*_प्रश्न ७६- मूठ मारल्यावर शत्रूचा मृत्यू कसा होतो?_*
*उत्तर* 👉 हृदयक्रिया बंद पडून (हार्ट अटॅक) माणूस क्षणात निधन पावतो, हे अलीकडे कळलेले सत्य होय. माझ्या लहानपणी कराडला बैलांच्या झुंजी लावल्या होत्या. कराड, इस्लामपुर भागांतील दोन मस्तवाल बैलांची झुंज. एका बैलाने दुसऱ्या बैलाच्या कपाळाला कपाळ भिडवले. लगेचच (टक्करसुद्धा नाही) दूसरा बैल कोलमडला आणि क्षणात गतप्राण झाला. विजयी बैलाच्या धन्याने बैल विजयी होण्यासाठी मांत्रिकाकरवी बैलावर मूठ मारली अशी चर्चा झुंज बघायला गेलेल्या मंडळीत चालू होती. आज हे आठवले की हसू येते. काय झाले असावे?
प्रचंड जनसमुदाय, विचित्र वातावरण यांमुळे घाबरलेल्या बैलाला भितीमुळे अचानक मृत्यु आला असावा.
हार्ट अटॅकमुळे क्षणात मृत्यु येतो हे पूर्वी लोकांना माहित नव्हते. त्यामुळे अशा प्रकारे मृत्यू आलेल्या व्यक्तीस मूठ मारल्याने मृत्यू आला, अशी समजूत रूढ झाली असावी.
*कारण न कळलेल्या घटनेमागे दैवी अगर अघोरी शक्तीचा संबंध जोडण्याचा मूठ मारणे हा आणखी एक अंधश्रद्धेचा प्रकार.*
*-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment