Thursday, 25 November 2021

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधान निर्मितीमध्ये योगदान,

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधान निर्मितीमध्ये योगदान,

विरोधकांचे आरोप व त्याचे खंडन- भाग १

==================================


२९ ऑगस्ट १९४७ रोजी सिन्हा यांनी मांडलेल्या ठरावांनुसार ७ सदस्यांची संविधानाची मसुदा समिती गठीत करण्यात यावी असा ठराव झाला. त्यानुसार ३० ऑगस्ट १९४७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. दोन महिन्यानंतर म्हणजे २७ ऑक्टोबर १९४७ रोजी मसुदा समितीची पहिली बैठक घेण्यात आली.


डॉ राजेंद्रप्रसाद यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बी. एन.राव. यांनी तयार केलेला ड्राफ्ट सर्व सदस्यांना वितरित करावा असे पत्राद्वारे कळवले परंतु बी एन राव यांच्या ड्राफ्ट सोबत इतर ज्या उपसमिती होत्या त्यांचे ही रिपोर्ट ग्राह्य धरूनच संविधानाचा नवा मसुदा तयार करायचा आहे असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इतर सदस्यांचे मत घेऊन डॉ राजेंद्रप्रसाद सिंग यांना कळवले. ( म्हणजे बी एन राव यांच्या ड्रॅफ्टवर संविधान तयार झाले, बाबासाहेब यांचे त्यात काही योगदान नवते हा दावा खोटा आहे).


३० ऑगस्ट १९४७ नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुद्यातील कलमांचे स्वतः लक्ष देऊन स्वतःच्या शब्दरचना असलेली कलमे तयार केली हे महत्वाचे व नमूद करायला हवे. २७ ऑक्टोबर १९४७ पासून मसुद्याच्या कलमावर, त्याची शब्दरचना, त्यातले बदल, कोणते शब्द वाढवावे,शब्दरचना कोणत्या कलमाची बदलावी याचा विचार करत सखोल चर्चा घडवून आणत त्यावर निर्णय घेण्यात आले. 


२१ फेब्रुवारी १९४८ ला मसुदा सादर करताना त्या मसुद्या सोबत बाबासाहेब यांनी डॉ राजेंद्रप्रसाद  यांना एक पत्र लिहले होते ते सर्वांनी वाचूनच काढले पाहिजे. त्या पत्रातील प्रस्तावना अशी आहे की ' संविधान सभेने २९ ऑगस्ट १९४७ रोजी पारित केलेल्या ठरावानुसार नियुक्त केलेल्या मसुदा समितीने तयार केलेला भारताचा नवीन संविधान मसुदा समितीतर्फे मी सादर करत आहे' ( त्यामुळे बी एन राव यांच्या ड्राफ्टच स्वीकारला गेला हे खोटे आहे हे सिद्ध होते)


या पत्रात बाबासाहेब यांनी इतर सभासदांच्या उपस्थिती बद्दल माहिती देत, मसुदा समितीने कोणते निर्णय घेतले, काय काय बदल केले याची मांडणी करत संविधानाच्या उद्देशपत्रिका पासून,भारताचे वर्णन, नागरिकत्व, मूलभूत अधिकार, संघराज्याच्या राष्ट्पतीचे अधिकार,राजसभेचे गठन आदी अनेक मुद्दे व त्यामधील बदलांवर भाष्य केले आहे.  बाबासाहेब यांनी एक एक मुद्दा घेत आधीचा मसुदा आणि नंतर तयार झालेला मसुदा यामधील कोणते बदल करण्यात आले व का केले याचे विवेचन दिले आहे. (त्यामुळे बाबासाहेब यांच्यावर त्यांनी संविधान सभेत काहीच केले नाही हा जो दावा ठोकला जातो तो किती पोकळ आहे ते कळते, जर आपण या सर्वांचा अभ्यास केला तर कळून येईल की बाबासाहेब यांना घटनेचे शिल्पकार का म्हणतात तरीही बी एन राव यांना बाबासाहेब यांनी धन्यवाद दिलेच)


२६ फेब्रुवारी १९४८ ला भारत सरकारच्या गँजेटने हा मसुदा लोकांची मते जाणून घ्यावा व त्यांचे सल्ले- मते जाणून घेण्यासाठी प्रकाशित केला आणि लोकांना संविधानाच्या मसुद्यासाठी तबल ८ महिन्याचा कालावधी दिला.( संविधान निर्मिती प्रक्रियेत लोकांचा सहभाग नवता, त्यांचा मतांचा विचार केला नाही हा दावा ही सपशेल फेल ठरतो).


डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार नाही असे बरेच लोक म्हणतात परंतु ४ नोव्हेंबर १९४८ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा जेव्हा संविधान सभेला सादर केला तेव्हा प्रचंड बुद्धीमतेच्या जोरावर त्यानी जे भाषण केले त्याचा परिणाम इतर सदस्यांवर झाला या सभेत उपस्थित असलेल्या काही सदस्यांचे मी मते देत आहे.


१ टी.टी. कृष्णमाचारी - " सभागृहाला जाणीव असेल की, तुम्ही नियुक्त केलेल्या सात सदस्यांपैकी एकाने राजीनामा दिला व त्या जागी दुसरा नेमण्यात आला.  एक सदस्य मरण पावला व ती जागा ही भरण्यात आली नाही.एक सदस्य दूर अमेरिकेत होते व त्यांचीही जागा भरण्यात आली नाही. दुसरा एकजण संस्थानचा कारभारात गुंतलेला होता व तेवढ्या पुरती ती ही जागा रिकामी होती.एक किंवा दोन सदस्य दिल्ली पासून दूर राहत होते प्रकृती अस्वस्थमुळे हजर राहू शकले नाही . तेव्हा हे संविधान तयार करण्याचे ओझे अंतिमतः डॉ आंबेडकरावंर पडले ( संविधान तयार करत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकृती फार चांगली नवती. डायबेटीस,हाय ब्लड प्रेशर, ब्रॉंनकायटीस,न्यूरायटीस सारखे आजार त्यांना असतानाही बाबासाहेब यांनी हे कार्य पूर्ण केले ) व त्यांनी हे काम यशस्वीरित्या पार पडले. हे त्यांचे कार्य निःसंशय प्रशंसनीय आहे व याबद्दल आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत."


२ काझी सयद करीमुद्दीन- " संविधानाचा मसुदा विचारार्थ ठेवण्याचा प्रस्तावावर डॉ आंबेडकर यांनी केलेल्या प्रस्ताविक भाषणाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांचे भाषण लक्षणीय होई आणि मला खात्री आहे की, पुढील पिढ्यांपर्यत एक महान 'घटनाकार' म्हणून त्यांची निश्चितपणे नोंद होईल."


३ डॉ पी एस देशमुख - " माझे सन्मानिय मित्र डॉ आंबेडकरांचे भाषण उत्कृष्ट दर्जाचे होते. सादर करण्यात आलेल्या मसुद्यावरील ते प्रारंका9 भाष्य होते . सर्वाना विदितच आहे, ते एक नामांकित वकील आहेत आणि मला वाटत त्यांच्यावरील जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. जर त्यानं पूर्ण मोकळीक मिळाली असती तर या संविधानाला त्यांना वेगळा आकार देता आला असता".


४ डॉ जोसेफ अलबन डिसुजा- " सुरवातीपासून शेवटपर्यंत तज्ज्ञांना शोभेल असे तुलनात्मकदृष्ट्या श्रेष्ठ स्वीकारण्यायोग्य, कार्यक्षम स्वरूपाचे संस्मरणीय दस्तावेज डॉ आंबेडकर आणि त्यांच्या मसुदा समितीने सादर केले आहे".


वरील सदस्यांच्या प्रतिक्रियेवरून आपल्याला समजूनच आले  असेल की बाबासाहेब यांच्या संविधान निर्मिती प्रक्रियेत योगदान नाकारणारे विरोधक किती अंधारात आहे .


- मैत्रेय दिपक

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...