🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_न ही वेरेन वेरानि सम्मन्तिध कुदाचनं ।_*
*_अवेरनच सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ।।_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/10/blog-post_31.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*पूर्वी वाराणसीचा राजा ब्रह्मदत्त होता.* प्रचंड संपत्तीचा तो मालक होता. त्याचा खजिना धनधान्याने भरलेला होता. त्याच्या सैन्यात सुशिक्षित सैनिक, प्रशिक्षित हत्ती-घोडे व सुसज्ज रथ-वाहनांचा समावेश होता. तो खूप यशस्वी होता. *काशिराज या नावाने प्रसिद्ध होता. कोसलराज दीधिति राजा, हा ब्रह्मदत्त काशिराजाचा समकालीन होता.* परंतु राजा ब्रह्मदत्त च्या तुलनेत याच्याकडे कमी संपत्ती, कमी धनधान्य व कमी निधी हे सर्व कमी होते. काशिराज ब्रह्ममदत्ताने, कोसलराज दीधितीला दुर्बल समजून त्याचा पराभव करण्याचा उद्देशाने, आपल्या राज्याचा विस्तार करण्याच्या इच्छेने, सर्व सेनेसह त्याच्यावर हल्ला केला, आपल्या राज्यावर हल्ला झाल्याची बातमी ऐकून *कोसलराज दीधिति ला वाटले की, काशिराजचे सैन्य जास्त शक्तिशाली आहे, मी जर त्याच्याशी लढलो तर माझे खुप लोक मारले जातील, पैशाचे नुकसान होणार, जीवहानी, वित्तहानी होणार त्यापेक्षा मी पळून जाणे योग्य होणार नाही का?* त्यामुळे प्रजेचा जीव वाचेल आणि जन-धन हानी होणार नाही, नाहीतर खूप लोक जिवानिशी जातील मुली आणि स्त्रिया विधवा होतील. असा विचार करुन कोसलराज दीधिति त्याच्या राणीसह राज्य सोडून पळून गेला. राजा शिवाय असलेले राज्य काशीराज ब्रह्मदत्ताने ताब्यात घेतले. सैन्य, वाहन, संपत्ती, धनधान्य सर्व काही स्वतःच्या ताब्यात घेतले._
_कोसलराज दीधिति आपल्या पत्नीसह वेश बदलून वाराणसी मध्ये दाखल झाला. तेथे तो एका कुंभाराचा विश्वासपात्र व संन्याशी म्हणून राहू लागला. तेथे असताना त्याची पत्नी गर्भवती झाली. *गरोदरपणात तिला डोहाळे लागले की, सुर्योदयाच्या वेळी रणांगणावर सशस्त्र आणि चिलखत घातलेल्या सैनिकांना पहावे, व तलवारीचे पाणी प्यावे, राणीला लागलेले डोहाळे तिन राजा दीधिति ला मोठ्या प्रेमाने सांगितले.* संकटात सापडलेल्या वीचितेन मोठ्या विवशतेने म्हटले, देवी संकटात सापडलेले आपण, आपल्याला रे कसे शक्य आहे? गर्भवतीला लागलेले डोहाळे खूप शक्तिशाली असतात. दुःखी स्वरात राणी म्हणाली, स्वामी जर माझी इच्छा पूर्ण झाली नाही तर मी मरुन जाणार._
_काशिराज ब्रह्मदत्ताचा राजपुरोहित हा कोसलराज दीधिति चा जिवलग मित्र होता. तो त्याला भेटला. वेश पालटून राहणाऱ्या राजा ने त्याला खरे स्वरुप दाखवले, व म्हणाला, सौम्य ! माझ्या पत्नीला असे डोहाळे लागले यावर मी काय करु? काही कळत नाही._
_पुरोहित म्हणाला, राजा, मला राणीचे दर्शन तरी मिळेल काय? दुसऱ्या दिवशी राजा दीधिति राणीला घेऊन पुरोहिता ला भेटायला गेला. पुरोहिताने दुरुनच त्या दोघांना येतांना पाहून जागेवरुनच उठून, डोके टेकवून, तिन वेळा नमन करुन मोठ्या आदराने म्हणाला- कोसल चा राजा गर्भात आहे! कोसल चा राजा गर्भात आहे! प्रचंड विनम्रतेने म्हणला देवी, तुम्ही आनंदी व्हा, तुमचे डोहाळे पुर्ण होतील पहाटेच्या सूर्योदयाच्या वेळी सशस्त्र सैनिकांना तुम्ही रणांगणावर पाहणार व तलवारीचे पाणी तुम्ही पिणार हे सांगून पुरोहित काशि नरेश ब्रह्मदत्त कडे गेला व म्हणाला हे राजा! उद्या पहाटेची वेळ खूप शुभ आहे, यावेळी रणांगणावर सशस्त्र सैनिकांना उभे राहून तलवारी धुवाव्यात पुरोहिताने दीधितिच्या मैत्रीमुळे हे सर्व घडवून आणले होते. त्याची युक्ति कामी पडली. पुरोहिताच्या सल्ल्यानुसार काशीराज ब्रह्मदत्तानेही सेवकांना व लष्करी अधिकाऱ्यांना आदेश दिला की, उद्या सूर्योदयाच्या वेळी शुभ वेळ आहे पुरोहितांनी सांगितल्याप्रमाणे तयारी करा. दुसऱ्या दिवशी तसेच झाले रणांगणात सूर्योदयाच्या वेळी सर्व सैनिक चिलखत व शस्त्रासह उभे राहून तलवारी धुवू लागले आपल्या मित्राच्या मदतीने दीधितिने पत्नीची डोहाळे पूर्ण केले, तिला पहाटेच्या वेळी रणांगणावरील सुसज्ज सैन्य दाखवून तलवारीचे पाणी पिण्यास दिले कालांतराने दीधितिच्या पत्नीने डोहाळे पूर्ण केले. *कालांतराने दीधितिच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. दोघांनी त्याचे नाव दीघार्यु ठेवले.* काही वर्षांनी दीर्घायु तरुण आणि विद्या संपन्न झाला, दिसायला देखणा च हुशार होता._
_वडिल म्हणून दीधिति सतत चिंतेत असे, हा विचार करत होता की, काशिराज ब्रह्मदत्त आमच्या दुर्दैवाचे कारण आहे त्याने आमचे राज्य, सैन्य, वाहन, खजिना, धनधान्य लुटले आहे, जरी त्याला कधीही तरी आमचे रहस्य कळले तर तो आम्हाला मारणार. मी माझ्या मुलाला सुरक्षित ठिकाणी का पाठवू नये, तिथे तो शास्त्र, हस्तकला आत्मसात करेल. आई-वडिलांनी मुलाच्या सुरक्षिततेचा विचार करुन मनाला कठोर करुन त्याला दुसऱ्या शहरात पाठवले, जिथे तो शास्त्र, शिल्पकलेने पारंगत झाला, आई-वडिलांच्या वाईट परिस्थिती मध्येही त्याचे राहणे, चालणे हे राजा प्रमाणेच दिसत होते._
_राजा काशिराजाने इथे राज्य हस्तगत केल्यानंतर कोसलचा न्हावी आता ब्रह्मदत्ताचा न्हावी झाला होता. एक दिवस त्या न्हाव्याने कोसल राजा व त्याच्या पत्नीला वेश पालटून जाताना पाहिले, व त्याने ही गोष्ट काशि नरेश ला सांगितली. काशि नरेश ने सैनिकांना आदेश दिला की, संन्याशाच्या, परिव्राजकाच्या वेशात राहणाऱ्या कोसल राजा दीधिति व त्याच्या पत्नीला त्यांचे हात-पाय बांधून मुंडन करुन, ढोल वाजवून शहरात फिरुन, दक्षिणेकडील दारावर नेऊन त्यांचे तुकडे करुन चारही दिशेला फेकून द्या._
_ज्यावेळी राजा व त्याच्या पत्नीला हात बांधून ढोल वाजवत सैनिक शहरातून नेत होते त्यावेळी त्यांना नक्कीच आपल्या मुलाची आठवण झाली असेल त्यांनी आपल्या मुलाला इतरत्र ठिकाणी पाठविण्याचा निर्णयावर ते समाधानी झाले असावे की, आमच्या वंशाचा दिवा तरी शिल्लक आहे, त्यामुळे यावेळीही त्यांना सुखाचा अनुभव झाला असेल मुलाच्या आठवणीचे तरंग मुलापर्यत पोहोचले, टेलीपची चा प्रभाव पडला की, दुसरीकडे राहणारा त्यांचा मुलगा दीर्घायु ला सुद्धा आपल्या आई-वडिलांची आठवण येऊन त्यालाही त्यांना भेटावेसे वाटले._
_दीर्घायुच्या मनात असे विचार आले की, आई-वडिलांची भेट होऊन खूप दिवस झाले आता जाऊन त्यांना भेटायला हवे, आई-वडिलांच्या आठवणीने जेव्हा तो वाराणसी मध्ये येऊन पोहोचला, तेव्हा आई-वडिलांना, सैनिकांनी दोरीने हात, पाय बांधून घेऊन जाताना शहरभर फिरवत आहेत हे पाहिले, म्हणून तो बेचैन झाला व त्यांच्या जवळ गेला तर वडिलांनी मोठ्या वेदनेने त्याला म्हटले दीर्घायु !_
*_न ही वेरेन वेरानि सम्मन्तिध कुदाचनं, अवेरेन च सम्मन्ति- दीघार्यु! वैराने चैर शांत होत नाही, अवैरानेच वैर शांत होते._*
_वाराणसी मध्ये दीर्घायु ला कोणी ओळखत नव्हते. दीधिति ने दीर्घायु ला उद्देशून म्हटलेली गाथा ऐकून सैनिकांनी विचारले, हे तु काय बडबडतो आहेस? दीर्घायु कोण आहे? दीधिति सैनिकांना म्हणाला- मी बडबडत नाही, *जो पंडित, ज्ञानी आहे, तो माझी गोष्ट सहज समजेल. मुलाने वडिलांच्या बोलण्याचा अर्थ समजून स्वतःवर नियंत्रण ठेवले* सैनिकांनी राजाच्या आदेशानुसार दीधिति च त्याच्या पत्नीला ढोल-ताशांच्या आवाजात सर्व शहरात फिरवून दक्षिण दाराजवळ त्यांचा बळी दिला, त्यांच्या मृत शरीरावर सैनिकांना पहारा ठेवून राजवाड्यात परत येऊन राजाला सर्व वृत्तांत कथन केला._
_दीर्घायु कुमार ने आई-वडिलांच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार करण्याचे ठरवले, त्याने वाराणसीच्या बाजारातून दारु विकत आणली, पहारेकऱ्यांना पाजली, पहारेकरी बेशुद्ध झाल्यावर त्याने आई-वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे एकत्र केले आणि तिथे चित्तेवर टाकून, चिता पेटवली, हात जोडून तिन वेळा प्रदक्षिणा केली काशिराजाने आपल्या महालाच्या छतावरुन पेटती चिता आणि बाजूला प्रदक्षिणा घालणारा तरुण पाहिला, विचार केला की- नक्कीच हा दीधितिचा कोणीतरी जवळचा किंवा नातेवाईक असावा, अरे एवढी मोठी गोष्ट, माझ्या दुर्दैवाने मला कोणी सांगितली कशी नाही._
_आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर दीर्घायु जंगलात जाऊन खूप रडला, त्यानंतर अश्रू पुसून शहरात आला. तिथे राज्याच्या अंतःपुरातील हत्ती शाळेच्या महावताकडे गेला व म्हणाला- आचार्य मला तुमचा शिष्य व्हायचे आहे, तुमच्याकडून शस्त्र, हस्तकला शिकायची आहे. हत्ती शाळेच्या महावत म्हणाला- शिक बाळा._
_अशा प्रकारे महावत आचार्यांकडे राहून दीर्घायु कला शिकू लागला. त्याचा आवाज खूपच कर्णमधुर होता तो विणा सुद्धा वाजवायचा, एकदा काशिराज ब्रह्मदत्ताने पहाटे त्याला गाताना आणि वीणा वाजवताना पाहिले, व त्याने सेवकांना विचारले की- इतक्या पहाटे मंजुळ आवाजात कोण वाजवत आहे? व कोण गात आहे? सेवकांनी माहिती काढली व सांगितले व तो महावत आचार्या चा विद्यार्थी आहे, जो इतक्या मधुर आवाजात गातो तसेच वीणा सुद्धा वाजवतो._
_काशिराज म्हणाला- त्याला माझ्याकडे घेऊन या तरुण जवळ येताच त्याला विचारले की, पहाटे तुच वीणा वाजवून गातोस का?_
_त्याने नम्रतेने म्हटले होय, राजा ! तर मला सुद्धा ऐकवून दाखव, राजाने म्हटल्यावर त्याला गाण्यासह वीणा वाजवून दाखवली काशिराज प्रसन्न झाला म्हणाला शिष्या, तु माझ्या सेवेसाठी राहा._
_ठीक आहे राजा असे म्हणून दीर्घायु कुमार ने काशिराजाला होकारार्थी उत्तर दिले व त्या दिवसापासून तो राजाचा सेवक म्हणून राहू लागला, थोड्या दिवसात विश्वास संपादन केला. राजाच्या आधी उठणारा, नंतर झोपणारा, कामाबद्दल विचारणारा प्रिय सेवक ठरला. थोड्या दिवसात तो राजाचा खास व्यक्ती म्हणून त्याच्या सोबत राहू लागला._
_एक दिवस राजा म्हणाला- शिष्य तयारी कर शिकारीला जाऊया अशा तन्हेने राजासाठी रथ तयार करुन दीर्घायुने त्याला जंगलात नेले, सैन्य एकीकडे आणि राजा दुसरीकडे पुढे गेल्यानंतर राजा म्हणाला- मानवका थांब, मला विश्रांती घ्यायची आहे, दीर्घायु कुमारने रथ थांबवला आणि जमिनीवर मांडी घालून बसला, आणि काशिराज त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला, दमल्यामुळे राजाला झोप लागली. तेव्हा दीर्घायु कुमार च्या मनात विचार आला हाच काशिराज ब्रह्मदत्त आहे, जो माझ्या सर्व दुःखाचे कारण आहे, याने माझ्या वडिलांचे राज्य हिसकावून घेतले, संपत्ती, धनधान्य, खजिना, सेना, वाहन, सर्वकाही स्वतःकडे घेतले, माझ्यासमोर माझ्या आई वडिलांना ठार केले, हिच वेळ योग्य आहे की, आता त्याचा बदला घ्यावा._
_त्याची हत्या करावी असे विचार मनात येऊन त्याने तलवार बाहेर काढली, *तेव्हा त्याला वडिलांच्या वचनाची आठवण झाली- न ही वरेन वेरानि सम्मन्तिय कुदाचनं, अवेरेन च सम्मन्ति म्हणजे वैराने वैर शांत होत नाही तर, अवैराने च वैर शांत होते याची आठवण झाल्यबरोबर त्याने तलवार पुन्हा ठेवून विचार केला की माझ्यासारख्या मुलाला वडिलांचा शब्द न पाळणे हे योग्य नाही. राजाला मारण्याचा विचार तिन वेळा दिर्घायु च्या मनात आला.*_
_त्याने तिन वेळा तलवार काढली, परंतु वडिलांच्या शब्दांची आठवण येताच तलवार तिन वेळा परत ठेवली अचानक, राजाची झोपमोड झाली. दीर्घायु ने विचारले काय झाले काय झाले राजा? काशिराज म्हणाला- मी एक भयानक स्वप्न पाहिले की, कोसलराज दीधिति चा मुलगा दीर्घायु कुमार ने मला तलवारीने ठार केले, या वाईट स्वप्नाने मला जाग आली._
_एका हाताने काशिराजाची मान पकडून दुसऱ्या हाताने तलवार काढत दीर्घायु कुमार म्हणाला हे राजा! दीधिति चा पुत्र मीच दीर्घायु कुमार आहे, माझ्या सर्व दुःखास तुम्ही कारणीभूत आहात, तुम्ही माझ्या वडिलांचे सर्व काही लुटले आहे, आणि माझ्या आई-वडिलांची हत्या केली आहे, तेव्हा काशिराजाने दीर्घायु च्या पायावर डोके ठेवून विनंती केली म्हणाला, हे, दीर्घायु मला सोड, जीवदान दे. दीर्घायु कुमार म्हणाला- जर, तुम्ही मला जीवदान दिले तर मी सुद्धा तुम्हाला जिवनदान देईन. तेव्हा काशिराज म्हणाला- तू मला जीवदान दे व मी तुला जीवदान देतो._
_काशिराज ब्रह्मदत्त आणि एकमेकांना जीवदान दिले आणि हातात हात घालून वैरत्व न करण्याची शपथ घेतली. तेव्हा काशिराज म्हणाला- चल, दीर्घायु तयारी कर, परत जाऊ लवकरच राजा सैन्याला जाऊन भेटला. वाराणसी मध्ये जाऊन ब्रह्मदत्ताने मंत्री परिषदेत असे सांगितले की, हा शिष्य दुसरा तिसरा कोणी नसून दीधितिचा मुलगा दीर्घायु आहे. आता तुम्ही सांगा याचे काय करायचे? परिषदेत जमलेल्या लोकांनी सांगितले- हे राजा! त्याचे हात, पाय, कान, नाक कापून टाकून त्याला ठार करु._
_तेव्हा काशिराज म्हणाला- अरे, तुम्ही याला हात सुद्धा लावायचा नाही, कारण त्याने मला जीवदान दिले आहे व मी त्याला जीवदान दिले आहे त्यानंतर *राजाने दीर्घायु कुमार ला विचारले तुझ्या, वडिलांनी मरताना तुला काय सांगितले होते, की ज्याचा विचार करुन, मला मारण्याची संधी मिळून सुद्धा तू मारले नाहीस? लहान-मोठे बघू नका, वैराने वैर शांत होत नाही, दीर्घायु, अवैरानेच वैर शांत होते, तुझ्या वडिलांच्या या अंतिम वचनाचा अर्थ काय?*_
_दीर्घायु म्हणाला- *मोठे काही बघू नका, म्हणजे माझे वडिलांच्या या शब्दाचा अर्थ आहे- वैर कायम धरून ठेवू नका. छोटे पाहू नको म्हणजे- मित्रांशी त्वरित सलोखा करा, म्हणजे संधी मोठी असो की, छोटी गोष्ट वैर जास्त वेळ ठेवू नये, कारण की वैराने वैर शांत होत नाही, अवैराने वैर शांत होते. राजाने माझ्या आई वडिलांना ठार केले, जर या विचाराने मी, राजाला मारले असते तर राजाच्या चाहत्यांनी मला ठार केले असते, आणि वैराने वैर कधीच शांत होत नाही, परंतु वडिलांच्या शब्दांचे वचन आठवून मी तुम्हाला जीवदान दिले आणि तुम्ही मला, कारण, अवैरानेच वैर शांत होते.*_
*_न ही वेरेन वेरानि सम्मन्तिध कुदाचनं ।_*
*_अवेरनच सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ।।_*
*_वैरा ने वैर शांत होत नाही, अवैराने वैर शांत होते- हाच शाश्वत धम्म आहे._*
_काशीराज ब्रह्मदत्त म्हणाला अप्रतिम, अद्भुत, किती छान आहे, किती ज्ञानी आहे दीर्घायु कुमार, ज्याने वडिलांनी थोडक्यात सांगितलेल्या शब्दाचे वर्णन इतक्या विस्ताराने जाणले, व त्याला समजले. एवढे बोलून काशिराजाने ब्रह्मदत्त दीर्घायु कुमाराला त्याच्या वडिलांचे राज्य व सैन्य, खजिना, सर्वकाही परत केले आणि स्वतःच्या मुलीचा विवाह त्याच्या सोबत लावून दिला._
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन :- महेश हरिश्चंद्र कांबळे_*
*दिनांक :-* ०१/११/२०२४
*_संदर्भ:-_*
१. *विनयपिटक - चुळवग्ग - सङ्घभेदक क्खन्धकं*
२. *धम्मपद - यमक वग्गो*
३. *दीधिति जातक*
४. *संघ भेदक जातक*
५. *धम्मपद अट्ठकथा - काळयक्खिनीवत्थु*
६. *मैत्री सम्पूर्ण धम्म आहे*
🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏
🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