Tuesday, 31 January 2023

जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                *_नमो बुद्धाय - जय भिम_*          

                     *_ओम मणि पद्मे हुं_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_कत्वान कटठमुदरं इव गब्भिनीया,_* 

*_चिञ्चाय दुट्ठवंचन जनकायमज्झे ।_* 

*_सन्तेन सोम विधिना जितवा मुनिन्दो,_* 

*_तं तेजसा भवतु ते जयमंगलानि ।।_*

                *_ज्या मुनींद्राने, पोटावर काष्ठ बांधुन गर्भवतीसारखे आपले पोट मोठे करुन लोकांसमक्ष दुष्ट वचन करणाऱ्या (बुद्धाला कलंक लावण्यासाठी) चिंचा नामक स्त्रीला, आपल्या शांती आणि सौम्यता या गुणांनी जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो._*

                                 *_जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप_*

                            _सुर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकांची दशा झाली होती . लोक त्यांना आदर किंवा उपाहार देइनात. त्यामुळे राजरस्त्यावर उभे राहुन ते बोलु लागले, 'जर गौतम बुद्ध श्रमण असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. ह्यास्तव आम्हास दान द्या._

            _लोकांनी त्यांच्या ह्या बडबडीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा श्रमण गौतमांच्या चारित्याबद्दल कंडी पसरवुन संघाला बदनाम करण्याचा गुप्त कट त्यांनी रचला._

        _त्यावेळी श्रावस्तीमध्ये.. *चिंचा नावाची एक ब्राह्मणी योगीनी राहात असे.* तिचा देह आणी रुप आकर्षक होते. आपल्या अंगविक्षेपांनी ती वासनोत्तेजक प्रभाव निर्माण करु शके._

        _जैन तीर्थकांपैकी एका कुटील तीर्थकाने सुचवले की, चिंचाच्या सहाय्याने गौतमाबद्दल कंडी उठवुन त्याला बदनाम करणे सुलभ होईल. वाकीच्या तीर्थकानी ह्या सुचनेस सहमती दर्शवली._

            _*एके दिवशी चिंचा तीर्थकांच्या उद्यानात आली आणी अभिवादन करुन ती त्यांच्याजवळ बसली, पण कुणीही तिच्याशी बोलले नाही. ह्यामुळे चकित होवुन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? तीनदा मी आपणास अभिवादन केले, पण आपण शब्दही बोलत नाही. तीर्थक बोलले, भगीनी! तुला माहीत नाही काय की, आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला बाधक झाला आहे. नाही मला माहीत नाही! पण याबाबत मी काय करु शकते? त्यावर तीर्थक म्हणाले, भगीनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तु स्वतः गौतमाबद्दल कांड्या उठव. जेणेकरुन त्याची लोकप्रियता नष्ट होईल. त्यावर चिंचा ने ठिक आहे असे म्हटले व नंतर ती निघुन गेली....*_

            _*स्त्री सुलभ आकर्षण कलेत आणी नैसर्गीक सौंदर्यविशेषात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहुन प्रवचन ऐकुन परत येत त्यावेळी रक्त-वस्त्र परिधान करुन, सुगंधित द्रव्ये लावुन हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे. जर कोणी तिला विचारले, तु कुठे निघालीस? त्यावर ती उत्तर देइ तुम्हाला काय करायचे!*_

                   _*जेतवनाजवळील तीर्थिकारामात रात्र घालवुन ती प्रातःकाळी शहराकडे परत येइ, त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर कोणी तिला विचारले, तु रात्र कुठे व्यतीत केलीस? तर ती उत्तर देइ, तुम्हाला काय करायचे? मी जेतवनात श्रमण गौतमांच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालविली! काही लोकांच्या मनात तिच्या ह्या उत्तरामुळे संदेह निर्माण होई. काही महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरगुटे गुंडाळुन त्याचा आकार वाढवुन तिने सांगायला सुरुवात केली की, श्रमण गौतमापासुन आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या ह्या शब्दांवर विश्वास ठेवला.*_

            _*नवव्या महिन्यानंतर तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणी कीटकदंशानी हात सुकवुन घेवुन ज्या स्थानी भगवान बुद्ध, भिक्खु व गृहस्थांसमोर प्रवचन करत होते तिथे जाऊन ति म्हणाले, हे महान उपदेशक! आपण पुष्कळ लोकांना उपदेश करता, आपली वाणी मधुर आहे आणी आपले ओठ फार नाजुक आहेत. आपल्याशी संबंध ठेवुन मी गर्भवती झाले आहे आणी प्रसुती-समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसुतीची काहीच व्यवस्था केलेली नाही. तसेच अडी-अडचणीसाठी औषध पाण्याचीही काहीच सोय केलेली दिसत नाही. जर स्वतः तुम्हाला हि व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यांपैकी कोशल देशाचा राजा, अनाथपिण्डिक किंवा विशाखा अशा कोणाला तरी ती करण्यास का सांगत नाही.? कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे, पण त्यामुळे होणाऱ्या अर्भकाचा परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही. उपस्थित श्रोतृवर्ग तटस्थ झाला होता. आपले प्रवचन अर्धवट सोडुन अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध बोलले, हे भगीनी, तु जे काही आता सांगीतलेस त्याची सत्यासत्यता फक्त आपणा दोघासच माहीत असणे संभाव्य आहे.*_

            _चिंचा जोराजोरात खोकलत म्हणाली, होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणा उभयतासच माहीत असणे संभाव्य आहे. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोराची गाठ सैल होवुन ती फळी सरकुन तिच्या पायाशी पडली. चिंचा यामुळे अस्वस्थ झाली. त्यानंतर लोकांनी तिला काठ्यांनी आणी दगडांनी मारुन तिला हाकलुन दिले._

        _त्यानंतर तिला जाब विचारला असता, तिने जैन तिर्थकांबद्दल झालेल्या चर्चेबाबत सर्वांना सांगीतले त्यामुळे,, जैन तीर्थक लोकांच्या नजरेत आणखी खाली उतरले. अश्या ह्या तीर्थकांची परंपरा पुढे चालवणारे,, लोक आजही जगात आहेत, ते वेळोवेळी, भगवान बुद्धाला, त्यांच्या धम्माला, त्यांच्या अनुयायांना कसे खाली दाखवता येइल,, याचा शोध घेत असतात,_

*_।। सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो....।।_*

                 *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/01/blog-post_45.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

बक ब्रह्माचे गर्वहरण

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                *_नमो बुद्धाय - जय भिम_*          

                     *_ओम मणि पद्मे हुं_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                     *_बक ब्रह्माचे गर्वहरण_*

*_दुग्गाहदिठ्टिभुजगेन सुदठ्टहत्थं,_*

*_ब्रम्ह विसुद्धि जुतिमिद्धि बकाभिधानं ।_* 

*_ञाणागदेन विधिना जितवा मुनिन्दो,_*

*_तं तेजसा भवतु ते जयमंगलानि ।।_*

*_ज्या मुनींद्राने, भयंकर मिथ्या दृष्टिरुप सापाने दंश केलेल्या, विशुद्धज्योती आणि ॠद्धिशक्ति संपन्न बक नामक ब्रह्मज्ञान्याला ज्ञानरुपी औषध देऊन जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो..._*

              _एकदा भगवान बुद्ध उकट्ठ मधील सुभगवनामध्ये विहार करीत असताना बक नावाच्या ब्रह्माला दुष्ट दृष्टी उत्पन्न झाली, तो समजु लागला कि मी ज्या लोकात (ब्रह्मलोकात) राहतो आहे तो नित्य, ध्रुव आणि शाश्वत आहे, मी अमर आहे असे तो स्वतःला समजु लागला होता. तेव्हा भगवान बुद्धांनी बक ब्रह्माचे मन ओळखुन ते ब्रह्मलोकात गेले आणि बक ब्रह्माला म्हणाले,_

              _हे ब्रह्मा, तु अज्ञानाच्या घोर अरण्यामध्ये विहार करतो आहेस. जेव्हा अनित्याला नित्य म्हणतोस, अध्रुवला ध्रुव, अशाश्वताला शाश्वत ; ब्रह्मलोकापासुन श्रेष्ठ शांती (निर्वाण) असुन सुद्धा तु म्हणतो आहेस कि यापेक्षा श्रेष्ठ शांती नाही._

_बकब्रह्मा म्हणाला : हे श्रमण गौतमा, आम्ही (ब्रह्मा) आपल्या पुण्यकर्माने जगावर राज्य करत आहोत. ब्रह्मलोकात उत्पन्न होणे हीच दुःखापासुन मुक्ती आहे._

_भगवान म्हणाले : हे ब्रह्मा तु ज्या आयुष्याला मोठे समजत आहेस ते आयुष्य सुद्धा थोडेच आहे, शेकडो, हजारो वर्षांच्या तुझ्या आयुष्याला मी जाणतो. मी अनंतदर्शी भगवान आहे. वेदनेच्या पलीकडे गेलो आहे._

_हे ब्रह्मा.. मी तुझ्या गतीच्या प्रभावाला जाणतो, महान ऋद्धीबल असलेला तु महाशक्तीशाली आहेस... परंतु दुसऱ्या लोकसमुहातील असे लोक आहेत ज्यांना तु जाणत नाहीस, त्यांना तु पाहु शकत नाहीस, परंतु मी त्यांना पाहतो, मी त्यांना जाणतो._

_तु आभस्सर नावाच्या लोकातुन येथे उत्पन्न झाला आहेस, तो खुप लांब प्रवास असल्याने तुला त्याची स्मृती नाही., परंतु मी त्याला जाणतो, मी त्याला पाहतो. यापुर्वीही तु सुभकिण्ह, वेहप्पाल, अभिभु नावाच्या लोकांमधुन प्रवास केला आहेस. परंतु तु त्याला जाणत नाहीस. परंतु मी जाणतो._

_ब्रह्मा! पृथ्वी, जल, वायू, अग्नी आदींना त्यांच्या योग्य स्वरुपात जाणले, मी जगाच्या परम सत्याला, निर्वाणाला जाणले, याद्वारे ज्ञानामध्ये मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे सर्व ऐकुन बक ब्रह्मा भगवान बुद्धांची चेष्टा करण्याचा प्रयत्न करु लागला परंतु तो त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकला नाही._

_बकब्रह्मा म्हणाला : माझे पहिले शील आणि व्रत काय होते..?_

_भगवान म्हणाले,_

_• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु पुष्कळ तहानलेल्यांची तहान भागवली आहेस._

_• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु गंगेच्या प्रवाहातुन वाहत जाणार्या माणसाला तु वाचविलेस._

_• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु गंगेच्या प्रवाहात नावेला पकडलेल्या मोठ्या सर्पापासुन तु सोडविलेस._

_• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु मी तुझा कप्प नावाचा शिष्य होतो, ज्याला तु बुद्धीमान समजलेस._

            _हे सर्व ऐकुन अचंबीत झालेला बकब्रह्मा म्हणाला, खरोखरच भगवान आपण माझ्या आयुष्याला जाणता, त्याचप्रमाणे इतर गोष्टींना सुद्धा जाणता. आपल्या दैदिप्यमान तेजाने संपुर्ण ब्रह्मलोक प्रकाशमान झाले आहे._

            *_जो कोणी उपासक या सर्व गाथांच्या कथांमधुन योग्य तो बोध घेऊन आपल्या जीवनात त्याचे आचरण करेल, त्या पुण्याचरणाने खचितच निर्वाण प्राप्त होईल... तुम्हाला सुद्धा याचे सदाचरण करुन निर्वाणाचे सुख प्राप्त होवो हिच मंगल कामना...._*

*_।। सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो....।।_*

                 *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/01/blog-post_66.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

मारावर विजय

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                *_नमो बुद्धाय - जय भिम_*          

                     *_ओम मणि पद्मे हुं_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


*_बाहुं सहस्समभिनिम्मित सावुधंतं,_*

*_गिरिमेक्खलं उदित-घोर-ससेन मार_*

*_दानादि धम्मविधिना जितवा मुनिंदो_*

*_तं ते जसा भवतु ते जयमङ्लानि_*


              *_ज्या मुनिंद्राने तीक्ष्ण व बळकट हत्यारे धारण केलेल्या सहस्र बाहुबळ निर्माण करुन गिरीमेखल नावाच्या महाभयंकर हत्तीवर बसुन अनंत, भयानक व अफाट सेनेसह माराला क्षणातच आपल्या दानादी धर्मबळाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो._*


_जयमंगल अष्टगाथा मधल्या पहिल्या गाथेमध्ये माराची गोष्ट सांगीतली आहे ती याप्रमाणे :-_


                           *_मारावर विजय_*


              _परिव्राजक सिद्धार्थ *"बुद्ध"* होण्याच्या तयारीत आहेत, हे पाहून माराला अतिशय वाईट वाटले. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला आजपर्यंत कोणत्याही श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माझा पराजय केला नाही. परंतु हा श्रमण गौतम खुप दृढनिश्चयी दिसतो, हा माझा अपमान करुन माझ्यापासुन स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करत आहे, मला याचे वेळीच दमन करायला हवे, नाहीतर तो माझ्या हातुन कायमचा सुटेल व माझ्यविरुद्ध बंड करुन उठेल. असा विचार करुन माराने त्याच क्षणी आपली सेना तयार केली._


               _अशा प्रकारे आपल्या अफाट सेनेला पुढे पाठवुन मार *गिरीमेखल नावाच्या हत्तीवर* आरुढ होऊन त्यांच्या मागोमाग आला. इकडे माराच्या अफाट सेनेने बोधीसत्त्वाचा पराभव करण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्टा केली होती. आपल्या शस्त्रांचा वर्षाव त्यांनी बोधीसत्वावर चालवला होता. परंतु त्या शस्त्रास्त्रांची फुले बनुन बोधीसत्त्वाच्या अंगावर येऊन पडत होती. कोणतीच शस्त्रास्त्रे बोधीसत्वाच्या अंगावर काहीच परिणाम करु शकत नव्हती. मारालाही कळुन चुकले होते कि आपल्या अफाट सेनेचा पराभव निश्चित आहे, त्याला त्याच्या सेनेचा पराभव दिसत होता, तेव्हा त्याने आपल्या पराभवाने वादळ उत्पन्न केले. आसपासचे वृक्ष कोसळु लागले, पशूपक्ष्यांचा एकच आक्रोश सुरु झाला. परंतु बोधीसत्व आपल्या समाधीपासुन तीळमात्रही ढळला नाही._


           _तेव्हा बोधीसत्वाला पाण्याने बुडवुन मारीन म्हणुन त्याने पाऊस पाडला, जिकडे तिकडे महापुर आणला परंतु पाण्याचा एकही थेंब बोधीसत्वाला स्पर्श केला नाही._


            _त्यामुळे व्यथीत झालेल्या माराने सहा प्रकारच्या वृष्टी उत्पन्न केल्या परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. हे पाहुन मार अतिशय खिन्न झाला. तरीसुद्धा त्याने प्रयत्न करणे सोडले नाही. त्याने भयानक काळोख उत्पन्न केला, *ती वैशाख शुद्ध पोर्णीमेची रात्र होती. पोर्णीमेच्या चंद्राने आणि चांदण्याने रात्र खुप प्रकाशलेली होती.* परंतु माराने बोधीवृक्षाजवळ भयानक अंधकार पसरविल्या कारणाने, माराचा गिरीमेखल हत्ती व जवळपासची पर्वतशिखरे घुबडांना दिसेनाशी झाली. परंतु बोधीसत्वाच्या प्रज्ञारुपी प्रदीपापुढे माराचा अज्ञान रुपी अंधकारचा नायनाट केला._


             _आजपर्यंत त्या माराला पराभव काय आहे, हे माहीतच नव्हते, आजपर्यंत त्याचा कधीच पराभव झाला नव्हता. जरी एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माराविरुद्ध युद्ध पुकारले तरी मार आपल्या एखाद्या तुकडीला पाठवुन त्याचा तेव्हाच पराभव करायचा._


             _श्रमण गौतम साधारण तपस्वी नव्हता हे जाणुनच माराने आपल्या सैन्याला त्याच्यावर तुटुन पडायच्या आज्ञा केल्या होत्या, परंतु आपल्या अफाट सेनेला बोधीसत्व चारी मुंड्या चित करेल हे त्याने जाणले नव्हते. आपली सर्व शक्ती पणाला लावुन देखील तो बोधीसत्वाला आपल्या मार्गापासुन क्षणभरही विचलीत करु शकला नव्हता, आता परभवाची वार्ता घेऊन माघारी जाण्यापेक्षा बोधीसत्वावर हल्ला करणे माराला योग्य वाटले. तेव्हा मार आपल्या गिरीमेखल हत्तीवरुन खाली उतरला आणि बोधीसत्वाला म्हणाला सिद्धार्था इथुन मुकाट्याने चालता हो, नाहीतर एका क्षणात तुझा नाश करेन._


             _*तेव्हा बोधीसत्व म्हणतो, हे पापी मारा, तुझ्या सैन्यांना मी चांगल्या प्रकारे ओळखतो, वेगवेगळ्या प्रकारच्या चैनीच्या वस्तु हि तुझी सर्वात पुढे जाणारी तुकडी आहे. तहान, भुक, तृष्णा, आळस, गर्व, किर्तीची आशा, आत्मस्तुती आदी, ह्या तुकड्या त्यामागोमाग येत असतात. कच्च्या मातीचे भांडे जसे फोडतात त्याप्रमाणे मी तुझ्या सैन्याचा पराभव करेन.*_


             _हे ऐकुन मार म्हणाला, त्या सर्व गोष्टींना जाऊदे,, आधी तु ज्या आसनावर बसला आहेस, तिथुन उठ ते माझे आसन आहे. चल ताबडतोब चालता हो इथुन. त्यावर बोधीसत्व म्हणाला, कशावरुन तु म्हणत आहेस कि हे तुझे आसन आहे, याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे काय? हा प्रश्न ऐकुन माराच्या सेनेतील अनेक लोक योध्ये म्हणायला आहोत कि आम्ही साक्षी आहोत. तेव्हा पापी मार बोधीसत्वाला म्हणाला कि, सिद्धार्था हा माझा पुरावा आहे, चल आता इथुन मुकाट्याने चालता हो. त्यावर *बोधीसत्व म्हणाला कि मी अनेक जन्मी दानपारमिता पुर्ण करुन या आसनावर बसण्याचा अधिकारी बनलो आहे, यावर मार म्हणाला याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे.*_


           _*तेव्हा बोधीसत्व म्हणाला हि पृथ्वी साक्षी आहे, हि वसुंधरा साक्षी आहे. याचबरोबर तिथे एक देवता प्रगट झाली आणि तिने साक्ष दिली कि, श्रमण गौतमाने अनेक जन्म घेऊन दानपारमिता पुर्ण केली याबाबत साक्ष दिली. येवढे बोलुन त्या देवतेने आपले ओले केस पिळले आणि त्या प्रवाहाबरोबरच आपल्य अफाट सेनेसह व गिरिमेखल हत्तीसोबत मार वाहुन गेला. माराची झालेली दुर्दशा पाहुन देवांगण बोधीवृक्षाजवळ जमले आणि त्यांनी सिद्धार्थावर पुष्पवृष्टी केली.*_


         _*अनेकजातिसंसारं संधाविस्सं अनब्बिसं गहकारकं गवेसन्तो दुक्खा जाति पुनप्पुनं।*_

         _*गहकारकं दिट्टोऽसि पुन गेहं न काहसि सब्बा ते फासुका भग्गा गहकूटं विसंखितं विसंखारगतं चितं तव्हानं स्वयमज्झगा।*_


_धम्मपदाच्या १०३ ऱ्या गाथेद्वारे भगवान बुद्ध आपल्याला सांगतात,_


_*यो सहस्सं सहस्सेन, सङ्गामे मानुसे जिने।*_ 

_*एकञ्च जेय्यमत्तानं स वे सङ्गामजुत्तमो॥*_


_*जो युद्धात लाखो जेत्यांना जिंकतो (त्या जेत्याहुन), जो एक स्वतःला जिंकतो, तो उत्तम युद्धजेता होय.*_


_खरच तो सर्वश्रेष्ठ विजेता होता.. ज्याने स्वतःलाच जिंकले..._


_*सुचना : हे युद्ध बोधीसत्वाच्या मनातील चांगले विचार विरुद्ध वाईट विचार असे होते, त्याला अलंकारीक रीत्या सजवले आहे.*_  

       *_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

                       *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/01/blog-post_30.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

सच्चक

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼                  

                    *_ओम मणि पद्मे हुं_*



*_सच्चं विहाय - मतिसच्चक - वादकेतुं,_*

*_वादाभिरोपितमनं अतिअंधभूतं ।_* 

*_पञ्ञापदीपजलितो जितवा मुनिंदो,_*

*_तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि ।।_*


            _*ज्या मुनींद्राने, सत्य सोडलेल्या व असत्यवादाला पोषक, अभिमानी, वादविवाद परायण व अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकास प्रज्ञाप्रदीपाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.*_


            *_सच्चक नावाच्या निर्गंथ नाथपुत्रावर विजय_*


              _*सच्चक हा तरूण निर्गंथ दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता.* तो वादविवादात अतिशय पारंगत बनला होता, त्याला विविध प्रकारच्या विद्या येत होत्या. *त्याला ४ मोठ्या बहिणी होत्या त्या सुद्धा त्यांच्या पालकांनी शिकविलेल्या एक हजार विद्यांमध्ये पारंगत बनल्या होत्या. परंतु महास्थविर सारीपुत्र यांच्यासोबत वादविवादात झालेल्या पराभवामुळे त्यांनी भिक्खुणी संघात प्रवेश केला. आणि खुप कमी वेळात अरहंतपद प्राप्त करुन घेतले.* सच्चक हा त्यांच्या भावंडांपैकी सर्वात हुशार होता. त्याने आपल्या पालकांकडुन हजार प्रकारच्या विद्याच नव्हे तर अनेक प्रकारच्या विद्या त्याला येत होत्या. तो आपल्या हुशारीने आंधळा / अहंकारी बनला होता. तो लिच्छवीच्या राजकन्येचा शिक्षक म्हणुन वैशालीला रहायचा...._


        _तो स्वतःबद्दल जाहीरपणे सांगायचा कि, मी वादविवादात माझ्यापेक्षा पारंगत या जगात दुसरा कोणी सापडायचा नाही. तो स्वतःला अतिशय विद्वान आणि पवित्र समजायचा. वैशाली शहरात तो जाऊन अशा प्रकारच्या बढाया मारताना तो नागरिकांना म्हणायचा......._


           _मी अशा एकाही पंथाच्या नायकाला बघु शकत नाही कि जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मग तो कोणत्या संघाचा नायक असो, कोणता तपस्वी असो, एवढेच नव्हे तर स्वतः सम्यक संबुद्ध सुद्धा असो,, माझ्यासमोर कोणाचे काहीच चालत नाही.._


          _एके दिवशी शहरातुन भटकत असताना त्याने *स्थविर अश्वजीत* यांना बघितले. ते पिंडपात करत होते. तेव्हा सच्चक अश्वजीत यांना भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाबद्दल विचारले आणि भगवान बुद्धांसोबत वादविवाद करुन त्या वादविवादात त्यांना हरविण्याची इच्छा प्रगट केली._


        _भगवान बुद्धांच्या अनित्यवाद, अनात्मवाद, दुःख, इत्यादी शिकवणींच्या बद्दल ऐकल्यावर त्याचा असा समज झाला कि, भगवान बुद्धांसोबत वादविवाद करण्याची हिच योग्य वेळ आहे. त्यानंतर त्याने लिच्छवींच्या सभेमध्ये बुद्धांसोबत वादविवाद करण्याचे जाहीर केले यासाठी लिच्छवींच्या राजकन्येला आपला वादविवादात असलेला दबदबा आपली विद्वानता बघण्यासाठी आमंत्रीत केले._


            _*त्यावेळी भगवान बुद्ध महावन नावाच्या जंगलात असताना सच्चक आपल्या पाचशे अनुयायी व लिच्छवींसह भगवान बुद्धांकडे गेला.* भगवान बुद्धांना भेटल्यानंतर काहीशी विचारपुस केली. आणि विशिष्ट विषयावर प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. भगवान बुद्धांनी संमती दिल्यानंतर, त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याला जाणुन घ्यायचे होते कि भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना काय शिकवले. (जेव्हा त्याने स्थविर अश्वजीत यांच्याकडुन याबाबत माहीती करुन घेतली होती. परंतु त्याला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची लोकांसमोर पुष्टी करायची होती.)_


_*सच्चक म्हणाला,, सम्यक संबुद्धांनी आपल्या शिष्यांना काय शिकवले..?*_


          *_त्यावर भगवान बुद्ध म्हणतात,, सर्व संस्कार अनित्य आहेत, सर्व वेदना अनित्य आहेत, रुप अनित्य आहेत, संज्ञा अनित्य आहेत, विज्ञान अनित्य आहेत.... हे सच्चका सर्व रुप अनात्म आहेत, वेदना अनात्म आहेत, विज्ञान अनात्म आहेत. संज्ञा अनात्म आहेत, संस्कार अनात्म आहेत., सर्व धर्म अनात्म आहेत......_*


_यावर सच्चकाने प्रतिकार करताना म्हटले कि, ज्याप्रमाणे बी किंवा प्राणी पृथ्वीचा आधार घेवुन वृद्धी प्राप्त करुन घेतात._


_ज्याप्रमाणे बळ लागणारी कामे पृथ्वीचा आश्रय घेवुन संपन्न केली जातात. त्याचप्रमाणे पुरुष सुद्धा रुप, वेदना, संज्ञा संस्कार आणि विज्ञान यांचा आश्रय घेऊन पुण्याचे सृजन करुन घेतात. सच्चक पुढे म्हणाला, माझ्या विचारांमध्ये रुप, वेदना, संस्कार, विज्ञान आणि माझा आत्मा आहे._


_तेव्हा भगवंत सच्चकाला म्हणाले कि, राजा अजातशत्रु, राजा प्रसेनजीत अथवा अन्य कोणताही राजा आपल्या राज्यातील नागरीकास जिवे मारु शकतो.? जाळु शकतो.? देशाच्या बाहेर हाकलुन लावु शकतो काय.? सच्चक म्हणाला, होय हे संभव आहे. तेव्हा भगवंतांनी त्याला विचारले कि रुप माझा आत्मा आहे, तर हा रुप तुझ्या अधिपत्याखाली आहे काय.? माझा रुप असा असेल, माझा रुप तसा असेल.. हे आपल्या अधिकारात आहे काय.?_


_यावर पहिल्यांदा सच्चकाने मौन पाळले, दुसऱ्यांदा विचारल्यावरही सच्चक मौन होता. तिसऱ्यांदा विचारल्यावर सच्चक म्हणाला,, नाही भगवान... आपले म्हणने सत्य आहे.._


_*यानंतर सच्चकाने विचारलेल्या अन्य प्रश्नांना भगवंतांनी दिलेल्या उत्तरांचा तो स्वीकार करत गेला.*_


*_वादविवादात आपणच महाज्ञानी, सर्वश्रेष्ठ आहोत, हा त्याचा आंधळेपणा आता त्याला दिसु लागला होता._*


_• वेदना, विज्ञान, संस्कार, संज्ञा हे आपल्या शक्यते पलीकडे आहे._

_• रुप अनित्य आहे._

_• जो अनित्य आहे, तो दुःख आहे._

_• अनित्य, दुःख, परिवर्तनशील आहे, त्याच्याबद्दल विचार करणे योग्य नाही._

_• जी स्थीती रुपाची आहे, तिच स्थीती वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान या सर्वांची सुद्धा आहे._


*_त्यानंतर सच्चक म्हणाला, आपले श्रावक कशाप्रकारे संशयविरहीत, आत्मविश्वासी आणि आत्मनिर्भर होऊन आपल्या शासनात विहार करतात..?_*


*_भगवान म्हणाले., माझे श्रावक भुत, भविष्य आणि वर्तमानात शरीराच्या आत किंवा बाहेर, दुर किंवा बाहेर जे काही रुप, वेदना, संज्ञा, संस्कार किंवा विज्ञान आहेत, त्यांना हे माझे नाही, हे मी आहे, हे सर्व प्रज्ञेने पाहतात._*


_यानंतर सच्चक म्हणाला,, भिक्षु कशाप्रकारे, सम्यक ज्ञानाची प्राप्ती करुन अरहंत प्राप्त करुन घेतो..? भगवान बुद्धांनी या प्रश्नाचे उत्तर पहिल्याप्रमाणेच दिले, सम्यक संबुद्धाने प्रभावीत होवुन त्याने भगवान बुद्धांना भिक्षुसंघासहीत भोजनाला आमंत्रीत केले..._


                 *_नमो बुद्धाय - जय भिम_*          

                     *_ओम मणि पद्मे हुं_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/01/blog-post_31.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 28 January 2023

जयमंगल अष्टगाथा

 *जयमंगल अष्टगाथा*


 मारकथा


जयमंगल अष्टगाथा मधल्या पहिल्या गाथेमध्ये माराची गोष्ट सांगीतली आहे ती याप्रमाणे,


*बाहुं सहस्समभिनिम्मित सायुधंतं*

*गिरिमेखलं* *उदित-घोर-सरेन मारं*

*दानादि धम्म विदिना,* *जितवा मुनिंदो*,

*तं ते जसा भवतु ते जयमङ्गलानि*


ज्या मुनींद्राने अत्यंत तीक्ष्ण हत्यार घेऊन सहस्रबाहु, गिरिमेखलं नावाच्या हत्तीवर आरुढ झालेल्या व अत्यंत भयानक व अफाट सेनेसह आलेल्या माराला आपल्या दान आदि धर्मबळाने जिंकले,, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...


मारावर विजय


परिव्राजक सिद्धार्थ बुद्ध होण्याच्या तयारीत आहेत, हे पाहून माराला अतिशय वाईट वाटले. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला आजपर्यंत कोणत्याही श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माझा पराजय केला नाही. परंतु हा श्रमण गौतम खुप दृढनिश्चयी दिसतो, हा माझा अपमान करुन माझ्यापासुन स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करत आहे, मला याचे वेळीच दमन करायला हवे, नाहीतर तो माझ्या हातुन कायमचा सुटेल व माझ्यविरुद्ध बंड करुन उठेल. असा विचार करुन माराने त्याच क्षणी आपली सेना तयार केली.


अशा प्रकारे आपल्या अफाट सेनेला पुढे पाठवुन मार गिरीमेखल नावाच्या हत्तीवर आरुढ होऊन त्यांच्या मागोमाग आला. इकडे माराच्या अफाट सेनेने बोधीसत्त्वाचा पराभव करण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्टा केली होती. आपल्या शस्त्रांचा वर्षाव त्यांनी बोधीसत्वावर चालवला होता. परंतु त्या शस्त्रास्त्रांची फुले बनुन बोधीसत्त्वाच्या अंगावर येऊन पडत होती. कोणतीच शस्त्रास्त्रे बोधीसत्वाच्या अंगावर काहीच परिणाम करु शकत नव्हती. मारालाही कळुन चुकले होते कि आपल्या अफाट सेनेचा पराभव निश्चित आहे, त्याला त्याच्या सेनेचा पराभव दिसत होता, तेव्हा त्याने आपल्या पराभवाने वादळ उत्पन्न केले. आसपासचे वृक्ष कोसळु लागले, पशूपक्ष्यांचा एकच आक्रोश सुरु झाला. परंतु बोधीसत्व आपल्या समाधीपासुन तीळमात्रही ढळला नाही.


तेव्हा बोधीसत्वाला पाण्याने बुडवुन मारीन म्हणुन त्यान पाऊस पाडला, जिकडे तिकडे महापुर आणला परंतु पाण्याचा एकही थेंब बोधीसत्वाला स्पर्श केला नाही.


त्यामुळे व्यथीत झालेल्या माराने सहा प्रकारच्या वृष्टी उत्पन्न केल्या परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. हे पाहुन मार अतिशय खिन्न झाला. तरीसुद्धा त्याने प्रयत्न करणे सोडले नाही. त्याने भयानक काळोख उत्पन्न केला, ती वैशाख शुद्ध पोर्णीमेची रात्र होती. पोर्णीमेच्या चंद्राने आणि चांदण्याने रात्र खुप प्रकाशलेली होती. परंतु माराने बोधीवृक्षाजवळ भयानक अंधकार पसरविल्या कारणाने, माराचा गिरीमेखल हत्ती व जवळपासची पर्वतशिखरे घुबडांना दिसेनाशी झाली. परंतु बोधीसत्वाच्या प्रज्ञारुपी प्रदीपापुढे माराचा अज्ञान रुपी अंधकारचा नायनाट केला.


आजपर्यंत त्या माराला पराभव काय आहे, हे माहीतच नव्हते, आजपर्यंत त्याचा कधीच पराभव झाला नव्हता. जरी एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माराविरुद्ध युद्ध पुकारले तरी मार आपल्या एखाद्या तुकडीला पाठवुन त्याचा तेव्हाच पराभव करायचा.


श्रमण गौतम साधारण तपस्वी नव्हता हे जाणुनच माराने आपल्या सैन्याला त्याच्यावर तुटुन पडायच्या आज्ञा केल्या होत्या, परंतु आपल्या अफाट सेनेला बोधीसत्व चारी मुंड्या चित करल हे त्या जाणले नव्हते. आपली सर्व शक्ती पणाला लावुन देखील तो बोधीसत्वाला आपल्य मार्गापासुन क्षणभरही विचलीत करु शकला नव्हता, आता परभवाची वार्ता घेऊन माघारी जाण्यापेक्षा बोधीसत्वावर हल्ला करणे माराला योग्य वाटले. तेव्हा मार आपल्या गिरीमेखल हत्तीवरुन खाली उतरला आणि बोधीसत्वाला म्हणाला सिद्धार्था इथुन मुकाट्याने चालता हो, नाहीतर एका क्षणात तुझा नाश करेन.


तेव्हा बोधीसत्व म्हणतो, हे पापी मारा, तुझ्या सैन्यांना मी चांगल्या प्रकारे ओळखतो, वेगवेगळ्या प्रकारच्या चैनीच्या वस्तु हि तुझी सर्वात पुढे जाणारी तुकडी आहे. तहान, भुक, तृष्णा, आळस, गर्व, किर्तीची आशा, आत्मस्तुती आदी, ह्या तुकड्या त्यामागोमाग येत असतात. कच्च्या मातीचे भांडे जसे फोडतात त्याप्रमाणे मी तुझ्या सैन्याचा पराभव करेन.


हे ऐकुन मार म्हणाला, त्या सर्व गोष्टींना जाऊदे,, आधी तु ज्या आसनावर बसला आहेस, तिथुन उठ ते माझे आसन आहे. चल ताबडतोब चालता हो इथुन. त्यावर बोधीसत्व म्हणाला, कशावरुन तु म्हणत आहेस कि हे तुझे आसन आहे, याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे काय? हा प्रश्न ऐकुन माराच्या सेनेतील अनेक लोक योध्ये म्हणायला आहोत कि आम्ही साक्षी आहोत. तेव्हा पापी मार बोधीसत्वाला म्हणाला कि, सिद्धार्था हा माझा पुरावा आहे, चल आता इथुन मुकाट्याने चालता हो. त्यावर बोधीसत्व म्हणाला कि मी अनेक जन्मी दानपारमिता पुर्ण करुन या आसनावर बसण्याचा अधिकारी बनलो आहे, यावर मार म्हणाला याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे.


तेव्हा बोधीसत्व म्हणाला हि पृथ्वी साक्षी आहे, हि वसुंधरा साक्षी आहे. याचबरोबर तिथे एक देवता प्रगट झाली आणि तिने साक्ष दिली कि, श्रमण गौतमाने अनेक जन्म घेऊन दानपारमिता पुर्ण केली याबाबत साक्ष दिली. येवढे बोलुन त्या देवतेने आपले ओले केस पिळले आणि त्या प्रवाहाबरोबरच आपल्य अफाट सेनेसह व गिरिमेखल हत्तीसोबत मार वाहुन गेला. माराची झालेली दुर्दशा पाहुन देवांगण बोधीवृक्षाजवळ जमले आणि त्यांनी सिद्धार्थावर पुष्पवृष्टी केली. तेव्हा बोधीसत्वाने पुढील गाथा म्हटली,,


अनेकजातिसंसारं संधाविस्सं अनब्बिसं गहकारकं गवेसन्तो दुक्खा जाति पुनप्पुनं।गहकारकं दिट्टो ऽसि पुन गेहं न काहसि सब्बा ते फासुका भग्गा गहकूटं विसंखितं

विसंखारगतं चितं तव्हानं स्वयमज्झगा।


धम्मपदाच्या १०३ ऱ्या गाथेद्वारे भगवान बुद्ध आपल्याला सांगतात,,


यो सहस्सं सहस्सेन, सङ्गामे मानुसे जिने। एकञ्च जेय्यमत्तानं स वे सङ्गामजुत्तमो॥


जो युद्धात लाखो जेत्यांना जिंकतो (त्या जेत्याहुन), जो एक स्वतःला जिंकतो, तो उत्तम युद्धजेता होय.


खरच तो सर्वश्रेष्ठ विजेता होता.. ज्याने स्वतःलाच जिंकले...


बाहुं सहस्समभिनिम्मित सावुधंतं,

गिरिमेक्खलं उदित-घोर-ससेन मार

दानादि धम्मविधिना जितवा मुनिंदो

तं ते जसा भवतु ते जयमङलानि


ज्या मुनिंद्राने तीक्ष्ण व बळकट हत्यारे धारण केलेल्या सहस्र बाहुबळ निर्माण करुन गिरीमेखल नावाच्या मस्त हत्तीवर बसुन अनंत, भयानक व अफाट सेनेसह माराला क्षणातच आपल्या दानादी धर्मबळाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.


सुचना : हे युद्ध बोधीसत्वाच्या मनातील चांगले विचार विरुद्ध वाईट विचार असे होते, त्याला अलंकारीक रीत्या सजवले आहे.


बक ब्रह्माचे गर्वहरण


एकदा भगवान बुद्ध उकट्ठ मधील सुभगवनामध्ये विहार करीत असताना बक नावाच्या ब्रह्माला दुष्ट दृष्टी उत्पन्न झाली, तो समजु लागला कि मी ज्या लोकात (ब्रह्मलोकात) राहतो आहे तो नित्य, ध्रुव आणि शाश्वत आहे, मी अमर आहे असे तो स्वतःला समजु लागला होता. तेव्हा भगवान बुद्धांनी बक ब्रह्माचे मन ओळखुन ते ब्रह्मलोकात गेले आणि बक ब्रह्माला म्हणाले,


हे ब्रह्मा, तु अज्ञानाच्या घोर अरण्यामध्ये विहार करतो आहेस. जेव्हा अनित्याला नित्य म्हणतोस, अध्रुवला ध्रुव, अशाश्वताला शाश्वत ; ब्रह्मलोकापासुन श्रेष्ठ शांती (निर्वाण) असुन सुद्धा तु म्हणतो आहेस कि यापेक्षा श्रेष्ठ शांती नाही.


बकब्रह्मा म्हणाला : हे श्रमण गौतमा, आम्ही (ब्रह्मा) आपल्या पुण्यकर्माने जगावर राज्य करत आहोत. ब्रह्मलोकात उत्पन्न होणे हीच दुःखापासुन मुक्ती आहे.


भगवान म्हणाला : हे ब्रह्मा तु ज्या आयुष्याला मोठे समजत आहेस ते आयुष्य सुद्धा थोडेच आहे, शेकडो, हजारो वर्षांच्या तुझ्या आयुष्याला मी जाणतो. मी अनंतदर्शी भगवान आहे. वेदनेच्या पलीकडे गेलो आहे.


हे ब्रह्मा.. मी तुझ्या गतीच्या प्रभावाला जाणतो, महान ऋद्धीबल असलेला तु महाशक्तीशाली आहेस... परंतु दुसऱ्या लोकसमुहातील असे लोक आहेत ज्यांना तु जाणत नाहीस, त्यांना तु पाहु शकत नाहीस, परंतु मी त्यांना पाहतो, मी त्यांना जाणतो.


तु आभस्सर नावाच्या लोकातुन येथे उत्पन्न झाला आहेस, तो खुप लांब प्रवास असल्याने तुला त्याची स्मृती नाही., परंतु मी त्याला जाणतो, मी त्याला पाहतो. यापुर्वीही तु सुभकिण्ह, वेहप्पाल, अभिभु नावाच्या लोकांमधुन प्रवास केला आहेस. परंतु तु त्याला जाणत नाहीस. परंतु मी जाणतो.


ब्रह्मा! पृथ्वी, जल, वायू, अग्नी आदींना त्यांच्या योग्य स्वरुपात जाणले, मी जगाच्या परम सत्याला, निर्वाणाला जाणले, याद्वारे ज्ञानामध्ये मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे सर्व ऐकुन बक ब्रह्मा भगवान बुद्धांची चेष्टा करण्याचा प्रयत्न करु लागला परंतु तो त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकला नाही.


बकब्रह्मा म्हणाला : माझे पहिले शील आणि व्रत काय होते..?


भगवान म्हणाले,


• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु पुष्कळ तहानलेल्यांची तहान भागवली आहेस.

• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु गंगेच्या प्रवाहातुन वाहत जाणार्या माणसाला तु वाचविलेस.

• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु गंगेच्या प्रवाहात नावेला पकडलेल्या मोठ्या सर्पापासुन तु सोडविलेस.

• झोपेतुन उठल्याप्रमाणे मला आठवते कि तु मी तुझा कप्प नावाचा शिष्य होतो, ज्याला तु बुद्धीमान समजलेस.


हे सर्व ऐकुन अचंबीत झालेला बकब्रह्मा म्हणाला, खरोखरच भगवान आपण माझ्या आयुष्याला जाणता, त्याचप्रमाणे इतर गोष्टींना सुद्धा जाणता. आपल्या दैदिप्यमान तेजाने संपुर्ण ब्रह्मलोक प्रकाशमान झाले आहे.


दुग्गाहदिठ्टिभुजगेन सुदठ्टहत्थं, ब्रम्ह विसुद्धि जुतिमिद्धि बकाभिधानं । ञाणागदेन विधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि


ज्या मुनींद्राने, भयंकर मिथ्या दृष्टिरुप सापाने दंश केलेल्या, विशुद्धज्योती आणि ॠद्धिशक्ति संपन्न बक नामक ब्रह्मज्ञान्याला ज्ञानरुपी औषध देऊन जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो...


एतापि बुद्ध जयमंगल अठ्ट गाथा, यो वाचको दिनदिने सरते मतन्दी हित्वान नेका विविधानि चुपद्दवानि, मोक्खं सुंखं अधिगमेय्य नरो सपञ्ञो


जो कोणी उपासक या सर्व गाथांच्या कथांमधुन योग्य तो बोध घेऊन आपल्या जीवनात त्याचे आचरण करेल, त्या पुण्याचरणाने खचितच निर्वाण प्राप्त होईल... तुम्हाला सुद्धा याचे सदाचरण करुन निर्वाणाचे सुख प्राप्त होवो हिच मंगल कामना....


सब्बे सत्ता सुखी होंन्तु , सब्बे होंन्तु च खेमिनो । सब्बे भद्रानिपस्स न्तु , माकत्र्चि दुक्खमागमा


सर्व प्राणी सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न होवो....


जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप


सुर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकांची दशा झाली होती . लोक त्यांना आदर किंवा उपाहार देइनात. त्यामुळे राजरस्त्यावर उभे राहुन ते बोलु लागले, 'जर गौतम बुद्ध श्रमण असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. ह्यास्तव आम्हास दान द्या.


लोकांनी त्यांच्या ह्या बडबडीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा श्रमण गौतमांच्या चरित्याबद्दल कंडी पसरवुन संघाला बदनाम करण्याचा गुप्त कट त्यांनी रचला.


त्यावेळी श्रावस्तीमध्ये.. चिंचा नावाची एक ब्राह्मणी योगीनी राहात असे. तिचा देह आणी रुप आकर्षक होते. आपल्या अंगविक्षेपांनी ती वासनोत्तेजक प्रभाव निर्माण करु शके.


जैन तीर्थकांपैकी एका कुटील तीर्थकाने सुचवले की, चिंचाच्या सहाय्याने गौतमाबद्दल कंडी उठवुन त्याला बदनाम करणे सुलभ होईल. वाकीच्या तीर्थकानी ह्या सुचनेस सहमती दर्शवली.


एके दिवशी चिंचा तीर्थकांच्या उद्यानात आली आणी अभिवादन करुन ती त्यांच्याजवळ बसली, पण कुणीही तिच्याशी बोलले नाही. ह्यामुळे चकित होवुन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? तीनदा मी आपणास अभिवादन केले, पण आपण शब्दही बोलत नाही. तीर्थक बोलले, भगीनी! तुला माहीत नाही काय की, आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला बाधक झाला आहे. नाही मला माहीत नाही! पण याबाबत मी काय करु शकते? त्यावर तीर्थक म्हणाले, भगीनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तु स्वतः गौतमाबद्दल कांड्या उठव. जेणेकरुन त्याची लोकप्रियता नष्ट होईल. त्यावर चिंचा ने ठिक आहे असे म्हटले व नंतर ती निघुन गेली....


स्त्री सुलभ आकर्षण कलेत आणी नैसर्गीक सौंदर्यविशेषात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहुन प्रवचन ऐकुन परत येत त्यावेळी रक्त-वस्त्र परिधान करुन, सुगंधित द्रव्ये लावुन हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे. जर कोणी तिला विचारले, तु कुठे निघालीस? त्यावर ती उत्तर देइ तुम्हाला काय करायचे!


जेतवनाजवळील तीर्थिकारामात रात्र घालवुन ती प्रातःकाळी शहराकडे परत येइ, त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर कोणी तिला विचारले, तु रात्र कुठे व्यतीत केलीस? तर ती उत्तर देइ, तुम्हाला काय करायचे? मी जेतवनात श्रमण गौतमांच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालविली! काही लोकांच्या मनात तिच्या ह्या उत्तरामुळे संदेह निर्माण होई. काही महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरगुटे गुंडाळुन त्याचा आकार वाढवुन तिने सांगायला सुरुवात केली की, श्रमण गौतमापासुन आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या ह्या शब्दांवर विश्वास ठेवला.


नवव्या महिन्यानंतर तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणी कीटकदंशानी हात सुकवुन घेवुन ज्या स्थानी भगवान बुद्ध, भिक्खु व गृहस्थांसमोर प्रवचन करत होते तिथे जाऊन ति म्हणाले, हे महान उपदेशक! आपण पुष्कळ लोकांना उपदेश करता, आपली वाणी मधुर आहे आणी आपले ओठ फार नाजुक आहेत. आपल्याशी संबंध ठेवुन मी गर्भवती झाले आहे आणी प्रसुती-समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसुतीची काहीच व्यवस्था केलेली नाही. तसेच अडी-अडचणीसाठी औषध पाण्याचीही काहीच सोय केलेली दिसत नाही. जर स्वतः तुम्हाला हि व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यांपैकी कोशल देशाचा राजा, अनाथ पिण्डिक किंवा विशाखा अशा कोणाला तरी ती करण्यास का सांगत नाही.? कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे, पण त्यामुळे होणाऱ्या अर्भकाचा परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही. उपस्थित श्रोतृवर्ग तटस्थ झाला होता. आपले प्रवचन अर्धवट सोडुन अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध बोलले, हे भगीनी, तु जे काही आता सांगीतलेस त्याची सत्यासत्यता फक्त आपणा दोघासच माहीत असणे संभाव्य आहे.


चिंचा जोराजोरात खोकलत म्हणाली, होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणा उभयतासच माहीत असणे संभाव्य आहे. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोराची गाठ सैल होवुन ती फळी सरकुन तिच्या पायाशी पडली. चिंचा यामुळे अस्वस्थ झाली. त्यानंतर लोकांनी तिला काठ्यांनी आणी दगडांनी मारुन तिला हाकलुन दिले.


त्यानंतर तिला जाब विचारला असता, तिने जैन तिर्थकांबद्दल झालेल्या चर्चेबाबत सर्वांना सांगीतले त्यामुळे,, जैन तीर्थक लोकांच्या नजरेत आणखी खाली उतरले.


अश्या ह्या तीर्थकांची परंपरा पुढे चालवणारे,, लोक आजही जगात आहेत, ते वेळोवेळी, भगवान बुद्धाला, त्यांच्या धम्माला, त्यांच्या अनुयायांना कसे खाली दाखवता येइल,, याचा शोध घेत असतात,


कत्वान कटठमुदरं इव गब्भिनीया, चिञ्चाय दुट्ठवंचन जनकायमज्झे । सन्तेन सोम विधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि ।।


ज्या मुनींद्राने, पोटावर काष्ठ बांधुन गर्भवतीसारखे आपले पोट मोठे करुन लोकांसमक्ष दुष्ट वचन करणाऱ्या (बुद्धाला कलंक लावण्यासाठी) चिंचा नामक स्त्रीला, आपल्या शांती आणि सौम्यता या गुणांनी जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.


नालागीरी हत्तीवर विजय


नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं,दावग्गिचक्कमसनीव सुदारूणन्तं। मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो,

तं तेजसा भवुत ते जयमंगलानि...


ज्या मुनींद्राने, दावाग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत अशा नालागीरी हत्तीला आपल्या मैत्री अभिषेकाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...


देवदत्त हा सिद्धार्थाचा चुलत भाऊ त्याच्यावर नेहमी जळत असे,


एकदा जेव्हा भगवान बुद्ध कपिलवस्तु मध्ये आले आणि शाक्यांना धम्मदेशना करु लागले, त्या देशनेने प्रभावित होऊन अनेक शाक्यांनी बुद्धाच्या संघात प्रवेश केला. त्यावेळेस देवदत्त ने सुद्धा भगवान बुद्धाच्या संघात प्रवेश केला. आणि फार थोड्या कालावधीतच त्याने असीम नैसर्गीक शक्ती मिळविल्या. तो आता ध्यान साधनेचा सराव करु लागला होता. पण तरी सुद्धा त्याच्या मनात बुद्धाच्या प्रती असलेला द्वेष कमी होत नव्हता.


एकदा तो राजा अजातशत्रुच्या जवळ गेला आणि त्याने आपल्या शक्तीने राजाला प्रभावित केले. त्यामुळे अजातशत्रु देवदत्ताचा शिष्य बनला होता.


इकडे संघात,, आपण संघनायक बनलो पाहिजे यासाठी देवदत्त बुद्धासमोर नेहमीच बढाया मारायचा.


एकदा त्याने संघात मला मानाचे स्थान नाही असा बुद्धावर आणि संघावर आरोप केला. त्यानंतर तो मगध राष्ट्रांत आपला मित्र अजातशत्रुकडे मदतीसाठी गेला. (अजातशत्रु हा बिंबीसाराचा मुलगा होता,, आणि बिंबीसार हा बुद्धाच्या प्रमुख अनुयायांपैकी एक. अजातशत्रुने बिंबीसाराची हत्या केली होती. ) त्यामुळे अजातशत्रुने देवदत्ताला बुद्धाच्या विरोधात मदत करण्याची हमी दिली.


सर्वप्रथम अजातशत्रुने धनुर्विद्येत अतिशय पारंगत अशा सोळा धनुर्धरांची नियुक्ती बुद्धाची हत्या करण्यासाठी केली होती. परंतु भगवान बुद्धाच्या प्रभावाने त्या धनुर्धरांचे ह्रदय परिवर्तन झाले.


या अपयशाने यापुढे देवदत्त स्वतः बुद्धाची हत्या करण्याचा प्रयत्न करु लागला. एकदा भगवान बुद्ध त्यांच्या संघासोबत एका पर्वतशिखरा खालुन जात असताना. त्या पर्वतशिखराहुन एक मोठा दगड भगवान बुद्धांच्या दिशेने फेकला. परंतु तो दगड भगवान बुद्धांच्या समोर पडला आणि त्या दगडाचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायाला लागला आणि त्यांच्या पायाला जखम झाली. देवदत्ताचा हा प्रयत्न फसला परंतु तरीही त्याने पराभव स्वीकारला नव्हता.


त्यानंतर तो एका नालागीरी नावाच्या हत्तीजवळ गेला, त्याने त्या हत्तीला दारु, आणि अन्य नशा येणारे पदार्थ खायला दिले, त्यामुळे तो हत्ती आपली शुद्ध हरवुन बसला होता. नशेच्या प्रभावामुळे नालागीरी आता अत्यंत क्रुर व भयानक बनला होता. वाटेत भेटेल त्याला पायाने चिरडत समोर तो चालला होता, लोक त्याच्या भितीमुळे सैरावैरा पळु लागले होते, संपुर्ण नगरीत त्याची दहशत माजली होती तरीसुद्धा अशा भयानक परिस्थीत भगवान बुद्ध आपल्या संघासोबत त्याच दिशेने चालले होते. तेव्हा एका स्त्रीने आपल्या बाळाला भगवान बुद्धांच्या पायाखाली आणुन ठेवले, तो नालागीरी हत्ती त्या बाळाला लाथ मारणार एवढ्यातच भगवान बुद्धांनी त्या हत्तीला स्पर्श केला आणि काय तो हत्ती शांत झाला आणि गुडघ्यावर बसला. तो आता भगवान बुद्धांचा मित्र बनला होता, सर्व नगरवासी भगवान बुद्धांचा हा पराक्रम बघत होते. भगवान बुद्धांनी त्या हत्तीला काही कोणत्या जादुई शक्तीने प्रभावित केले नव्हते तर भगवान बुद्धांकडे एक अलौकिक शक्ती होती त्यांच्या चेहऱ्यावार एक वेगळ्याच प्रकारचे तेज होते, ज्याला बघुनच लोक भगवान बुद्धांकडे आकर्षित व्हायचे....


नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं,दावग्गिचक्कमसनीव सुदारूणन्तं। मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो,

तं तेजसा भवुत ते जयमंगलानि...


ज्या मुनींद्राने, दावाग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत अशा नालागीरी हत्तीला आपल्या मैत्री अभिषेकाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...

आलवक नामक यक्षाची गोष्ट


मारातिरेक-मभियुज्झित-सब्बरंत्ती, घोरम्पनाल वक मक्ख मथद्ध यक्ख । खान्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि


ज्या मुनींद्राने, माराशिवाय समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठुर ह्रदयाच्या आलवक नावाच्या यक्षाला क्षांती आणि संयमाच्या बळाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.


एकदा भगवान बुद्ध आळवी मध्ये आरामांत थांबले होते. तेव्हा आलवक नावाचा निष्ठुर यक्ष त्यांच्या जवळ येऊन म्हणाला,


इथुन चालता हो,,


त्यावर तथागत उत्तरले, मित्रा, मी इथुन जाणार नाही, तुला जे करायचे आहे ते कर.


मी तुला प्रश्न विचारतो, जर तु त्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकला नाहीस तर तुझे पाय पकडुन गंगेच्या पलीकडे फेकीन.


भगवान म्हणाले, माझ्या मित्रा सर्व देवांगणांत, मारांमध्ये, ब्रह्मांमध्ये नाही श्रमण आणि ब्राह्मणांमध्ये असा कोणी जो माझ्या मनापर्यंत पोहोचु शकेल. आणि माझे पाय धरुन मला गंगेच्या पलीकडे फेकु शकेल. पण जाऊदे,, तुला जे काही विचारायचे आहे ते विचार.


आलवक म्हणाला,


•मनुष्याचे श्रेष्ठ धन कोणते?


•कोणते सत्कृत्य त्याच्यासाठी सुखकारक आहे?


•कोणत्या प्रकारच्या आचरणाने त्याचे जीवन श्रेष्ठ होते?


भगवान म्हणाले -


•श्रद्धा हे मनुष्याचे श्रेष्ठ धन होय.


•सद्धम्माचे संपादन केल्यास जीवन सुखकारक होते. सत्य हा सर्वोच्च उद्धारक आहे.


•सन्मार्गाने प्रज्ञापुर्वक वागणाऱ्यांचे जीवन श्रेष्ठ आहे.


आलवक म्हणाला,


• मनुष्य पुरातुन बाहेर कसा निघतो?


• तो अर्णव (समुद्र) कसा पार करतो?


•मनुष्य दुःखाच्या पार कसा जातो?

तो परिशुद्ध कसा होतो.?


भगवान म्हणाले,


• मनुष्य श्रद्धेने पुरातुन पोहुन बाहेर येतो.


• सावधानपणाने अर्णव तरतो.


• उत्साहाने दुःखाच्या पार जातो.


• प्रज्ञेने परिशुद्ध होतो.


आलवक म्हणाला,


• मनुष्य कशाने प्रज्ञा मिळवतो?


• धन कसे मिळवतो?


• किर्ती कशी प्राप्त करतो?


• मित्र कसे मिळवितो?


• कोणता मनुष्य परलोकात गेल्यावर शोक करत नाही?


भगवान म्हणाले,


•अरहंताच्या निर्वाणप्राप्तीच्या धम्मावर श्रद्धा ठेवुन श्रद्धावान व प्रज्ञावंत मनुष्य शुश्रुषेने प्रज्ञा मिळवितो.


• योग्य मेहनत करणारा, धुरा वाहणारा, सत्याने किर्ती प्राप्त करणारा, दानाने मित्र जोडतो.


• ज्या गृहस्थाकडे सत्य, संयम, अहिंसा व दमन हे गुण आहेत. तो परलोकात गेल्यावर शोक करत नाही. हवे असल्यास निरनिराळ्या श्रमण ब्राह्मणांकडे जाऊन विचार श्रेष्ठ, दम, त्याग आणि क्षांति यांच्यापेक्षा श्रेष्ठ या लोकात काय आहे?


यावर आलवक नामक यक्ष म्हणाला, मी निरनिराळ्या श्रमण आणि ब्राह्मणांना कशाला विचारु? जेव्हा तथागतांनी येथेच मला सत्याचे दर्शन घडवुन दिले. मला माझ्या जीवनाचा लाभ समजला आहे.


खरोखरच माझ्या लाभासाठी तथागत आळवीला रहावयास आले, त्यामुळे कोणाला दान दिले असता ते लाभदायक होते हे मला समजले. मी सम्यक संबुद्धाला आणि त्याच्या धम्माच्या सुधर्मतेला नमस्कार करीत गावो गावी आणि शहरो शहरी फिरत राहीन.


धन्य धन्य गौतमा,, आजपासुन मी तुला शरण जातो.

असे म्हणत आलवक भगवान बुद्धांना शरण गेला तेथेच त्याची उपसंपदा झाली.


मारातिरेक-मभियुज्झित-सब्बरंत्ती, घोरम्पनालवक मक्ख मथद्ध यक्ख । खान्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो,

तं तेजसा भवतु ते जयमंगलानि


ज्या मुनींद्राने, माराशिवाय समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठुर ह्रदयाच्या आलवक नावाच्या यक्षाला क्षांती आणि संयमाच्या बळाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.


Thursday, 5 January 2023

ॐ मणि पद्मे हूँ

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_ॐ मणि पद्मे हूँ_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                   *_२४ फेब्रुवारी १९५६ रोजी बोधिसत्व बाबासाहेब यांनी संकलित केलेले एक छोटेसे पुस्तक मुळ मराठीमध्ये प्रकाशित केलेले, बुद्ध पूजा पाठ. ज्यामध्ये दैनंदिन व नियमित पूजापाठ यासाठी उपयोगी, त्रिशरण पंचशील, तीन रत्नांची वंदना, बुद्धपूजेसह रतनसुत्त, सर्व गाथा, मराठी मध्ये लिहिलेले आहे. या पुस्तकाची प्रस्तावना मराठीतून बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेली आहे. त्यात त्यांनी हा उल्लेख केला की, या पुस्तिकेतील सुत्त त्यांनी १९५० च्या श्रीलंकेच्या प्रवासादरम्यान एकत्र केले होते. या पुस्तिकेतील सुत्त बाबासाहेबांनी त्यावेळचे प्रसिद्ध गायक मास्टर कृष्णराव यांच्याकडून गाऊन घेतले होते. याची निर्मिती तत्कालीन प्रसिद्ध ग्रामोफोन कंपनी एच. एम. व्हि. ने केली होती. जे म्युझिक आर्काईव मध्ये आजही उपलब्ध आहे._*

               _*या पुस्तिकाला प्रदीप सतिकाबाई गायकवाड यांनी “बुद्ध आणि त्यांचा धम्म" "बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया” “समता सैनिक दल” यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशित केली. बोधिसत्व बाबासाहेब यांनी संकलित आणि स्वतः त्यांच्या जीवनात प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेच्या शेवटी छोट्याशा शिर्षकात दिले आहे, “जप" व खाली तीन वेळा बोधिसत्व अवलोकितेश्वर याचे एक बौद्ध मंत्र छापले आहे.*_

*_ॐ मणि पद्मे हूँ_*

*_ॐ मणि पद्मे हूँ_*

*_ॐ मणि मद्मे हुँ_*

           _*या पुस्तिकेचे हिंदी भाषांतर आंबेडकर ज्ञान मंदिर, नागपूर याच्याकडून १९९७ मध्ये पुन्हा प्रकाशित केले, त्याचा अकरावा आणि शेवटचा भाग जा विधायक पंचशील असून जप या शिर्षकाखाली पुन्हा वरील मंत्र तीन वेळा छापला आहे ॐ मणि पद्मे हूँ....*_

            *_महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या बोधिसत्व बाबासाहेबांच्या संपूर्ण साहित्याच्या इंग्रजी आवृत्तीच्या सोळाव्या खंडात वरील पुस्तिका मुळ मराठी स्वरुपात जशीच्या तशी प्रकाशित केली आहे. ज्यामध्ये शेवटच्या अध्यायाचे शिर्षक जप आहे, त्या अंतर्गत बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा वरील मंत्र लिखित आहे - ॐ मणि पद्मे हुँ.._*

            _*बोधिसत्व बाबासाहेबांचा सर्वाधिक प्रसिद्ध ग्रंथ The Buddha and His Dhamma (मराठी आवृत्ती, बुद्ध आणि त्यांचा धम्म) १९५७ मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीच्या शेवटी सुद्धा बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा वरील मंत्र तीन वेळा उल्लेखित करण्यात आला आहे - ॐ मणि पद्मे हुँ.. महापरिनिर्वाणाच्या दोन दिवस अगोदर, ४ डिसेंबर १९५६ रोजी बोधिसत्व बाबासाहेबांनी श्री. वी.एस. कर्डक यांना बौद्ध विवाह सोहळा, विधी बद्दल एक अतिशय संक्षिप्त पत्र लिहिले होते, त्याचा शेवट बाबासाहेबांनी या मंत्राने केला आहे. ॐ मणि पद्मे हुँ.*_

            _हे प्रामाणिक व अचूक संदर्भ सिद्ध करतात की, *बोधिसत्व बाबासाहेब करुणेचे बोधिसत्व अवलोकितेश्वराचा मंत्र जप करीत असत. ॐ मणि पद्मे हूँ, कारण या मंत्राला त्यांनी आपल्या पुस्तकांमध्ये "जप" या शिर्षका अंतर्गत दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध चळवळीचा इतिहास, या पुस्तकाचे लेखक श्री श्यामसिंह यांनी त्यांच्या पुस्तकात भारतीय शिक्षण संस्थेचे संचालक प्राध्यापक बुद्ध प्रकाश यांच्या लेखाचा संदर्भ “बौद्ध धर्माची अभिनव व्याख्या" या लेखात प्राध्यापक बुद्ध प्रकाश यांनी बाबासाहेबांच्या सोबतची आठवण आपल्या शब्दात मांडली आहे. एकदा जुन्या सचिवालयाच्या शेजारी बाबासाहेबांना भेटायला त्यांच्या राहत्या निवासस्थानी, दिल्लीला गेलो तर बैठकीच्या खोलीत प्रवेश केल्याबरोबर प्लास्टर ऑफ पॅरीसने बनवलेल्या अवलोकितेश्वर यांच्या मूर्तीच्या दर्शनाचा लाभ झाला. विचारल्यानंतर बाबासाहेब म्हणाले, त्या मूर्तीला त्यांनी त्यांच्या भावनेनुसार बनवलेली आहे आणि ती त्यांच्या भावनांच्या विचारांचा उगम आहे आणि ती त्यांच्या भावनांचा निरंतर झरा आहे. हे वाक्य स्वतःच संदर्भ स्पष्ट करते. हा संदर्भ डॉ. चंद्र स्वरुप धम्मचारी ज्ञानसागर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण पुस्तकातून युगदृष्ट्रा डॉ. आंबेडकर यांनी सांगितलेला आहे. २०१५ मध्ये सम्यक प्रकाशन ने प्रकाशित केलेले हे पुस्तक आहे.*_

                _ही आठवण पुरावा देते की, *बाबासाहेब केवळ बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा “ॐ मणि पद्मे हुँ” चा वारंवार जपच करत होते तर त्यांची पूजा सुद्धा करत होते आणि ते त्यांच्या विचारांचे कायम ऊर्जाप्रवाह, होते. पुढे बोधिसत्व बाबासाहेब यांचे वैयक्तिक सचिव नानकचंद रत्तू यांनी त्यांच्या स्मृती वर इंग्रजीमध्ये एक पुस्तक लिहिले - Reminiscences and Remembrances of Dr. B. R. Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण या नावाने जे मुळात १९९५ मध्ये Falcon Books] B70/72,D.S.I.D.C. Complex. Lawrence Road. Delhi - 110035 द्वारे प्रकाशित झाले. आणि याची हिंदी आवृत्ती २००९ तसेच २०१२ मध्ये सम्यक प्रकाशन नवी दिल्ली द्वारे 'बाबासाहेब डॉ. आंबेडकर संस्मरण और स्मृतिया' या शिर्षकाने प्रकाशित झाले. या प्रकाशनाचे प्रकाशक प्रमुख श्री. शान्ति बौद्ध हस्ते २००२ मध्ये गेले. या पुस्तकातील इंग्रजी भाषेतील सुप्रसिद्ध कादंबरीकार, विशेषता, द अनटचेबल (अछूत) या कादंबरीचे लेखक मुल्कराज आनंद यांची बोधिसत बाबासाहेब यांच्या सोबतची एक मुलाखत प्रकाशित झाली*_ 

             _या संभाषणाच्या सुरुवातीच्या भागाचे भाषांतर खालीलप्रमाणे....? *मे १९५० च्या एका सुगंधित अशा एका संध्याकाळी दोन सभ्य गृहस्थ मुंबईतील कफ परेड मैदानावर एका बाकावर बसले आणि त्यांच्यातील संवाद सुरु झाला. त्यापैकी एक होते, 'भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ, भिमराव रामजी आंबेडकर, दुसरे होते, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि अस्पृश्य या कादंबरीचे लेखक मुल्कराज आनंद...* चाळीस वर्षांनंतर डॉ. आनंद यांनी दलितांच्या प्रेषिताबरोबर त्यांचे झालेल्या संवादाची उजळणी करत आहे.._

मुल्कराज आनंद : नमस्कार डॉ. आंबेडकर..... 

_*भिमराव रामजी आंबेडकर: त्यापेक्षा मला बौद्ध पद्धतीचे अभिवादन  "ॐ मणि पद्मे हुं" हे जास्त आवडेल...."विश्व कमलस्थ बुद्धाला प्रणाम असो..."*_

_मुल्कराज आनंद मी तुमच्याशी सहमत आहे. आम्ही किती विचारहिन आहोत. आम्ही शब्दांच्या अर्थाने पुनरावलोकन न करता त्यांना स्विकारतो. हे खरे आहे की, नमस्कार म्हणजे मी तुमच्यापुढे नमन करतो._ 

*_भिमराव रामजी आंबेडकर: यामुळे समर्पणाकरिता सातत्य लाभते. कमळ फुलू या यामध्ये बुद्धत्वाच्या उमलण्यासाठी ची प्रार्थना आहे._*

_मुल्कराज आनंद: खरंतर जुन्या सवयी सहजा जात नाहीत. आम्ही विचार न करता त्यांना स्विकारतो._ 

*_भिमराव रामजी आंबेडकर: प्रत्येक गोष्टीत....._*

            _ही एक लांबलचक चर्चा आहे. *ज्यात या संभाषणाच्या सुरुवातीच्या भागात बोधिसत्व बाबासाहेबांनी मुल्कराज आनंद यांच्या अभिवादनाला तसाच प्रतिसाद न देता, "ॐ मणि पद्मे हुं" म्हणून उत्तर दिले,*_

             _खरंतर, चाळीस ते पन्नास वर्षात छापले किंवा ऐकले की, *ॐ मणि पद्मे हुँ च्या जागेवर पदमये असे छापण्यात आले आहे. अन्यथा बाबासाहेबांच्या प्रकाशित आवृत्तीच्या आधारावर हे अभिवादन, ॐ मणि पद्मे हुँ हेच आहे. या संभाषणाद्वारे बौद्ध मंत्र ॐ मणि पद्मे हुँ याबद्दल बोधिसत्व बाबासाहेब यांनी एका भावी कल्पनेवर प्रकाश पाडला की, ते केवळ या मंत्राचा जपच करायचे नाही तर त्यांना, याला "नमस्कार" या शब्दा ऐवजी बौद्ध समाजात एकमेकांना अभिवादन करण्यासाठी रूजवायचे होते, म्हणुनच त्यांनी मुल्कराज यांच्या नमस्काराच्या प्रतिक्रियेदाखल आपल्या प्रिय बौद्ध अभिवादनाने म्हणजेच ॐ मणि पद्मे हुँ ने उत्तर देऊन त्याचे स्पष्टीकरण देखील केले. हे अगदी खरे आहे की, नमस्कार या शब्दाचा अर्थ होतो नमन करणे, नतमस्तक होणे, ज्याअर्थी बाबासाहेब भारतात ज्या समाजाचे नेतृत्व करत होते आणि ज्या देश, देशाचे वेळेचे प्रतिनिधित्व करत होते, ते त्या समाजाला नतमस्तक नाही तर, घर येण्यासाठी, फुलण्याच्या इच्छेने बोलत होते. उठणे व फुलणे हे साधारण अर्थाने नाहीतर बुद्धत्वाच्या पदापर्यंत उठणे व फुलणे होते.*_

            _म्हणून *बहुजन समाजासाठी, एकमेकांना अभिवादनासाठी हा मंत्र त्यांनी निवडला होता. ॐ मणि पद्मे हूँ जसे शीख समाज एकमेकांना शुभेच्छा देतांना - "सत श्री अकाल" मुस्लिम समाज अभिवाद करताना, "सलाम वालेकुम, किंवा वालेकुम सलाम" सर्वात लोकप्रिय अभिवादन म्हणजे नमस्कार, अशीच बोधिसत्व यांची संकल्पना या संभाषणातून ज्ञात आहे की, बौद्धांच्या शुभेच्छा किंवा एकमेकांना अभिवादनाचे शब्द असतील, “ॐ मणि पदमे हूँ" या अभिवादन संकल्पित करण्यामागे त्यांची खूप खोल मानसिक विचारसरणी होती की, बौद्ध समाजाने न झुकता, नमन न करता उलट उठून फुलायला शिकावे.*_

              _या संदर्भात आणखी एक मनोरंजक वस्तुस्थिती नमूद करणे योग्य ठरेल की, *बोधिसत्व बाबासाहेबांवर जब्बार पटेल यांनी काढलेल्या चित्रपटातील एक दृश्य ज्यामध्ये बाबासाहेबांनी गांधीची हत्ये ची बातमी कळते, ही बातमी ऐकल्यावर बाबासाहेबांच्या हातून एक पुस्तक खाली पडते व त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात "ॐ मणि पद्मे हुँ". हे दृश्य या चित्रपटात दाखवण्यामागे चित्रपटाच्या पटकथा लेखकाच्या प्रखर संशोधनाची खात्री पटते. “ॐ मणि पद्मे हूँ" बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा मंत्र आहे त्याचा सरळ अर्थ आहे की, ज्ञानाचे रत्न कमळाच्या हृदयात आहे... लडाख, सिक्कीम, अरुणाचल आणि तिबेट या पारंपारिक समाजामध्ये हा मंत्र अजूनही प्रचलीत आहे. परमपूज्य दलाई लामा स्वतः या मंत्राचा जप करतात.*_

              _*आश्चर्याची गोष्ट आहे की, वरील उल्लेख केलेला मंत्रांच्या संदर्भाना आजचे प्रकाशक, भाषांतरकार, संपादकांनी बाबासाहेबांच्या पुस्तकातून काढून टाकले आहेत.*_

             _*काही वेळ विवेकवादी लोक ओम तसेच नाम जपाला बुद्ध धर्मामध्ये इतर संप्रदायातून आलेले घटक आणि पद्धत म्हणतात, जेव्हा की, ते मूळ पालि तिपिटकांमध्ये मंत्रजपाचे अनेक प्रसंग आहेत, ज्यात भगवान बुद्ध स्वतः मंत्राची दीक्षा देतात. त्यांनी चूलपथकाला दिलेला "रजो हरणं" हा मंत्र हे त्याचे एक उदाहरण आहे. भगवान बुद्ध आपल्या भिक्खूंना ध्यान-साधनेसाठी जो आधार देतात त्याला कम्मट्ठान म्हणतात. हे जाणून आहे की, ४० कम्मड्डानापैकी एक कम्मट्टान म्हणजे कर्मस्थान किंवा ध्यान सरावाचा आधार मंत्र सुद्धा आहे. हा एक व्यापक विषय आहे. ॐ बद्दल सुद्धा विवेकवादी लोकांमध्ये मोठे पूर्वग्रह आहेत.*_

              _*पालि भाषेपेक्षा अधिक प्राचीन भाषा आहे प्राकृत. ॐ चा प्राचीन संदर्भ प्राकृत भाषेत आढळतो. वास्तविक ॐ हे एकच अक्षर नाही परंतु अ, उ. म या अक्षरांचा एकत्रीत आवाज आहे. ध्यान योगी हे स्वतः मध्ये आवाज ऐकतात, जो जवळजवळ अ, उ, म एकत्रित आवाजासारखा असतो. त्या एकत्रित आवाजाला ॐ दर्शवलेले आहे. म्हटले आहे. त्याला आवाजाला अनुस्वाराचा समावेश आहे म्हणून या चिन्हांमध्ये चंद्राचा ठिपका देखील आहे अनेक संप्रदायात अ, उ, म आहेत तसेच अनुस्वराचे अध्यात्मिक, धार्मिक, दार्शनिक अर्थ लावण्यात आले आहेत. प्राकृत भाषेतील मजकूरचा संग्रह सादर केलेल्या श्लोकांमध्ये ॐ एकत्रीत अक्षरांचे मूळ स्वरुप पाहावयास मिळते.*_

            _*"ओं एकाक्षर पंचपरमजष्ठिनामादिपम् तत्कथमिति चेत । अरिहंता असरीरा आचरीया तह उवज्झाया मुणियां ।। "*_

         *_- एकाक्षर ॐ पाच परमेश्वराच्या पहिल्या अक्षराने तयार झाले ते परमेश्वर आहेत अरिहंत(अ) अशरीर(अ) आचार्य (अ) उपाध्याय (उ) मुनी(म) या प्रकारे अ+अ+अ+उ+म = ॐ*_*

                _*हे माहीत असणे आवश्यक आहे की, हे पाच परमेश्वर प्रत्यक्षात भगवान बुद्धांसाठी पर्याय होत. ते अर्हत आहेत. भौतिक शरीर नसल्याने ते आता शरीरहीन अशरीरी आहेत. धम्माचे शिक्षक या अर्थाने आचार्य आहेत, धम्माची दीक्षा व जगाला शिक्षित करण्याच्या अर्थाने उपाध्याय आहेत. तसेच ते या लोकात मुनी, महामुनी, शाक्यमुनी या नावाने परिचित आहेत. अशाप्रकारे ॐ बुद्धांचा किंवा बुद्धत्वाचा पर्याय आहे. जैन पंथीय लोक ॐ ला भगवान महावीरांच्या अर्थाने वापरतात, इतर पंथीय याच ॐ ला आपआपल्या मान्यते नुसार दार्शनिक, धार्मिक, अध्यात्मिक, तांत्रिक, स्पष्टीकरण देतात. एवढेच नाही तर सारनाथ येथील राष्ट्रीय संग्रहालयात प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला, एका उत्खननात सापडलेली, सहा अक्षरी लोकेश्वराची एक मूर्ती जतन केलेली दिसते, जीच्या खाली मंत्र कोरलेला आहे “ॐ देअथ " हेच शिलालेख कपिलवस्तू तसेच कुशीनगर स्तूपाच्या उत्खननात सापडलेल्या बौद्ध अवशेषांवर कोरलेले सापडले आहेत. ज्यांना कोणीही आज सुद्धा प्रत्यक्षात पाहू शकतात. सारनाथ च्या धम्मेक स्तूपावर स्वस्तिक चिन्ह, अतिशय कलात्मकतेने कोरलेली आहेत. सांप्रदायिक विचारांचे काही बौद्ध अभ्यासक देखील या संदर्भाना थेरवाद, महायान, वज्रयान, मंत्रयान इत्यादीत भेद करुन पाहतात. श्रीलंकेचे प्रसिद्ध थेरवादी भिक्खू के. चंदरतन यांनी पहिल्यांदा महापरित्राण पाठ हिंदी भाषेतून भाषांतरित केला होता, ज्यामध्ये सर्व सूत्र पालि तिपिटकातून संकलित केलेले आहेत. त्या ग्रंथाच्या शेवटी एक मंत्र देखील लिखीत आहे. न जालतीति आ, ई, ऊ, ओम इ. स्वाहा, म्हणजेच थेरवादी देशांमध्ये सुद्धा ॐ प्रचलीत आहे. सर्वात मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की, भारतातील सर्व भाषांमध्ये आणि जगातील जवळपास सर्व भाषांमध्ये अगदी अरबी, फारस मध्ये आमीन म्हणून तसेच ग्रीक-रोमन किंवा इंग्रजीत "ओमेन" सारख्या वेगवेगळ्या स्वरुपाच्या सापडतो. याचा मूळ स्त्रोत भगवान बुद्ध आणि त्यांच्या पूर्ववर्ती कदाचित पूर्वीच्या बुद्धांपर्यंत जातो. ॐ तसेच मंत्रजप बुद्ध धर्मात इतर पंथातून घेतला आहे, असे मानणाऱ्यांनी या दिशेने सुद्धा अभ्यास करण्याची गरज आहे की, इतर पंथांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या एकत्रीत अक्षराचा मूळ उगम, स्त्रोत हा बुद्ध धम्मात आहे. खरे तर, बऱ्याच काळापर्यंत वापरातून बाद झालेल्या गोष्टींना, परंपरांना लोक विसरतात, त्यांच्या मूळ उगमापासून दूर जातात. हीच गोष्ट बाबासाहेबांनी लोकशाहीच्या सार्वजनिक तक्रारी विषयी, श्रीलंकेच्या एका पत्रकाराला सांगितले होते की, भारतीय राज्यघटनेतील लोकशाही व्यवस्था भारताच्या प्राचीन बौद्ध संघातून घेतली, फ्रान्स किंवा युरोप मधील कोणत्याही देशातून नाही. भारताला संविधान समर्पित करताना बाबासाहेबांनी त्यांच्या ऐतिहासिक व्याख्यानात म्हटले होते की, आज या देशातील लोकांना लोकशाही नवीन वाटेल परंतु भारतातील बौद्ध संघ आणि जनपद हे प्राचीन काळापासून याचा वापर करतात.*_

           _*हीच गोष्ट ॐ आणि मंत्र जाप करण्याबाबत सुद्धा आहे, त्याचे मूळ बुद्ध धम्मात समावेशित आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे लोक मुळाचा शोध न घेता, आपल्या अल्पज्ञान व पूर्वग्रहामुळे बाबासाहेबांच्या ग्रंथांमध्ये, संपादनात, काटछाट करीत आहेत. आजच्या प्रकाशकांनी बाबासाहेबांच्या पुस्तकातून व लेखांमधून “ॐ मणि पद्मे हुँ” हा मंत्र काढला आहे. सर्वात मोठा धक्का त्या दिवशी बसला, जेंव्हा एका शिक्षित भिक्खूने आपल्या सार्वजनिक प्रबोधन, प्रवचना दरम्यान एक दिवस “ॐ मणि पद्मे हुँ” चा जप करणाऱ्या श्रद्धाळू उपासकाला हे खोटे असल्याचे सांगितले. अप्रत्यक्षपणे बोधिसत्व बाबासाहेबांना चुकीचे असल्याचे सांगितले, कारण त्यांच्या पुस्तकांमध्ये हा मंत्र जपा च्या स्वरुपात आहे. या विषयावर लिहिणे आवश्यक आहे, नाहीतर जे खोटे आहे ते खरे मानले जाणार. योगायोगाने हे नमूद करणे देखील आवश्यक वाटत आहे की, बोधिसत्व बाबासाहेब दररोज बुद्धांच्या मूर्ती समोर उभे राहून, हात जोडून नियमितपणे प्रार्थना करायचे आणि नंतर चटईवर बसून नियमितपणे ध्यान करायचे, पुस्तकामध्ये पृष्ठ बाबासाहेबांचे वैयक्तिक सचिव नानकचंद रत्तू यांनी त्यांच्या आठवणीत "डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुछ अनछुये प्रसंग" या पुस्तकात नमूद केले आहे.*_

          _*बौद्ध पूजा पाठ या त्यांच्या छोट्या पुस्तिकेच्या मराठी आवृत्तीच्या प्रस्तावनेत बोधिसत्व बाबासाहेबांनी शेवटी याचा उल्लेख केला आहे की, याचा पुढील भाग "बौद्ध संस्कार पाठ" नावाचे दुसरे पुस्तक प्रकाशित करतील. तो प्रकल्प बाबासाहेब त्यांच्या हयातीत पूर्ण करू शकले नाही, बाबा तुमचे ध्येय अपूर्ण आहे, आम्ही एकत्र मिळून पूर्ण करु ही घोषणा देणाऱ्यांना खरोखरच बाबांचे मिशन माहित आहे का?*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :-_*

*_१) बौद्ध पूजा पाठ_*

*_२) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी _*

*_३) मैत्री संपूर्ण धम्म आहे_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०५/०१/२०२३_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/01/blog-post_5.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


Wednesday, 4 January 2023

खन्ति

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_"खन्ति = क्षांति = धैर्यशील = क्षमाशील"_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _एका झेन विहारात अतिशय कडक नियम होता. नवीन भिक्खुंनी पहिल्या वर्षी अरिय मौन पाळायचे, म्हणजे एकदम मौन! दुसऱ्या वर्षांपासून, तो प्रत्येक वर्षी फक्त दोन शब्द बोलू शकत असे आणि तेही आचार्यांनी विचारल्यावर!_

         _एका नवीन भिक्खूचे पाहिले वर्ष झाल्यानंतर आचार्यांनी त्याला बोलावले आणि दोन शब्द बोलायला सांगितले._

_भिक्खू म्हणाला, "बिछाना त्रासदायक"_

_आचार्यांनी मान डोलावली._

        _दुसरे वर्ष झाल्यानंतर, आचार्यांनी त्याला बोलावले आणि पुन्हा दोन शब्द बोलायला सांगितले._

_भिक्खू म्हणाला, "जेवण बेचव"_

_आचार्यांनी मान डोलावली._

_तिसऱ्या वर्षी आचार्यांनी त्याला बोलायला सांगितले._

_भिक्खू म्हणाला, "मी सोडतोय"_

     _*आचार्य म्हणाले, "मला माहितेय तू असंच म्हणणार..नाहीतरी तीन वर्षांपासून नुसतीच तक्रार करतोयस"*_

     _आचार्य पुढे म्हणाले, "इतरांसारखेच तुला बिछाना आहे, जेवणही सर्वांना सारखेच आहे तरीही तू तक्रार करतोस? *तू ज्या ज्ञानप्राप्ती साठी आला आहेस, ते कसं मिळवता येईल ते पहा... बाकीच्या गोष्टी गौण आहेत. तुझं लक्ष ध्यानापेक्षा खाण्यापिण्यात जास्त आहे !*_

*_महामङल सुत्त मध्ये बुद्ध म्हणतात -_*

*_खन्ति च सोव च साकच्छा, समणानं च दस्सनं_"

_*कालेन धम्मसाकच्छा, एतं मंग्ङलमुत्तमं||_*

*_म्हणजे धैर्यशील असणे, क्षमाशील असणे, आचार्यांचे ऐकणे, भिक्खुंशी (किंवा ज्ञानियांशी) धम्मचर्चा करणे हे उत्तम लक्षण होय_*

        *_बौद्ध धम्मामध्ये संयम (सारासार विचार केल्याशिवाय पाऊल न उचलणे), धैर्य (संकटे आली तर घाबरून न जाता), सहवेदना (इतरांची बाजू व परिस्थिती समजून घेणे) आणि क्षमा (कोणी केलेली चूक लक्षात न ठेवता त्या व्यक्तीला क्षमा करणे) यांना अतिशय महत्त्व आहे._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :-_* 

*_१) झेन कथा _*

*_२) महामङल सुत्त_*

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०५/०१/२०२३_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/01/blog-post.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...