*_मन आणि मनाचा स्वभाव_*
मन हे दूरवर प्रवास करू शकते. मनाला भौतिक अवस्था नसते. धम्मपद पालि ग्रंथानुसार 'मन' हे हदयातून ( हृदय ) उगम पावते. पुढे त्याचे तपशीलवार वर्णन करणार आहे.
३७. दूरङ्गमं एकचरं असरिरं गुहासयं ।
ये चित्त सञ्ञमेस्सन्ति मोक्खानि मारबन्धना ।।
दूर जाणारे, एकटे भटकणारे, अशरिरी, हृदयाच्या गुहेत ( पोकळीत ) निवास करणारे.
चित्ताचा ( मनाचा ) जे संयम करतात ते माराच्या बंधनातून मुक्त होतात.
#जणू_काही_गुहेत_राहतं ( #मन ).
रूपविञ्ञाणं डोळ्यांमुळे उगम पावते,
सोतविञ्ञाणं कानामुळे उगम पावते,
रसविञ्ञाणं जिभेमुळे उगम पावते,
गन्धविञ्ञाणं नाकामुळे उगम पावते,
फोट्ठब्बविञ्ञाणं त्वचेमुळे उगम पावते,
हे सर्व इंद्रिय विषय डोळे, कान, नाक इत्यादी मुळे उगम पावतात. यांत महत्वाचे मनोविञ्ञाणं हृदयाच्या पोकळीतून ( Cardiac Cavity ) उगम पावते. म्हणूनच लाक्षणिकरित्या म्हटले जाते जणू काही गुहेत राहतं ( मन ).
थोडक्यात, हे लक्षात घेतले पाहिजे चित्ताला / मनाला आकार नसतो, ते इंद्रिय विषय जाणते, विषय ओळखणे हा त्याचा स्वभाव असतो. जेव्हा ते त्या विषयाची अनुभूती करत असते तेव्हा आपले वास्तव्य केसांच्या रुंदीइतकंही बदलत नाही, परंतु दुरवरील विषयाचा ठाव घेऊ शकतं. दोन किंवा तीन चित्त घटक एकत्रितपणे उदय पावत नाहीत. प्रत्येक घटक हा तेव्हाच उदय पावतो जेव्हा एका विषयाचे आकलन होते.
३७. दूरङ्गमं एकचरं असरिरं गुहासयं ।
ये चित्त सञ्ञमेस्सन्ति मोक्खानि मारबन्धना ।।
दूर जाणारे, एकटे भटकणारे, अशरिरी, हृदयाच्या गुहेत ( पोकळीत ) निवास करणारे.
चित्ताचा ( मनाचा ) जे संयम करतात ते माराच्या बंधनातून मुक्त होतात.
#जसे_रूप_वेगवेगळे_असते, #तसेच_नाम_ही_वेगवेगळे_असते.
जसा एका मनुष्याच्या आकार, शरीररचना दुसऱ्या मनुष्यापासून वेगळी असते, तसेच त्यांचे मन ही वेगवेगळे असते.
जसे की जाड, गबाळे शरीर हे पिळदार शरीरापेक्षा वेगळे असते तसेच एखाद्याचे व्याकुळ, असंवेदनशील मन उत्साही, सुदृढ मनापेक्षा वेगळे असते.
निरोगी उपकारक मनाच्या गटाचे वेगवेगळे स्तर आहेत जसे की सामान्य बुद्धिमत्तेपासून ते उदात्त / थोर मनाच्या विचारांपर्यंत आणि अपायकारक वर्गातील मनाचे स्तर वेगवेगळे आहेत, जसे की दृष्ट, वाईट, तिरस्करणीय व मूर्खपणाची जाहिरात करणारे.
#मन_एकटेच_भटकत_असते
#चित्त हे क्षणात उत्पन्न होते व नष्ट होते. हाताची चुटकी वाजेपर्यंत किंवा डोळ्यांची पापणी लावेपर्यंत एक लाख करोड पेक्षा अधिक वेळा चित्त घटक उदय पावतात व नष्ट होतात.
उदय होणे व लय पावणे ही क्रिया क्षणात होत असते त्यामुळे दोन किंवा तीनच चित्त घटक दोन ते तीनच इंद्रिय विषय एकावेळी आकलन करू शकतात. खरं तर दोन किंवा तीन चित्त घटक एकाच वेळी उदय पावत नाहीत. ते एका मागोमाग एक क्षणात उत्पन्न होतात. एका चित्त घटकाने एकाच गोष्टीचे आकलन केल्यानंतर दूसरे चित्त उत्पन्न होऊन ते दुसऱ्या इंद्रिय विषयाचे आकलन करते.
सुगंधित गालिचावर बसून, खाताना, नृत्य आणि नर्तकाला पाहताना आपण निरीक्षण करतो की, पाच इंद्रिय विषय तेथे उपस्थित असतात. म्हणजेच पाहणे, ध्वनी, गंध, चव आणि स्पर्श. मन ह्या सर्व विषयांचे एकत्रित एकाचवेळी आकलन करत नाही. एका इंद्रिय विषयाचे आकलन झाल्यास दुसऱ्या विषयाचे आकलन करते.
म्हणूनच दोन किंवा तीन किंवा अधिक चित्त घटक एकाचवेळी उदयास येत नाहीत. म्हणून त्याला 'मन' एकटेच भटकते असे म्हणतात.
इथे भटकणे हा शब्द कुठेतरी जाण्यासंदर्भात नाही तर इथे विचार / विषय दूर ठिकाणी / अंतरावर जाण्यासंदर्भात आहे.
पूर्ण आकलन होण्याकरिता एका चित्त घटकाला एका इंद्रिय विषयाने जाणणे पुरेसे नसते
त्याकरिता अनेक चित्त घटकांचे एका मागोमाग एक उत्पन्न होणे आवश्यक असते. करोडो चित्त घटक चुटकीसरशी उत्पन्न होताच आपणाला असे वाटते की आपण तो इंद्रिय विषय पाहताक्षणीच जाणला, आवाज ऐकू येता क्षणीच ध्वनी जाणला, गंध येता क्षणीच सुगंध जाणला, स्पर्श करता संपर्क जाणला.
#सहा_इंद्रिय_विषय,#विञ्ञाणाचे_सहा_प्रकार ( #विषय )
दिट्ठि ( दृष्टी ) - रूपारम्मण
सद्द ( ध्वनी ) - सद्दारम्मण
गन्ध ( गंध ) - गन्धारम्मण
रस ( चव ) - रसारम्मण
फस्स ( स्पर्श ) - फोट्ठब्बारम्मण
मन - धम्मारम्मण
#किंवा
#सळायतन - #इंद्रिय_विषय / #स्वभाव*
चक्खायतनं ( डोळा ) - रूपायतनं
सोतायतनं ( कान ) - सद्दायतनं
घानायतनं ( नाक ) - गन्धायतनं
कायायतनं( त्वचा ) - फोट्ठब्बायतनं
मनायतनं ( मन ) - धम्मायतनं
दृष्यमान गोष्ट पाहून, रूपविञ्ञाण उत्पन्न होते.
ध्वनी ऐकल्याने, सोतविञ्ञाण उत्पन्न होते.
गंधाच्या सुंघण्याने, गन्धविञ्ञाण उत्पन्न होते.
चव चाखल्याने, रसविञ्ञाण उत्पन्न होते.
स्पर्श केल्याने, फोट्ठब्बविञ्ञाण उत्पन्न होते.
या पाच शरीरधर्मांना मनोंद्रियाने जाणल्यामुळे मनोविञ्ञाण उत्पन्न होते.
अशा प्रकारे संबंधित स्थिती जाणून घेण्याला चित्त ( मन किंवा विञ्ञाण ) म्हणतात.
#नोट -
रूपारम्मण = रूप + आरम्मण
रूप - भौतिक पदार्थ
आरम्मण - इंद्रिय विषय
रूपायतनं = रूप + आयतनं
रूप - भौतिक पदार्थ
आयतनं - इंद्रिय
#मनाला_भौतिक_अवस्था_नसते.
मनाला भौतिक अवस्था अथवा आकार नसतो. म्हणूनच आपण ते काळे आहे की सफेद, जाडे आहे की पातळ हे म्हणू शकत नाही.
यामध्ये फक्त इंद्रिय विषय ओळखण्याची क्षमता व संवेदना ( सुखदायक - दुःखदायक ) असतात.
#मनावर_ताबा_मिळवता_येतो.
#मनाला_वळण_लावता_येते.
समजा एखाद्याचा जन्म एका देशातील खेडेगावात झाला असेल व ती व्यक्ती तिथल्या राहणीमानाला अनुसरत असेल तर त्याला शहरी राहणीमानाचे, आचारविचाराचे प्रशिक्षण द्या. त्याचे बाह्यरूप ( Physical Appearance ) आपणांस एक दोन वर्षांत पालटलेले दिसेल. ती व्यक्ती त्याची पूर्वीची ओळख टाकून एका नवीन रुपात दिसेल. म्हणूनच जर एखाद्याचे रूप पालटू शकते तर मनाला सुदृढ बनविणाऱ्या प्रशिक्षणाने ( ध्यानाने ) चित्तातील अहितकारक, निरुपयोगी घटक बाजूला सारून त्यावर नियंत्रण मिळवून हितकारक मन विकसित करून एखाद्याला स्वतःचा सन्मान प्राप्त होऊ शकतो.
#कसे_चांगले_आणि_वाईट_चित्त_एकमेकांत_मिसळतात.
#चित्त क्षणात उदय व लय पावते म्हणून, चांगले किंवा वाईट, उपकारक ( सप्पाय ) किंवा अपायकारक ( असप्पाय ) चित्त घटक अगदी थोड्याच वेळात एकमेकांत मिसळतात. सकाळी लवकर उठून बुद्धांना वंदन करून, पंचशील घेऊन आपण चांगले विचार धारण करत असतो. त्याचवेळी एखाद्याने आपणांस खरेदीसाठी ( Shopping ) सोबत चलण्यास सांगितले असता आपल्या मनांत लोभ उत्पन्न होतो, तेव्हाच एखाद्याने येऊन आपणास काही मनाविरुद्ध सांगितले की राग उत्पन्न होतो.
जेव्हा आपण खरेदी करत असतो तेव्हा आपण लोभात गुंतलेलो असतो, त्याचवेळी जर आपल्या मनात दान देण्याचा विचार आला तर ते श्रद्धेबद्दलचे हितकारक विचार आहेत ( दान कर्मफळाच्या लाभावरील विश्वास ).
जेव्हा आपण एखाद्यावर किंवा एखाद्या गोष्टीवर रागावलेलो असतो, तेव्हा आपणांस आपल्या गुरूंचे शब्द किंवा सूचना आठवल्यास उपकारक सती पुन्हा जागृत होते.
जेव्हा पती पत्नी मनात वासना ठेवून एकमेकांशी संवाद साधतात, तेव्हा गैरसमजुतीमुळे ते रागावतात / चिडतात. दोघांपैकी एकाने दिलगिरी व्यक्त करून सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला की पुन्हा मन बदलून वासनामयी होते.
चित्त क्षणात बदलत असते म्हणून, जेव्हाही चांगले किंवा वाईट चित्त घटक उत्पन्न होतात, तेव्हा त्यात काळजीपूर्वक फरक करता आला पाहिजे तसेच जास्तीत जास्त उपकारक चित्त उत्पन्न होईल असे प्रयत्न केले पाहिजेत.
सप्पाय - उपकारक Beneficial
असप्पाय - अपायकारक Not benificial
#ध्यान
ध्यान ड्राइविंग शिकण्यासारखे आहे. केवळ पुस्तक वाचून आपण उत्तम ड्रायव्हर ( चालक ) बनू शकणार नाही. त्याकरिता आपणांस जिवंत सर्वश्रेष्ठ मार्गदर्शकाची आवश्यकता लागते. त्यानंतर अल्पावधीत तुम्ही उत्तम ड्रायव्हर होण्यास समर्थ व्हाल व इतरांनाही शिकवाल.
#मनाला ( #चित्ताला ) #का_सुधारले_पाहिजे.
आपण मनाला का सुधारले पाहिजे याची अनेक कारणे आहेत. आपण आपल्या मनाची दुर्बलता व कमकुवतपणा चांगल्याप्रकारे जाणतो. जरी काही दुष्ट लोक या जगात प्रतिष्ठेची पद प्राप्त करून बसली असतील व त्यांच्यात नैतिकतेचा अभाव असेल तर त्यांचा पुढील जन्म हा खालच्या योनीत ( 31 Planes of Existence ) होईल. ह्याच कारणाने त्यांनी आपले मन / चित्त सुधारले पाहिजे व नितीमान बनले पाहिजे.
दुष्ट आपला स्वाभिमान गमावतात. त्याची बायको - मुलं, भाऊ - बहीण, गुरुजन, नातेवाईक त्याचा अनादर करू लागतात व तो सर्वांना अप्रिय होतो. अशांनी स्वतःच्या अंत:करणाकडे दुर्लक्ष न करता, स्वतःचे मन सुधारले पाहिजे व पवित्र, प्रामाणिक व नितीमान बनले पाहिजे.
शक्यतो लोक यावर विश्वास ठेवत नाहीत की दुष्टलोक दान, शिल, भावना यांच्यापासून दूर असले तरी प्रामाणिक व नितीमान बनू शकतात. खरंतर ते त्यांच्या दुष्टकर्मामुळेच पुण्य फळ प्राप्त करू शकत नाहीत. म्हणूनच त्यांनी अहितकारक परिणामांच्या भितीतून बाहेर येऊन आपले मन सुधारले पाहिजे आणि पवित्र, प्रामाणिक व नितीमान बनले पाहिजे.
शिवाय, दुष्ट मनुष्याचा दुष्टपणा हा त्याच्या वर्तमानातच नसतो तर त्याच्या भविष्यात व पुढील जन्मात सुद्धा सोबत राहतो. त्याचे शरीर व मन संपूर्णपणे दुष्ट प्रवृत्तींच्या संगतीत राहिल्यामुळे पुण्याचा / नैतिकतेचा संचय करणे अशक्यच असते. परंतु याकारणाने त्याला परिपूर्णता ( पारमि - Completeness, Perfection ) लाभणार नाही ही भिती त्याने मनातून काढून ताबडतोब आपल्या मनाला शिस्त लावली पाहिजे.
हीच करणे आहेत की मनुष्याने आपले मन सुधारले पाहिजे.
( दुष्ट मनुष्याला पूर्णता कशी लाभते हे समजण्यास अंगुलीमालाचे उदाहरण समर्पक राहील )
*_संदर्भ :- १) अभिधम्म_इन_डैली_लाईफ_*
*_२) पूज्य_पिया_तन_*
*_३) धम्मपद_*
No comments:
Post a Comment