🌕 *चैत्र पौर्णिमा. चित्तमासो* 🌕
*_चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांच्या जीवनात ५ महत्वपूर्ण घटना घडल्या._*
🔹 *१.* भृगु ऋषींच्या आश्रमात प्रवेश तसेच निरोप.
🔹 *२.* उद्गक रामपुत्त यांच्या आश्रमात प्रवेश तसेच निरोप.
🔹 *३.* कपिल मुनींच्या 'सांख्य दर्शन' तत्वज्ञानाचा अभ्यास.
🔹 *४.* एक शूद्र व्यक्तीने धन दान म्हणून दिले.
🔹 *५.* सुजाताचे खीर दान.
*_१.भृगु ऋषींच्या आश्रमात प्रवेश तसेच निरोप._*
*भारद्वाजांचे गुरु ' आलारकालाम ' हे योग साधनेत निपुण असे अभ्यासक होते.* त्यावेळी ते वैशाली येते राहत होते. आणि सिद्धार्थ गौतम राजगृहाजवळील गुहाकुटपर्वत टेकडीवर पर्णकुटीत राहत होते. आलारकालाम यांना भेटण्यासाठी सिद्धार्थ गौतम तेथून निघाले. जाता जाता भृग ऋषींचा आश्रम लागला.
*भृग ऋषींचे तत्वज्ञान आणि उपासना जाणून घेण्यासाठी आश्रमात प्रवेश केला.* शाररिक कष्ट करून तपस्वी जीवन जगणे हे त्यांचे तत्वज्ञान होते. सिद्धार्थ गौतमांना हे आवडले नाही आणि त्यांनी निरोप घेतला.
दोन्ही हि घटना वेगवेगळ्या चैत्र पौर्णिमेला घडल्या. म्हणजे १ वर्ष सिद्धार्थ गौतम हे भृग ऋषींकडे होते.
*_२. उद्गक रामपुत्त यांच्या आश्रमात प्रवेश तसेच निरोप._*
*उद्गक रामपुत्त हे समाधी योग साधनेत निपुण होते. सिद्धार्थ गौतमांनी तेथे ' अकियन्या यतन ' नावाची समाधी पर्यंत अभ्यास केला.*
त्यांच्या कडून हि निरोप घेतला तो दिवस चैत्र पौर्णिमेचा होता. म्हणजे इथे ही १ वर्ष सिद्धार्थ गौतम राहिले होते.
*_३. कपिल मुनींच्या 'सांख्य दर्शन' तत्वज्ञानाचा अभ्यास._*
त्याकाळी *कपिल मुनी हे सर्व तत्वज्ञानी लोकांमध्ये प्रमुख होते. त्यांचा सांख्य दर्शन तत्वज्ञान/सिद्धांत हा सत्यावर आधारित होता. कुठली वस्तू/गोष्ट सत्य असण्यासाठी तिला प्रमाण असणे अत्यावश्यक आहे.*
ह्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून सिद्धार्थाने ३ गोष्टी ग्रहण केल्या.
१. सत्य प्रमाणावर म्हणजेच पाहिलेले किंवा अनुभवलेले असावे.
२.ईश्वर अस्तित्वाचे कुठले हि प्रमाण नाही म्हणून ईश्वर आणि आत्मा अस्तित्वाविषयीची चर्चा व्यर्थ आहे.
३.जीवनात दुःख आहे.
*_४. एक शूद्र व्यक्तीने धन दान म्हणून दिले._*
एक शूद्र जातीतील व्यक्ती जो धनगर होता त्याने तथागताना खूप सारे धन दान म्हणून दिले.
*_५. सुजाताचे खीर दान._*
इतके सारे ध्यान साधना करून हि ज्ञान प्राप्ती होत नव्हती. मग सिद्धार्थ गौतम फक्त एक फळ खाऊन राहू लागले.
प्राचीन निरंजना नदीवरील उरुवेला अर्वाचीन बुद्धगयाच्या शेजारी सेनानी गाव होते. सुजाताचे हे जन्म गाव. सध्या त्या गावाचे नाव बकरौर आहे. सुजाता हिला जसा हवा तसा सुशील, सुंदर आणि कमाई करणारा वर मिळाला आणि प्रथम पुत्रप्राप्त झाल्यावर निर्जल दुधाची खीर नैवेद्य म्हणून त्या वटवृक्षाला अर्पण करेल असे मनोगत व्यक्त केले होते.
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तिची दासी पन्ना तिथे साफसफाई साठी जाता तिला सिद्धार्थ गौतम दिसले. तिने हि घटना सुजाताला सांगितली तर स्वतः सुजाता तिथे सोन्याच्या पात्रात खीर घेऊन आली व सिद्धार्थ गौतमाने ती स्वीकारली.
सुजातकडे १००० गायी होत्या. तिने त्या सर्वांना गोड वालमी खायला घालत. त्यामुळे त्या गायींचे दूध अधिक गोड आणि पौष्टिक येत. त्या १००० गायींचे दूध ५०० गायींना, ५००चे २५० गायींना असे करून शेवटी ८ गायींना ते दूध पाजले. आणि ती खीर ह्या ८ गायींच्या दुधापासून बनवली गेलेली होती.
सिद्धार्थ गौतमाचे हे शेवटचे अन्न ग्रहण होते ज्ञान प्राप्ती पूर्वीचे. हा दिवस चैत्र पौर्णिमा इ. स. पू. ५२८ चा होता. संबोधी प्राप्ती नंतर स्वतः भगवान बुद्ध सुजाताला भेटण्यासाठी सेनानी गावी आले आणि तिला दिक्षा दिली.
बौद्ध इतिहासात सुजाताला व तिच्या खिरीला अनन्य साधारण महत्व आहे.
सर्व उपासक/उपासिकाना चित्तमासो पौर्णिमेच्या हार्दिक सदिच्छा.
*जय भीम...!*
*जय भारत...!*
*नमो बुद्धाय...!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment