी', 'अहं' नाहीच. नित्य बदलणाऱ्या मानसिक व शारीरिक क्रियांनी तयार झालेला 'मी' ही एक अतिरंजित कल्पना विकसित करण्याचे प्रशिक्षण आहे. आणि यालाच आपण एवढे समर्पित झालो आहोत. शरीराचा व मनाच्या अगदी खोलवर जाऊन घेतलेल्या शोधामुळे आपल्या असे लक्षात येईल की इथे अपरिवर्तनीय गाभा असा नाहीच. बदलत्या प्रक्रियेखेरीज स्वतंत्र अस्तित्व असे नाहीच. सर्व गोष्टी क्षणभंगुरत्वाच्या अधिपत्यानेच भरून उरल्या आहेत.. त्याखेरीज अस्तित्वच नाही. आपल्या नियंत्रणाबाहेरच्या सतत बदलणाऱ्या केवळ व्यक्तिनिरपेक्ष घटनाच आहेत._

                    _दुसरेही सत्य आपल्याला स्पष्ट होऊ लागते ते हे की, 'मी' व 'माझे' ची आसक्ती किंवा यातील गुंतवणूक ही दुःख निर्माण केल्याशिवाय राहाणारच नाही. कारण कधी ना कधी, ज्या गोष्टीला आपण कवटाळून असतो ती संपणारच किंवा आपण म्हणजे 'मी' तरी स्वतःच्या नियंत्रणाबाहेरील, क्षणभंगुर, अनित्य, सतत बदलणाऱ्या, अतिरंजित वा भ्रामक गोष्टीबद्दलची आसक्ती हीच तर दुःख निर्माण करते. सर्व गोष्टी आपल्याला कोणीतरी सांगितल्या म्हणून नव्हे, तर आपल्या स्वतःच्या अनुभवावरून संवेदनांच्या निरीक्षणामुळे समजू लागतात._

 _*समता*_

                _स्वतःला दुःखी होण्यापासून कसे वाचवावयाचे? दुःखमुक्त कसे जगावयाचे? याचे उत्तर घडणाऱ्या घटनांमुळे प्रतिक्रिया न करता केवळ निरीक्षण करणे हेच आहे. एखाद्या अनुभूतिचा पाठलाग करणे किंवा दुसरीपासून दूर पळणे, हे जवळ करणे, ते दूर ढकलणे यापेक्षा मनाची शांत अवस्था टिकवून, मनाचा समतोल कायम राखून, येणाऱ्या प्रत्येक अनुभवाचे निःपक्षपाती निरीक्षण करणे यानेच आपण दुःखमुक्त होणार आहोत.._

                    _हे तर अगदी सोपे वाटते नाही? पण जेव्हा आपण एखादा तास ध्यान करावयाच्या विचाराने बसतो व दहा मिनिटांतच गुडघ्यांना कळ लागते तेव्हा काय करावयाचे? ताबडतोब आपण व्यथित होतो. दुःखाचा तिटकारा करू लागतो, ते दूर ढकलण्याची इच्छा करू लागतो. पण ते तसे जात नाही. उलट आपण जो जो ते घालवण्याची इच्छा करू लागतो, त्याचा द्वेष करू लागतो, तो तो त्याची तीव्रता अधिकाधिक वाढत राहते. शारीरिक पीडांचे रुपांतर मनाच्या क्रोधरुपी अस्वस्थतेत होते._

                        _आपण एक क्षण या शारीरिक पीडेचे फक्त निरीक्षण करावयास शिकलो, एक क्षणभर का होईना पण ही आपली पीडा आहे. आपल्याला पीडा जर जाणवते आहे या भ्रामक कल्पनेतून आपण वर येऊ शकलो, जसा एखादा डॉक्टर याच्याकडे येणाऱ्या रोग्याच्या व्याधीची तपासणी करतो त्याप्रमाणेच आपणही जर आपल्या पीडेची तपासणी केली तर आपल्या असे ध्यानात येईल की, आपण होऊन ही पीड़ा बदलायला लागते. ती कायम तर राहतच नाही पण प्रतिक्षण बदलतच असते. तिचा व्यय होतो, परत उदय होतो, परत तिच्यात बदल होत असे होतच राहते._

                        _जेव्हा हे वैयक्तिक अनुभवावर आपल्याला समजू लागते तेव्हा मात्र ही पीडा • आपल्यावर मात करून आपणावर नियंत्रण करू शकत नाही. कधी पीडा लवकर नाहीशी होते, कधी दीर्घकाल टिकते. पण त्यामुळे आपले मन मात्र विचलीत होत नाही. आपण दुःखग्रस्त होत नाही. कारण आपण त्याकडे तटस्थपणे पाहू शकतो. अलिप्तपणे वावरू शकतो._

*_मुक्तीचा मार्ग_*

                            _*सजगता व समता यांचा विकास केल्यास आपण स्वतःस दुःखमुक्त करू शकतो. स्वतःबद्दलच्या सत्याच्या अज्ञानापासूनच आपल्या दुःखास सुरुवात होते. अज्ञानाच्या अंधारातच मन हे राग, द्वेष, आवड, नावड अशा प्रतिक्रिया करत राहते. ही प्रत्येक प्रतिक्रिया आत्ता तर दुःख निर्माण करतेच पण अशा घटनांची श्रृंखला तयार करते की भविष्यातही त्यामुळे दुःखाखेरीज दुसरे काहीच निर्माण होत नाही._

*_कारण व परिणाम यांची ही श्रृंखला कशी तोडायची ?_*

                    _अज्ञानात केलेल्या पूर्व कर्मामुळे जीवनास सुरुवात तर झालीच आहे. मनाचा व शरीराचा प्रवाह सुरू झाला आहे. मग काय आत्महत्या करायची ? नाही, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. आत्महत्या करतांना मनाची अवस्था कशी असणार? ते दुःख, तिटकारा, व द्वेष ह्यांनी पूर्ण भरलेले असणार. त्यामुळेच पुढे येणारे जे काही आहे ते पण दुःखमयच असणार व म्हणून अशा प्रकारचे कृत्य कधीच सुखकारक होणार नाही._

                        _जीवनाला सुरुवात झाली आहे व त्यापासून सुटका नाहीच तर मग विषयज्ञानाचा पाया असणारी सहा ज्ञानेंद्रियेच नष्ट करावयाची का? आपण आपले डोळे फोडू शकू, जीभ तोडू शकू, नाक-कान यांचा नाश करू शकू, पण आपण साऱ्या नाश कसा करणार ? मनाचा नाश कसा करणार? तसे केल्यास परत ती निरर्थक आत्महत्याच ठरणार नाही का ?_

                            _सर्व दृश्य, ध्वनी या प्रकारचे सहाही ज्ञानेंद्रियांचे विषयच आपण नष्ट करावयाचे का? ते तर शक्यच नाही. हे सगळे जगच अशा अगणित विषयांनी भरलेले आहे. त्यामुळे या सर्वांना आपण नष्टही करू शकणार नाही. एकदा का सहा इंद्रिये अस्तित्वात आली की त्यांना आपण नष्ट करू शकणार नाही. त्यांना त्यांच्या विषयापासून दूर ठेवणे केवळ अशक्यच आहे. त्याचबरोबर जेव्हा या इंद्रियांचा त्यांच्या विषयांशी स्पर्श होईल, तेव्हा तेव्हा संवेदनांची निर्मिती होणारच. पण त्याचबरोबर संवेदना हीच एक अशी कडी आहे की जेथे दुःखाची साखळी तुटू शकत. दुःखाच्या साखळीचा नाजुक जोड म्हणजेच संवेदना प्रत्येक संवेदना आवड-नावड यांची निर्मिती करते. या क्षणिक व अंध प्रतिक्रिया ताबडतोब प्रखर होऊन, बहुगुणित होऊन तीव्र राग व द्वेष यांच्यात रुपांतरित होतात. त्यातूनच वर्तमानात व भविष्यात दुःख निर्मिती होत असते. या अंध सवयीमुळेच आपण आपोआपच दुःख निर्मितीच्या चक्रात अडकतो._

                    _*विपश्यना भावना अभ्यासातूनच आपण प्रत्येक संवेदनेविषयी जागरूक राहू शकतो. मनाची स्थिरता विकसित करू शकतो. प्रतिक्रिया थांबवून आपण संवेदनांचे द्वेषरहित, कामनारहित, आसक्तीरहित, तटस्थ निरीक्षण करू शकतो. त्यामुळे आता या संवेदनांपासून तृष्णेऐवजी प्रज्ञाच विकसित होते. या अंतर्दृष्टीस पाली भाषेत 'पञ्ञा' असे म्हणतात. ती म्हणजे हे सर्व क्षणभंगुर, मर्त्य आहे, हे नित्य बदलणारे आहे, त्यांची निर्मितीच विनाशासाठी झाली आहे याची अनुभूति होय,*_

                            _प्रज्ञेमुळे दुःखाची साखळी तुटते. दु:ख नष्ट होते. राग व द्वेष यांच्या नवीन प्रतिक्रिया निर्माण होत नाहीत व दुःख निर्माण होण्याचे काही कारणच शिल्लक राहत नाही. दुःख निर्मितीचे कारण हे कर्मच आहे. राग व द्वेष यांच्या अंध प्रतिक्रिया हेच मनाचे कर्म आहे. 'संखार' [संस्कार] असे त्याला म्हणतात. जेव्हा मनाला संवेदनांची जाणीव असते पण मन शांत व समतेत असते. त्यावेळी अंध प्रतिक्रिया होत नाहीत. म्हणून दुःखाचे कारणच नाहीसे होते. ह्या प्रज्ञाजागृतीमुळे आपण आपल्यासाठी होणारी दुःख निर्मितीच थांबवितो._

 _*भगवान बुद्ध म्हणत :-_*

                *_"सर्व संस्कार अनित्य आहेत. जेव्हा त्यांना आपण प्रज्ञापूर्वक जाणतो, तेव्हा दुःखापासून आपण अलिप्त होतो. हाच तर शुद्धीकरणाचा मार्ग आहे. “_*

                        *_येथे 'संस्कार' शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे. मनाच्या अंध प्रतिक्रियांना 'संस्कार' असे म्हणतात. कर्माच्या फळाला, त्यापासून मिळणाऱ्या परिणामांना देखील 'संस्कार' असेच म्हणतात. जसे बीज तसेच फळ. आयुष्यात आपल्याला ज्या गोष्टीशी सामना करावा लागतो, ते सर्व शेवटी आपल्या मानसिक कर्माचे फळच असते. म्हणूनच व्यापक अर्थाने संस्कार म्हणजे या जगातील निर्माण झालेले, तयार केलेले, यात भरलेले सर्व काही आहे.* निर्माण झालेल्या सर्वच गोष्टी अनित्य आहेत. मग त्या शारीरिक असोत वा मानसिक असोत. विश्वातील सर्व गोष्टी अनित्यच आहेत. जेव्हा आपण आपल्या प्रज्ञेने या सत्याचा विपश्यना साधनाविधिद्वारे अनुभव करतो तेव्हा दुःख नाहीसे होते. कारण तेव्हा दुःख निर्माण करणाऱ्या सवयीपासून आपण मुक्त होतो. याचा अर्थ दुःख निर्माण करणाऱ्या रागाच्या व द्वेषाच्या प्रतिक्रिया आपण थांबवितो. हाच तर मुक्तीचा मार्ग आहे._*

                     _सारे प्रयत्न आपण प्रतिक्रियांपासून परावृत्त होण्यास कसे शिकावे, नवे संस्कार कसे निर्माण न होऊ द्यावे यासाठी करीत आहोत. संवेदना प्रकट होतात आणि आवड नावड यांची सुरुवात होते. या छोट्याशा क्षणीच जर आपण जागृत नसलो तर याची तीव्रता वाढून त्याचेच रूपांतर राग व द्वेष यांच्यात होते. यातूनच तीव्र विकारांची निर्मिती होते व त्याचा परिणाम आपले बहिर्मन दुर्बल होण्यात होतो. आपली सद्विवेक बुद्धी बाजूला पडते. त्याचा परिणाम म्हणजे आपण वाचिक व शारीरिक दुष्कृत्ये करू लागतो. त्यामुळे आपले व इतरांचे नुकसान करून घेतो. त्यामुळेच आपण आपल्यासाठी आता व भविष्यातही दुःखाची निर्मिती करून घेतो. केवळ एका क्षणाच्या अंध प्रतिक्रियेमुळे हे घडत असते._

                    _पण जर आपण प्रतिक्रियेच्या निर्मितीच्या क्षणी जागृत असलो म्हणजेच, संवेदनांची जाणीव ठेवली तर आपण प्रतिक्रिया न करण्याचा व त्यांना बहुगुणित न करण्याचा मार्ग अवलंबू शकतो. आपण जर राग किंवा द्वेष विरहित प्रतिक्रियांचे निरीक्षण केले तर आपल्या बहिर्मनाला दुबळे करणाऱ्या राग व द्वेषाच्या प्रतिक्रिया व त्यातूनच जन्मणाऱ्या विकारांना आवर घालू शकू. अशावेळी संवेदनांची केवळ निर्मिती होते व त्या नष्ट होत असतात. मन मात्र समतोल व शांतच राहते. यामुळे आता तर आपण आनंदी, सुखी राहतो पण भविष्यातही सुखाची आकांक्षा धरू शकतो कारण आपण प्रतिक्रियाच केलेली नसते._

                        _प्रतिक्रिया थांबविण्याची क्षमताच फार मोलाची आहे. जेव्हा आपण आपल्या शरीराच्या संवेदनांबद्दल जागृत असतो, त्याच वेळेला आपण आपल्या मनाची स्थिरता व शांती कायम राखतो, त्याच क्षणी मुक्ती असते. कदाचित ध्यानाच्या सुरुवातीला असे क्षण फारच थोडे असतील व इतर वेळी मन हे त्याच्या राग-द्वेषाच्या सवयीतच बुडालेले असेल. पण सतत अभ्यासाने ह्या काही क्षणांचे सेकंद होतील. सेकंदाची मिनिटे होतील व शेवटी मनाची ही जुनी सवय मोडेल, नंतर मन निरंतर शांतीत व सुखात स्थिर होईल. अशा रीतीने दुःख निर्मितीच थांबविता येईल व आपली दुःख निर्मिती आपणच बंद करू शकू._

*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*

*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जगण्याची कला.....विपश्यना साधना_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०१/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼



No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...