महाराष्ट्राचे शिल्पकार सातवाहन आहेत. हे सह्याद्री मध्ये फिरताना पाहायला मिळते.
महाराष्ट्रातील दुर्ग निर्मितीचे श्रेय हे सातवाहन सम्राटांना जाते. सातवाहन सम्राटांचे लिखित इतिहास कुणी पुस्तकरूपाने लिहला नसला तरी सातवाहन राजांच्या अधिकाऱ्यांनी जिथे तिथे आपले अधिकार क्षेत्रात आपले शिलालेख कोरून ठेवले आहेत. किल्ल्यावर पाषाणात कोरलेली लेणी त्याचे प्रमाण आहे. महाराष्ट्रातील व्यापारी बंदरे ही सातवाहनांच्या समृद्ध राज्याचे प्रतिनिधित्व करतात. सातवाहन यांच्यापेक्षा महाराष्ट्रात इतर कोणता ही राजा श्रेष्ठ ठरत नाही एवढे बलाढ्य कारकीर्द सातवाहन यांची आहे. सातवाहन हे बौद्ध राजे होते हे दुखणे असल्याने सातवाहनांच्या ऐवजी दुसऱ्याच राजांना महाराष्ट्राचे निर्माते समजतात. संपूर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य असणारा सातवाहन एकमेव सम्राट आहे. ज्याचे राज्य महाराष्ट्राच्या संपूर्ण भूभागावर होते. मग सातवाहन दुर्लक्षित का? कोणी सातवाहन यांच्या जागेवर इतर राजा बसवला? प्रश्न निर्माण करण्याची आवश्यकता आहे. जर सातवाहन पुढे आले तर सातवाहन यांनी बुद्ध लेण्या स्तूप विहार निर्माण केली. महत्वाचे म्हणजे बुद्धांच्या शरीर धातू जतन केले. आणि आर्थिक सुबत्ता यावी म्हणून लोकांना उद्योग धंदे निर्माण करून दिले. मोठमोठ्या बाजारपेठा निर्माण केल्या व्यापारी बंदरे निर्माण केली. गावापासून नगरांपर्यंत लोकांचा सोयी सुविधा निर्माण केल्या. इतरांचे कर्तुत्व काय?
सातवाहन नंतर महाराष्ट्रात वाकाटक ते शिलाहार राजे होवून गेले. सातवाहन यांच्या काळात क्षत्रप देखील बौद्ध राजे महाराष्ट्रात होवून गेले. ह्या सर्वांनी बुद्धांच्या शिकवणीला सातासमुद्रालीकडे नेले. धम्म शिकवणीला अनुसरून दुःखमुक्त जीवन केले. पण वेळोवेळी हा इतिहास लपावला जातो.
महाराष्ट्राचे हेच खरे शिल्पकार आहेत. महाराष्ट्रात असलेले गडकोट ही देखील सातवाहन यांची निर्मिती आहे. नंतर शिवाजी राजे यांनी सतराव्या शतकात त्याची डागडुजी करून घेतली. गडकोटांची देणगी ही खरी सातवाहन यांची आहे. लेण्या महाराष्ट्रात सातवाहन यांनी निर्माण केल्या. प्रसिद्ध व्यापारी बंदरे सातवाहन यांनी निर्माण केले. मोठ्या बाजारपेठा हे देखील सातवाहन यांनी निर्माण केले. शिक्षणासाठी स्वतःचा राजमहाल देणारे सातवाहन राजे आम्हाला का? सांगत नाहीत लोक. नागार्जुन यांनी विद्यापीठासाठी सातवाहन राजा गौतमपुत्र यज्ञ सिरी सातकर्णी आम्हाला का लपवला जातोय. आमच्यावर राजा ही थोपवला गेलाय आणि समाज सुधारक ही आमच्यावर थोपवले गेले. आमचा इतिहास च कधी आम्हाला समजू दिला जात नाही. किती भयाण परिस्थिती आहे. आम्हाला सहिष्णू बनून जर का चळवळ केली तर आमचा घात निश्चित आहे. आम्हाला आमच्या इतिहासाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. थोपावलेले नेतृत्व जसे कामाचे नसते तसेच थोपवलेले हे राजे महाराजे देखील कामाचे नसतात. बाबासाहेब हे कुण्या एका समाजाचे नाहीत मान्य पण बाबासाहेब समजल्यावर विषमतावादी धर्मात नांदणाऱ्या लोकांसाठी आम्ही आमचा इतिहास का लपवायचा. बाबासाहेब ज्यांना समजले ते धर्मांतर करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. पण स्वार्थासाठी बाबासाहेबांचा वापर करणारे लोक म्हणतील की, बाबासाहेब यांना एका जाती मध्ये बांधू नका म्हणून. मला त्या सर्वांना एवढेच सांगावे वाटते की, बाबासाहेब हे बौद्ध होते, त्यांनी धम्माची दीक्षा दिली, ते बुद्धापुढे नतमस्तक झाले. विषमतेवर त्यांनी समता यावी म्हणून बुद्ध धम्म दिला. आणि आम्ही बौद्ध आहोत आणि ही काही जात नाही. आशिया खंडाचा प्रमुख धर्म हा बौद्ध धम्म आहे. आशिया खंडाचा ४९ टक्के लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. अश्यावेळी बाबासाहेब यांना एका जातीत अडकवू नका म्हणणाऱ्या लोकांनी बाबासाहेब यांच्या सारखे धर्मांतर का करू नये. नुसते बाबासाहेब स्वीकारणे म्हणजे राजकीय लोकांसारखे आहे. या गोष्टींमुळे आम्ही आमचा इतिहास समजू शकलो नाही. बाबासाहेब यांनी सरळ इशारा दिलाय की बौद्ध धम्माचा इतिहास हाच तुमचा खरा इतिहास आहे. म्हणून सातवाहन यांचा इतिहास समजून घ्या. या पुरोगामी बहुजनवादी लोकांनी सातवाहन कधी सांगितला नाही आम्हाला साडे तीनशे वर्षाच्या इतिहासात अडकवून ठेवले. आम्ही साडे तीनशे वर्षाच्या इतिहासातून मुक्त होवून २३०० वर्षापूर्वीचा इतिहास समजून घ्यायला शिकले पाहिजे. बौद्ध लोकांनी सहिष्णू होवून इतिहासाची माती करू नका.
आम्हाला राष्ट्रवादा सोबत बौद्ध धम्म आणि त्याचा दैदिप्यमान वारसा पण दिला आहे.
महाराष्ट्रात आम्ही सातवाहन सम्राटांचे गुण गौरव गाऊ , सातवाहन राजांची कीर्ती गाऊ सांगू ह्या सह्याद्रीला पुन्हा त्याच्या गौरवाची गाथा. सातवाहन कालखंड महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णयुग आहे. यासाठी सातवाहन सम्राटांना कोणत्या साम्राज्यावर आर्थिक लूट करावी लागली नाही. सातवाहन यांनी सर्वसामान्य माणसाला व्यापारी बनवले.
आपलाच इतिहास लपवू नका मूठभर लोकांना खुश करण्यासाठी आपल्या इतिहासाचा गळा घोटून टाकू नका.
मिनाक्खीपुत्र रविंदो सातकर्णी
( मी सातवाहन यांना आमचा पूर्वज मानतो. सातकर्णी हे नाव माझ्या नावसोबत यापुढे नक्कीच जोडले जाईल. मी महाराष्ट्रात जन्माला आलो तो ही सातवाहन यांच्या राज्यात त्यामुळे सातवाहन यांना आम्ही आमचे पूर्वज मानतो.)
No comments:
Post a Comment