🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_बौद्ध धम्मात ब्राह्मणांचे योगदान : चांगले आणि वाईट_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_जेव्हा आपण बुद्ध धम्माच्या प्रसाराचा जागतिक इतिहास पाहतो, तेव्हा लक्षात येते की, *संपूर्ण जगात बुद्ध धम्माचा प्रसार करण्याचे सर्वात जास्त श्रेय ब्राह्मणांना जाते. संपूर्ण जगात बुद्धधम्म पोहोचवण्याचे काम सर्वात जास्त ब्राह्मणांनी केले आणि भारत भूमीतून बुद्धधर्माचा ऱ्हास करण्याच्या प्रयत्नात देखील सर्वात मोठे योगदान ब्राह्मणांनीच दिले.*_
_*हे खरे आहे की अनेक वैदिक ब्राम्हणांना बौद्ध धर्म नको होता, पण याचा अर्थ सगळेच ब्राम्हण बौद्ध धर्माचे विरोधक होते असा होत नाही.* खुद्द गौतम बुद्ध यांच्या संघात त्यांचे सर्वाधिक आणि प्रमुख शिष्य हे ब्राम्हण होते, त्यानंतर क्षत्रिय शिष्यांचा नंबर येतो. या संघात शूद्रांचे स्थान तसे नगण्यच होते. अनेक ब्राम्हणांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो वाढवला. *बौद्ध धर्म तिबेट, चीन, जपान वगैरे देशात नेण्याचे श्रेय ब्राम्हनांनाच जाते.* आजच्या ब्राम्हणविरोधी बौद्ध धर्मियांनी तर ही गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजेच पण ब्राम्हणांनी देखील यावर विचार करायला पाहिजे, कारण बहुतेक ब्राम्हणांना वैदिक धर्माच्या पलीकडचा आपला इतिहास माहित नाही. त्यांनी तो माहीत करून घेण्यात त्यांचाच फायदा आहे._
*_बौद्ध धम्म प्रचारासाठी ब्राह्मणांनी दिलेले योगदान :-_*
१. _बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धांनी आपल्या धम्माचा प्रथम उपदेश ५ भिक्खूंना दिला. बौद्ध इतिहासात त्या प्रथम उपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात. त्या पाच भिक्खूंना ज्यांना 'भगवंताकडून प्रथम उपदेश मिळाला. त्यांना पंचवर्गीय भिक्खू म्हणतात. *बुद्धांनी त्यांचा प्रथम उपदेश ज्या पाच भिक्खूंना दिला ते पाचही जण ब्राह्मण होते कौण्डिण्य, वप्प, अश्वजीत, भद्धीय, महानाम.*_
२. _*सारीपुत्त आणि मोद्गल्यायन, दोघेही खूप हुशार ब्राह्मण, बुद्धांचे शिष्य झाले. बुद्धांनी त्यांना आपले अग्रश्रावक आणि धम्म सेनापती म्हणून घोषित केले होते.*_
३. _बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रथम धम्म परिषदेचे अध्यक्ष भंते महाकाश्यप, हे सुद्धा ब्राह्मण होते._
४. _बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जवळपास *शंभर वर्षांनंतर इ.स. पूर्व ४४४ मध्ये वैशाली येथे सम्राट काळाशोक यांच्या वेळी दुसरी धम्म परिषद आयोजित केली होती, अध्यक्ष होते भंते सब्बकामी आणि अध्यक्ष रेवत थेर होते, दोघेही ब्राह्मण.*_
५. _सम्राट अशोकाच्या संरक्षणाखाली इ.स. पूर्व २५० मध्ये आयोजित तिसरी धम्मपरिषद, त्याचे अध्यक्ष होते मोगलीपुत्त तिस्स, जे सम्राट अशोकाचे गुरु होते, ब्राह्मण होते._
६. _सम्राट अशोकांनी भारत व परदेशात ज्या धर्मप्रसारकांना पाठवले.... मज्झन्तिक (अफगाणिस्थान), महारक्खित (ग्रीक), मज्झिम (नेपाळ), धम्मरक्खित (भारत सागर किनारपट्टी), महाधम्मर क्खित (महाराष्ट्र). महादेव (कर्नाटक), रक्खित (उत्तर कर्नाटक) सर्वच्या सर्व ब्राह्मण होते._
७. _*सम्राट कनिष्क याच्या काळातील ई. १०० मध्ये काश्मीरच्या कुंडलवन मध्ये चौथी परिषद आयोजित केली होती, वसुमित्रांच्या अध्यक्षतेखाली, उपाध्यक्ष अश्वघोष, दोघेही ब्राह्मण पंडित.*_
८. _आचार्य अश्वघोष यांनी पहिले बुद्ध चरित्र लिहिले. अश्वघोषरचित "बुद्धचरित्र" याच परिषदेत त्रिपिटकामध्ये समाविष्ट करण्यात आले._
९. _*कंबोडिया मध्ये कौण्डिण्य नावाच्या ब्राह्मणाने बुद्ध धम्म स्थापनेचा पाया घातला.*_
१०. _*बर्मा (म्यानमार) ला बुद्धधम्माच्या थेरवादी शाखेची ओळख करुन देणारे बुद्धघोष ब्राह्मण होते.*_
११. _*बुद्धघोषांनी थायलंड ला सुद्धा बुद्ध धम्म ऐकवला.*_
१२. _*चिन मध्ये बुद्ध धर्माची स्थापना चांगल्या पद्धतीने करण्याचे श्रेय आचार्य बोधिधम्माला जाते* ते ब्राह्मण होते._
१३. _*कोरियामध्ये आचार्य मारानन्त*_
१४. _*तिबेट मध्ये आचार्य पदमसंभव*_
१५. _*वियतनाम मध्ये आचार्य विनितारुची*.... सर्व ब्राह्मण,
१६. _संस्कृती गोत्राचे ब्राह्मण केदार पांडे नंतर राहुल सांस्कृत्यायन बनले. त्यांनी तिपिटकाचे पुनरुज्जीवन केले, आणि महापंडित म्हणून ओळखले जाऊ लागले._
१७. _महाराष्ट्राचे धर्मानंद कोसंबी, डॉ. भदंत आनंद कौसल्यायन, ज्यांनी मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती केली तेही ब्राह्मणच होते._
१८. _बंगाली ब्राह्मण डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय बौद्ध महासभेत सक्रिय कार्यकर्ते होते._
१९. _भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन बौद्ध तत्वज्ञानाचे मोठे अभ्यासक होते. त्यांनी बुद्धांवर पुस्तकही लिहिले._
_*बौद्ध धम्माच्या ऱ्हास करण्यात ब्राह्मणांचे योगदान :-*_
१. _वस्साक ब्राह्मणाने वैशालीच्या वज्जीसंघा मध्ये फुट पाडली_
२. _सम्राट अशोकाचा वंशज *बृहद्रथ याची हत्या त्याचा ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंगाने केली आणि बौद्ध भिक्खूंचा शिरच्छेद करणाऱ्यांना शंभर सुवर्णमुद्रांचे बक्षीस जाहीर केले.*_
३. _सहाव्या शतकात सिंधचा बौद्ध सम्राट बाहिर याचा ब्राह्मणमंत्री चच याने सम्राटाचा विश्वासघात केला. त्याची हत्या करुन मोहम्मद बिन कासिम याला भारताच्या सिमेमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली._
४. _आपल्या ब्राह्मण मंत्राच्या सल्ल्यानुसार सातव्या शतकात बंगालचा शासक, शशांकने बोधीवृक्ष तोडून, बौद्ध भिक्खूंवर क्रूर अत्याचार केले, हत्या केली._
५. _आचार्य शंकर, ज्याला प्रच्छन्न बौद्ध म्हणतात, त्याने बौद्ध मठांना निवास बनवले._
_बुद्धधम्माचा ऱ्हास भारतामध्ये इ. सनाच्या दहाव्या शतकापासून सुरू झाला. तो मुसलमानांच्या भारतावर केलेल्या स्वाऱ्यांचा काळ होता. भिक्खूंची कत्तल झाल्याने इतर भिक्खू पळून जाऊ लागले. त्यांच्या पुस्तकांची नासधूस झाली. सारांश रुपाने आपण म्हणू शकतो की....._
१. संघामध्ये इतर धर्मीय भिक्खूंचा शिरकाव झाल्याने मिथ्याधम्माचा झालेला प्रचार
२. संघामध्ये शिरलेला अप्रामाणिकपणा, आलस्य व अपवित्रता.
३. मुसलमानांच्या भारतावरील आक्रमणाने बौद्ध भिक्खूंची करण्यात आलेली कत्तल व बौद्ध भिक्खूंचे भारताबाहेर पलायन.
४. बौद्धभिक्खूंच्या अभावी बौद्ध उपासकांचे हळूहळू होत गेलेले मतपरिवर्तन व बौद्ध मंदिरांची नासधूस व तसेच तलवारीच्या जोरावर मुसलमानांनी केलेले धर्मपरिवर्तन.
_एक बाजू अत्यंत चमत्कारिकतेने बघायला मिळते की, बुद्धांच्या काळापासून बुद्ध धम्माचा प्रचार, प्रसार देश-विदेशात करण्यात ब्राह्मणांचे सर्वाधिक योगदान आहे. परंतु दुसरी बाजूही तितकीच अंधकारमय आहे, जी दाखवते की बुद्ध धम्माचा भारतभुमीतून ऱ्हास करण्याचे श्रेयही सर्वात जास्त ब्राह्मणांना जाते._
_आत्ता आपण *भगवान बुद्ध ब्राह्मण कोणास म्हणतात याची काही उदाहरणे पाहू....*_
_*बुद्ध नेहमी एखाद्याच्या ज्ञानावर आणि आचरणाला महत्त्व देतात, त्याच्या जातीवर नव्हे. भगवान म्हणाले की, कोणताही मनुष्य केवळ विशिष्ट मातेच्या पोटी जन्म घेतल्याने ब्राह्मण होत नाही.*_
_त्यांनी पुढील गुणांचे स्पष्टीकरण दिले, ज्याच्या बळावर माणूस ब्राह्मण बनतो._
_जो साठा करत नाही, जो आसक्ती आणि लोभमुक्त आहे, तो निर्भय आहे ज्याने त्याला जन्म-मृत्यूच्या चक्राला जखडणारे सर्व बेड्या तोडले आहेत, ज्याने मनातील क्रोध आणि तृष्णा काढून टाकली आहे, ज्याने स्वतःला सर्वांपासून मुक्त केले आहे. चुकीचे विचार (त्या काळात ६२ प्रकारचे चुकीचे विचार प्रचलित होते), जो पूर्ण ज्ञानी आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो._
_मी त्याला ब्राह्मण म्हणतो, जो प्रतिक्रियेशिवाय अपमान आणि वेदना सहन करतो, राग न ठेवता म्हणजेच मन दूषित न करता, ज्याचे सामर्थ्य क्षमा आहे, जो क्रोधमुक्त आहे, जो सदाचारी, नैतिक, विद्वान आणि पराक्रमी आहे आणि ज्यासाठी हे आहे. शेवटचा जन्म आहे._
_कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे इंद्रियसुखांना चिकटून न राहणाऱ्या किंवा ज्याच्यामध्ये मत्सर, अभिमान, तृष्णा आणि तिरस्कार चिकटत नाही, अशा मोहरीच्या दाण्याप्रमाणे ज्याचा अंत झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो._
_या जीवनात दु:ख आहे आणि त्याने आपले सर्व ओझे फेकून दिले आहे, जो सखोल शहाणपणाचा आहे, शिकलेला आहे, ज्याला मार्ग काय आहे आणि कोणता मार्ग नाही हे ज्याला माहित आहे, तो प्रामाणिक आहे, जो घरच्यांशी जोडलेला नाही आणि ज्यांनी घर सोडले आहे त्यांच्याशी नाही. बेघर जीवन, जो कोणाही प्राण्याला मारत नाही, किंवा इतरांना मारण्यासाठी प्रवृत्त करत नाही, जो शत्रूंमध्ये शांतताप्रिय आहे, जो लाठीने सज्ज आहे त्यांच्यामध्ये कोणतीही लाठी न ठेवणारा आहे, जो साठेबाजी करणाऱ्यांमध्ये नाही, जो आदरणीय आहे आणि ज्याचे शब्द गोड आणि खरे आहेत, इतरांना कधीही न दुखावणारे शब्द, एवढ्या योग्य व्यक्तीला मी ब्राह्मण म्हणतो._
_*बुद्धांचा धम्म हा महासागरासारखा आहे. ज्या प्रमाणे महासागरात अनेक नद्या जाऊन मिळतात तेंव्हा आपण हे म्हणून शकत नाही की, हे अमुक अमुक नदीचे पाणी आहे. अगदी तसेच भगवान बुद्धांच्या संघात जरी अनेक जाती धर्मातील लोकांनी प्रवेश केला तरी आपण त्यांना असं नाही म्हणत की हा अमुक अमुक जातीचा आहे... त्यांची ओळख ही *भिक्खू आणि भिक्खूनी* हीच होते.*_
_*ज्या ज्या ज्ञात अज्ञात ब्राह्मणांनी बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी प्रयत्न केला.... आजही प्रयत्न करीत आहेत (we never know what happened in future) त्या सर्वांच्या प्रती मङ्गल मैत्री अर्पुण कृतज्ञता भाव ठेवून त्यांचे आभार मानून हा लेख प्रपंच संपवितो.*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_लेखन :- महेश हरिश्चंद्र कांबळे_*
*दिनांक :-* ०२/११/२०२४
*_संदर्भ:-_*
१. *भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म*
२. *धम्मपद - ब्राह्मण वग्ग*
३. *पाली साहित्य का इतिहास*
४. *मैत्री सम्पूर्ण धम्म आहे*
🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏
🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment