🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_गारगोटया व तूप_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_एके दिवशी भगवान बुद्धांकडे एक तरुण माणूस रडत रडतच आला, बुद्धांनी त्याला विचारले, 'तरुण माणसा, काय झाले? का रडतोस?'_
'भगवान, माझे वृद्ध वडील काळ मरण पावले.'
'खरंच! मग मी काय करू शकतो? रडून तर काही आपण मरण पावलेल्या व्यक्तीला परत आणू शकत नाही?'
'होय भगवंत, रडून काही माझे येऊ शकणार नाहीत हे मी समजू शकतो. पण भगवान, मी आपल्याकडे एक विशेष विनंती करण्याकरिता आलो आहे. कृपया माझ्या मृत पित्यासाठी आपण काहीतरी करा.'
'अरे ! मी तुझ्या मृत पित्यासाठी काय करू शकतो?'
*_'भगवंत, नाही म्हणू नका. कृपया काही तरी करा. आपण एवढे सामर्थवान आहात, आपण नक्कीच हे करू शकाल. हे छोटे मोठे धर्मगुरू, पुरोहित, पंडे वगैरे मंडळी मृत माणसाच्या मुक्तीसाठी बरेच कर्मकांड करतात आणि सर्व कर्मकांडाची पूर्तता झाल्यावर मृत माणसासाठी स्वर्गाचे दार उघडले जाते. त्याला स्वर्गात प्रवेश करण्याचा परवाना दिला जातो. भगवान, आपण तर थोर, सामर्थ्यवान आहात. आपण जर माझ्या मृत पित्यासाठी काही कर्मकांड केले तर त्यांना नुसता प्रवेश परवानाच काय, पण स्वर्गात कायम वास्तव्य परवाना पण मिळू शकेल, आपण जरूर काहीतरी कराच.'_*
_तो बिचारा तरुण इतका भावविवश झाला होता की कोणतीही तात्त्विक चर्चा किंवा तर्कसंगत स्पष्टीकरण तो समजू शकला नसता. त्याला सत्य गोष्टी समजाव्यात यासाठी बुद्धांना दुसराच उपाय अवलंबणे जरुरीचे होते. म्हणून ते त्याला म्हणाले 'ठीक आहे. बाजारात जाऊन दोन मडकी घेऊन ये'._
_भगवान बुद्ध आपल्या मृत पित्यासाठी काही कर्मकांड करण्यास तयार झालेले पाहून त्या तरुणाला खूप समाधान वाटले. तो धावतच बाजारात गेला दोन मडकी घेऊन आला._
भगवान त्याला महणाले, फारच छान! आता असे कर, एक मडके तुपाने भर'.
तरुणाने एका मडक्यात तूप भरले.
'दुसरे मडके गारगोट्यांनी भर'.
तरुणाने तीही कामगिरी पूर्ण केली.
"आता त्यांची तोड़े उत्तम प्रकारे बंद कर.'
त्याने तसे केले.
"आता ती दोन्हीही मडकी समोरच्या तलावात नेऊन ठेव."
तरुणाने मडकी पाण्यात ठेवल्यावर दोन्हीही मडकी पाण्यात बुडाली.
*_"आता एक लांब काठी घेऊन ये व या मडक्यांवर मारून ती फोड" भगवान बुद्धांनी सांगितले._*
तरुणाला भगवान बुद्धांनी आपल्या मृत पित्यासाठी केलेले हे आश्चर्यजनक कर्मकांड बघून खूपच समाधान वाटले.
_आपल्या जुन्या परंपरेप्रमाणे माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा त्याचे मृत शरीर स्मशानात नेत असे. ते शरीर चितेवर ठेवून त्याला अग्नी दिला जात असे. *शरीर अर्धवट जळाल्यावर एका भक्कम काठीने त्याचे डोके फोडले जाई. इथे जेव्हा त्याची कवटी फोडली जाई. अशी मान्यता होती की, त्याचवेळी त्याच्यासाठी स्वर्गाचे दार उघडले जाई.* काल माझ्या वडिलांना अग्नी दिला व आज भगवान बुद्धांनी एक रूपक म्हणून ही मडकी फोडावयास सांगितले असणार असे त्या तरुणास वाटले. तो या कर्मकांडामुळे फारच संतुष्ट झाला होता._
_बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे त्या तरुणाने एक काठी घेऊन जोरदार फटका मारून, ती दोन्ही मडकी मोठ्या त्वेषाने फोडली. त्याचबरोबर एका मडक्यातले सर्व तूप वर येऊन पाण्यावर पसरून तरंगू लागले. तर दुसऱ्या मडक्यातील गारगोट्या मात्र तळाशीच राहिल्या._
_त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले, 'छान! तरुण गृहस्था, तुझ्यासाठी एवढे केले. आता तुझ्या त्या तांत्रिकाना, मांत्रिकांना आणि पुरोहितांना बोलाव व अशी प्रार्थना करावयास अगर मंत्र म्हणावयास सांग की, 'हे गारगोट्यांनी, वर या। आणि हे तुपा, तुपा तू मात्र खाली जा, खाली जा.' मला तरी बघू दे हे कसे घडते ते."_
_'भगवंत! आपण तर माझी थट्टा करायला सुरुवात केलीत. आपण म्हणता प्रार्थनेने तूप खाली जावे वा गारगोट्या वर याव्यात हे कसे शक्य आहे भगवान! गारगोट्या पाण्यापेक्षा जड आहेत, त्यामुळे त्या वर येणे शक्य नाही. त्या खालीच राहणार. त्या वर येऊच शकणार नाहीत. हा तर निसर्गाचा नियम आहे. त्याचप्रमाणे तूप हे पाण्यापेक्षा हलके असते व ते पाण्यावर तरंगणारच. ते पाण्यात तळाशी राहूच शकणार नाही.'_
*_'तरुण गृहस्था! तुला तर निसर्ग नियमांची बरीच माहिती दिसते. पण माणसाच्या निसर्ग नियमांना तू कसा समजू शकत नाहीस? जर सर्व आयुष्यात तुझ्या पित्याची कर्मे या गारगोट्यांसारखी जड असतील तर ती त्यांना अधोगतीलाच नेणार. त्यांना कोण वर काढू शकेल? आणि जर त्यांची कर्मे या तुपासारखी हलकी फुलकी असतील तर त्यांना सद्गतीच मिळणार. त्यांना कोण खाली ढकलू शकेल?'_*
_*जितक्या लवकर आपण निसर्गाचा हा नियम समजू व या नियमांनुसार आपले जीवन जगायला लागू तितक्या लवकर आपण आपल्या दुःखातून क्लेशातून बाहेर येऊ."*_
*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जगण्याची कला_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- १२/०८/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/08/blog-post_12.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment