🌼🌼 *_इद्धी*_ 🌼🌼
_ज्याला सर्वसाधारणपणे आपण चमत्कार म्हणतो, त्यासाठी गुप्त शक्ती मनुष्याला स्वभावतःच प्राप्त झालेल्या आहेत काय ? ह्याचे उत्तर होय असे आहे; परंतु ज्या स्वाभाविक शक्ती आहेत, अद्भुत नव्हते. *विशुद्धिमार्ग ह्या ग्रंथात सांगितलेल्या विशिष्ट पद्धतीवर त्या शक्तीची वाढ केली जाऊ शकते. विज्ञानाच्या ह्या शाखेचे पाली नाव इद्धि-विजाननं (इद्धी-विद्याज्ञान = Knowledge of super natural power), असे आहे. अर्हतांनी दाखविलेल्या अद्भुत चमत्कारांची शेंकडो उदाहरणे बौद्धांच्या धम्मग्रंथात सापडतात; त्या शक्तीला इद्धि विद्या म्हटलेले आहे.* ज्याला ही आत्मसात होते, तो वेगवेगळ्या नैसर्गिक शक्तीचा कौशल्याने योग्य वापर करून अद्भुत वाटणारा कोणताही चमत्कार करून दाखवू शकतो. उदाहरणार्थ त्याच्या मनास वाटेल तसा वैज्ञानिक प्रयोग._
*_इद्धी विद्येचे दोन प्रकार आहेत. ते असे :_*
*१)* बहीर, म्हणजे ज्यात अद्भुत चमत्कारी कार्य करणारी शक्ती आहे अशी. ती तपश्चर्येने तसेच मंत्रांच्या पठणाने किंवा विशिष्ट औषधीद्रव्याने किंवा इतर बाह्य मदतीनेसुद्धा तात्पुरती प्राप्त होऊ शकते.
*२)* 'शासनिक', म्हणजे ज्यात ही शक्ती अंतस्थ आत्म-विकासाद्वारे मिळालेली असते. ती सर्वव्यापी असून लौकिक-इद्धि च्या अद्भुत चमत्कारापेक्षा अधिक शक्तिशाली असते.
तपश्चर्या म्हणजेच ध्यानाचा मार्ग सतत अनुसरल्याने त्यांचे हळूहळू तपस्वी लोकांमध्ये परिवर्तन होते व तेच लोक ह्या शक्तीचा उपयोग घेऊ शकतात.
*_बहीर इद्धि-शक्ती नष्ट होऊ शकते; परंतु शासनिक इद्धि-शक्ती एकदा प्राप्त केल्यावर कधीच नष्ट होत नाही. लोकोतर ज्ञान (Occult) एकदा मिळविले की, ते कधीच नष्ट होत नाही; आणि केवळ ह्या ज्ञानामुळेच निर्वाणाची परिपूर्ण अवस्था अर्हताला माहीत होते. हे ज्ञान अष्टांगमार्गाचे उदास जीवन अनुसरल्याने प्राप्त होऊ शकते._*
_महास्थविर सुमंगल ह्यांनी कर्नल ऑलकॉट यांना स्पष्ट सांगितले होते की, ही श्रेष्ठ शक्ती ज्याने आपल्या मनोविकारांवर विजय मिळविला असतो केवळ त्यालाच, म्हणजे अर्हतालाच कायमची प्राप्त झालेली असते. ह्या शक्तीचा उपयोग वाईट वृत्तीचा माणूसही करू शकेल; परंतु ते कार्य थोड्या अवधिकरिता मर्यादित असते. कह्यांत न येणारे मनोविकार जादूगारावर पुन्हा वरचढ होतात आणि शेवटी तो त्यांना बळी पडतो._
_भगवान बुद्धांनी लोकोत्तर इद्धि प्राप्त केली होती. ती त्यांना पूर्णावस्थेमुळे प्राप्त झाली. कमी अधिक प्रमाणात त्यांच्या काही शिष्यांनादेखील ती प्राप्त झाली. आयुष्मान मोग्गल्लान ह्यांनी अद्भुत चमत्कार करण्याचे अलौकिक सामर्थ्य सर्वाधिक प्राप्त केले होते. ह्याउलट आयु. आनंद स्वतः भ. बुद्धांचे अतिशय जवळचे व प्रिय शिष्य अनेक वर्षांपर्यंत सोबत राहूनही अलौकिक शक्तीला मुळीच प्राप्त करू शकले नाहीत. परंतु भगवंतांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी लोकोत्तर इन्द्धी प्राप्त केली._
*_मृत व्यक्तीस चमत्काराने जागृत करता येणे शक्य आहे, असे बौद्धधम्मात अधिकारपूर्वक अजिबात सांगितलेले नाही. एवढेच नव्हे तर भ. बुद्धांनी किशा गौतमी व मोहरीचे दाणे ह्या सुंदर प्रसंगाद्वारे ह्या उलट शिकविले आहे._*
*_लोकोत्तर इद्धीचा विकास अर्हताना क्रमाक्रमाने प्राप्त होण्याजोग्या सहा अवस्था आहेत._*
१) प्रगमनशील भूतदर्शन उगम किंवा उत्पत्तीविषयी क्रमाक्रमाने जाणावयास भूतकाळाचे दर्शन घडविणाऱ्या शक्तीला क्रमाक्रमाने प्राप्त करणे,
२) प्रगमनशील दूरदृष्टी म्हणजेच भविष्यकथनाची शक्ती आणि
३) क्रमाक्रमाने तृष्णांचा आणि भौतिक वस्तुविषयीच्या आसक्तीचा लोप करावयाची ह्याच शक्तींचा अमर्यादपणे विकास झालेल्या अशा आणखी तीन अवस्था
*_अशा प्रकारे परिपूर्ण अर्हत झालेल्या व्यक्तीस कोणत्याही वस्तूच्या भूतकाळाचे इत्यंभूत दर्शन घडविणारी दृष्टी व भविष्याचे संपूर्ण दर्शन घडविणारी दूरदृष्टी प्राप्त असते; आणि तृष्णेचा व स्वार्थी आकर्षणांचा अंतिम लेशही त्याने पूर्णपणे नष्ट केलेला असतो. त्यांच्यापेक्षा अधिक उच्च प्रतीची अवस्था केवळ 'बुद्धाला' प्राप्त होऊ शकते._*
*_इद्धि मिळविण्याची चार साधने :_*
१) दृढ आकांक्षा, २) तिच्याकरिता प्रयत्न, ३) मानसिक विकास आणि ४) योग्य अयोग्य ह्यामधील तारतम्य, ही इद्धी मिळविण्याची चार साधने आहेत.
_चमत्कार दाखविणे सर्वथा असंभव नाही, परंतु समर्थ लोक अशा पुष्कळशा 'हातचलाख्या' दाखवू शकतात. ज्यांना सामान्य लोक चमत्कार समजू लागतात. परंतु *प्राकृतिक नियमांविरुद्ध कोणतीही घटना घड़ शकत नाही. अशा पुष्कळच गोष्टी आहेत ज्या प्राकृतिक नियमानुसारच घडतात. परंतु त्या 'चमत्कारासारख्या दिसतात, कारण त्यावेळी त्या प्राकृतिक नियमांविषयीचे ज्ञान अवगत झालेले नसते. त्या नियमांचा शोध लागल्यानंतर त्या घटनांना चमत्कार असे संबोधन देणे बंद होते. जसे वीज, रेडिओ, टेलिविजन, विमान, टेलिफोन, सिनेमा, इत्यादी याचा शोध लागण्यापूर्वी त्यांना काल्पनिक वस्तूच समजल्या जात असे._
*_भ. बुद्धांनी अद्भुत चमत्कार करून दाखविण्यास उत्तेजन दिले नाही. ज्यांना चमत्काराच्या मुळाशी असलेल्या तत्वांची ओळख नसेल त्यांच्या मनात चमत्कारामुळे गोंधळ उत्पन्न होईल असे आणून चमत्कार दाखविणान्यांना त्यांनी निरुत्साहित केले व मज्जाव केला. शिवाय लोकांची चमत्काराबद्दल उगाचच जिज्ञासा वाढते व ज्याला इद्धी प्राप्त असेल. त्याला त्याचा डौल दाखवावासा वाटतो. एवढेच नव्हे तर निम्न दर्जाची इडी, म्हणजे लौकिक विद्येमध्ये पारंगत असलेले काही जादूगार आणि चेटकेदेखील अद्भुत चमतकारासारखा दुसरा चमत्कार दाखवून लोकांना फसवू शकतात. अलौकिक इसी प्राप्त झाली असल्याचे खोटेनाटेच जर एखाद्या भिक्खने सांगितले तर त्यास अक्षम्य पाप समजले पाहिजे, असे तेविज्ञ्ज सुत्रात सांगितले आहे._*
*संदर्भ :-*
१) बौद्धधर्म - एक बुद्धिवादी अध्ययन
२) Buddhist Catechism
३) बौद्धधम्म जिज्ञासा
*संकलन :*
*महेश कांबळे*
२८/०२/२०२२
*_ओम मणि पद्मे हूं_*
( *_विश्व कमलस्थ बुद्धाला प्रणाम असो_* )
http://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment