Tuesday, 13 February 2024

भगवान बुद्धाचे लोकोत्तर गुण

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भगवान बुद्धांचे लोकोत्तर गुण_*

*_भंते के. श्री. धम्मानंद_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                      _भगवान बुद्ध सर्व उच्च गुणांचे मूर्तरूप होते. उच्चतम शील, समाधी आणि प्रज्ञा ह्या गुणांचे मूर्तरूप- मानवी इतिहासात कोणत्याही दुसऱ्या (इतर) व्यक्तीत इतक्या विशाल स्वरूपात नव्हते. ह्या उच्च मूल्यांचा उल्लेख भगवान बुद्धांचे उपदेश ज्या ग्रंथात (त्रिपिटक) लिपिबद्ध आहेत, त्यात आहे._

                     _*पाली सुत्तातं भगवान बुद्धाच्या नऊ लोकोत्तर गुणांचा समावेश आहे.* बौद्ध जगतात दररोज त्याचे पठण आणि त्यावर चिंतन केले जाते. भगवान बुद्धात आणखी मौल्यवान गुण होते पण पाली सुत्तात नऊ गुण उल्लेखिले आहेत. येथे हा उल्लेख करणे उचित ठरेल की काही बौद्ध परंपरेत, अनुयायांनी विभिन्न गुणांच्या बुद्धांचा उल्लेख केला आहे. कशाही पद्धतीने बुद्धांना वर्णिले गेले तरी तथ्य असे आहे की जे ऐतिहासिक बुद्ध ह्या जगात उत्पन्न झाले त्या साऱ्यांमध्ये सारखेच गुण होते. साऱ्यांनीच संबोधि प्राप्त केली होती. त्यामुळे कोणत्याही बुद्धाला आदरांजली वाहिली तरी फारसे बिघडत नाही. कोणता बुद्ध जास्त अधिकारप्राप्त आहे. शक्तिशाली आहे व कोणता नाही ह्या वादात तथ्य नाही._

               _भगवान बुद्धाचे अनुयायी भगवान बुद्धांना आदरांजली वाहताना पाली भाषेतील जी शब्दावली उच्चारतात त्यात बुद्धाचे नऊ लोकोत्तर गुण आहेत. ती शब्दावली खालील प्रमाणे आहे-_

_*"इतिपि सो भगवा अरहं सम्मासम्बुद्धो ।*_

*_विज्जाचरण संपन्नो, सुगतो, लोकविदू अनुत्तरो।_*

*_पुरिसधम्मसारथी, सत्या देव-मनुस्सानं, बुद्धो भगवा ति।।"_*

                _उपरोक्त शब्दावलीबद्दल शंका घेण्यास वाव नाही. त्रिपिटकातील महत्त्वाच्या प्रकरणांमधून हे शब्द वेचले आहेत. तसेच शमथा भावनेच्या चाळीस भावनांपैकी एक भावना (साधना) 'बुद्धानुस्सति' आहे, अर्थात् बुद्ध गुणांचे ध्यान चिंतन करणे. पाली भाषेतील वरील शब्दावलीचे विवरण खाली दिले आहे._

_*१. अरहं -* निम्नलिखीत पाच पैलूंमुळे बुद्धांना अर्हत म्हणतात_

_(i) सर्व क्लेषांचा नाश केला आहे._

_(ii) क्लेषांना नष्ट करण्यासाठी सर्व शत्रुचा नाश केला आहे._

_(iii) भव चक्रातील आधारभूत कड्यांना नष्ट केला आहे._

_(iv) पूजनीय आहेत व दान देण्यास योग्य आहेत._

_(V) त्यांचे चारित्र्य व शिकवण निष्कलंक, पारदर्शक आहे._

                 _मानवी इतिहासात बुद्ध सर्वोच्च मानव आहेत- निष्कलंक चारित्र्य, आयुष्यात परिपूर्णता असलेले, परिपूर्ण निर्दोष, साऱ्या दुष्ट अकुशलांचा त्याग करून पावित्र्याची अत्युच्य अवस्था त्यांनी गाठली, निर्वाण गाठून ते दुःखमुक्त झाले. सर्व बाजूंनी विचार केल्यास ते जगत् वंदनीय आहेत. त्यांच्या उपदेशात चमत्कारिक वा गुढ असे नाहीच कोणीही यावे पहावे, आणि अनुभव घ्यावा._

_*२. सम्मा सम्बुद्धो* भगवान बुद्धांना सम्मा-सम्बुद्धो ही उपाधी लावली जाते कारण त्यांनी जगाचे अस्तित्व खोलात जावून जाणून घेतले. त्यांनी स्वतः चार आर्य सत्ये शोधून काढली. राजपुत्र म्हणून ते जन्मास आले. संसार त्याग करून सहा वर्षे तप केले. त्या काळच्या प्रसिद्ध आचार्यांकडे जाऊन, त्या-त्या आचार्यांना माहित असलेल्या साऱ्या पद्धती आत्मसात केल्या. आचार्यांच्या समकक्ष होऊन सुद्धा त्यांना संबोधि प्राप्त झाली नाही. शेवटी विवेकनिष्ट तर्क संगती आणि मध्यममार्गाची कास धरून, परंपरागत श्रद्धा आणि पद्धतीचा त्याग करून त्यांनी असमाधान, तणाव, दुःख ह्या वैश्विक समस्यांवर उपाय शोधला. प्रतित्य समुत्पाद सिद्धांत शोधला आणि सम्यक समबुद्ध झाले._

_*३. विज्जाचरण संपन्नो -* भगवान बुद्धांना परिपूर्ण स्पष्ट दृष्टी लाभ झाला होता आणि त्यांचे आचरण सुद्धा आदर्श होते. त्यांना त्रिविध ज्ञान आणि प्रकारचा प्रज्ञालाभ झाला होता._

    _-बुद्ध स्वतःचे व इतरांचे पूर्वजन्म जाणून घेवू शकत होते_

   _-भविष्य वेध घेवू शकणारी आणि संपूर्ण विश्व एका क्षणात पाहू शकणारी अंतर्दृष्टी त्यांना लाभली होती._

    _-अत्यंत खोलात शिरून जाणून घेणारी अर्हत्वाची दृष्टी त्यांना प्राप्त झाली होती._

              _*आठ प्रकारच्या प्रज्ञांमध्ये त्यांना दिव्य दृष्टी, दिव्य श्रोत, इतरांच्या मनातील विचार जाणून घेण्याची शक्ती, असाधारण करतब करून दाखविण्याचे सामर्थ्य, पुनर्जन्म आठविण्याचे सामर्थ्य, अंतर्दृष्टी, शारीरिक सामर्थ्य, अत्यंत पवित्र जीवनाचे अत्यंत सुक्ष्मग्राही ज्ञान- प्राप्त झाले होते._*

                 _*आचरण पंधरा भागात विभागले आहे.* हे पंधरा प्रकारचे सद्‌गुण भगवान बुद्धांत परिपूर्ण प्रकटले होते. शब्द अर्थात वाचा आणि कृतीवर संयम, इंद्रियांवर व इंद्रियांच्या परिणामांवर संयम, भोजनावर नियंत्रण, झोपेवर नियंत्रण, सुस्पष्ट श्रद्धा अकुशलात भय, ज्ञानपिपासा, शक्ती, जागृती, प्रज्ञा, करूणा संपूर्ण जीवसृष्टीसाठी काय बरे, काय वाईट हे आपल्या प्रज्ञेद्वारे जाणून करूणे पोटी त्यांनी मानवतेची सेवा केली. आपल्या उच्च गुणांमुळेच सर्व जीवसृष्टीत बंधुत्वाचे, सेवेचे नाते जोडते._

_*४. सुगतो-* भगवान बुद्धांना 'सुगत' हे विशेषण लावले जाते. कारण त्यांचा मार्ग चांगला आहे. त्याचे गंतव्यस्थळ उत्कृष्ट आहे. हा मार्ग दाखविण्यासाठी जे शब्द वापरले आहेत, जी पद्धती वापरली आहे ती निर्दोष आणि निष्कलंक आहे. सर्वोच्च सुखप्राप्तीसाठी बुद्धांनी योजिलेला मार्ग योग्य आणि शुद्ध आहे. सरळ, स्पष्ट आणि खात्रीशीर आहे._

                _भगवान बुद्धांचे शब्द उदात्त, लोकोत्तर आणि अचूक आहेत. *जगप्रसिद्ध इतिहास तज्ञ आणि महान वैज्ञानिकांनी भाष्य केले आहे की "धार्मिक उपदेशांमध्ये केवळ बुद्धवचनेच अशी आहेत की ज्यांना विज्ञान आणि बुद्धिमान आव्हान देऊ शकले नाहीत."*_

_*५. लोकविदू -* जगाची उत्तम जाण असणारा 'लोकविदू' हे पद बुद्धास लावले जाते. जगातील भौतिक आणि आध्यात्मिक साऱ्या अवस्थांना जाणून, त्यांचे भेदन करून अनुभवणारे हे श्रेष्ठ आचार्य, ब्रह्मांडात आपल्या सौरप्रणाली प्रमाणे आणखी शेकडो प्रणाली अस्तित्वात आहेत असे सांगणारे पहिला श्रेष्ठ मानव. हे जग एक 'धारणा आहे त्यांनी प्रथमच सांगितले, जगाचा प्रारंभ आणि अंत याबद्दल अंदाज करणे निरर्थक आहे. मानवी शरीर, मानवाची आकलन शक्ती, मानवी विज्ञान यातच त्याचे उत्तर सापडू शकेल अशा मताचे भगवान बुद्ध होते._

_*६ अनुत्तरो - पुरिस दम्म सारथी -* अनुत्तर म्हणजे ज्याच्यासारखा इतर कोणी नाही- अद्वितिय, एकमेव, आणि ज्याच्या पलिकडे कोणी जाऊ शकला नाही. पुरिसदम्म अर्थात अशी माणसे ज्यांना धम्म जाणून घ्यायचा आहे. सारथी म्हणजे नेतृत्व करणारा 'धम्माच्या सम्यक मार्गावर चालणाऱ्या माणसांचा अद्वितीय नेता, अकुशल वृत्तींचा त्याग करून धम्माच्या सन्मार्गावर चालणारांमध्ये खुनी, दरोडेखोर अंगुलीमाल, आळवक आणि नालागिरी शेकडो दरोडेखोर, नरभक्षी माणसे, क्रूर माणसे, विद्वान, अभिमानी, वादविवाद पटू सच्चक इत्यादी अनेक लोक होते. काहीना ह्याच जन्मी अर्हत् पदप्राप्ती झाली. देवदत्तसारखा कट्टर विरोधकाला देखील बुद्धाने धम्ममार्गावर चालण्यास प्रेरित केले._

_*७ सत्था देव मनुस्सानं-* भगवान बुद्ध देव आणि मनुष्य ह्यांचे शास्ता (आचार्य) होते. येथे 'देव' ह्या शब्दाचा अर्थ असे जीव की ज्यांनी आपल्या सत्कर्मानी मानवी सिमा ओलांडली आहे. मानव हा जैविक उत्क्रांतीचा शेवटला टप्पा नाही. बौद्ध साहित्यात येणारा देवांचा उल्लेख प्राचीन, पारंपारिक, गुढवादी देवी-देवतांसारखा नाही, भिन्न-भिन्न प्रवृत्तिच्या, वेग-वेगळ्या बौद्धिक क्षमतेच्या देव व मानवांना नाना प्रकारच्या उपाययोजनांचे कौशल्य भगवान बुद्ध ह्या अद्वितीय शिक्षकात होते. प्रत्येकाला बुद्धाने सन्मार्गाने जीवन जगणे शिकविले. भगवान बुद्ध निःसंशय जगदगुरू होते._

_*८. बुद्धो -* विशेष गुण व्यक्त करणारा हा स्यंभू शब्द ज्याला लावला जातो ती व्यक्ती, आपला शोधलेला धम्म इतरांना शिकविण्यासाठी अत्याधिक शक्तांनी युक्त असते. त्याची शैली इतर कोणत्याही आचार्यात नसते. 'बुद्ध' ह्या शब्दाचा आणखी एक अर्थ पूर्णपणे जागृत व्यक्ती, साधारण व्यक्ती जड (मूढ़) अवस्थेत असते. ही मूढ़ता जइता पूर्णपणे त्यागलेला पहिला पुरुष भगवान बुद्ध. नंतर भगवान बुद्धाने इतरांना जड़ता - मूढ़ता त्यागून 'जागृत' होण्यास शिकविले._

_*९. भगवा –* भगवान बुद्धांना इतर विशेषणांखेरीज बुद्धो भगवा' एकत्र किंवा बुद्ध' व 'भगवा' वेगवेगळे वापरले जातात. अर्थात अत्यंत पवित्र. काही विद्वानांनी आणखी अर्थ दिले आहेत. राग, द्वेष, मोह भग्न करणारा भगवा किंवा भगवान मानव जातीत जन्मलेला, चित्ताची मलिनता पूर्णपणे नष्ट करून अत्युच्च धम्म मानवजातीला देणारा, असाधारण बौद्धिक क्षमता असणारा महामानव म्हणजे भगवान बुद्ध._

                 _भगवान बुद्धांच्या ह्या नऊ गुणांचे बारकाईने, लक्षपूर्वक चिंतन ध्यानाचे विषय आहेत. त्यांचे निव्वळ पठण फारसे परिणामकारक नाही. मात्र प्रत्येक गुणाचे वारंवार उच्चारण करत त्यात दडलेल्या गंभीर अर्थावर चिंतन केल्यास परिणाम होतो._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १३/०२/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक नोव्हेंबर २०१३ अंक ६४ - वर्ष सहावे_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_13.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...