Thursday, 31 October 2024

न ही वेरेन

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_न ही वेरेन वेरानि सम्मन्तिध कुदाचनं ।_* 

*_अवेरनच सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ।।_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/10/blog-post_31.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                  _*पूर्वी वाराणसीचा राजा ब्रह्मदत्त होता.* प्रचंड संपत्तीचा तो मालक होता. त्याचा खजिना धनधान्याने भरलेला होता. त्याच्या सैन्यात सुशिक्षित सैनिक, प्रशिक्षित हत्ती-घोडे व सुसज्ज रथ-वाहनांचा समावेश होता. तो खूप यशस्वी होता. *काशिराज या नावाने प्रसिद्ध होता. कोसलराज दीधिति राजा, हा ब्रह्मदत्त काशिराजाचा समकालीन होता.* परंतु राजा ब्रह्मदत्त च्या तुलनेत याच्याकडे कमी संपत्ती, कमी धनधान्य व कमी निधी हे सर्व कमी होते. काशिराज ब्रह्ममदत्ताने, कोसलराज दीधितीला दुर्बल समजून त्याचा पराभव करण्याचा उद्देशाने, आपल्या राज्याचा विस्तार करण्याच्या इच्छेने, सर्व सेनेसह त्याच्यावर हल्ला केला, आपल्या राज्यावर हल्ला झाल्याची बातमी ऐकून *कोसलराज दीधिति ला वाटले की, काशिराजचे सैन्य जास्त शक्तिशाली आहे, मी जर त्याच्याशी लढलो तर माझे खुप लोक मारले जातील, पैशाचे नुकसान होणार, जीवहानी, वित्तहानी होणार त्यापेक्षा मी पळून जाणे योग्य होणार नाही का?* त्यामुळे प्रजेचा जीव वाचेल आणि जन-धन हानी होणार नाही, नाहीतर खूप लोक जिवानिशी जातील मुली आणि स्त्रिया विधवा होतील. असा विचार करुन कोसलराज दीधिति त्याच्या राणीसह राज्य सोडून पळून गेला. राजा शिवाय असलेले राज्य काशीराज ब्रह्मदत्ताने ताब्यात घेतले. सैन्य, वाहन, संपत्ती, धनधान्य सर्व काही स्वतःच्या ताब्यात घेतले._

               _कोसलराज दीधिति आपल्या पत्नीसह वेश बदलून वाराणसी मध्ये दाखल झाला. तेथे तो एका कुंभाराचा विश्वासपात्र व संन्याशी म्हणून राहू लागला. तेथे असताना त्याची पत्नी गर्भवती झाली. *गरोदरपणात तिला डोहाळे लागले की, सुर्योदयाच्या वेळी रणांगणावर सशस्त्र आणि चिलखत घातलेल्या सैनिकांना पहावे, व तलवारीचे पाणी प्यावे, राणीला लागलेले डोहाळे तिन राजा दीधिति ला मोठ्या प्रेमाने सांगितले.* संकटात सापडलेल्या वीचितेन मोठ्या विवशतेने म्हटले, देवी संकटात सापडलेले आपण, आपल्याला रे कसे शक्य आहे? गर्भवतीला लागलेले डोहाळे खूप शक्तिशाली असतात. दुःखी स्वरात राणी म्हणाली, स्वामी जर माझी इच्छा पूर्ण झाली नाही तर मी मरुन जाणार._

              _काशिराज ब्रह्मदत्ताचा राजपुरोहित हा कोसलराज दीधिति चा जिवलग मित्र होता. तो त्याला भेटला. वेश पालटून राहणाऱ्या राजा ने त्याला खरे स्वरुप दाखवले, व म्हणाला, सौम्य ! माझ्या पत्नीला असे डोहाळे लागले यावर मी काय करु? काही कळत नाही._

             _पुरोहित म्हणाला, राजा, मला राणीचे दर्शन तरी मिळेल काय? दुसऱ्या दिवशी राजा दीधिति राणीला घेऊन पुरोहिता ला भेटायला गेला. पुरोहिताने दुरुनच त्या दोघांना येतांना पाहून जागेवरुनच उठून, डोके टेकवून, तिन वेळा नमन करुन मोठ्या आदराने म्हणाला- कोसल चा राजा गर्भात आहे! कोसल चा राजा गर्भात आहे! प्रचंड विनम्रतेने म्हणला देवी, तुम्ही आनंदी व्हा, तुमचे डोहाळे पुर्ण होतील पहाटेच्या सूर्योदयाच्या वेळी सशस्त्र सैनिकांना तुम्ही रणांगणावर पाहणार व तलवारीचे पाणी तुम्ही पिणार हे सांगून पुरोहित काशि नरेश ब्रह्मदत्त कडे गेला व म्हणाला हे राजा! उद्या पहाटेची वेळ खूप शुभ आहे, यावेळी रणांगणावर सशस्त्र सैनिकांना उभे राहून तलवारी धुवाव्यात पुरोहिताने दीधितिच्या मैत्रीमुळे हे सर्व घडवून आणले होते. त्याची युक्ति कामी पडली. पुरोहिताच्या सल्ल्यानुसार काशीराज ब्रह्मदत्तानेही सेवकांना व लष्करी अधिकाऱ्यांना आदेश दिला की, उद्या सूर्योदयाच्या वेळी शुभ वेळ आहे पुरोहितांनी सांगितल्याप्रमाणे तयारी करा. दुसऱ्या दिवशी तसेच झाले रणांगणात सूर्योदयाच्या वेळी सर्व सैनिक चिलखत व शस्त्रासह उभे राहून तलवारी धुवू लागले आपल्या मित्राच्या मदतीने दीधितिने पत्नीची डोहाळे पूर्ण केले, तिला पहाटेच्या वेळी रणांगणावरील सुसज्ज सैन्य दाखवून तलवारीचे पाणी पिण्यास दिले कालांतराने दीधितिच्या पत्नीने डोहाळे पूर्ण केले. *कालांतराने दीधितिच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. दोघांनी त्याचे नाव दीघार्यु ठेवले.* काही वर्षांनी दीर्घायु तरुण आणि विद्या संपन्न झाला, दिसायला देखणा च हुशार होता._

_वडिल म्हणून दीधिति सतत चिंतेत असे, हा विचार करत होता की, काशिराज ब्रह्मदत्त आमच्या दुर्दैवाचे कारण आहे त्याने आमचे राज्य, सैन्य, वाहन, खजिना, धनधान्य लुटले आहे, जरी त्याला कधीही तरी आमचे रहस्य कळले तर तो आम्हाला मारणार. मी माझ्या मुलाला सुरक्षित ठिकाणी का पाठवू नये, तिथे तो शास्त्र, हस्तकला आत्मसात करेल. आई-वडिलांनी मुलाच्या सुरक्षिततेचा विचार करुन मनाला कठोर करुन त्याला दुसऱ्या शहरात पाठवले, जिथे तो शास्त्र, शिल्पकलेने पारंगत झाला, आई-वडिलांच्या वाईट परिस्थिती मध्येही त्याचे राहणे, चालणे हे राजा प्रमाणेच दिसत होते._

_राजा काशिराजाने इथे राज्य हस्तगत केल्यानंतर कोसलचा न्हावी आता ब्रह्मदत्ताचा न्हावी झाला होता. एक दिवस त्या न्हाव्याने कोसल राजा व त्याच्या पत्नीला वेश पालटून जाताना पाहिले, व त्याने ही गोष्ट काशि नरेश ला सांगितली. काशि नरेश ने सैनिकांना आदेश दिला की, संन्याशाच्या, परिव्राजकाच्या वेशात राहणाऱ्या कोसल राजा दीधिति व त्याच्या पत्नीला त्यांचे हात-पाय बांधून मुंडन करुन, ढोल वाजवून शहरात फिरुन, दक्षिणेकडील दारावर नेऊन त्यांचे तुकडे करुन चारही दिशेला फेकून द्या._

_ज्यावेळी राजा व त्याच्या पत्नीला हात बांधून ढोल वाजवत सैनिक शहरातून नेत होते त्यावेळी त्यांना नक्कीच आपल्या मुलाची आठवण झाली असेल त्यांनी आपल्या मुलाला इतरत्र ठिकाणी पाठविण्याचा निर्णयावर ते समाधानी झाले असावे की, आमच्या वंशाचा दिवा तरी शिल्लक आहे, त्यामुळे यावेळीही त्यांना सुखाचा अनुभव झाला असेल मुलाच्या आठवणीचे तरंग मुलापर्यत पोहोचले, टेलीपची चा प्रभाव पडला की, दुसरीकडे राहणारा त्यांचा मुलगा दीर्घायु ला सुद्धा आपल्या आई-वडिलांची आठवण येऊन त्यालाही त्यांना भेटावेसे वाटले._

_दीर्घायुच्या मनात असे विचार आले की, आई-वडिलांची भेट होऊन खूप दिवस झाले आता जाऊन त्यांना भेटायला हवे, आई-वडिलांच्या आठवणीने जेव्हा तो वाराणसी मध्ये येऊन पोहोचला, तेव्हा आई-वडिलांना, सैनिकांनी दोरीने हात, पाय बांधून घेऊन जाताना शहरभर फिरवत आहेत हे पाहिले, म्हणून तो बेचैन झाला व त्यांच्या जवळ गेला तर वडिलांनी मोठ्या वेदनेने त्याला म्हटले दीर्घायु !_

*_न ही वेरेन वेरानि सम्मन्तिध कुदाचनं, अवेरेन च सम्मन्ति- दीघार्यु! वैराने चैर शांत होत नाही, अवैरानेच वैर शांत होते._*

_वाराणसी मध्ये दीर्घायु ला कोणी ओळखत नव्हते. दीधिति ने दीर्घायु ला उद्देशून म्हटलेली गाथा ऐकून सैनिकांनी विचारले, हे तु काय बडबडतो आहेस? दीर्घायु कोण आहे? दीधिति सैनिकांना म्हणाला- मी बडबडत नाही, *जो पंडित, ज्ञानी आहे, तो माझी गोष्ट सहज समजेल. मुलाने वडिलांच्या बोलण्याचा अर्थ समजून स्वतःवर नियंत्रण ठेवले* सैनिकांनी राजाच्या आदेशानुसार दीधिति च त्याच्या पत्नीला ढोल-ताशांच्या आवाजात सर्व शहरात फिरवून दक्षिण दाराजवळ त्यांचा बळी दिला, त्यांच्या मृत शरीरावर सैनिकांना पहारा ठेवून राजवाड्यात परत येऊन राजाला सर्व वृत्तांत कथन केला._

_दीर्घायु कुमार ने आई-वडिलांच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार करण्याचे ठरवले, त्याने वाराणसीच्या बाजारातून दारु विकत आणली, पहारेकऱ्यांना पाजली, पहारेकरी बेशुद्ध झाल्यावर त्याने आई-वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे एकत्र केले आणि तिथे चित्तेवर टाकून, चिता पेटवली, हात जोडून तिन वेळा प्रदक्षिणा केली काशिराजाने आपल्या महालाच्या छतावरुन पेटती चिता आणि बाजूला प्रदक्षिणा घालणारा तरुण पाहिला, विचार केला की- नक्कीच हा दीधितिचा कोणीतरी जवळचा किंवा नातेवाईक असावा, अरे एवढी मोठी गोष्ट, माझ्या दुर्दैवाने मला कोणी सांगितली कशी नाही._

_आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर दीर्घायु जंगलात जाऊन खूप रडला, त्यानंतर अश्रू पुसून शहरात आला. तिथे राज्याच्या अंतःपुरातील हत्ती शाळेच्या महावताकडे गेला व म्हणाला- आचार्य मला तुमचा शिष्य व्हायचे आहे, तुमच्याकडून शस्त्र, हस्तकला शिकायची आहे. हत्ती शाळेच्या महावत म्हणाला- शिक बाळा._

_अशा प्रकारे महावत आचार्यांकडे राहून दीर्घायु कला शिकू लागला. त्याचा आवाज खूपच कर्णमधुर होता तो विणा सुद्धा वाजवायचा, एकदा काशिराज ब्रह्मदत्ताने पहाटे त्याला गाताना आणि वीणा वाजवताना पाहिले, व त्याने सेवकांना विचारले की- इतक्या पहाटे मंजुळ आवाजात कोण वाजवत आहे? व कोण गात आहे? सेवकांनी माहिती काढली व सांगितले व तो महावत आचार्या चा विद्यार्थी आहे, जो इतक्या मधुर आवाजात गातो तसेच वीणा सुद्धा वाजवतो._

_काशिराज म्हणाला- त्याला माझ्याकडे घेऊन या तरुण जवळ येताच त्याला विचारले की, पहाटे तुच वीणा वाजवून गातोस का?_

_त्याने नम्रतेने म्हटले होय, राजा ! तर मला सुद्धा ऐकवून दाखव, राजाने म्हटल्यावर त्याला गाण्यासह वीणा वाजवून दाखवली काशिराज प्रसन्न झाला म्हणाला शिष्या, तु माझ्या सेवेसाठी राहा._

_ठीक आहे राजा असे म्हणून दीर्घायु कुमार ने काशिराजाला होकारार्थी उत्तर दिले व त्या दिवसापासून तो राजाचा सेवक म्हणून राहू लागला, थोड्या दिवसात विश्वास संपादन केला. राजाच्या आधी उठणारा, नंतर झोपणारा, कामाबद्दल विचारणारा प्रिय सेवक ठरला. थोड्या दिवसात तो राजाचा खास व्यक्ती म्हणून त्याच्या सोबत राहू लागला._

_एक दिवस राजा म्हणाला- शिष्य तयारी कर शिकारीला जाऊया अशा तन्हेने राजासाठी रथ तयार करुन दीर्घायुने त्याला जंगलात नेले, सैन्य एकीकडे आणि राजा दुसरीकडे पुढे गेल्यानंतर राजा म्हणाला- मानवका थांब, मला विश्रांती घ्यायची आहे, दीर्घायु कुमारने रथ थांबवला आणि जमिनीवर मांडी घालून बसला, आणि काशिराज त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला, दमल्यामुळे राजाला झोप लागली. तेव्हा दीर्घायु कुमार च्या मनात विचार आला हाच काशिराज ब्रह्मदत्त आहे, जो माझ्या सर्व दुःखाचे कारण आहे, याने माझ्या वडिलांचे राज्य हिसकावून घेतले, संपत्ती, धनधान्य, खजिना, सेना, वाहन, सर्वकाही स्वतःकडे घेतले, माझ्यासमोर माझ्या आई वडिलांना ठार केले, हिच वेळ योग्य आहे की, आता त्याचा बदला घ्यावा._

_त्याची हत्या करावी असे विचार मनात येऊन त्याने तलवार बाहेर काढली, *तेव्हा त्याला वडिलांच्या वचनाची आठवण झाली- न ही वरेन वेरानि सम्मन्तिय कुदाचनं, अवेरेन च सम्मन्ति म्हणजे वैराने वैर शांत होत नाही तर, अवैराने च वैर शांत होते याची आठवण झाल्यबरोबर त्याने तलवार पुन्हा ठेवून विचार केला की माझ्यासारख्या मुलाला वडिलांचा शब्द न पाळणे हे योग्य नाही. राजाला मारण्याचा विचार तिन वेळा दिर्घायु च्या मनात आला.*_

_त्याने तिन वेळा तलवार काढली, परंतु वडिलांच्या शब्दांची आठवण येताच तलवार तिन वेळा परत ठेवली अचानक, राजाची झोपमोड झाली. दीर्घायु ने विचारले काय झाले काय झाले राजा? काशिराज म्हणाला- मी एक भयानक स्वप्न पाहिले की, कोसलराज दीधिति चा मुलगा दीर्घायु कुमार ने मला तलवारीने ठार केले, या वाईट स्वप्नाने मला जाग आली._ 

_एका हाताने काशिराजाची मान पकडून दुसऱ्या हाताने तलवार काढत दीर्घायु कुमार म्हणाला हे राजा! दीधिति चा पुत्र मीच दीर्घायु कुमार आहे, माझ्या सर्व दुःखास तुम्ही कारणीभूत आहात, तुम्ही माझ्या वडिलांचे सर्व काही लुटले आहे, आणि माझ्या आई-वडिलांची हत्या केली आहे, तेव्हा काशिराजाने दीर्घायु च्या पायावर डोके ठेवून विनंती केली म्हणाला, हे, दीर्घायु मला सोड, जीवदान दे. दीर्घायु कुमार म्हणाला- जर, तुम्ही मला जीवदान दिले तर मी सुद्धा तुम्हाला जिवनदान देईन. तेव्हा काशिराज म्हणाला- तू मला जीवदान दे व मी तुला जीवदान देतो._

_काशिराज ब्रह्मदत्त आणि एकमेकांना जीवदान दिले आणि हातात हात घालून वैरत्व न करण्याची शपथ घेतली. तेव्हा काशिराज म्हणाला- चल, दीर्घायु तयारी कर, परत जाऊ लवकरच राजा सैन्याला जाऊन भेटला. वाराणसी मध्ये जाऊन ब्रह्मदत्ताने मंत्री परिषदेत असे सांगितले की, हा शिष्य दुसरा तिसरा कोणी नसून दीधितिचा मुलगा दीर्घायु आहे. आता तुम्ही सांगा याचे काय करायचे? परिषदेत जमलेल्या लोकांनी सांगितले- हे राजा! त्याचे हात, पाय, कान, नाक कापून टाकून त्याला ठार करु._

_तेव्हा काशिराज म्हणाला- अरे, तुम्ही याला हात सुद्धा लावायचा नाही, कारण त्याने मला जीवदान दिले आहे व मी त्याला जीवदान दिले आहे त्यानंतर *राजाने दीर्घायु कुमार ला विचारले तुझ्या, वडिलांनी मरताना तुला काय सांगितले होते, की ज्याचा विचार करुन, मला मारण्याची संधी मिळून सुद्धा तू मारले नाहीस? लहान-मोठे बघू नका, वैराने वैर शांत होत नाही, दीर्घायु, अवैरानेच वैर शांत होते, तुझ्या वडिलांच्या या अंतिम वचनाचा अर्थ काय?*_

_दीर्घायु म्हणाला- *मोठे काही बघू नका, म्हणजे माझे वडिलांच्या या शब्दाचा अर्थ आहे- वैर कायम धरून ठेवू नका. छोटे पाहू नको म्हणजे- मित्रांशी त्वरित सलोखा करा, म्हणजे संधी मोठी असो की, छोटी गोष्ट वैर जास्त वेळ ठेवू नये, कारण की वैराने वैर शांत होत नाही, अवैराने वैर शांत होते. राजाने माझ्या आई वडिलांना ठार केले, जर या विचाराने मी, राजाला मारले असते तर राजाच्या चाहत्यांनी मला ठार केले असते, आणि वैराने वैर कधीच शांत होत नाही, परंतु वडिलांच्या शब्दांचे वचन आठवून मी तुम्हाला जीवदान दिले आणि तुम्ही मला, कारण, अवैरानेच वैर शांत होते.*_

*_न ही वेरेन वेरानि सम्मन्तिध कुदाचनं ।_*

*_अवेरनच सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ।।_* 

*_वैरा ने वैर शांत होत नाही, अवैराने वैर शांत होते- हाच शाश्वत धम्म आहे._*

_काशीराज ब्रह्मदत्त म्हणाला अप्रतिम, अद्भुत, किती छान आहे, किती ज्ञानी आहे दीर्घायु कुमार, ज्याने वडिलांनी थोडक्यात सांगितलेल्या शब्दाचे वर्णन इतक्या विस्ताराने जाणले, व त्याला समजले. एवढे बोलून काशिराजाने ब्रह्मदत्त दीर्घायु कुमाराला त्याच्या वडिलांचे राज्य व सैन्य, खजिना, सर्वकाही परत केले आणि स्वतःच्या मुलीचा विवाह त्याच्या सोबत लावून दिला._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन :- महेश हरिश्चंद्र कांबळे_*

*दिनांक :-* ०१/११/२०२४

*_संदर्भ:-_*

१. *विनयपिटक - चुळवग्ग - सङ्घभेदक क्खन्धकं

२. *धम्मपद - यमक वग्गो*

३. *दीधिति जातक* 

४. *संघ भेदक जातक*

५. *धम्मपद अट्ठकथा - काळयक्खिनीवत्थु*

६. *मैत्री सम्पूर्ण धम्म आहे*

🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏

                 🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 30 October 2024

भिक्खू गलगेदर प्रज्ञानंद

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पूजनीय भन्ते गलगेदर प्रज्ञानंद महाथेर_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/10/blog-post_30.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_१४ ऑक्टोबर १९५६ रोजी, विजयादशमीच्या दिवशी भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व बाबासाहेबांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह नागपूरमध्ये बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. असा बुद्ध विनय आहे की, धम्मदीक्षा कोणा व्यक्ती कडून नव्हे तर, संघाकडून दिली जाते. तेव्हा "सघं शरणं गच्छामि" हे म्हणणे सार्थ ठरते. बोधिसत्व बाबासाहेबांनी त्यांच्या लाखो अनुयायांना धम्मदीक्षा सप्तवर्गिय भिक्खू संघाकडून दिली होती._

१) भदन्त चंद्रमणी महाथेर, 

२) भिक्खू प्रज्ञातिस्स, 

३) भिक्खू एम. संघरतन महाथेर. 

४) भिक्खू सुमेध, 

५) भिक्खू एच. सध्दा तिस्स, 

६) भिक्खू एच. धम्मानंद महाथेर, 

७) भिक्खू गलगेदर प्रज्ञानंद.

_*सप्तवर्गीय भिक्खू संघामध्ये सर्वात तरुण होते, भन्ते प्रज्ञानंद त्यावेळी ते २८ वर्षाचे होते, मूळचे श्रीलंकेचे वयाच्या तेराव्या वर्षी भारतात येऊन नव्वद वर्षापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ते पुण्यभूमि भारतातच राहीले. या संघामध्ये परमपूज्य भन्ते चंद्रमणी हे मूळचे ब्रह्मदेशातून होते, त्यांच्याबरोबर बोधिसत्व बाबासाहेब यांची पहिली भेट सहाव्या परिषदेदरम्यान १९५४ ला रंगून येथे बर्मामध्ये झाली, सुमित भन्ते भारतातील होते, आणि उर्वरित पाच भन्ते श्रीलंकेचे होते.* ज्यात सर्वात लहान होते प्रज्ञानंद भन्ते. *भन्ते प्रज्ञानंदाचा जन्म श्रीलंकेतील कँडी जिल्ह्यातील गलगेदर या गावी झाला. त्यांच्या गावाच्या नावावरुन त्यांचे नाव प्रज्ञानंद गलगेदर पडले.* आईचे नाव रम्मेनिका वाहील मुदियांसी हे कुटुंब पारंपरिक बौद्ध होते. त्यांच्यासाठी भारत पुण्यभूमी होती, वडिलांची चहाची बाग होती घरात सुख समृद्धी होती. श्रीलंकेतील तसेच बौद्ध देशातील प्रत्येक गाव-शहरांप्रमाणे येथे ही एक विहार होते, जिथे अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा, या दिवशी उपोसथ ठेवत. *प्रज्ञानंद लहान असताना बुद्धांच्या गोष्टी ऐकत असे, त्याला भारताबद्दल प्रचंड श्रद्धा निर्माण झाली होती, त्याच दरम्यान महाबोधि सोसायटी ऑफ इंडियाच्या एका नियतकालिकात एक जाहिरात छापून आली की, भारतातील जेष्ठ भन्ते बोधानंद यांना श्रीलंकेच्या पारंपारिक बौद्ध कुटुंबातून एक मुलगा हवा आहे, ज्याला ते त्यांचा शिष्य म्हणून त्याला धम्म शिकवतील. महाबोधी सोसायटीचे तत्कालीन सरचिटणीस देवप्रिय वली सिंह हे देखील मूळचे श्रीलंकेचे तसेच भन्ते बोधानंदाचे मित्र होते. त्यांच्या सहकार्याने ती जाहिरात महाबोधी च्या मासिकात प्रसिद्ध झाली होती. गावातील भन्तेंनी ती जाहिरात वाचून प्रज्ञानंद यांच्या परिवाराशी चर्चा केली. कुटुंबातील लोकांच्या आधी छोट्या प्रज्ञानंदाला आनंद झाला होता की, त्याला पुण्यभूमी ला जाण्याची संधी मिळेल, तो जाण्यास तयार झाला. जरी तो यावेळी फक्त १३ वर्षाचा होता, दस्तऐवजानुसार त्याची जन्मतारीख १८ डिसेंबर १९२७ होती, व जाहिरात १९४० मधली होती. कुटुंबाच्या परवानगीने छोट्या प्रज्ञानंदाला घेऊन गावातील भन्ते कोलंबोला पोहोचले. ज्या ठिकाणी पात्रतेच्या आधारे मुलांची निवड होणार होती, सात मुलांपैकी दोन निवडले, त्या दोघांमध्ये प्रज्ञानंद होते.*_

_भन्ते प्रज्ञानंदाचे घरचे नाव सुद्धा हेच होते, तसेच दिक्षेनंतर सुद्धा ते याच नावाने राहिले. *महाबोधी सोसायटीद्वारे भारतात पोहोचल्यावर भदंत बोधानंदांनी प्रज्ञानंदला शिष्य म्हणून स्विकारले. देव प्रिय वली सिंहाने त्याला लखनऊला आणले होते. विसाव्या शतकामधील हा बौद्ध धम्माच्या जागरणाचा काळ होता. तेव्हा एकाहून एक लोक कार्यरत होते. चटगाव सध्याचे बांग्लादेशचे भन्ते कृपा शरण माहास्थवीर कार्यरत होते, कुशिनगर येथे महाविर महास्थविर चळवळ बघत होते. तामिळनाडूमध्ये पी. लक्ष्मी, नरसू कामकाज पाहत होते. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मध्ये केंद्र बनवून तिथे भदन्त बोधानंद कार्य करीत होते.

_*बोधिसत्व बाबासाहेब भन्ते बोधानंदाच्या कार्याने प्रभावित होते, तसेच जेव्हा ते लखनऊ ला येत तेव्हा ते रिसालदार पार्क, लालकुआं विहारात भन्ते बोधानंदांना भेटायला जरुर येत असत, तसेच त्यांच्या बरोबर तासनतास धम्मचर्चा करीत. १८ एप्रिल १९४८ ला बोधिसत्व बाबासाहेबांचा या विहारात आल्याचा फोटो उपलब्ध आहे. बाबासाहेबांना हवे असलेले दुर्मिळ ग्रंथ त्यांना या विहारात ग्रंथालयातून मिळाले.* पुन्हा १९५१ एप्रिल मध्ये बाबासाहेब येथे येण्याची नोंद आहे पण फोटो नाही. *महाबोधी सोसायटीचे सरचिटणीय अनागरिक धम्मपाल यांचे शिष्य, देवप्रिय वली सिंह तेरा वर्षाच्या छोट्या प्रज्ञानंदाला घेऊन २० ऑक्टोबर १९४१ लखनऊ मधील या विहारात आले. तसेच भन्ते बोधानंदाला हस्तांतरित केले. याच विहारात ३० एप्रिल १९४२ भन्ते बोधानंदांकडून प्रज्ञानंदाची श्रामनेर दीक्षा झाली, व त्यांचे दिक्षीत नाद श्रामणेर गलगेदर प्रज्ञानंद झाले.* सोप्या शब्दात, बुद्ध धम्मात श्रामणेर दिक्षेला छोटी दिक्षा तसेच उपसंपदेला मोठी दिक्षा म्हणतात. *श्रामणेर दिक्षेच्या वेळी महापंडित राहुल सांस्कृत्यायन, डॉ. भदंत आनंद कौसल्यायन तसेच भिक्खू महानाम हजर होते. प्रज्ञानंद यांची मोठी दिक्षा म्हणजे उपसंपदा १९४८ ला सारनाथ येथे बोधानंदांकडून त्याच सिमेमध्ये पार पडली, ज्या ठिकाणी अनागरिक धम्मपाल यांची दिक्षा झाली होती. सारनाथ मध्ये उपसंपादक दिक्षा घेणारे दुसरे भिक्खू प्रज्ञानंद होते.*_

 _*भन्ते प्रज्ञानंद यांची सीमा दिक्षा घेऊन ४ वर्षा नंतर, भन्ते बोधानंद यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी पौर्णिमेला, ११ मे, १९५२ ला कलकत्ता येथे देहत्याग केला. त्यांच्या चळवळीची सर्व जबाबदारी त्यांच्या पंचवीस वर्षीय धम्मपुत्र भन्ते गलगेदर प्रज्ञानंदावर येऊन पडली. गुरु बोधानंदाचे परिनिर्वाण प्रज्ञानंदासाठी दुसरे भावनिक वळण आले, ते १० वर्षाचे असतांना आईचे निधन तर वडिलांचे निधन त्यांच्या लहानपणीच झाले होते. भारतात येऊन या धरतीला आई आणि गुरु बोधानंदांना वडील मानले होते, गुरुंचे जाणे त्याच्या आयुष्यातील भावनिक धक्का होता. गुरु बोधानंदाचे अनुयायी आणि १९१६ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या "भारतीय बौद्ध समिती" च्या सदस्यांनी सामूहिक निर्णय घेऊन भन्ते गलगेदर प्रज्ञानंदांना विहार तसेच समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.*_

_भारतीय बौद्ध महासभेच्या तत्वाखाली भन्ते बोधानंदानी बौद्ध साहित्य प्रकाशनाचे काम सुरु केले होते. त्यावेळी बौद्ध संस्काराची कोणतीच पुस्तके उपलब्ध नव्हती, *भन्ते बोधानंदानी "बौद्ध चर्या पद्धती," "श्रामनेर विनय," "भगवान बुद्ध," मूल भारतवाशी आणि आर्य इ. पुस्तके प्रकाशित केली. बौद्ध संशोधन ग्रंथालय स्थापन केले. भन्ते प्रज्ञानंद यांनी गुरुंच्या कार्याला अधिक व्यापक स्वरुप दिले. एक-एक करुन त्यांनी एकूण ६५ पुस्तकांचे प्रकाशन केले. त्यामध्ये महापंडित राहुल सांस्कृत्यायन यांनी भाषांतरित केलेले "मज्झिम निकाय" हे सुद्धा होते. त्यानंतर त्यांनी मध्यममार्ग नावाचे साप्ताहिक सुरु केले. जे तीन वर्षे सातत्याने यशस्वी झाले, आणि नंतर पैशाच्या अभावामुळे बंद पडले. यानंतर भन्ते प्रज्ञानंद यांनी त्यांचे लक्ष लोकांच्या हिताकरिता सामाजिक कार्याकडे केंद्रित केले. "मानव उत्थान मिशन" नावाची एक संस्था स्थापन केली. ज्यामध्ये त्यावेळचे डॉ. गया प्रसाद प्रशांत आणि रायबरेली चे श्री. रामनाथ अमलकारी यांचे विशेष योगदान होते. या संस्थेच्या माध्यमातून भन्तेजींनी "मानव उत्थान" नावाचे मासिक सुरु केले. या संस्थेच्या उत्तर प्रदेशातल्या बऱ्याच जिल्ह्यात शाखा सुरु केल्या तसेच एक शाखा मध्यप्रदेशात सुद्धा उघडण्यात आली. भन्तेजींच्या जिवनातले दुसरे निर्णायक वळण बोधिसत्व बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या धम्मदीक्षा कार्यक्रमात उपस्थित राहणे. ज्याप्रमाणे भन्तेजी सांगतात की, बाबासाहेबांना त्यांचे गुरु भन्ते बोधानंदांकडून दिक्षा घ्यायची होती, आणि एकदा तर त्यांनी लखनऊमध्ये भन्ते बोधानंदांसमोर भिक्खू बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु १९५२ मध्ये भन्ते बोधानंदाचे परीनिर्वाण झाल्यामुळे, धम्मदीक्षेच्या कार्यक्रमात भन्ते प्रज्ञानंद यांनी गुरुचे प्रतिनिधित्व केले.* सप्तवर्गीय भिक्खूंमध्ये सर्वात तरुण, केवळ अट्ठाविस वर्षाचे होते._

_भन्ते प्रज्ञानंद सर्व जिवनभर याच कारणाने लोकप्रिय नाहीत की, ते केवळ बाबासाहेबांच्या धम्मदिक्षेच्या कार्यक्रमाचा एक भाग होते, परंतु धम्मदिक्षेनंतर फक्त ५३ दिवसात बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर भन्ते प्रज्ञानंद यांनी धम्मदिक्षेची चळवळ सुरु ठेवली, त्याला पुढे आणून विकसित केले. *बाबासाहेबानंतर भन्ते लखनऊ येथील उद्यानात धम्मदीक्षेचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यात बाबासाहेबांचे दिक्षा गुरु भन्ते चंद्रमणी महात्थेर स्वतः उपस्थित होते. या कार्यक्रमात १९५७ ला जवळपास पाच हजार लोकांनी दिक्षा घेतली. लखनऊ च्या धम्म दिक्षेनंतर भन्तेंनी अलीगड, जालंधर (पंजाब) देशातील अनेक ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम आयोजित केले त्यामध्ये लाखो लोकांनी दिक्षा घेतली.* बोधिसत्व बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर संपूर्ण भारतभर धम्मदीक्षेच्या चळवळीव्यतिरिक्त *पूजनीय भन्तेंनी इतर सामाजिक प्रकल्प, धार्मिक प्रकल्पांवर ही उल्लेखनीय कार्य केले. बरेच बौद्ध साहित्य प्रकाशित केले. "मध्यम मार्ग" नावाचे मासिक सुरु केले. त्यांच्याकडून आशिर्वाद घेऊन समन्वय सेवा समितीने याच नावाने मासिक सुरु केले पूजनीय भन्तेजींवर बरेच अंक ही काढले. भन्ते गलगेदर प्रज्ञानंद महात्थेरांनी श्रावस्ती च्या बौद्ध स्थळांच्या संरक्षणार्थ विशेष काम केले. १९९४ मध्ये जेतवन विद्यालयाची स्थापना केली. ज्यात इंटरमीडिएट पर्यंतचा अभ्यास शिकवला जातो. १९८४ मध्ये कुशीनगर येथे प्रस्थापित जपानी बुद्धविहाराच्या निर्मितीमध्ये पण त्यांचे योगदान आहे.*_

_*भारतात कुठेही भिक्खू प्रशिक्षण केंद्र नव्हते. भन्तेंनी जपानी गुरु रेन-चेन यांच्या स्मरणार्थ श्रावस्तीमध्ये भिक्खू प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. ज्यात भन्तेंनी त्यांच्या हयातीत जवळपास २०० लोकांना श्रामनेर दिक्षा देऊन भिक्खू बनविले, जवळपास सहा श्रमनेरांना उपसंपदा स्वतः दिली, यामध्ये पूजनीय भन्ते उपानंद, पूज्य भन्ते पञ्ञासार, पूज्य भन्ते सुमनरत्न, पूज्य भन्ते ज्ञानलोक, पूज्य भन्ते धम्मप्रिय, पूजनीय भन्ते देवेंद्र, पूज्य भन्ते संघरक्षित प्रमुख आहेत. ४० ते ५० वयाचे आज जेवढे भिक्खू भारतात किंवा परदेशात प्रमुख सक्रिय आहेत त्यातील जास्तीत जास्त श्रामनेर दिक्षा भन्ते कडून घेतलेले आहेत. या प्रशिक्षण संस्थेत त्यांनी केवळ बुद्धधम्माचे प्रशिक्षण न देता जेतवन विद्यालयात त्यांना आधुनिक अभ्यासक्रम तसेच हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान शिकवले. विद्यार्थ्यांची फी आणि शिक्षकांचा पगार त्यांनी मिळवलेल्या रकमेतून दिला. धर्मप्रचारासाठी तसेच श्रद्धावान उपासक-उपासिकांचे आमंत्रण स्विकारून भन्तेंनी जपान, इंग्लंड, अमेरिका, श्रीलंका येथे बऱ्याच वेळा प्रवास केला.*_

_भारतीय नवबौद्धांना एकदा ते म्हणाले, भारताचे नवबौद्ध त्रिपिटक साहित्याच्या दृष्टीने जास्त शिक्षित नाहीत, म्हणून त्यांना बौद्ध परंपरेविषयी आवड नाही, बौद्धांच्या नियमांचे ज्ञान नाही. परदेशातून लोक मोठ्या आशेने भारतात येतात, परंतु नवबौद्धांना भेटून निराश होतात, माझा संदेश आहे की, त्यांनी त्रिपिटक बौद्ध साहित्य वाचावे, बौद्ध परंपरा रितीरिवाज परत सुरु कराव्या, आपली अशी ओळख निर्माण करा की, विदेशातील लोकांवर छाप पडेल._

   _*महाबोधी सोसायटी चे संस्थापक, अनागारिक धम्मपाल यांनी शपथ घेतली होती की, त्यांना परत जन्म भारतातच हवा. आणि गलगेदर प्रज्ञानंद यांची प्रतिज्ञा होती की, श्रीलंकेत जरी जन्मलो, तरी भारत हीच माझी धम्मभूमी आहे. म्हणून मी ह्याच पुण्यभूमीत देहत्याग करणार पूजनीय भन्तेंची प्रतिज्ञा पूर्ण झाली, ३० नोव्हेंबर २०१७ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी लखनऊ या शहरात देहत्याग केला.* त्यांचा अंतिम संस्कार १७ डिसेंबर २०१७ ला श्रावस्ती मध्ये संपूर्ण राजकीय सन्मानाने झाला._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन :- महेश हरिश्चंद्र कांबळे_*

*दिनांक :-* ३१/१०/२०२४

*_लेखक :- राजेश चन्द्रा_*

*_संदर्भ:- मैत्री सम्पूर्ण धम्म आहे_*

   🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏

      🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Tuesday, 29 October 2024

बुद्धांचे परिचर (उपस्थापक)

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_बुद्धांचे परिचर (उपस्थापक)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/10/blog-post.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_सिद्धार्थ ते बुद्धत्व प्राप्ती ह्या काळात सिद्धार्थ यांनी अती कष्ट केले, ह्या दरम्यान काळात *कौण्डिण्य, वप्प, भद्दिय, महानाम आणि अस्सजित ह्यांनी त्यांची सेवा केली होती.* पण सिद्धार्थाने अन्न सेवन केल्यामुळे ते त्यांना सोडून गेले. पुढे जाऊन सिद्धार्थ यांनी बुद्धत्व प्राप्त केले आणि ते भगवान बुद्ध झाले. बुद्धत्व प्राप्ती झाल्या पासून ते पुढे वीस वर्षात त्यांचा कोणताही वैयक्तिक परिचर / उपस्थापक नव्हता. या काळात वेळोवेळी बऱ्याच भिक्खूंनी त्यांची सेवा केली. *त्यांची नावे नागसिमाला, नगिता, उपवना, सुनाखता, चुंदा, सागता, राध आणि मेघीय, ह्याची अधिकृत नोंद आहे.*_

१. *नागसिमाला*

            _हा शाक्य कुळातील होता. एकदा बुद्ध आणि नागसिमाला दोन वेगवेगळ्या दिशेने खुणविणाऱ्या मार्गावर आले. बुद्धांनी एका मार्गावर प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु नागसिमालाने दुसऱ्या मार्गाने जाण्याचा आग्रह धरला. जेव्हा *बुद्धांनी त्याच्या इच्छित मार्गात जाण्याच्या धोक्याबद्दल त्याला स्पष्टपणे चेतावनी दिली, तेव्हा नागसिमालाने लगेच बुद्धांचे भिक्षापात्र आणि चिवर जमिनीवर ठेवले आहे आणि मी तुम्हाला सोडून जात आहे असे बोलून ताबडतोब त्याने बुद्धांना सोडले आणि आपल्या इच्छित मार्गाने निघाला.* काही वेळानंतर त्या मार्गाने जाताना मार्गावरील माणसांनी त्याच्यावर आक्रमण केले आणि त्याच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर तो बुद्धांकडे परत आला आणि त्यांची क्षमा मागू लागला. बुद्धांचे सेवक म्हणून त्याची सेवा नंतर नाकारल्या गेली._

२. *नगिता*

            _बुद्धांचा वैयक्तिक परिचर म्हणून काम करणारा आळशी आणि अवजड बांधा असलेला होता. बुद्धांनी नगिताला सूचित केले की भिक्षूंनी खेड्यात न राहता जंगलात राहून लठ्ठपणा व खुशामत, वाहवा करणे सोडले असते तर त्यांना आनंद झाला असता. परंतु *नगिताने चंगळपूर्ण जगणे पसंत केले. म्हणूनच त्याने स्वतःला बुद्धांचे वैयक्तिक सेवक म्हणून अपात्र केले.*_

३. *उपवना* 

    ‍    _श्रावस्तीच्या ब्राह्मण घराण्यातला होता, तो बुद्धांचा वैयक्तिक परिचर म्हणून नेमलेला होता. एकदा बुद्धांना स्नायूच्या वेदनादायक आकुंचनामुळे तीव्र वेदना होऊ लागल्या. उपवनाने त्याचा मित्र देवहीता ह्याच्या मदतीने गरम पाणी आणि औषधे तयार केली. ज्याच्या लावण्यामुळे बुद्ध तीव्र वेदनेपासून मुक्त झाले. पण *उपवना बुद्धिमान नव्हता आणि तो बुद्धांच्या विचारशील हावभावाचे महत्त्व समजू शकला नाही.*_

४. *सुनाखता*

             _वैशालीचा लीच्छवी राजपुत्र बुद्धाचा वैयक्तिक सेवादार बनला, पण नंतर तो कोरखट्टीपाच्या मताच्या विचारसणीमध्ये बदलला आणि तो संघाला सोडून निघून गेला._

५. *चुंदा समनुद्देसा*

           _हा नवशिका होता आणि काही काळापर्यंत त्याने बुद्धांचे वैयक्तिक सेवादार म्हणून काम केले. जेव्हा बुद्ध दोन चमत्कार प्रदर्शित करणार होते. तेव्हा बुद्धांचा त्रास आणि परिश्रम वाचविण्यासाठी चुंदाने स्वतः चमत्कार करण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. परंतु चुंदा नवशिक्या होता आणि फार तरुण होता आणि म्हणून बुद्ध पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहू शकत नव्हते._

६. *सागता* 

          _एकदा तो भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेला. काही घरात त्याला बोलविण्यात आले त्यामुळे तो हर्षोत्फुल्ल झाला आणि त्याने मद्यपान केले. तो इतका धुंद झालेला होता आणि तो विहाराकडे परत यायला निघाला आणि खाली पडला, विहाराच्या प्रवेशद्वाराजवळ त्याचे संतुलन गमावले, त्याला भिक्षूंनी उचलून आत आणून बुद्धांच्या पायाजवळ त्याचे डोके ठेवले. *अनपेक्षितपणे तो पूर्ण गोल फिरला आणि शास्ताकडे त्याचे पाय आले.* दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची नशा उतरली त्याला त्याने केलेली गंभीर चूक कळून आली. त्याने ह्याबद्दल बुद्धांकडे क्षमा, दयेची याचना केली. त्याप्रसंगी बुद्धांनी त्याला माफ केले. परंतु बुद्धाची सेवा करण्याची क्षमता त्याच्यात खरोखरच नव्हती._

७. *नवशिक्या राध*

        _जो थोड्या काळासाठी बुद्धांचा सेवादार म्हणून होता. त्यापूर्वी तो सारीपुत्तांचाही सेवादार होता. तो कौटुंबिक होता. परंतु तो आपल्या कर्तव्यात फार कुशल होता._

८. *मेघीय*

     _तो शाक्य कुटुंबातील होता, त्यानेही कर्तव्ये पार पाडली. एकदा मेघीय भिक्षा मागण्याकरिता जंतुहमाला गेला आणि परत येताना नावेतून तो नदी किनाऱ्यावरील आम्रवनाकडे फार आकर्षित झाला. त्याने तेथे राहून घ्यान करण्याची बुद्धांची परवानगी मिळावी म्हणून प्रार्थना केली. दोनदा बुद्धांनी त्याची प्रार्थना नाकारली, परंतु तिसऱ्यावेळी त्यांनी त्याला तिथे जाण्याची परवानगी दिली. तिथे गेल्यावर मेघीयाच्या मनात भीतिदायक विचार येऊ लागले आणि तो घाबरून गेला व शेवटी संघामध्ये परतला. बुद्धांची सेवा करण्याची क्षमता त्याच्यातही स्वाभाविक अशी नव्हती._ 

_जेव्हा बुद्ध पन्नास वर्षाचे झाले त्यांनी भिक्खूच्या संघासमोर त्यांचा निर्णय सांगितला की मी वाढत्या वयामुळे वाकलेला आहे आणि अशक्तपणामुळे मी अनुयायांना उपदेश करण्याकरिता असमर्थ असल्याचे आपण ओळखले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या वैयक्तिक सेवेकरिता भिक्खू नियुक्त केला पाहिजे जेणेकरून तो माझी काळजी घेईल. बुद्धांचे सर्व प्रसिद्ध आणि ज्येष्ठ शिष्य स्वतःहून उत्साहपूर्वक प्रशंसनीय ह्या जबाबदारीसाठी पुढे आले._

_*कौंडिण्य* म्हणाले की ते सेवक होण्यास तयार आहेत. परंतु बुद्धांनी त्यांना म्हटले की ते आता म्हातारे झालेले आहेत आणि त्यांनी स्वतःसाठी एक परिचर घ्यावा. *अश्वजी, सुबाहू आणि इतर सर्व स्थविरांनी ह्या सेवेकरिता त्यांच्याकडे प्रार्थना केली.* पण बुद्ध म्हणाले की, ते खूप वयोवृद्ध आहेत, *तेव्हा मोद्गल्यान ह्यांनी विचार केला की आनंद ह्याकरिता योग्य उमेदवार राहील आणि तो बुद्धांना सुद्धा मान्य असेल म्हणून त्यांनी सारीपुत्ताला सोबत घेतले आणि जाऊन आनंदाला विचारले की, ही महत्त्वपूर्ण जबाबदारी आपण स्वीकाराल का? आनंदाने प्रथम नकार दिला.*_

_साहित्यामध्ये अजून एक कथा ऐकण्यास मिळते ती अशी.... *शास्ताने आपल्या ऐंशी शिष्याद्वारे देऊ केलेल्या प्रस्तावित सेवांना एकामागून एक नकार दिला, तेव्हा आनंदा एकटाच शांत बसलेला होता. त्याला विचारले गेले की, त्याने स्वतःला का सेवेकरिता सादर केले नाही. तर त्याने त्वरित उस दिले की, "बुद्ध चांगल्याप्रकारे जाणून आहेत आणि कोणाची निवड करावी हे त्यांना चांगले ठाऊक आहे. "*_

_शेवटी *बुद्धांनी आनंदास वैयक्तिक परिचर म्हणून नेमणूक करण्यास मान्यता दिली.* ही जबाबदारी काही पूर्व शर्तीवर स्वीकारण्यास आनंदाने मान्य केले. परंतु त्याने ज्या चार गोष्टी नाकारल्या होत्या त्या अशा :-_

१. जर बुद्धांना उत्तम उंची चिवर दानात मिळाल्यास ते त्यांनी त्याला देऊ नये, किंवा देण्याची गरज नाही, 

२. बुद्धांना मिळालेली भिक्षा त्यांनी त्याला देऊ नये, 

३. बुद्धांच्या सुगंधित असलेल्या खोलीमध्ये तो राहणार नाही 

४. आणि जर बुद्धांना वैयक्तिक आमंत्रण मिळाले असेल तर त्यामध्ये त्याचा समावेश करू नये. 

_तसेच या चार गोष्टी त्यांनी स्वीकाराव्या अशी त्याची इच्छा होती. की जर...._

१. त्याने स्वतः आमंत्रण स्वीकारले तर बुद्ध त्याच्यासोबत असावेत, 

२. त्याचप्रमाणे जर बुद्धांना दूरून लोक भेटावयास आले तर त्यांना त्याच्याकडे सादर केले पाहिजे. 

३. तो त्यांना बुद्धांकडे भेटण्यास परवानगी देईल आणि 

४. बुद्ध त्याच्या अनुपस्थितीत जे उपदेश शिकवतील ते त्याला परत सांगण्यात यावे.

_पुढे त्या दिवसापासून सुमारे ३० वर्ष बुद्धांच्या महापरिनिर्वाणापर्यंत त्यांची सावली म्हणून न थकता, दिवस-रात्र, न झोपता त्यांच्या सेवेत व्यस्त राहिला. बुद्ध सेवेत आनंद इतके व्यस्त राहिले की, त्यांना अर्हत पद प्राप्त करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही किंवा त्यांना त्या क्षणापर्यंत त्याची जाणीवच राहिली नाही.... ते फक्त बुद्ध सेवेत स्वतःला झोकून देत होते. बुद्धांच्या सेवेत असताना त्यांचे शरीर झिजले तरी त्यांना त्याचे काही महत्त्व नव्हते, चिंता नव्हती._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन :- महेश हरिश्चंद्र कांबळे_*

*दिनांक :-* ३०/१०/२०२४

संदर्भ:-

१. उदान अट्ठकथा

२. अनुत्तरित शिकार

३. धम्मपद अट्ठकथा

४. लोमहंस जातक

५. थेरगाथा अट्ठकथा

६. मनोरथपुरणी

७. The life of Buddha 

८. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏

🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...