🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_भगवान बुद्ध_*
*_Ven. Narad Mashthera_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_भगवान बुद्ध एकमेवाद्वितीय होते. विचारवंतांमध्ये गंभीर, सर्वात विश्वसनिय वक्ता, कार्मिकांमध्ये सर्वात उत्साही, सर्वोत्तम यशस्वी समाजसुधारक, अत्यंत दयाळू आणि सहिष्णु आचार्य, शासकांमध्ये सर्वोत्तम आत्यंतिक पवित्रता आणि शुद्धता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची शुद्धता आणि पवित्रता आणि शुद्धता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची शुद्धता आणि पावित्र्य इतक्या पराकोटीचे होते की त्यांनी पवित्रांतील सर्वोत्तम पवित्र म्हटले पाहिजे. त्यांनी शिकविलेल्या सर्व गुणांचे ते मूर्तिमंत प्रतिक होते. त्यांच्यातील नीतिमत्ता तसुभरही कधीच कमी झाली नाही. जो कोणी त्यांच्या संपर्कात आला त्याने बुद्धांची वादातीत थोरवी मान्य केली. त्यांचे व्यक्तिमत्व चुंबकासारखे साऱ्यांना आकर्षुन घेई._
_*भगवान बुद्धांची दृढ इच्छाशक्ती, त्यांची प्रज्ञा, सेवा, त्याग, वैराग्य, आदर्श वैयक्तीक जीवन, धर्म प्रचाराची निष्कलंक पद्धत, त्यांचे यश हे सारे त्यांना श्रेष्ठ धार्मिक आचार्य म्हणून पूजनिय ठरवितात.*_
_भगवान बुद्ध हे जगात सर्व प्रथम अत्यंत उत्साही धर्मप्रचारक होते. पंचेचाळीस वर्षे त्यांनी सतत पायी भ्रमण करून बहुजनात तसेच बुद्धीवंतात आपले सिद्धांत प्रचारित केले. आयुष्याच्या शेवटल्या क्षणापर्यंत त्यांनी सेवेचे आणि नीतिचे आदर्श पालन केले. त्यांच्या विख्यात अनुयायांनी त्यांचा कित्ता गिरविला. द्रव्यबळ नसतानाही दूरवरच्या प्रदेशांत जाऊन निःस्वार्थपणे धर्मप्रचार केला._
_*'अप्पमादेन सम्पादेथ' हे बुद्धांचे शेवटले शब्द, स्वतः प्रयत्न केल्याशिवाय शुद्धी किंवा मुक्ती शक्य नाही.* बौद्ध धर्मात आर्जवी प्रार्थना, अनुनय करणारी प्रार्थना ह्यांना स्थान नाही त्याऐवजी स्व-नियंत्रणासाठी, शुद्धीसाठी आणि संबोधिसाठी ध्यान-साधना सांगितली आहे. *जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून सुटका, दुःखातून सुटका इच्छिणाऱ्यासाठी त्यांना मार्ग दाखविणे हा बुद्धांच्या धर्मप्रचाराचा हेतू होता.* त्यांचे काही प्रासंगिक उपदेश भौतिक प्रगतिसंबंधी सुद्धा आहेत. भौतिक आणि आध्यात्मिक प्रगति राष्ट्रासाठी, देशासाठी आवश्यक आहे. एक दुसऱ्यापासून अलग करू नये. परंतु केवळ भौतिक प्रगति साधण्यासाठी आध्यात्मिक प्रगतिला त्याज्य ठरविणे चुक आहे. निव्वळ भौतिक सुधारणावादी देशांची स्फोटक स्थिती आपण आज पाहातच आहोत._
_*'भारताचा सर्वोत्तम सुपुत्र' असा भगवान बुद्धांचा उल्लेख भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी करीत. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे राष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ भगवान बुद्धास आदरांजली वाहताना म्हणतात "धार्मिक परंपरा निर्मात्यांना सुद्धा पवित्र, आदरणीय ज्याच्या उपदेशांचा ठसा सर्व मानवजातीवर खोल उमटला आहे असा श्रेष्ठ मार्गदर्शक आपणास पूर्वेकडील गौतम बुद्धाच्या ठायी आढळतो. जागतिक दर्जाचा ऐतिहासिक विचारवंत, प्रामाणिक बुद्धीमत्तेने मूल्यमापन केल्यास, बुद्ध हे जागतिक इतिहासातील सर्वोत्तम पुरूष होय यात शंका नाही."*_
_*प्रसिद्ध इतिहासकार एच. जी. वेल्स त्यांच्या The Three Greatest Men in History या ग्रंथात लिहितात-*_
_*"बुद्धात तुम्ही स्पष्टपणे पाहता- साधा, धर्मनिष्ठ माणूस, प्रकाशासाठी लढणारा, तेजस्वी व्यक्तिमत्व काल्पनिक नव्हे. त्यांनी मानवतेला जागतिक, वैश्विक संदेश दिला. आधुनिक युगातील सर्वोत्कृष्ट विचार त्या संदेशासमान आहेत. दुःख आणि असमाधान स्वार्थामुळे आहे असे त्यांनी सांगितले. माणसाला इंद्रियांच्या आसक्तीतून बाहेर पडावे लागते तेव्हा कोठे तो थोर पदाला प्राप्त होतो. येशू खिस्ताच्या पाचशे वर्षांपूर्वी बुद्धांनी निराळ्या भाषेत 'स्व'ला विसरायला सांगितले. काही बाबतीत बुद्ध आपल्या आणि आपल्या गरजांच्या जवळ आहेत. येशु खिस्तापेक्षा बुद्धांनी अधिक सोप्या शब्दात व्यक्ति माहात्म्य, त्याग, सेवा सांगितली आणि वैयक्तिक अमरत्वाबद्दल बुद्ध कमी संदिग्ध होते."*_
_*बुद्ध माणूसच होते पण साधारण नव्हते. त्यांचा जन्म 'बुद्ध' म्हणून झाला नव्हता. त्यांनी 'बुद्धत्त्व' प्राप्त करून घेतले. मानवातील छुप्या शक्ती, सृजकता त्यांनी हेरली आणि स्वतःला ओवाळून न घेता. त्यांनी आपल्या अनुयायांना उत्साहाने आपल्यासारखे व्हायला प्रेरित केले, कारण 'बुद्धत्त्व' सुप्त स्वरूपात सर्वात विद्यमान आहे.*_
_*बुद्ध ईश्वर म्हणून पूजिले जात नाही. त्यांच्याकडे भौतिक किंवा आध्यात्मिक कृपेची मागणी त्यांचे अनुयायी करीत नाही तर सर्वोच्च नीतिमान आचार्य म्हणून त्यांचे प्रति आदरभाव प्रकट केला जातो. आपल्या धर्मनिष्ठ अनुयांयामध्ये बुद्धांनी स्वतः करता कोणतेही विशेष स्थान ठेवले नाही. कोणताही नीतिशिक्षक बुद्धांसमान झाला नाही. बाँड रसेल त्यांना सर्वकालिक सर्वोच्च नास्तिक' म्हणतो. परंतु नास्तिक' आणि अधार्मिक ह्या शब्दांना समानार्थी समजू नये. सदाचरण (नीती) सोडलेल्या ह्या जगात खरोखर शांती-समाधान नांदायचे असेल तर धार्मिक जागृती अत्यंत आवश्यक आहे. जुन्या चालीरिती, संकेत, अंधश्रद्धा, उत्सव, कर्मकांड जे बहुसंख्य लोक करतात ते फारसे महत्त्वाचे नाही तर उत्तम आचार्यांनी प्रतिपादिलेल्या उदात्त तत्त्वांचे शुद्ध आणि उपयोगी जीवन, न्याय आणि बुद्धी युक्त जीवन महत्त्वाचे आहे. प्राध्यापक जोड (Prof.Joad) म्हणतात- "इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात भारतात आणि चीन मध्ये तीन श्रेष्ठ आचार्यांचा उदय झाला. ईश्वर असो वा नसो, मानवाच्या हितासाठी काय करणे आवश्यक आहे हे लोकांच्या गळी उतरवणारांमध्ये सर्वोत्तम आचार्य गौतम बुद्ध होय."*_
_*'अतिम सत्य' प्राप्तीसाठी. दुःखांचा अंत करण्यासाठी बुद्धांनी शिलाचरणावर भर दिला. निःस्वार्थ विचारशैली, करूणाभावना, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजिवीका, अवैध मार्गाने पैसा वा संपत्ती न मिळविणे, हे शीलाचरणाचे आधार आहेत. बुद्धांनी आपला करूणेचा, मैत्रीचा, निःस्वार्थ सेवेचा, शीलाचरणाचा संदेश फक्त राजे-रजवाडे, श्रेष्ठलोक, श्रीमंत ह्यांनाच दिला असे नव्हे तर गोर-गरीब, गरजू आणि निम्न श्रेणीतील लोकांनासुद्धा दिला. त्यांनी सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली आणि लोकांचा दर्जा उंचाविला. अध्यात्मिक प्रगतिचा रस्ता साधु आणि संत, श्रीमंत आणि फकीर, उच्च-निच, शीलवान-शीलभ्रष्ट, पापी-पुण्यवान, साऱ्यांसाठी सर्वदा खुला आहे. फक्त स्वतः प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.*_
_बुद्ध दररोज भिक्षुना तसेच साधारण जनांना उपदेश द्यायचे. त्यांना माहित असलेल्या ज्ञानापैकी अल्पसा भाग ते उघड करायचे. एके प्रसंगी बुद्धांनी मूठभर पाने घेऊन सांगितले की वनात असलेल्या असंख्य पानांपैकी काही पाने (ज्ञान) मी मुठीत धरली आहेत. मुक्तीसाठी गरजेच्या ज्ञानांची पाने मी तुम्हासमक्ष उघड केली आहेत._
_बुद्धांच्या दैनंदीन कार्यकलापात ते गरजु उपासकांना मदत करीत. प्रवज्जित झालेल्या भिक्षुंना धर्म समजावित आणि देव देवतांना सुद्धा धम्मोपदेश करीत. बहुजनांना तसेच बुद्धीवंतांना ते धर्म सांगत. त्यांचे उपदेश जाणून लहान बालकांसाठी दूध आणि सज्ञानांसाठी भोजन असे. धम्मोपदेश करण्यापूर्वी बुद्ध 'कोणी उपाशी नाही ना!' याची खात्री करून घेत. मनाला जशी धर्माच्या आहाराची गरज आहे तशी शरीराला भोजनाची गरज असते. उपाशी असलेला माणुस धर्म ग्रहण करू शकत नाही. आजारी व्यक्तीची ते स्वहस्ते सेवा करीत आणि इतरांना ते सांगत, "जो आजारी व्यक्तीची सेवा करतो तो माझी सेवा करतो."_
_*बुद्धांनी योग्य लोकांना, वर्ण, जात, वर्ग, जात, वर्ग न पाहता संघाची दारे उघडून वर्गविरहित समाजाची स्थापना केली.* दीक्षा घेतल्यापासून नवीन अथवा जुने (श्रामणेर, भिक्खु) थेर अथवा महाथेर, तसेच भिन्न भिन्न अध्यात्मिक सोपानांवर आरूढ असलेले शिष्य असे वर्गीकरण होते. *संघराज आणि नायक थेर ह्या नंतर आलेल्या कल्पना संघाचे नियम लोकशाही सारखे होते. या संदर्भात लॉर्ड झेटलैंड म्हणतात अनेक अभ्यासकांना हे वाचून आश्चर्य वाटेल की आमच्या आजच्या सांसदीय कार्यप्रणालीची मूळे दोन हजार वर्षांपूर्वीच्या भारतातील बौद्ध सभांमध्ये आढळते.*_
*_जगाच्या इतिहासात प्रथमच स्त्रियांसाठी संघाची स्थापना बुद्धांनी केली. भिक्षुणींच्या संघात देखील भेदभाव नव्हता. स्त्रियांना आध्यात्मिक प्रगतीची दारे उघडणारे बुद्ध महान समतावादी होते._*
_मानवाला उदात्त व महत्त्व प्राप्त करून देणार व बंधुत्वाची शिकवण देऊन 'गुलामी प्रथा; दूर करणारे जगातील पहिले मानव बुद्ध होय. दुर्दैवी, दुर्बळ प्राण्यांची हत्या रोखणारी, प्राण्यांप्रती करूणा दर्शविणारी बुद्धांची शिकवण आहे. *खरा बौद्ध कोणताही भेदभाव न करता सर्व जीव मात्रांविषयी मैत्रीभावनेचा व करूणाभावनेचा अभ्यास करतो.*_
_ही मैत्री व करूणा राष्ट्राराष्ट्रांमध्ये बंधूभाव विकसित करो. धार्मिक बंधूभावना देशा-देशातील अडसर दूर करो. जर भिन्न-भिन्न धर्मांचे, मतांचे अनुयायी एका व्यासपिठावर एकत्र येत नसतील, बहिण-भावांसारखे वागत नसतील, आमचे धर्म निराळे आहेत म्हणून जर एकत्र येत नसतील तर मानवतेप्रती त्या त्या धार्मिक आचार्यांचे हे अपयश असेल._
_*भगवान बुद्ध अत्यंत सहिष्णु होते. असहिष्णुता हा धर्माचा सर्वात मोठा शत्रु. म्हणून भगवान बुद्ध आपल्या अनुयायांना सांगायचे- "माझ्याबद्दल, माझ्या उपदेशांबद्दल किंवा माझ्या भिक्षुंबद्दल अनुद्गार काढल्यास क्रोधित होऊ नका, निराश होऊ नका. कारण तुम्ही क्रुद्ध झालात तर तुमचे आध्यात्मिक नुकसान तर होईलच शिवाय अनुद्गार काढणाऱ्याचे म्हणणे बरोबर आहे अथवा चूक हे ठरविण्याची न्यायबुद्धी तुम्ही गमावून बसाल!" डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांनी ह्या भावनेची खूप प्रशंसा केली आहे.*_
_बुद्धांनी अंधविश्वास नाकारला. कर्मकांड नाकारले. अर्थहिन त्याग आणि प्रायश्चित यांची चित्तशुद्धीसाठी गरज नाकारली. बहुजनांना सोप्या शब्दात साधे सत्य समजाविले तर बुद्धिवंतांना गंभीर तत्त्वज्ञान समजाविले. सत्यान्वेषण करणारांना त्यांनी इतर कोणाचा अधिकार न जुमानता स्वतः कारणमिमांसा करून चूक अथवा बरोबर ठरवावे असे सांगितले._
_*भगवान बुद्धांच्या उपदेशांच्या अडीच हजार वर्षांच्या शांतीपूर्ण प्रवासात, धर्मप्रचाराच्या नावाने रक्ताचा एकही छेड सांडल्या गेला नाही. सक्तीने अथवा प्रलोभने दाखवून कोणाचेही बौद्ध धर्मात धर्मांतर केले गेले नाही. तरीही भगवान बुद्ध पृथ्वीतला वरील सर्वोच्च मिशनरी (धर्मप्रचारक) ठरले.*_
_भगवान बुद्धांचे लोकोत्तर उपदेश सर्वत्र पसरले. आपल्या व्यावहारिक उपयोगितेमुळे, तर्कसंगतीमुळे, परिणामकारकतेमुळे सहिष्णुतेमुळे, वैश्विकतेमुळे, सौम्यतेमुळे, बुद्धांचे उपदेश आजही अनेक देशांत पसरत आहेत. आशिया खंडातील अनेक देशांत बौद्ध धर्मामुळे संस्कृती बहरली आहे. बौद्ध धर्माच्या छत्रछायेखाली अनेक देशांनी सांस्कृतिक विकास साधला आहे._
_*अनेक राष्ट्रे उदयास आली, अनेक राष्ट्रे नष्ट झाली. तलवारीच्या बळावर अनेक साम्राज्ये उदयास आली, बहरतो आणि नष्ट झाली मात्र भगवान बुद्धांनी प्रेम, दया, करूणा, मैत्री, तर्कसंगती यांच्या बळावर उभारलेले धम्मराज्य आजही बहरत आहे आणि पुढेही बहरत राहील.*_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- १०/०२/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) विजित संग्राम, मासिक नोव्हेंबर २०१३ अंक ६४ - वर्ष सहावे_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_10.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment