_*भगवान बुद्धांच्या शिकवणीचा मूलभूत सिद्धांत*_
*प्रतित्यसमूत्पाद* हा भगवंतांच्या शिकवणीचा मूलभूत सिद्धांत होय. *एकाचा विनाश झाला की त्यासोबतच दुसऱ्याची उत्पत्ती सुरू होते ह्या नियमालाच भगवंतांनी प्रतित्य-समुत्पाद नियम म्हटले आहे. (प्रतित्यसमुत्पाद किंवा प्रत्यय समुत्पाद)*.
*_प्रत्येक उत्पन्न होणाऱ्या वस्तूचा प्रत्यय आहे. प्रत्यय आणि हेतू (कारण) समनार्थक शब्द असल्याचे वाटते. परंतु प्रत्ययाचा अर्थ आहे उत्पाद; संपल्यावर उत्पाद म्हणजे एकाचा शेवट झाल्यावर, ते नष्ट झाल्यावर दुसऱ्याची उत्पत्ती._* भगवंतांनी सांगितलेला प्रत्यय, अशा प्रकारचा हेतू आहे. (कारण आहे) जो कोणत्याही वस्तू किंवा घटनेच्या उत्पन्न होण्याच्या आधीच्या क्षणीं नेहमीच लुप्त होतांना दिसतो. प्रतित्यसमुत्पाद कार्यकारण नियमाचा अविच्छिन्न नव्हे तर विच्छिन्न प्रवाह असल्याचे सांगतो. *प्रतित्यसमुत्पाद ह्याच विच्छिन्न प्रवाहाबद्दल पुढे नागार्जुनांनी आपल्या शून्यवादास विकसित केले*
*प्रतित्यसमुत्पाद पूर्णतः विज्ञानावर (Science) आधारित असून अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे.* मूळ सिद्धान्त येणेप्रमाणे :
👉 *'जाती,'* (जन्म घेणे) जरा व मरण ह्यांचा हेतू आहे; म्हणून 'जाती' हेच जरा-मरणाचे कारण
होय.
👉 *'भव'* (समष्टिगत संसार) जातीचा हेतु आहे; म्हणून भव' हेच जातीचे कारण होय.
👉 *'उपादान'* (प्राप्त करण्यासाठी प्रयत्न) 'भवचे' कारण होय.
👉 *'तृष्णा'* उपादानाचे कारण होय.
👉 *'वेदना'* ही तृष्णेचे कारण आहे.
👉 *'स्पर्श'* हा वेदनेचे कारण आहे.
👉 *'षडायतन'* (सहा इंद्रिये) ही स्पर्शाची कारणे आहेत.
👉 *'नाम-रूप'* (मन-शरीर) षडायतनाचे कारण आहेत.
👉 *'विज्ञान'* नाम-रूपाचे कारण आहे.
👉 *'संस्कार'* विज्ञानाचे कारण आहे.
👉 *'अविद्या'* संस्कारांचे कारण आहे.
*'अविद्या' म्हणजे केवळ विद्येचा अभाव नसून ती चित्ताची अंधकारमय अवस्था होय. अशा अवस्थेमध्ये जे 'अनित्य' आहे, ते 'अनित्य' असल्याचे लक्षात येणे संभवनीय नसते, जे दुःख आहे, ते दुःख असल्याचे लक्षांत येणे संभवनीय नसते. जे 'अनात्म' आहे ते 'अनात्म' असल्याचे लक्षात येणे संभवनीय नसते. ह्यास्तव अविद्या हीच संस्कारांची जनक आहे. जेथे अविद्या नाही, तेथे चित्तावर पडलेली छाया नाही, म्हणजेच संस्कार नाही.*
*संक्षिप्तरूपाने 'प्रतीत्यसमुत्पाद' येणेप्रमाणे -*
*१)* अविद्येपासून संस्कार (संखार Activities) निर्माण होतात.
*२)* संस्कारामुळे विज्ञान (विज्ञान Consciousness)
*३)* विज्ञानामुळे नामरूप (नाम रूप Mind and Matter or Body)
*४)* नामरूपामुळे षडायतन (सलायतन Six spheres of senses)
*५)* षडायतनामुळे स्पर्श (फस्स Contact)
*६)* स्पर्शामुळे वेदना (वेदना Feeling) सुख, दुःख, ना सुख, ना दुःख.
