➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*६९
सुन्दरी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_वाराणसिधील
एका बब्राह्मण कुटुंबात सुन्दरीचा जन्म झाला होता. *सुजात हे तिच्या वडिलांचे नाव
होते.* अतिशय सुंदर असल्यामुळे तिचे नाव सुंदरी हे नाव ठेवण्यात आले होते. ती मोठी
झाल्यावर तिचा लहान भाव मरण पावला. पुत्राच्या मरणामुळे सुजात हा दुःखामुळे हिकडे
तिकडे भटकू लागला. एके दिवशी *वासेट्टी* नावाच्या भिखुणीबरोबर त्याची गाठ पडली.
भिक्खुणीने त्याच्या शोकाचे कारण विचारले, तेव्हा ब्राह्मणाने आपल्या पुत्राचे
वर्णन केले. यावर भिक्खुणीने आपल्या पुत्र वियोगाचे वर्णन केले व शेवटी ती म्हणाली
– “असे असून सुद्धा आज मी शांत आहे.”. सुजात ब्राह्मणाला हे कसे ते जाणून घेण्याची
उत्सुकता वाटू लागली. त्याने भिक्खुणीला विचारले, “हे आर्ये! आपण दुःखापासून कसे
विमुक्त झालात?” भिक्खुणीने त्याला बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जाण्याचा उपदेश
केला. ब्राह्मणाने विचारले, “भगवान बुद्ध सध्या कोठे आहेत?” भिक्खुणीने सांगितले,
“भगवंत सध्या मिथिला नगरीत विहार करीत आहेत.” ते ऐकल्याबरोबर ब्राह्मणाने रथ तयार
केला व तो मिथिला नगरीला गेला. तेथे गेल्यावर त्याने भगवंतांना वंदन केले व एका
बाजूला बसला. भगवंतांनी धम्मोपदेश केल्यानंतर त्याने प्रव्रज्या घेतली व तो साधना
करू लागला. त्याने तिसऱ्या दिवशीच अर्हतपद प्राप्त केले. त्याचा सारथी वाराणसीला
परत आला आणि त्याने ब्राह्मणाच्या पत्नीला घडलेली सर्व घटना सांगितली. आपले वडील
प्रव्रजित झाल्याचे कळल्यावर सुंदरीनेहि आपल्या आईकडे प्रव्रजित होण्यासाठी
परवानगी मागितली. आईने म्हटले, “या घरातील सर्व संपत्ती तुझ्या मालकीची आहे. तूच
एक या कुटुंबातील एकुलती एक उत्तराधिकारी आहेस. त्यामुळे प्रव्रज्या घेऊ नकोस.”
सुंदरी म्हणाली, “मला धनसंपत्तीचे काहीच प्रयोजन नाही. मला संसाराचा त्याग
करावयाचा आहे.” शेवटी सर्व संपत्ती, घर, आई आणि नातलग ह्यांना सोडून ती प्रव्रजित
झाली. परिश्रमपूर्वक साधना करून तिने अर्हतपद प्राप्त केले. अर्हतपद प्राप्तीच्या
आनंदात विहार करीत असता “आपण शास्त्यासोबत सिंहनाद करावा” असा विचार तिच्या मनात
आला. लगेच वाराणसीतून निघून पुष्कळ भिक्खुंबरोबर ती श्रावस्ती नगरीला जाण्याला
निघाली. श्रावस्तीत भगवंतांना वंदन करून ती एका बाजूला उभी राहिली. *भगवंतांनी
तिला परम ज्ञान प्राप्त झालेली साधिका म्हटले.* दुसऱ्या दिवशी तिची आई तिथे आली व
ती सुद्धा प्रव्रजित झाली. काही दिवसांनी आपल्या पूर्वजन्माचे अवलोकन करीत असता
वडील व वासेट्टी ह्या दोघांचा संवाद तिला आठवला व त्या गाथा ती सतत म्हणू लागली.
:-_
*_सुजात_*
*_हे
ब्राह्मणी वासेट्टी! पुर्वी तुझे पुत्र मेले. तू खाल्लेस, असे असतांना तू
रात्रंदिवस अतिशय पिडीत झाली होतीस.||३१२||_*
*_आज
सर्वचे सर्व पुत्र तू खाल्लेस. असे असतांना सुद्धा कोणत्या कारणाने तू पिडीत होत
नाहीस? ||३१३||_*
*_वासेट्टी_*
*_हे
ब्राह्मणा! तुझे आणि माझे शेकडो पुत्र आणि अनेक जातीबांधव भूतकाळात खाल्ले गेले.
||३१४||_
*_परंतु
आज मी जन्म आणि मरणापासून मुक्ती जाणली आहे. त्यामुळेच मी शोक करीत नाही. रडत नाही
व दुःखीत होत नाही.” ||३१५||_*
*_सुजात_*
*_”हे
वासेट्टी! तू हि अद्भुत वाणी बोलत आहेस. तू कोणाचा धम्म जाणून अशाप्रकारची वाणी
बोलत आहेस?” ||३१६||_*
*_वासेट्टी_*
*_हे
ब्राह्मणा! मिथिला नगरीत असलेल्या संबुद्धाने सर्व प्राण्यांना दुःखाच्या
नाशाकरिता उपदेश केला. ||३१७||_
*_हे
ब्राह्मणा! त्या अर्ह्ताचा सर्व क्लेशांचा निरोधक धम्म ऐकून मला येथे सद्धमाचे
ज्ञान झाले. त्याचक्षणी माझा पुत्र शोक दूर झाला.” ||३१८||_*
*_सुजात_*
*_”मी
सुद्धा मिथिला नगरीला जाईन, म्हणजे भगवंत मला सर्व दुःखापासून मुक्त करतील.”
||३१९||_*
*_मिथिला
नगरीत जाऊन ब्राह्मणाने विमुक्त व क्लेशरहित अशा बुद्धाचे दर्शन घेतले. तेव्हा
सर्व दुःखाच्या पलीकडे गेलेल्या मुनीने त्याला धम्माचा उपदेश केला. ||३२०||_*
*_दुःख,
दुःखाचा उत्पत्ती, दुःखावर मात आणि दुःखनाशाचा आर्य अष्टांगिक मार्ग याचा उपदेश
भगवंतांनी केला. ||३२१||_*
*_त्यानंतर
सद्धमाचे ज्ञान झाल्यावर त्याने प्रव्रज्येची याचना केली. प्रव्रजित झाल्यावर
सुजात ब्राह्मणाने तीन रात्रीत तीन विद्या प्राप्त केल्या. ||३२२||_*
*_हे
सारथी! माझा रथ घेऊन जा व तो घरी परत दे. ब्राह्मणीला कुशल सांग. सुजात ब्राह्मण
प्रव्रजित झाला आहे व त्याने तीन विद्या प्राप्त केल्या.” ||३२३||_*
*_तेव्हा
सारथी रथ व खर्चाकरिता ब्राह्मणाने आणलेली हजार नाणी घेऊन घरी परत आला.
ब्राह्मणीला कुशल सांगितले. त्याचप्रमाणे सुजात ब्राह्मण प्रव्रजित झाला व त्याने
तीन रात्रीत तीन विद्या प्राप्त केल्या. हे सुद्धा सांगितले. ||३२४||_*
*_सुंदरीची आई_*
*_”हे
सारथी! ब्राह्मणाला तीन विद्या प्राप्त झाल्या आहेत हे ऐकून मी तुला हा अश्वरथ व
हजार नाणी देणगी देत आहे.” ||३२५||_*
*_सारथी_*
*_”हे
ब्राह्मणी! हा अश्वरथ व हजार नाणी तुझी तुलाच लाभोत, मी सुद्धा श्रेष्ठ ज्ञानी
भगवंतांजवळ प्रव्रज्या घेईन.” ३२६||_*
*_सुंदरीची आई_*
*_हे
सुंदरी! हत्ती,घोडे, गाई व मणीरत्न तसेच समृद्ध असे हे घर सोडून तुझे वडील
प्रव्रजित झाले. तू यांचा उपभोग घे. तूच कुटुंबाची एकमात्र उत्तराधिकारणी आहेस.
||३२७||_*
*_सुंदरी_*
*_हत्ती,
घोडे, गाई व मणीरत्न हे सोडून माझे वडील पुत्रशोकाने पिडीत होऊन प्रव्रजित झाले.
भावाच्या शोकाने पिडीत झालेली मी सुद्धा प्रव्रज्या घेईन.” ||३२८||_*
*_सुंदरीची आई_*
*_हे
सुंदरी! ज्याची तू इच्छा करतेस तो तुझा संकल्प पूर्ण होवो. भिक्षेकरीता दारोदारी
उभी राहून मिळविलेल्या अन्नाचा गोळा व धुळीने माखलेले चीवर हे सर्व पचनी पाडून तू
परलोकात अनास्त्रव होशील.” ||३२९||_*
*_सुन्दरी_*
*_आर्ये!
शिकत असता मी दिव्यचक्षु विशोधीत केला आहे. मी पुर्वी जेथे राहिले ती पूर्वजन्मीची
निवासस्थाने मी जाणते. ||३३०||_*
*_हे
कल्याणी भिक्खुणी! तू भिक्खुणीसंघाचे भूषण अशी थेरी आहेस. तुझ्याच आश्रयाने मी तीन
विद्या प्राप्त केल्या आणि बुद्धाच्या शासनाप्रमाणे आचरण केले. ||३३१||_*
*_हे
आर्ये! माझी श्रावस्तीला जाण्याची इच्छा आहे. मला आज्ञा द्या. मी बुद्धश्रेष्ठाजवळ
सिंहगर्जना करीन.” ||३३२||_*
*_सुंदरी स्वागत_*
*_”हे
सुंदरी! सुवर्ण वर्ण आणि पिवळी शरीर कांती असलेल्या शास्त्याला पहा. ते असंयमी
लोकांना संयमी करणारे, निर्भय व सम्यकसंबुद्ध आहेत.” ||३३३||_*
*_विमुक्त,
क्लेशरहित येथे आलेल्या मला सुंदरीला पहा. ती रागरहित, अनासक्त, कर्तव्यपूर्ण
केलेली व चित्तमलरहित आहे. ||३३४||_*
*_सुंदरी प्रकट_*
*_हे
महावीरा! मी वाराणसितून येथे आले आहे. मी तुमची श्राविका आहे. आपल्या चरणांना वंदन
करते. मी सुंदरी आहे. ||३३५||_*
*_हे
ब्राह्मण! मी आपली ओरस मुखातून उत्पन्न झालेली, कृतकृत्य व चित्तमलरहित अशी मुलगी
आहे.” ||३३५||_*
*_बुद्ध_*
*_”हे
कल्याणी! तुझे स्वागत असो. तुझे आगमन वाईट नाही. शास्त्याच्या चरणांना वंदन
करणारे, इंद्रिय दमन केलेले, राग-मुक्त, अनासक्त, कृतकृत्य झालेले आणि चित्तमलरहित
असलेले लोक अशाच प्रकारे येतात. “ ||३३७||_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*०५/०२/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment