Wednesday, 14 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ४५

 *_प्रश्न ४५ - जिवंत व्यक्तीपेक्षा मेलेल्या व्यक्तीचे वजन कमी भरले. काचेच्या बंद पेटीत ठेवलेली मरणोन्मुख व्यक्ती मरतेक्षणी काचेला तडा गेला असे आम्ही वाचले आहे. हे कमी झालेले वजन आत्म्याचे होते. बंद काचेच्या पेटीला तडा गेला कारण त्यातून मृत व्यक्तीचा आत्मा बाहेर गेला, असे सांगितले जाते. हे खरे की खोटे?_*

 

 *उत्तर 👉* वृतपत्रांतून विविध पुस्तकांतून छापलेल्या कथा सत्य असू शकतील वा असत्य असू शकतील. अशा कथांचा खरेखोटेपणा छापणाऱ्यांनी पडताळून पाहिलेला असतोच असे नाही. म्हणून केवळ वृत्तपत्रांत छापलेले आहे अगर पुस्तकात आहे म्हणून एखादी घटना खरी ठरत नाही.

ब्लीट्झमध्ये डॉ. भगवंतम् यांनी सत्य साईबाबांनी जपानी सिको घड्याळकंपनीच्या कारखानदाराला दर्शन देतेवेळी त्याच्या हातावर हवेतून नवे कोरे सिको घड्याळ काढून दिल्याचा चमत्कार वर्णन केला होता. या चमत्काराची शहानिशा डॉ. अ. कोवूर यांनी केली असता वरील चमत्काराची कथा बनावट असल्याचे सिद्ध झाले.

दत्ता बाळ आपल्या प्रवचनात प्रेम प्रक्षेपणाने गुलाबाला फुले लागतात, असा शोध एका जपानी शास्त्रज्ञाने लावल्याचे सांगत. असला महत्वाचा शोध वनस्पतिशास्त्राच्या ज्ञानकोशात नोंदला गेला पाहिजे. श्री. दि. के. बेडेकर यांनी संपूर्ण ज्ञानकोश चाळून पाहिले असता अशा संशोधनाचा कोठेच उल्लेख आढळला नाही.

वर वर्णन केलेल्या घटनांची ज्ञानकोशात कोठेही नोंद नाही. या *केवळ भाकड कथा आहेत.* अशा काल्पनिक कथांचे उदंड पीक धार्मिक ग्रंथांतून वाचावयास मिळेल. शरीरात आत्मा नावाचे काही नसतेच; त्यामुळे मृतशरीराचे वजन कमी होण्याचा व पेटी फोडून तो बाहेर येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...