*७)* वेदनेमुळे तृष्णा (तण्हा Desire)
*८)* तृष्णेमुळे उपादान (उपादान Grasping)
*९)* उपादानामळे भव (भव Becoming) कम्म भव आणि उपपत्तीभव
*१०)* भवामुळे जाति (जाती Rebirth)
*११)* जातीमुळे जरा, मरण, दुःख, शोक, चिंता, निराशा, चित्तखेद यांची उत्पत्ती होते. (Decay, Death, Sorrow, Lamentation, Despair)
*१२)* जरा, मरण, दुःख, शोक, निराशा या दुःखाच्या स्कंधांची उत्पत्ति होते.
वरील *बारा निदान किंवा कड्यांपैकी प्रथम दोन भूतकालाविषयी, मधील आठ वर्तमान आणि शेवटच्या दोन भविष्यकाळाविषयी आहेत. ही प्रक्रिया सदोदित (Adinifinitum) सुरूच असते. तिची उत्पत्ती कधी झाली हे सांगता येत नसल्यामुळे, जीवाची (Life -flux) उत्पत्ती अविद्येमुळे कधी झाली, हे सांगता येत नाही. (= अनतमग्गो यंम् संखारो. अविज्जा
पुब्बकोटि न पञ्ञायरे)*
*प्रतित्यसमुत्पाद भगवंतांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा आधारस्तंभच होय.* त्यांचे तत्वज्ञान समजून घेण्याची ही गुरुकिल्लीच आहे. त्यांनी म्हंटले आहे - *"जो प्रतित्यसमुत्पादास बघतो, तो धर्मास *
(भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानास) बघत असतो. ज्याला धम्म दिसतो त्याला प्रतित्यसमुत्पाद दिसत असतो."* हे पाच उपादान स्कंध (रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान) प्रतित्यसमुत्पन्न (विच्छिन्न प्रवाहाप्रमाणे उत्पन्न) असतात.
प्रतित्यसमुत्पादाच्या नियमाला मानवाच्या व्यक्तित्वास अनुलक्षून त्यांनी त्याची १२ अंगे असल्याचे सांगितले. *सती केवठपुत्राचा* असा समज होता की, दुसरे नव्हे, हेच एक विज्ञान (जीव) संसरण - संधावन (आवागमन) करीत असते. भगवंतांनी तो सर्वथा चूक असल्याचे त्याला सांगितले; आणि भिक्खुंना समजावून सांगितले, *"भिक्खुंनो! ज्या-ज्या प्रत्ययामुळे विज्ञान (जीव-चेतना) उत्पन्न होते, तीच त्याची संज्ञा असते. चक्षुच्या निमित्ताने (जे) विज्ञान उत्पन्न होते, त्याची चक्षुविज्ञान हीच संज्ञा असते. याचप्रमाणे श्रोत्र-घ्राण-संज्ञा, रस, काया, मनविज्ञान संज्ञा असते. जसे ज्या-ज्या निमित्ताने (प्रत्येयाने) आग जळते, तिथे तिथे त्याची संज्ञा असते. काष्ठ-अग्नी, तृण-अग्नी, वगैरे."*
*"हे (पंचस्कंध) उत्पन्न झालेले आहेत. त्यांना नीटपणे प्रज्ञेने बघितल्यावर (आत्म्याच्या अस्तित्वाबद्दलची) शंका नष्ट होते. भिक्खुंनो! हे पंचस्कंध (भौतिक तत्व आणि मन) निर्माण होतात. हे स्वतःच्या आहारामुळे निर्माण होतात. हे स्वतःच्या आहाराच्या निरोधामुळेच निरुद्ध होत असतात."*
*पाली भाषेत पटिच्च समुप्पाद येणेप्रमाणे :*
*_अविजा पच्चया संखारा, संखारा पच्चया विज्ञानं. विज्ञान पच्चया नामरूपं. नामरूपं पच्चया सळायतनं. सलायतन पच्चया फस्स. फस्स पच्चया वेदना. वेदना पच्चया तण्हा. तण्हा पच्चया उपादानम्. उपादान पच्चया भवो. भव पच्चया जाति. जाति पच्चया जरा-मरण- सोक- परिदेव- दुःख- दोम्मनस्स- उपायास संभवन्ति. एवं एतस्स केवलस्स दुक्खखन्धस्स समुदयो होति।_*
*संकलन :* *महेश कांबळे*
No comments:
Post a Comment