Wednesday, 4 January 2023

खन्ति

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_"खन्ति = क्षांति = धैर्यशील = क्षमाशील"_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _एका झेन विहारात अतिशय कडक नियम होता. नवीन भिक्खुंनी पहिल्या वर्षी अरिय मौन पाळायचे, म्हणजे एकदम मौन! दुसऱ्या वर्षांपासून, तो प्रत्येक वर्षी फक्त दोन शब्द बोलू शकत असे आणि तेही आचार्यांनी विचारल्यावर!_

         _एका नवीन भिक्खूचे पाहिले वर्ष झाल्यानंतर आचार्यांनी त्याला बोलावले आणि दोन शब्द बोलायला सांगितले._

_भिक्खू म्हणाला, "बिछाना त्रासदायक"_

_आचार्यांनी मान डोलावली._

        _दुसरे वर्ष झाल्यानंतर, आचार्यांनी त्याला बोलावले आणि पुन्हा दोन शब्द बोलायला सांगितले._

_भिक्खू म्हणाला, "जेवण बेचव"_

_आचार्यांनी मान डोलावली._

_तिसऱ्या वर्षी आचार्यांनी त्याला बोलायला सांगितले._

_भिक्खू म्हणाला, "मी सोडतोय"_

     _*आचार्य म्हणाले, "मला माहितेय तू असंच म्हणणार..नाहीतरी तीन वर्षांपासून नुसतीच तक्रार करतोयस"*_

     _आचार्य पुढे म्हणाले, "इतरांसारखेच तुला बिछाना आहे, जेवणही सर्वांना सारखेच आहे तरीही तू तक्रार करतोस? *तू ज्या ज्ञानप्राप्ती साठी आला आहेस, ते कसं मिळवता येईल ते पहा... बाकीच्या गोष्टी गौण आहेत. तुझं लक्ष ध्यानापेक्षा खाण्यापिण्यात जास्त आहे !*_

*_महामङल सुत्त मध्ये बुद्ध म्हणतात -_*

*_खन्ति च सोव च साकच्छा, समणानं च दस्सनं_"

_*कालेन धम्मसाकच्छा, एतं मंग्ङलमुत्तमं||_*

*_म्हणजे धैर्यशील असणे, क्षमाशील असणे, आचार्यांचे ऐकणे, भिक्खुंशी (किंवा ज्ञानियांशी) धम्मचर्चा करणे हे उत्तम लक्षण होय_*

        *_बौद्ध धम्मामध्ये संयम (सारासार विचार केल्याशिवाय पाऊल न उचलणे), धैर्य (संकटे आली तर घाबरून न जाता), सहवेदना (इतरांची बाजू व परिस्थिती समजून घेणे) आणि क्षमा (कोणी केलेली चूक लक्षात न ठेवता त्या व्यक्तीला क्षमा करणे) यांना अतिशय महत्त्व आहे._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :-_* 

*_१) झेन कथा _*

*_२) महामङल सुत्त_*

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०५/०१/२०२३_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/01/blog-post.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...