नालंदा डायरी 2022
हार्वर्ड ऑक्स्फर्ड केंब्रिज ही जागतिक विद्यापीठे जन्माला आली नव्हती तेव्हा भारतात जगभरातून विद्यार्थी बौद्ध विद्यापीठ नालंदा येथे
रसायन शास्त्र ,
खगोल शास्त्र ,
गणित शास्त्र ,
शरीर शल्य चिकित्सा शास्त्र ,
प्लास्टिक सर्जरी ,
यंत्रविज्ञान - तंत्रविज्ञान या सारखे 60 च्या वर विषय शिकण्या साठी येत होते .
मुख्य भाषा ही पाली होती आणि ज्ञान भाषा ह्या मुख्यत्वे पाली , प्राकृत , छंदस ह्या भाषेतून मधून शिक्षण दिले जात होते .
भगवान बुद्धां च्या ज्ञानाचा प्रभाव या विद्यापीठातील शिक्षण पद्धती वर झालेला होता .
नालंदा महाविहार येथे धम्म सेनापती सारीपुत्र यांचा महा स्तूप आहे .
त्याची रचना आणि बुद्ध गयेतील महाबोधि महाविहार च्या स्थापत्य रचना जवळ पास सारखी होती असे अवशेषामध्ये दिसते .
येथे अनेक अर्हँत भिक्षू भिक्षुनि बोधिचित्त अवस्था प्राप्त भिक्षूंचे स्तूप चैत्य येथे पाहायला मिळतात .
येथे भगवान बुद्धाची बामीयान सारखी विशाल अशी 80 फूट उंच प्रतिमा होती त्याच्या पायाचे अवशेष तेवढे शिल्लक आहेत .
अनेक बोधिसत्व शिल्प येथे उत्खननात सापडले आहेत .
10000 विद्यार्थी
1200 शिक्षक
जवळ पास प्रत्येकी 7 -10 विद्यार्थ्याला शिकवायला एक शिक्षक नियुक्त केला गेला होता .
सर्व शिक्षक हे विद्वान पंडित बौद्ध भिक्षू होते .
संपूर्ण विद्यापीठ हे निवासी विद्यार्थ्याचे विद्यापीठ होते .
एका रूम मध्ये एकच विद्यार्थी राहत असे .
प्रत्येक रूम मध्ये ग्रंथ ठेवण्यासाठी खास बुककेस (पुस्तक ठेवण्या ची जागा ) होते .
प्रत्येक रूम मध्ये ध्यान कक्ष (शुन्यागार होते )
10-20 विद्यार्थ्यासाठी कॉमन स्नान गृह होते .
सांडपाणी काढण्या साठी सिंधू कालीन स्थापत्या सारखी नाली काढलेली आहे .
संपूर्ण विद्यापीठ हे 9 ते 10 चौरस वर्ग किलोमीटर मध्ये पसरलेले होते .
आपण आज उत्खनन करून पाहत असलेले विद्यापीठाचे अवशेष केवळ एक ते दीड चौरस वर्ग किलोमीटर चाच परिसर आपल्या ला दिसतो आहे .
अजून 9 चौरस वर्ग किलोमीटर जागेचे उत्खनन झालेले नाही .
तेथे गाव आणि लोक वस्ती आहे .
लोक हटन्यास तयार नाही .
त्या मुळे कोणता आणि किती इतिहास आपल्या ला माहीत नाही हे सांगता येत नाही .
बखत्यार खिलजी भारतात येण्या आधी अनेक वेळेस भारतातील वर्ण व्यवस्था मानणाऱ्या ब्राह्मणांनी विद्यापीठ बंद पाडण्याचे प्रयत्न केले ते यशस्वी झाले नाही म्हणून स्थानिक ब्राह्मणांनी बख्त्यार खिलजी ला आक्रमण करण्या चे आमंत्रण दिले . खिलजी च्या विजया साठी यज्ञ पवित् कर्म कांड केले गेले आणि 9 मजली ग्रंथालयाला आग लावून संपूर्ण विद्यापीठ जाळले .
येथे थेरवाद , महा यान , वज्र यान तिन्ही बौद्ध ज्ञान शाखेचे त्रिपिटक अभ्यासनारे बौद्ध भिक्षू एकत्र राहत होते .
नालंदा युगा मध्ये बौद्ध धम्माचा आणि अखंड जम्बुदीपातील बौद्ध साम्राज्य पाडाव करण्या साठी वैदिक ब्राह्मण आणि जैन मुनी लोकांनी युती केली आणि त्यातूनच प्रति क्रांती करून मौर्य साम्राज्य नष्ट करण्या साठी शुंग ब्राह्मणाने कुटील कारवाया केल्या आणि तेव्हा पासून भारताचे तुकडे होत गेले भारत गुलाम बनत गेला .
भारताला पुन्हा एकदा समृद्ध राष्ट्र म्हणून महा सत्ता म्हणून पुन्हा उभे व्हायचे असेल तर भारतीयांनी भगवान बुद्ध सम्राट अशोक आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्व ज्ञानाला स्वीकारावेच लागेल .
(टीप:- जेव्हा बौद्ध स्थळांना भेटी देण्या साठी जाल तेव्हा तुमच्या सोबत Arvind Bhandare Shantaramji Ingle यांच्या सारखे जाणकार माहिती देणाऱ्या पाली भाषेचे बौद्ध स्थळांचे रिसर्च करणाऱ्या संस्थे सोबत नक्की जा .)
नालंदा विश्व विद्यापीठ.
नालंदा युनेसको हेरीटेज .
12/04/2022
No comments:
Post a Comment