Wednesday, 28 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ६१

 *_प्रश्न ६१ - भृगुसंहिता भृगु ऋषींची फार पूर्वीची अत्यंत अचूक अशी भविष्यवाणी आहे असे जगभर मानले जाते, याचा फायदा का घेऊ नये?_* 


 *उत्तर*  👉 भविष्याचे जे विविध प्रकार मानले जातात त्यामध्ये भृगुसंहिता ही फार विश्वासार्ह मानली केलेली आहे.

          

           भूतकाळात होऊन गेलेल्या, वर्तमानकाळात असलेल्या आणि भविष्यकाळात जन्माला येणाऱ्या सर्वांचे भविष्य भृगु ऋषींनी त्यांच्या ग्रंथात लिहून ठेवले आहे असे मानले जाते. तांब्याच्या काही हजार पट्ट्यांवर लिहिलेले हे भविष्य आता पुस्तक रुपात वा पोथी स्वरुपात उपलब्ध आहे. शंभर वर्षांचे कॅलेंडर ज्याप्रमाणे मिळते व त्यामुळे मागील व पुढील सालातील कोणत्या तारखेला कोणता वार येईल वा त्या वर्षातील, महिन्यातील, आठवड्यातील कोणत्या वाराला तारीख काय असेल हे अचूक सांगता येते, तसेच भविष्याबद्दल भूत, वर्तमान भविष्याचा अचूक वेध घेणारी अशी ही संहिता मानली जाते. आपल्याकडे संहितेची अस्सल प्रत आहे असा दावा करणाऱ्या व ती अचूकपणे वाचता येते असे सांगणाऱ्या व्यक्ती आढळतात. *मात्र हा दावा करणाऱ्या व्यक्ती त्यांची चाचणी देण्यास कधीच पुढे येत नाहीत.* दहा व्यक्तींच्या जीवनातील शिक्षण, व्यवसाय, लग्न, संतती, अपघात, प्रमुख घटना याबाबतचे ८०% निदान अचूक करण्याचे आव्हान जसे ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक म्हणणारे ज्योतिषी स्वीकारत नाहीत, तसेच भृगुसंहितेच्या विश्वासार्हतेचे गुणगान करणारेही स्वीकारत नाहीत. तेव्हा जगभर काय मानले जाते, यापेक्षा काय वस्तुस्थिती आहे, याची शहानिशा करूनच कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवावा.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...