🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_वासना विमुक्तीचा मार्ग_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*कोशल देशाची राजधानी महानगरी श्रावस्ती.* त्या काळात भगवान बुद्ध श्रावस्ती शहरांत अनाथपिंडिक निर्मित जेतवनांत विहार करीत होते. फार मोठ्या संख्येने साधक साधिका भगवानांकडून विपश्यना साधना शिकत होते. वेळोवेळी धर्मचर्चा होत होती._
_भगवान बुद्धांची अमृतवाणी ऐकण्यासाठी नगरातील अन्य लोक देखील येत असत. त्यांना त्याचा चांगला उपयोगही होत असे. *एक दिवस अभय नावाचा ब्राह्मण धर्मप्रवचनासाठी आला.* त्या दिवशी विपश्यना साधनेमुळे साधक सगळ्या मनोविकारांपासून वासनांपासून कसा मुक्त होतो, हे भगवानांनी समजावून सांगितले. अभय हा गृहस्थ होता. कामवासनेने पीडित होता. त्यामुळे तो फार व्यथित असे. त्या विकारापासून मुक्त होण्याची त्याची तीव्र इच्छा होती. त्याने अनेक उपाय करून पाहिले पण कामवासनेवर विजय मिळविता आला नाही. भगवानांच्या प्रवचन श्रवणाने त्याच्या आशा पल्लवित झाल्या. ही साधना आपल्या परंपरागत चालत आलेल्या दार्शनिक मान्यतांना पुष्ट करीत नाही, परंतु युक्तिसंगत वाटते. म्हणून या वैज्ञानिक साधनेचा अभ्यास करून मला वासनेपासून सुटका करून घेतली पाहिजे. त्याने विचार केला की घरातील भोग विलासमय वातावरणांत राहून विपश्यना साधनेच्या सहाय्याने पूर्ण मुक्ती मिळविण्यास फार काळ लागेल. म्हणून तो घरदार सोडून भिक्षु होऊन भगवानांच्या विहारात राहू लागला. विपश्यना साधनेचा अभ्यास करू लागला. विपश्यना साधनेमुळे त्याला अनेक प्रकारचे फायदे झाले. विकारांचे शमन झाले. त्याला वाटले की आता कामवासनेचेही निर्मूलन झालेले आहे. परंतु अजून *'अनुशय क्लेश' च्या रूपाने कामवासनेचे पूर्वसंस्कार अंतर्मनाच्या खोल गाभाऱ्यात सुप्तावस्थेत पडून आहेत न त्यांची उदीरणा होऊ शकली आहे, न निर्जरा.*_
_भिक्षु अभय भिक्षाटनासाठी रोज नगरात जात असे. भिक्षुंच्या नियमाप्रमाणे नेहमी नजर खाली ठेवूनच भिक्षा घेत असे आणि विहारात परत येत असे व भोजन करून ध्यानात मग्न होत असे._
_एक दिवस भिक्षाटन करीत असतांना एका घरासमोर भिक्षा पात्रात भिक्षा घेत होता. भिक्षा वाढणाऱ्या गृहिणीने पायांवर सुरेख मेहेंदी काढली होती. तिच्या त्या आकर्षक पायांवर त्याची नजर गेली आणि आपल्या स्वभावाविरुद्ध त्याची नजर वर गेली. समोर लावण्यवती तरुणी उभी होती. अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे पहातच राहिला. असं लावण्य त्याने त्यापूर्वी कधी पाहिलचं नव्हतं. भिक्षु पाहत असल्याचे तिच्या लक्षांत येताच त्या रमणीने मधुर हास्य केलं. तिला आपल्या सौंदर्याचा अभिमान वाटला आणि हसत, लचकत पावले टाकीत ती आपल्या घरांत निघून गेली._
_भिक्षु अक्षय विहारात परत आला. पण त्याला जेवण गोड लागले नाही ध्यानातही विमग्न होऊ शकला नाही. एक सारखा तो लोभस चेहरा, मनमोहक हास्य व चित्ताकर्षक सुवर्ण काया, त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागली. भिक्षु कामातुर झाला. ध्यान भावनेत जरासेही मन टिकेना. कामविचारातच मन गुरफटले. तो लोभस चेहरा, ते हास्य, ती देहयष्टी, साधक भिक्षु अभयची अगदी केविलवाणी दशा झाली. मध्येच त्याचे मन जागे होई व त्याची त्यालाच कीव येई. घृणा वाटे. जाणत होता की अशाप्रकारे आत्मघृणेमुळे आपली विकारातून मुक्तता होणार नाही. पण काय करणार ?_
_सौभाग्याने भगवान बुद्धांची धर्मवाणी कानांत घुमली. *“रुपं दिस्वा सतिमुट्ठा - रूपसौंदर्य पाहून मन चळलं, सजगता नष्ट झाली. मिथ्या झाली.*_
_कारण *“पियनिमित्तं मनसिकरोतो"* मनात प्रिय मानलेल्या आपल्या प्रियनिमित्तांचे चिंतन सुरू झाले._
अशा अवस्थेत
*_'भारतचित्तो' वेदेति चित्त._*
_शरीरावर उत्पन्न होणाऱ्या संवेदना जाणू तर लागतो पण ती सुखद - प्रिय मानून मन त्यांत आसक्त होऊन जाते. मनालाही त्या सुखद संवेदना वाटतात._ आणि
*“तं च अज्झोस तिट्ठति”*
_त्यातच मन डुंबत जाते. त्याचा परिणाम असा होतो की,_
*_"तस्स वड्ढन्ति आसवा”_*
_अशा व्यक्तीचे आस्त्रव वाढतात व भवसंस्काराची वृद्धी होते._
_अशा प्रकारच्या भवसंस्कारांचे [जे की *'भवमूलोपगामिनो'* भवाच्या मुळ्या अथवा भवंगाकडे नेणाऱ्या संस्कारांचे] अंतर्मनामध्ये भक्कम स्थान होते व असे संस्कार संग्रहित होऊ लागतात._
_भगवानांच्या या शब्दांनी साधक अभय विजेचा झटका बसावा तसा खडबडून सावध झाला. तीव्र कामवासनेच्या जागृतीची ही घटना त्याच्या मुक्तीसाठी अद्भूत प्रेरक घटना ठरली. त्याने आपल्या स्मृतिला - सजगतेला सतिमुट्ठाकडून सतिपट्ठानकडे वळविले. मोठा पराक्रम केला. यथाभूत ज्ञानदर्शन - सत्यज्ञानदर्शन देणारी विपश्यना सुरू केली. यावेळी माझ्या मनांत काम वासना प्रबळ झाली आहे. त्यामुळे माझ्या शरीरात संवेदना उत्पन्न झाल्या आहेत. या दोन्हीकडे तो तटस्थवृत्तीने, साक्षीभावनेने पाहू लागला. ही वासना आली त्यासोबत येणारी संवेदना दोन्ही अनित्य आहेत, अशाश्वत आहेत, अनित्य असा त्यांचा स्वभावधर्म आहे. पाहू या. किती वेळ राहतात ते. बस्स! पाहत राहिला. त्यांना दूर हटवण्याचा उपक्रम बंद केला आणि मग विपश्यना साधनेने आपले कार्य सुरू केले. तात्काळ त्याची त्या वादळातून मुक्तता झाली. इतकेच नव्हे तर अशा त-हेने संवदेनाप्रति साक्षीभाव ठेवीत राहिल्यामुळे अंतःकरणातील सुप्त अशा कामविकारांचा क्षय झाला. तो जीवनमुक्त झाला._
*_भिक्षु अभय अरहंतांतील एक झाला._*
*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*
*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*
*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०५/०९/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_5.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment