Friday, 4 November 2022

केल्याने होत आहे रे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_केल्याने होत आहे रे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

              *_धर्माच्या तीन पायऱ्या आहेत. [१] परियत्ति [२] पटिपत्ति, (३) पटिवेधन.._*

                *_परियत्ति म्हणजे पर्याप्ति. शास्त्रीय सैद्धांतिक बाजूची परिपूर्ण ओळख संपूर्ण माहिती. धर्मग्रंथांचे चांगले अध्ययन करणे. बहुश्रुत होणे, आणि त्या वाचलेल्या-ऐकलेल्या धर्माला बुद्धीच्या स्तरावर चिंतन-मननद्वारा योग्यप्रकारे समजून घेणे, म्हणजे परियत्ति._*

                  _परंतु जर कोणी व्यक्ती फक्त ऐकीव ज्ञानावर आणि चिंतन मननाच्या पायरीवरच थांबून राहिली. त्याच्या पुढे एक पाऊलही उचलले नाही तर ती व्यक्ती खरोखरच दुर्देवी म्हणावी लागेल. *परियत्ति ज्ञान म्हणजे दुसऱ्याचेच ज्ञान असते, आपले नव्हे.* अशी व्यक्ती फक्त गुराख्याचे काम करीत असते. दुसयाची गुरे राखायची आणि संध्याकाळ होताच त्यांच्या गोठ्यात नेऊन बांधायची. तो गुराखी प्रत्येक गाईचा एक एक गुणावगुण जाणतो. काळी आहे, पांढरी आहे, करडी आहे, गाभण आहे, व्यालेली आहे, किती शेर दूध देत आहे. सारं त्याला माहीत असते. परंतु गाय दुसऱ्याची आणि दूधही दुसऱ्याचे. एक थेंब दुधसुद्धा त्याच्या पोटात जात नाही. दूधाची चव घ्यायला मिळत नाही._

               _अशी व्यक्ती म्हणजे साऱ्या उद्यानांची राखण करणारा रखवालदारच असतो. एकून झाडे किती आहेत? कोणकोणत्या फळांची किती किती झाडे आहेत? कोणत्या झाडाला किती फळे लागतात ? सारे त्याला माहित असते. पण झाडे दुसऱ्याची फळे दुसऱ्याची. एकाही फळाची स्वतः कधीच चव घेऊ शकत नाही._

                _डोक्यावर बहुमूल्य वस्त्राभूषणांनी भरलेली पेटी घेऊन जाणारा हमालच, ती पेटी मालकाची, आतील मालही मालकाचाच. त्याला तो स्पर्शही करू शकत नाही. केवळ ओझे वाहणारा हमाल हीच अवस्था परियत्ति धर्माच्या सीमेत राहणाऱ्या माणसाची असते._

              _*'कालेन धम्मस्सवनं'* वेळोवेळी धर्मसाराचे श्रवण करणे कल्याणदायक असते. *'कालेन धम्मसाकच्छा' वेळोवेळी धर्मविषयक चर्चा करणे ही मंगलप्रद असते. परंतु वस्तुतः मंगलदायी तेव्हाच आहे जेव्हा तो श्रुतधर्म धारण करू लागेल. आणि हीच धर्मपदाची दुसरी पायरी होय. ज्याला 'पटिपत्ति' [प्रतिपत्ति] म्हणजे प्रतिपादन म्हटले गेले.* धर्माचे प्रतिपादन करावे. धर्म धारण करावा. एक एक पाऊल पुढे टाकावे._

                 _*जेव्हा एखादी व्यक्ती शीलसंपन्न असे सदाचाराचे जीवन जगू लागते आणि त्याप्रमाणे मनावर ताबा मिळविण्याचा अभ्यास करू लागते तेव्हा 'पटिपत्ति' धर्माचा प्रारंभ होऊ लागतो, जो की आशुफलदायी म्हणजे तत्काळ फळ देणारा होतो. अशी व्यक्ती स्वतःचे भले तर करतेच पण दुसऱ्यांचेही कल्याण साधते.* मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. जेव्हा जेव्हा तो शील्सदाचारांकडे पाठ फिरवितो तेव्हा तेव्हा तो दुसऱ्यांच्या सुखशांती भंग तर करतोच आणि स्वतःचेही नुकसान करून घेतो. शील सदाचाराचे जीवन जगणे, आत्मसंयम करणे म्हणजे कोणा एका विशेष संप्रदायाचा धर्म नाही. हा तर सर्वांचा धर्म आहे. सर्वांसाठी समान कल्याणकारी आहे. समंजस व्यक्ती धर्माच्या या सार्वजनिक सार्वमांगालिक स्वरूपाला चांगल्या रीतीने समजून घेऊन त्याचे प्रतिपादनास सुरुवात करते._

                 _परंतु असे करणारी व्यक्ती जीवनात पदोपदी अडचणी येत असल्याचे पाहाते. बाह्य अडचणींपेक्षा आंतरिक अडचणी अधिक. जुन्या स्वभावमुळे मन वारंवार विकारांनी विकृत होत असते. आणि सदाचाराचे जीवन जगण्यासाठी वारंवार मनाचे दमन करावे लागते. प्रत्येक दमनाच्यावेळी आतल्या आतगाठी निर्माण होऊ लागतात. तणाव वाढत जातो आणि त्याचा परिणाम, व्याकुळता निर्माण होते._

                  _*तेव्हा समजुतदार व्यक्ती धर्माच्या तिसऱ्या पायरीकडे पाऊल उचलते. त्याला पटिवेधन-प्रतिवेधन म्हणतात. तो आपल्या चित्ताविषयी स्वतः च संशोधन करू लागतो. चित्तावर उत्पन्न होणाऱ्या विकारांबाबतीत संशोधन करतो. चित्त आणि शरीराच्या पारस्परिक संबंधांना जाणण्यासाठी शरीराबाबत शोधकार्य सुरू होते. मनातील विकारांमुळे प्रभावित होणाऱ्या शारीरिक संवेदनांच्याबद्दल परीक्षण सुरू होते. या संशोधनाच्या प्रारंभिक प्रयत्नात घनीभूत म्हणजे स्थूल सत्याला सामोरे जातो. शरीरासंबंधी सघनता आणि शरीरावर होणाऱ्या संवेदनांची सघनता, चित्त आणि चित्तवृत्तींची सघनता. हेच प्रतिवेधन, पृथक्करण असते की स्थूल स्वरूपाचे विघटन करता करता सूक्ष्मातिसूक्ष्म सत्यापर्यंत पोहोचतो. शरीर आणि चित्तवृत्ती याबाबतीतील अंतीम सत्याचा साक्षात्कार घडवतो.*_

                 _प्रतिवेधनाच्या या प्रक्रियेतूनच सहज भावनेने मनातील विकार दूर होऊ लागतात. मनातील गुंते-गाठी सुटू लागतात. वेगवेगळ्या प्रकारांनी प्रतिवेधन करणाऱ्या या विपश्यना साधनेच्या सहाय्याने साधक एक एक सघन कर्मग्रंथीचा गुंता पिंजून काढून मोकळा करीत असतो. त्यातील तंतू नी तंतू वेगवेगळे करतो तेव्हा विकारविमुक्त होत असतो. दुःखविमुक्त होत असतो. शेवटी शरीर आणि मन यांच्या पलिकडील, इंद्रियातीत अशा परमसत्याचा साक्षात्कार करून घेतो. अशा प्रकारे शरीर आणि चित्त ह्यांच्या धर्माची यात्रा पूर्ण करून घेऊन मानवी जीवनांचे साफल्य प्राप्त करून घेतो._

                  _*परियत्ति प्रतिपत्तिसाठी आहे. प्रतिपत्ति प्रतिवेधन करण्यासाठीच आहे. आणि प्रतिवेधन विकारांपासून विमुक्तीसाठी आहे.* धर्माची ही सार्वजनिक वैज्ञानिक बाजू धारण केल्यानेच म्हणजे आचरल्यानेच फलदायी होत असते. मंगलदायी ठरते. याची *केवळ चर्चा करून किंवा श्रद्धापूर्वक श्रवण करून वा बुद्धीच्या पातळीवर चिंतन-मनन करून राहिले आणि धारण न केल्यास त्याचा काहीच लाभ होत नाही.* या संदर्भात कबीराचे हे सुवचन अतिशय बोलके आहे._

_*कथै, बदै, सुणै सब कोई ।*_

_सर्वजन सांगतात, बोलतात अन् ऐकतात सुद्धा._

*_कथै न होई, कीयै होई ॥_*

_पण या बोलण्यामुळे काही होत नाही, केवळ केल्यानेच खरे कल्याण होत असते._

                    _म्हणून साधकांनो! *केवळ बोलून व ऐकून स्वस्थ बसू नका. या करा! धर्म धारण करा! परियत्तिच्या क्षेत्रातून पुढे जाऊन प्रतिपत्तिच्या आणि प्रतिवेधनाच्या क्षेत्राकडे वाटचाल करून खऱ्या अर्थाने आपले कल्याण साधून घ्या!*_

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०४/११/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/11/blog-post_4.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...