🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सामनेर पञ्हो_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*धम्मपद अट्ठकथेच्या शंभराव्या भागात* सारीपुत्त आणि कुंडलकेशा यांच्यामधील प्रश्नोत्तरोंचा प्रसंग खूप विस्ताराने दिला आहे. त्यातील निवडक भाग पुढीलप्रमाणे, परिव्राजीकेने सारीपुत्तांना विचारले, एक प्रश्न विचारू? हा भगिनी विचार. सारीपुत्ताने मृदृ आवाजात म्हटले, परिव्राजिकेने एक एक करून हजार प्रश्न विचारले. सारीपुत्त थेरांनी प्रत्येक प्रश्नाचे खुप चांगल्या प्रकारे उत्तर दिले. सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर सारीपुत्तांनी विचारले, भगिनी, तू तर खूप प्रश्न विचारले. आता मी तुला एक प्रश्न विचारला तर उत्तर देणार का? भन्ते, समजले तर मी उत्तर अवश्य देणार, परिव्राजिकेने म्हटले. *थेर सारीपुत्तांनी प्रश्न विचारला, एक नाम किं?* प्रश्न ऐकून परिव्राजिका निरुत्तर झाली, तिने पराभव स्वीकारला व म्हणाली. भन्ते, या प्रश्नाचे उत्तर मला माहिती नाही. तुम्ही सांगा या प्रश्नाचे उत्तर काय आहे. *सारीपुत्तांनी म्हटले, भगिनी हा बुद्ध प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी पहिल्यांदा प्रवज्जा करुन घ्यावी लागेल. बुद्धांवर विश्वास ठेवावा लागेल जम्बु परिव्राजिका तयार झाली. सारीपुत्तांनी तिची भिक्खुणी संघामध्ये दीक्षा करुन दिली. तिचे केस कुरळे असल्या कारणाने तिला कुंडलकेशा हे नाव पडले. हजार प्रश्नांची उत्तरे सारीपुत्तांकडून ऐकल्यानंतर तिला ज्ञानप्राप्ती झाली. परंतु त्यामुळे ती अर्हत झाली नाही.* परंतु दहा प्रश्नांची उत्तरे समजल्यानंतर परिव्राजिका अर्हत झाली. *दहा बुद्ध प्रश्न, जे आज सुद्धा श्रामनेर दिक्षा घेतात, तेव्हा त्यांच्याकडून हे दहा बुद्ध प्रश्न गिरवून घेतले जातात श्रामनेर प्रश्नांच्या स्वरुपात "सामनेर पञ्हो" दीक्षेच्या सहा भागांपैकी हा एक महत्वाचा भाग आहे.* श्रामनेर होण्यासाठी कायदेशीर वयोमर्यादा सात वर्ष आहे. ज्या प्रश्नांची उत्तरे सात वर्षांच्या श्रामनेरांना सुद्धा माहित असतात, त्या *दहा पैकी पहिलाच प्रश्न सारीपुत्तांनी जम्बु परिव्राजिकेला विचारला होता, एक नाम किं? एक म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही. आणि काही काळानंतर दहा प्रश्नांची उत्तरे अनुभवाच्या आधारे समर्पक उत्तरे, फक्त बुद्धीला पटणारी नाही तर समजून उमजून ती परिव्राजिका, कुंडल केशा अर्हत झाली. या दहा प्रश्नांमध्ये जवळपास संपूर्ण धम्म सामावलेला आहे. परंतु या दहा प्रश्नांचे बौद्धिक स्तरावर निराकरण झाले नाही तर अध्यात्मिक समाधी चा सराव केल्यास, ती व्यक्ती अर्हतपद प्राप्त करू शकते.*_
_मूळ तीपीटकात कुमारप्रश्न नावाचं एक छोटेसे सूत्र आहे. *कुमारप्रश्न (कुमारपञ्हा) ज्यास 'श्रामणेर प्रश्न' म्हणून काहीजण ओळखतात, ते पवित्र तीपीटकातील सुत्तपिटक, खुद्दकनिकाय,खुद्दकपाठपाळि, या ग्रंथात उपलब्ध आहे.* सदर निकायावरील कुमारपञ्हवण्णना या अठ्ठकथेनुसार तथागत सम्यक संबुद्धांनी सोपाक नावाचे सात वर्षीय महाश्रावक होते, त्यांना उपसंपदा द्यायची, या हेतूने १० प्रश्न विचारले. इथे महाश्रावक सोपाक यांचे वय ७ वर्ष म्हणून त्यांचा आणि सदर प्रश्नावलीचाच एकंदरीत उल्लेख 'कुमार प्रश्न' म्हणून नोंदविला गेला. ते दहा प्रश्न व त्यांची उत्तरे हे जरी सूत्र रुपात असली, तरी त्यांच्या सविस्तर विश्लेषणात उत्तुंग असे बौद्ध जीवन तत्वज्ञान दडलेलं आहे.
_१, २, ...,१० या संख्या म्हणजे गणितीय मूल्य, ज्या वस्तू मोजण्यासाठी, गणना करण्यासाठी असतात. या सूत्रात त्या संख्या 'वैश्विक सत्य' सांगण्यासाठी, ज्याचा हेतू अर्थातच 'अखिल जीवसृष्टीचे कल्याण' व्हावं हाच आहे, केलेला आहे. उत्तरे तंतोतंत एका वाक्यात आहेत. त्यांचा अर्थ अतिशय खोल, गहन असा आहे._
*_पहिला प्रश्न आहे एक नाम किं? म्हणजे एक काय आहे. उत्तर आहे, एक आहार आहे. ज्यावर सर्व प्राणिमात्र अवलंबून असतात. संत नेहमीच म्हणतात, सबका मालिक एक. खरं हेच की, आहारच सर्वांचा मालक आहे, सर्व त्यावर विसंबून असतात. निर्भर असतात. काही प्राणी तर फक्त पाण्याचा आहार घेतात, काही हवेचा आहार घेतात. तर काहींचा सूर्यप्रकाश आहार असतो म्हणून आहारच सर्वांचा एकमेव मालक आहे. श्रामणेर दिक्षेचे सहा भाग फक्त श्रामनेर व भिक्खूंसाठीच महत्वाचे नसून ते उपासक-उपासिकांसाठीही तेवढेच महत्वाचे आहेत. त्यात स्वारस्य, कुतूहल असणारे व तत्वज्ञानाची आवड असणारे लोक व अभ्यासक यांना सहा भागांमध्ये जवळजवळ संपुर्ण धम्म सापडतो. हे सहा भाग बौद्धांच्या कठीण व आयोजित प्रशिक्षणाचा एक भाग आहे. या कठोर प्रशिक्षणात सुलाखून निघालेला भिक्खू किंवा उपासक मानवतेसाठी मोलाचा ठरतो. सयूंक्त निकायातील अत्थिरागसुत्तात आहाराचे चार प्रकार आहेत असे बुद्ध सांगतात,
_*“चत्तारोमे, भिक्खवे, आहारा भूतानं वा सत्तानं ठितिया सम्भवेसीनं वा अनुग्गहाय कतमे चत्तारो? कबळीकारो आहारो ओळारिको वा सुखुमो वा, फस्सो दुतियो, मनोसञ्चेतना ततिया, विञ्ञाणं चतुत्थंइमे खो, भिक्खवे, चत्तारो आहारा भूतानं वा सत्तानं ठितिया सम्भवेसीनं वा अनुग्गहाय”।*_
पहिला कबळीकर आहार– रोजच्या आहारातील
जड, पातळ अन्न, जे प्राणी-वनस्पती-माणस जन्म ते मृत्यूपर्यंत खात असतात.
दुसरा स्पर्श आहार– सहा इंद्रियांना
सहा इंद्रिय विषयांचा स्पर्श होतो,
त्यातून उत्पन्न होणारा. सहा इंद्रिय
म्हणजे डोळे, कान, नाक आदी, व सहा इंद्रिय विषय म्हणजे दृश्य,ध्वनी,वास आदी..
तिसरा मनोसंचेतना आहार आणि चौथा विज्ञान आहार.
इथे मनो संचेतना आहार म्हणजे कामभव
आणि रूप-अरुप भव आहार व पटीसंधीनामरूप म्हणजे विज्ञान आहार.
सोप्या भाषेत मनोसंचेतना आहार म्हणजे मनात योजलेला हेतू (intention) आणि विज्ञान म्हणजे जाणीव. _*
◆ *_२. दोन काय आहे? नाम-रूप_*
तथागत सांगतात, “कतमञ्च भिक्खवे,
नामरूपं? वेदना, सञ्ञा, चेतना, फस्सो, मनसिकारो – इदं वुच्चति नामं। चत्तारो
च महाभूता, चतुन्नञ्च महाभूतानं उपादायरूपं। इदं
वुच्चति रूपं।इति इदञ्च नामं,
इदञ्च रूपं।इदं वुच्चति, भिक्खवे, नामरूपं।
हे नामरूप काय आहे? नाम म्हणजे – वेदना, संज्ञा, चेतना, स्पर्श आणि मनसिकार व रूप म्हणजे– पृथ्वी,जल,तेज आणि वायू.
◆ *_३. तीन काय आहे?
तीन वेदना. सुखद वेदना,दुःखद वेदना आणि असुखद-अदुःखद वेदना._*
◆ *_४. चार काय आहे?
चार आर्य सत्य._*
दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोध मार्ग.
◆ *_५. पाच काय आहे? पाच उपदान स्कंध_*
वेदना स्कंध, संज्ञा स्कंध,
संस्कार स्कंध, विज्ञान स्कंध आणि रूप स्कंध.
◆ *_६. सहा काय आहे?
सहा आयतन (खिडक्या). सहा इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन._*
◆ *_७. सात काय आहे?
सात बोध्यंग._*
'बोधाय संवत्तन्तीति खो, भिक्खु, तस्मा ‘बोज्झङ्गा’ति वुच्चन्ति।'
बोधी जागृत करण्याचे सात अंग. स्मृती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी, उपेक्षा,
◆ *_८. आठ काय आहे? आर्य अष्टांगिक मार्ग._*
सम्मादिट्ठि (सम्यक दृष्टी) , सम्मासङ्कप्पो (सम्यकसंकल्प), सम्मावाचा (सम्यकवाणी), सम्माकम्मन्तो (सम्यककर्म), सम्माआजीवो (सम्यकअजीविका), सम्मावायामो (सम्यक व्यायाम), सम्मासति (सम्यक स्मृती), सम्मासमाधि (सम्यक समाधी)
◆ *_९. नऊ काय आहे?
नऊ प्रकारचे जीव ठिकाण.-* इथे सत्तावासा
मधील 'वासा'– ठिकाण ही मनोवस्था (stations of consciousness) असते असे बौद्ध विद्वानांचे मत आहे.
◆ *_१०. दहा काय आहे?
दहा अंगांनी युक्त असलेला ज्यास पुढील
प्रशिक्षणाची आवश्यकता उरली नाही त्यास अर्हत असे म्हणतात._*
_ही दहा अंगे काय आहेत? तर अरिय अष्टांगिक मार्गातील आठ अंग आणि सम्यकज्ञान, सम्यकविमुक्ती असे दहा अंग. जो आर्य श्रावक सम्यक दृष्टी,सम्यक वाणी आदी उपरोक्त दहा अंगांच्या पलीकडे गेलाय, सदर मार्गातील प्रशिक्षणाच्या पलीकडे गेला आहे. निष्णात बनला आहे तो अर्हत._
अशाप्रकारे उपरोक्त दहा प्रश्नाच्या उत्तरांचा जर विस्तार करत करत गेलं तर विमुक्तीचे सर्वोच्च ज्ञान दडलेलं आहे हे स्पष्ट होते. वर केवळ आजच्या बौद्ध युवा वर्गाला हे दहा प्रश्न आणि त्याची उत्तरे माहित असावयास हवीत या हेतूने संक्षिप्त नोंद करून ठेवली आहे. हे दहा प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांमध्ये संपूर्ण तिपिटक सामावलेले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या दहा अंगांनी, गुणांनी युक्त व्यक्ती अर्हत होऊ शकतो._*
*_जर या प्रश्नांचे तसेच उत्तरांचे चिंतन केल्यास, दैनंदिन जीवनात आचरण केल्यास ही सुद्धा एक साधना, तप होऊ शकते. तो केवळ अभ्यास च नाही तर परित्राण अर्थात रक्षण आहे. रोग, दुःख, भिती आपत्ती, संकट इत्यांदीपासून संरक्षण म्हणूनच या दहा बुद्ध प्रश्न व त्यांची उत्तरे यांना परित्राण पाठाच्या ग्रंथांमध्ये आवश्यक व महत्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे._*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_महेश कांबळे_*
*११/०५/२०२२*
*संदर्भ : -*
*१) धम्मपद अट्ठकथा*
*२) मैत्री संपूर्ण धम्म आहे*
*३) कुमारप्रश्न*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/05/blog-post_10.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment