🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_बुद्धांचे परिचर (उपस्थापक)_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/10/blog-post.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_सिद्धार्थ ते बुद्धत्व प्राप्ती ह्या काळात सिद्धार्थ यांनी अती कष्ट केले, ह्या दरम्यान काळात *कौण्डिण्य, वप्प, भद्दिय, महानाम आणि अस्सजित ह्यांनी त्यांची सेवा केली होती.* पण सिद्धार्थाने अन्न सेवन केल्यामुळे ते त्यांना सोडून गेले. पुढे जाऊन सिद्धार्थ यांनी बुद्धत्व प्राप्त केले आणि ते भगवान बुद्ध झाले. बुद्धत्व प्राप्ती झाल्या पासून ते पुढे वीस वर्षात त्यांचा कोणताही वैयक्तिक परिचर / उपस्थापक नव्हता. या काळात वेळोवेळी बऱ्याच भिक्खूंनी त्यांची सेवा केली. *त्यांची नावे नागसिमाला, नगिता, उपवना, सुनाखता, चुंदा, सागता, राध आणि मेघीय, ह्याची अधिकृत नोंद आहे.*_
१. *नागसिमाला*
_हा शाक्य कुळातील होता. एकदा बुद्ध आणि नागसिमाला दोन वेगवेगळ्या दिशेने खुणविणाऱ्या मार्गावर आले. बुद्धांनी एका मार्गावर प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु नागसिमालाने दुसऱ्या मार्गाने जाण्याचा आग्रह धरला. जेव्हा *बुद्धांनी त्याच्या इच्छित मार्गात जाण्याच्या धोक्याबद्दल त्याला स्पष्टपणे चेतावनी दिली, तेव्हा नागसिमालाने लगेच बुद्धांचे भिक्षापात्र आणि चिवर जमिनीवर ठेवले आहे आणि मी तुम्हाला सोडून जात आहे असे बोलून ताबडतोब त्याने बुद्धांना सोडले आणि आपल्या इच्छित मार्गाने निघाला.* काही वेळानंतर त्या मार्गाने जाताना मार्गावरील माणसांनी त्याच्यावर आक्रमण केले आणि त्याच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर तो बुद्धांकडे परत आला आणि त्यांची क्षमा मागू लागला. बुद्धांचे सेवक म्हणून त्याची सेवा नंतर नाकारल्या गेली._
२. *नगिता*
_बुद्धांचा वैयक्तिक परिचर म्हणून काम करणारा आळशी आणि अवजड बांधा असलेला होता. बुद्धांनी नगिताला सूचित केले की भिक्षूंनी खेड्यात न राहता जंगलात राहून लठ्ठपणा व खुशामत, वाहवा करणे सोडले असते तर त्यांना आनंद झाला असता. परंतु *नगिताने चंगळपूर्ण जगणे पसंत केले. म्हणूनच त्याने स्वतःला बुद्धांचे वैयक्तिक सेवक म्हणून अपात्र केले.*_
३. *उपवना*
_श्रावस्तीच्या ब्राह्मण घराण्यातला होता, तो बुद्धांचा वैयक्तिक परिचर म्हणून नेमलेला होता. एकदा बुद्धांना स्नायूच्या वेदनादायक आकुंचनामुळे तीव्र वेदना होऊ लागल्या. उपवनाने त्याचा मित्र देवहीता ह्याच्या मदतीने गरम पाणी आणि औषधे तयार केली. ज्याच्या लावण्यामुळे बुद्ध तीव्र वेदनेपासून मुक्त झाले. पण *उपवना बुद्धिमान नव्हता आणि तो बुद्धांच्या विचारशील हावभावाचे महत्त्व समजू शकला नाही.*_
४. *सुनाखता*
_वैशालीचा लीच्छवी राजपुत्र बुद्धाचा वैयक्तिक सेवादार बनला, पण नंतर तो कोरखट्टीपाच्या मताच्या विचारसणीमध्ये बदलला आणि तो संघाला सोडून निघून गेला._
५. *चुंदा समनुद्देसा*
_हा नवशिका होता आणि काही काळापर्यंत त्याने बुद्धांचे वैयक्तिक सेवादार म्हणून काम केले. जेव्हा बुद्ध दोन चमत्कार प्रदर्शित करणार होते. तेव्हा बुद्धांचा त्रास आणि परिश्रम वाचविण्यासाठी चुंदाने स्वतः चमत्कार करण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. परंतु चुंदा नवशिक्या होता आणि फार तरुण होता आणि म्हणून बुद्ध पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहू शकत नव्हते._
६. *सागता*
_एकदा तो भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेला. काही घरात त्याला बोलविण्यात आले त्यामुळे तो हर्षोत्फुल्ल झाला आणि त्याने मद्यपान केले. तो इतका धुंद झालेला होता आणि तो विहाराकडे परत यायला निघाला आणि खाली पडला, विहाराच्या प्रवेशद्वाराजवळ त्याचे संतुलन गमावले, त्याला भिक्षूंनी उचलून आत आणून बुद्धांच्या पायाजवळ त्याचे डोके ठेवले. *अनपेक्षितपणे तो पूर्ण गोल फिरला आणि शास्ताकडे त्याचे पाय आले.* दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची नशा उतरली त्याला त्याने केलेली गंभीर चूक कळून आली. त्याने ह्याबद्दल बुद्धांकडे क्षमा, दयेची याचना केली. त्याप्रसंगी बुद्धांनी त्याला माफ केले. परंतु बुद्धाची सेवा करण्याची क्षमता त्याच्यात खरोखरच नव्हती._
७. *नवशिक्या राध*
_जो थोड्या काळासाठी बुद्धांचा सेवादार म्हणून होता. त्यापूर्वी तो सारीपुत्तांचाही सेवादार होता. तो कौटुंबिक होता. परंतु तो आपल्या कर्तव्यात फार कुशल होता._
८. *मेघीय*
_तो शाक्य कुटुंबातील होता, त्यानेही कर्तव्ये पार पाडली. एकदा मेघीय भिक्षा मागण्याकरिता जंतुहमाला गेला आणि परत येताना नावेतून तो नदी किनाऱ्यावरील आम्रवनाकडे फार आकर्षित झाला. त्याने तेथे राहून घ्यान करण्याची बुद्धांची परवानगी मिळावी म्हणून प्रार्थना केली. दोनदा बुद्धांनी त्याची प्रार्थना नाकारली, परंतु तिसऱ्यावेळी त्यांनी त्याला तिथे जाण्याची परवानगी दिली. तिथे गेल्यावर मेघीयाच्या मनात भीतिदायक विचार येऊ लागले आणि तो घाबरून गेला व शेवटी संघामध्ये परतला. बुद्धांची सेवा करण्याची क्षमता त्याच्यातही स्वाभाविक अशी नव्हती._
_जेव्हा बुद्ध पन्नास वर्षाचे झाले त्यांनी भिक्खूच्या संघासमोर त्यांचा निर्णय सांगितला की मी वाढत्या वयामुळे वाकलेला आहे आणि अशक्तपणामुळे मी अनुयायांना उपदेश करण्याकरिता असमर्थ असल्याचे आपण ओळखले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या वैयक्तिक सेवेकरिता भिक्खू नियुक्त केला पाहिजे जेणेकरून तो माझी काळजी घेईल. बुद्धांचे सर्व प्रसिद्ध आणि ज्येष्ठ शिष्य स्वतःहून उत्साहपूर्वक प्रशंसनीय ह्या जबाबदारीसाठी पुढे आले._
_*कौंडिण्य* म्हणाले की ते सेवक होण्यास तयार आहेत. परंतु बुद्धांनी त्यांना म्हटले की ते आता म्हातारे झालेले आहेत आणि त्यांनी स्वतःसाठी एक परिचर घ्यावा. *अश्वजी, सुबाहू आणि इतर सर्व स्थविरांनी ह्या सेवेकरिता त्यांच्याकडे प्रार्थना केली.* पण बुद्ध म्हणाले की, ते खूप वयोवृद्ध आहेत, *तेव्हा मोद्गल्यान ह्यांनी विचार केला की आनंद ह्याकरिता योग्य उमेदवार राहील आणि तो बुद्धांना सुद्धा मान्य असेल म्हणून त्यांनी सारीपुत्ताला सोबत घेतले आणि जाऊन आनंदाला विचारले की, ही महत्त्वपूर्ण जबाबदारी आपण स्वीकाराल का? आनंदाने प्रथम नकार दिला.*_
_साहित्यामध्ये अजून एक कथा ऐकण्यास मिळते ती अशी.... *शास्ताने आपल्या ऐंशी शिष्याद्वारे देऊ केलेल्या प्रस्तावित सेवांना एकामागून एक नकार दिला, तेव्हा आनंदा एकटाच शांत बसलेला होता. त्याला विचारले गेले की, त्याने स्वतःला का सेवेकरिता सादर केले नाही. तर त्याने त्वरित उस दिले की, "बुद्ध चांगल्याप्रकारे जाणून आहेत आणि कोणाची निवड करावी हे त्यांना चांगले ठाऊक आहे. "*_
_शेवटी *बुद्धांनी आनंदास वैयक्तिक परिचर म्हणून नेमणूक करण्यास मान्यता दिली.* ही जबाबदारी काही पूर्व शर्तीवर स्वीकारण्यास आनंदाने मान्य केले. परंतु त्याने ज्या चार गोष्टी नाकारल्या होत्या त्या अशा :-_
१. जर बुद्धांना उत्तम उंची चिवर दानात मिळाल्यास ते त्यांनी त्याला देऊ नये, किंवा देण्याची गरज नाही,
२. बुद्धांना मिळालेली भिक्षा त्यांनी त्याला देऊ नये,
३. बुद्धांच्या सुगंधित असलेल्या खोलीमध्ये तो राहणार नाही
४. आणि जर बुद्धांना वैयक्तिक आमंत्रण मिळाले असेल तर त्यामध्ये त्याचा समावेश करू नये.
_तसेच या चार गोष्टी त्यांनी स्वीकाराव्या अशी त्याची इच्छा होती. की जर...._
१. त्याने स्वतः आमंत्रण स्वीकारले तर बुद्ध त्याच्यासोबत असावेत,
२. त्याचप्रमाणे जर बुद्धांना दूरून लोक भेटावयास आले तर त्यांना त्याच्याकडे सादर केले पाहिजे.
३. तो त्यांना बुद्धांकडे भेटण्यास परवानगी देईल आणि
४. बुद्ध त्याच्या अनुपस्थितीत जे उपदेश शिकवतील ते त्याला परत सांगण्यात यावे.
_पुढे त्या दिवसापासून सुमारे ३० वर्ष बुद्धांच्या महापरिनिर्वाणापर्यंत त्यांची सावली म्हणून न थकता, दिवस-रात्र, न झोपता त्यांच्या सेवेत व्यस्त राहिला. बुद्ध सेवेत आनंद इतके व्यस्त राहिले की, त्यांना अर्हत पद प्राप्त करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही किंवा त्यांना त्या क्षणापर्यंत त्याची जाणीवच राहिली नाही.... ते फक्त बुद्ध सेवेत स्वतःला झोकून देत होते. बुद्धांच्या सेवेत असताना त्यांचे शरीर झिजले तरी त्यांना त्याचे काही महत्त्व नव्हते, चिंता नव्हती._
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_लेखन :- महेश हरिश्चंद्र कांबळे_*
*दिनांक :-* ३०/१०/२०२४
संदर्भ:-
१. उदान अट्ठकथा
२. अनुत्तरित शिकार
३. धम्मपद अट्ठकथा
४. लोमहंस जातक
५. थेरगाथा अट्ठकथा
६. मनोरथपुरणी
७. The life of Buddha
८. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏
🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment