Tuesday, 26 July 2022

बुद्धमूर्ती पुढे वंदन कसे करावे

 *बुद्धमूर्ती पुढे वंदन कसे करावे* 


In Buddhism, bowing is a physical expression of the Buddha's teaching. It is a dropping away of the ego and whatever we are clinging to. When bowing to an image of the Buddha or Stupa, one is not bowing to a god. The figure may represent the teachings or  enlightenment. It may represent the Buddha nature that is our original self. In that sense, when you bow to a Buddha figure you are bowing to yourself.


बौद्ध साहित्यात वर्णन आहे की सिद्धार्थ गौतम यांना जेव्हा बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा सर्व चराचर विश्व आनंदाने कंपित झाले. व त्यांच्या ज्ञानप्राप्तीस एकप्रकारे अधिकृत मान्यता दिली. त्या वेळी पृथ्वी थरारली. पृथ्वीवरील वृक्षांनी आणि गजराजांनी पूज्यभावाने त्यांच्या दिशेस त्यांना नमन केले. वातावरण उल्हसित झाले. आणि म्हणूनच बौद्ध परंपरेत अखिल विश्वशास्ते बुद्धांना पूर्णपणे खाली झुकून वंदन करण्याचा प्रघात पडला.


बुद्धमूर्तीला वंदन करणे म्हणजे बुद्धांप्रती आदर दाखवण्याचा, त्यांच्यापुढे नम्र होण्याचा, व त्यांच्याप्रती श्रद्धा जागविण्याचा एक विशेष विधी आहे. अनेक भिक्खूं सामूहिकपणे वंदन करताना गुडघे जमिनीवर टेकवून पायावर बसतात. मग पुढे झुकून हातावर भार घेऊन माथा भुईला टेकवितात. तेव्हा बुद्धरुपा पुढे ते नतमस्तक झालेले असतात. नाम-रूपाचे नमन बुद्धांप्रती करणे म्हणजेच त्यांच्या ज्ञानप्राप्तीला वंदन असते. त्यांच्या करुणेला वंदन असते. दुःखमुक्तीचा मार्ग दाखवून मानवजातीस उपकृत केल्याबद्दल वंदन असते. 


त्याचप्रमाणे श्रमण व उपासक गुडघे भुईवर टेकवून व माथा भुईवर टेकवून तीन वेळा प्रणाम करतात. मात्र स्रियांनी वंदन करण्याचा प्रकार पूर्वेकडील बौद्ध देशात वेगळा आहे. पुरुष उपासक यांचे प्रमाणे बैठक मारून स्रियांनी बसणे तेथे योग्य मानले जात नाही. तिथे स्रियांनी पालथे बसून हात जोडून वंदन करावे असा प्रघात आहे. 

पंचांग प्रणाम कसा करावा यासाठी खालील व्हिडीओ क्लिप बघावी.

https://www.youtube.com/watch?v=LugW-32isTY


--- संजय सावंत www.sanjaysat.in







Tuesday, 12 July 2022

आषाढ पौर्णिमा - वर्षावास प्रारंभ

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_आषाढ पौर्णिमा - वर्षावास प्रारंभ "_*

                              

                                                🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_जगामध्ये बुद्ध उत्पन्न होणे, सुखकारक आहे, असे धम्मपदात म्हटले आहे. बुद्ध उत्पन्न होण्यामुळे जगाचे कल्याण होते. बौद्ध धम्मात पौर्णिमेला फार महत्व आहे कारण भगवान बुद्धांच्या जीवनात ज्या ज्या मंगल घटना घडल्या त्या पौर्णिमेलाच घडल्या आहेत. बौद्ध परंपरेनुसार, आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसापासून पर्जन्यवृष्टी सुरू होते आणि अश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी संपते.  हा पाऊस चार महिने टिकतो.  म्हणून त्याला चातुर्मास देखील म्हणतात. या वेळी, बौद्ध भिक्षू बुद्ध विहारांपैकी एकामध्ये अभ्यास करतात, ध्यान करतात, ज्ञान घेतात, त्यानंतर वर्षाच्या उर्वरित महिन्यात चरिकाला भेट देतात किंवा चरिकाकडे जातात._

 

_*तथागतांच्या जीवनात पहिली पोर्णिमा आली ती म्हणजे आषाढ पौर्णिमा होय. या पौर्णिमेचे पहिले महत्व पुढीलप्रमाणे :-*_

१)     *_गर्भमंगल दिन_*

            _पौर्णिमेला शाक्य लोकात पौर्णिमेच्या सात दिवस आधी एक उत्सव साजरा करीत असत. इ.स. पूर्व ५६३ ला कपिलवस्तूचे राज्यपद राजा शुद्धोधन याच्याकडे होते. राजा शुद्धोधन हा खूप श्रीमंत राजा होता त्याच्याकडे अनेक राजवाडे-महाल, नोकर चाकर होते, हजारो एकर जमीन होती. त्यावेळच्या रीवाजाप्रमाणे राजा शुद्धोधन हा शेतीत जाऊन त्या दिवसांत मजुरांसोबत काम करीत असे. राजा शुद्धोधन व माता महामाया यांना बरेच वर्षे मुलबाळ नव्हते आणि हीच उणीव त्यांच्या जीवनात होती. परंतु ह्या पौर्णिमेच्या दिवशी राजा शुद्धोधन व माता महामाया यांच्या सहवास घडला आणि माता महामाया गरोदर असल्याचे समजले आणि म्हणून या पौर्णिमेला *गर्भमंगल दिन* असेही म्हणतात._

 

२)      _*महाभिनिष्क्रमण*_

              _कोकणात आज ही गावकी आणि भावकीचे नियम शहरात गेल्यावर सुद्धा पाळले जातात. त्यामुळेच कुटुंबातील वादविवाद वडिलोपार्जित शेतजमीन, संपत्ती आईवडीलांची देखभाल या भावकीत सोडविल्या जातात, मग त्यामुळे पोलीस तक्रारीन्यायालयातील संघर्ष टाळल्या जातो. काही ठिकाणी कुटुंबातील वादविवाद पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयाने निर्णय दिल्यावर ही सुटले नाहीत त्यात खून होण्यापर्यंत पोचले आहेत. म्हणूनच एकदा मनापासून वाचावे आमची भावकी चांगली आहे. असे म्हणणारे फार दुर्मिळ आहेत, तर दुसरीकडे आमच्या सारखी भावकी कोणाचीच नाही, असे म्हणणारे सुध्दा खूप आहेत. खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी एवढी विकृत का वागत असावीत? हे एक कोणालाच न सुटलेले कोडे आहे. अनेक पिढ्या, घरे आणि घराणी यात भूईसपाट झाल्याचा आपला इतिहास आहे. अहंकार मुक्त गावकी, भावकी, समाज असला पाहिजे त्यातुन कोणीच सुटले नाही._

 

                _तथागत गौतम बुद्ध म्हणजे शुद्धोधन राजाचा पुत्र सिद्धार्थ वीस वर्षाचा झाल्यावर संघाचा सभासद झाले. त्यानंतर आठ वर्षांनी शाक्य आणि कोलियांचे रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी वापरावे यावरून वादविवाद झाला, नंतर त्यांचे रूपांतर भांडणात झाले, त्यात मारामारी झाली. शेवटी दोन्ही राज्यातील लोकांनी युध्द करण्यासाठी ग्रामसभा घेऊन ठराव घेण्याचे ठरविले, युद्धात रक्तपात होणार त्यात आपलीच माणसं मारली जातील यासाठी सिद्धार्थ यांनी त्या युद्ध करण्याच्या ठरावाला विरोध केला. संघाचा निर्णय युद्ध करण्याचा झाला होता. संघाचा निर्णय सर्व सभासदांना बंधनकारक असतो, ज्यांना तो मान्य नसेल त्याला गृहत्याग - राज्यत्याग करावे लागते. राजपुत्र सिद्धार्थ यांनी युद्धात भाग न घेण्यासाठी गृहत्याग राजत्याग केला हा इतिहास आहे. अहंकार मुक्त गावकी, भावकी, समाज नसला तर काय घडू शकते त्यांचे हे जागतिक पातळीवरील उदाहरण आहे._

                _जगातील विविध समस्या व समस्त दुःखाच्या कारणाचे मुळ शोधण्यासाठी सिद्धार्थ यांनी गृहत्याग केला. राजवैभव, संपत्ती आणि रूपगुण संपन्न पत्नी यशोधरा एकुलता एक मुलगा राहुल त्याचप्रमाणे माता पिता यांचा त्याग करावा लागला. सर्व प्रियजनांचा आप्तेष्टांचा त्याग करावा लागला. *सिद्धार्थ गौतमांचा गृहत्याग म्हणजे पलायन नव्हे त्यांनी सगळ्यांसमोर भारद्वाज ऋषींच्या आश्रमात जाऊन प्रवज्जा घेतली व डोक्यावरील केस काढले , काषाय वस्त्र परिधान करून हातात भिक्षापात्र घेउन ते निघाले. त्या दिवशी देखील आषाढ पौर्णिमा होती ह्या दिवसाला *' महाभिनिष्क्रमण '* दिन असे म्हणतात.*_


३) *_धम्मचक्कपवत्तन, गुरू पौर्णिमा, कृतज्ञता दिन_*

_वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गोतमांनी अनुत्तर सम्यक संबोधी प्राप्त केली. हा बुद्धांचा जन्म होय. इ. स. पूर्व ५२८ ला त्यांना गया येथे पिंपळाच्या झाडाखाली दिव्य ज्ञान दृष्टी प्राप्त झाली म्हणजेच सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले. त्यांना जे ज्ञान अवगत झाले, ते इतरांपर्यंत पोचविण्यासाठी ते गयेतून वाराणसीकडे गेले. सारनाथ येथील ऋषीपत्तन येथे आषाढी पौर्णिमेला त्यांनी कौंडिण्य, वप्प, भद्दीय, अश्वजीत, महानाम या पाच परिव्राजकांना आपल्याला प्राप्त झालेल्या बोधीचे ज्ञान सांगीतले. त्या ज्ञानाला धम्म म्हटले जाते. *त्यांनी जो उपदेश केला, भ.बुद्धांच्या या देशनेला “धम्मचक्कपवत्तन सुत्त” म्हटले गेले आहे.* दु:ख नाहीसे होऊ शकते, याची घोषणा तथागतांनी या दिवशी केली. *आषाढ पौर्णिमेला, जगातील सर्वात महान आदर्श गुरूने सर्वात पहिल्यांदा मानव दुःखमुक्तीची, त्यांच्या कल्याणाची देशना दिली होती. म्हणूनच ही पौर्णिमा *"गुरू पौर्णिमा"* म्हणून प्रख्यात झाली.*_

 *"धम्मचक्कपवत्तन सुत्तं"ला पालि त्रिपिटक मध्ये कुठे नमूद केले आहे ते पाहुयात -*

त्रिपिटक : सुत्त, अभिधम्म, विनय

सुत्त पिटक मध्ये ५ निकाय आहेत : दीघ निकाय, मज्झिम निकाय, "संयुत्त निकाय", अङगुत्तर निकाय, खुद्दक निकाय

संयुत्त निकाय मध्ये ५ वग्गपाळि आहेत: सगाथवग्गपाळि  निदानवग्गपाळि, खन्धवग्गपाळि, सळायतनवग्गपाळि, "महावग्गपाळि"

महावग्गपाळि मध्ये १२ संयुत्तं आहेत : मग्गसंयुत्तं, बोज्झङगसंयुत्तं, सतिपट्ठान सं, इन्द्रिय सं, सम्मप्पधान सं, बल सं, इध्दिपाद सं, अनुरुध्द सं, झान सं, आनापान सं, सोतापत्ति सं, "सच्च सं"

सच्चसंयुत्तं मध्ये ११ वग्गो आहेत : समाधि वग्गो, "धम्मचक्कप्पवत्तन व", कोटिगाम व, सीसपावन व, पपात व, अभिसमय व, पठमआमकधञ्ञपेय्याल व, दुतियआमकधञ्ञपेय्याल व, ततियआमकधञ्ञपेय्याल व, चतुत्थआमकधञ्ञपेय्याल व, पञ्चगतिपेय्याल व,

धम्मचक्कपवत्तन वग्गो मध्ये १० सुत्त आहेत. त्यातील पहिले सुत्त आहे "धम्मचक्कपवत्तन सुत्त"

_याच धम्मचक्कपवत्तन सुत्ताची देशना भ. बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खुंना आषाढ पौर्णिमेच्या दिवशी दिली. म्हणून या दिवसाला "धम्मचक्कपवत्तन दिन" म्हणतात._

 

        _जगाला सर्वप्रथम हा आशावाद देणारे तथागत खर्‍या अर्थाने लोकगुरु बनले. म्हणूनच त्यांच्या गुणांचे वर्णन करताना त्यांना 'सत्था देवमनुस्सानं' असे म्हटले जाते. सत्था म्हणजे शिक्षक होय. देव आणि मनुष्यांचे शिक्षक म्हणजे तथागत बुद्ध होय. तृष्णेच्या कारणाने जगामध्ये दु:ख उत्पन्न होते. तृष्णेचा त्याग करण्याची पद्धती त्यांनी सांगीतले. प्रज्ञा शील समाधीची त्रिविध शिकवण प्रसारीत केली. त्यालाच अरिय अष्टांगिक मार्ग म्हटले जाते. ज्ञान देणारी पौर्णिमा असल्याने गुरुपौर्णिमा आणि त्या बोधीज्ञानाचे दान दिल्याबद्दल कृतज्ञता पौर्णिमा म्हणून आषाढी पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे._

 

३)     *_वर्षावास-*

                _वर्षावास ज्याला पाली भाषेत वसावास म्हणतात. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास थांबणे, वसणे असा अर्थ होय.  _वर्षावास ज्याला पाली भाषेत वसावास म्हणतात. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास थांबणे, वसणे असा अर्थ होय. २५०० वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्या घेतली होती त्यावेळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती, त्यावेळी ब्राम्हण तत्वक्खवे, धम्मं आदिकल्याणं मज्झेकल्याणं। परियोसान कल्याणं , सात्थ सब्यञजनं ,केवल परीपुण्णं परिसुद्धं, ब्रम्हचरियं पकासेथ ॥ "*

       _भिक्खूहो, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, मानवांना कल्याणकारी, धम्मपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्तज्ञानांखेरीज निरनिराळे बासष्ट पंथ अस्तित्वात होते त्यापैकी निदान सहा पंथ लक्षात घेण्यासारखे होतेबुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धाने इ.स.पूर्व ५२८ ला सारनाथ येथे प्रथम धम्मोपदेश दिला व त्यांचा पहिला वर्षावास तिथेच संपन्न झाला. त्यानंतर पुढील चार महिन्यात जवळपास साठ जणांचा भिक्षुसंघ तयार झाला होता त्या भिक्षुसंघास बुद्धाने आदेश दिला होता :-_     

*"चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, अत्थाय, हिताय सुखाय देवमनुस्सानं ।*

*देसेथ भिक्खू व्हा. प्रारंभी कल्याणपद , मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटीही कल्याणपद अशा या धम्ममार्गाचा लोकांना उपदेश करा.)*

 _लोकांच्या हितासाठी, सुखासाठी,त्यांच्यावर अनुकंपा करण्यासाठी, देवलोकांच्या ज्ञानाजर्नसाठी सतत एका ठिकाणी न राहता न थांबता प्रवास करीत राहा,प्रवास करताना दोघांनी किंवा समूहाने प्रवास करू नये,एकट्यानेच प्रवास करावा._

             बुद्धांच्या आदेशानंतर सर्व भिक्षूंनी काटेकोरपणे नियमांचे पालन करीत पुढील सात ते आठ महिने चारही दिशांना वर्षाच्या बाराही महिने पायी चारिका करीत गावोगावी धम्मोपदेश करीत होते. चारिका करीत असताना पावसाळ्यात अनेक भिक्षूंना लोक दोष देऊ लागले ह्या लोक समस्येचा त्रास होऊ लागल्यामुळे त्या समस्या त्यांनी तथागत बुध्दांना येऊन सांगितल्या....

             समस्या अश्या होत्या की, त्याकाळी जे विविध पंथ किंवा वेगळ्या मताचे पंथ होते ते वर्षावास काळात एकाच ठिकाणी स्थायिक होऊन धर्मप्रचार करित असे,परंतु बौद्धभिक्षू हा पावसाळ्यात देखिल गावोगावी चारिका करित असे,म्हणून लोक त्यांना दोष देऊ लागले "ह्या श्रमनांना काही कळतं कि नाही, हे नव्यानेच उत्पन्न झालेल्या तृणावर(गवतावर) चालून निसर्गाचे अतोनात नुकसान करित आहेत,त्याचप्रमाणे अनेक पावसाळी जीवजंतू ह्या भिक्षूंच्या पायाखाली येऊन नष्ट होत आहेत."!  ह्या दोषामुळे अनेक लोक भिक्षूंचा सन्मान करीत नव्हते व त्यांना महत्वही देत नव्हते...

             दुसरे कारण असे आहे की,अनेक भिक्षूंकडे एकच चिवर असायचे व चारिका करीत असतांना ते पूर्णपणे भिजून जात असे,अनेक भिक्षु आजारी पडत असत,त्यांना नानाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागे,अनेकांची उपासमार होत असत.

             तथागतांनी भिक्षूंकडून ह्या समस्या ऐकून घेऊन याचा उपाय म्हणून पावसाळ्यात (आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा) एका ठिकाणी तीन महिने वास्तव्य करण्याचा नियम भिक्षूसंघास घालून दिला.त्याला *वर्षावास* असे म्हणतात. तेव्हा पासून  आतापर्यंत बौद्धधम्मात वर्षावास नियमित केला जातो..

 

वर्षावास काळात भिक्षु संघाने स्थानिक विहारात अथवा स्तूपात राहून तेथील उपासक उपसिकाना धम्माचा उपदेश करावा. *विनयपिटकमधील वर्षावासाच्या दोन महत्वपूर्ण काळ नमूद केलेल्या आहेत. ‘वर्षोपनायिका स्कंध’ प्रकरणात ही वर्षावासाची माहिती दिली आहे.* पावसाळ्यात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे भिक्कुना कठीण जात असे. भिक्खूंच्या सांगण्यावरून बुद्धांनी वर्षावास करण्याची अनुमती दिली. एकदा बुद्धांना प्रश्न करण्यात आला की वर्षावास केव्हा केला पाहिजे? तेव्हा बुद्ध म्हणाले  "भिक्खूनो मी तुम्हाला वर्षा ऋतूत वर्षावास करण्याची अनुमती देत आहे"._

 

           _पावसाळ्याचे ३ महिने भिक्खुनी एकाच ठिकाणी राहिले पाहिजे. सर्वसाधारणपणे आषाढ पौर्णिमा ते पुढील तीन महिन्याच्या वर्षावासाला ‘पुरीमिकावस्सुनायिका’ असे म्हणतात. आषाढ पौर्णिमेनंतर ३ महिने वर्षावास करणे शक्य नसल्यास भाद्रपद पौर्णिमेनंतर पुढील ३ महिने वर्षावास आपणास करता येऊ शकतो. त्याला ‘पच्चिमिका’ असे म्हणतात. सुरुवातीला वर्षावासाच्या काळात भिकूला एक दिवस सुद्धा वर्षावास सोडून जाता येत नव्हते जर कोणता भिकू वर्षावासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यास त्याला 'दुकट' अपराधाला सामोरे जावे लागत. परंतु बुद्धांनी यामध्ये बदल करून वर्षावासाच्या काळात भिक्कु ७ दिवसांसाठी बाहेर जाऊ शकत होते._ 

 

*_भगवान बुद्धांनी आपला प्रथम वर्षावास सारनाथ येथे केला आहे. या दिवशी तथागत बुद्धांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुया, ज्यांनी ज्यांनी आपणांला शिकवले, शहाणे केले, नवे काही तरी सांगीतले अशा लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुया. त्यांचे अनुकरण करुन आपणही इतरांपर्यंत ज्ञान पोचवूया. आपल्या सर्वांना "धम्मचक्कपवत्तन" दिनाच्या, पौर्णिमेच्या व वर्षावासाच्या मनःपूर्वक सदिच्छा!!_* .

! जय भीम !

!! जय भारत !!

!!! नमो बुद्धाय !!!

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 

संदर्भ –

१)     महावग्ग, विनयपिटक

२)     बुद्ध आणि त्यांचा धम्म

३)     धम्मचक्कपवत्तन सुत्त


*_महेश कांबळे_*

*_१३/०७/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/07/blog-post_12.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

   

Saturday, 9 July 2022

गोव्यातील बौध्द संस्कृती

 *गोव्यातील बौध्द संस्कृती* 


गोव्यामध्ये बौध्दधम्माचा प्रवेश बुध्दकाळातच झाला होता. मौर्य काळात हा भाग प्राचीन अपरान्तच्या सुनापरान्त या भूभागात मोडत होता. या विभागात सोपाऱ्याच्या पुर्णा ( पालित पुण्ण )  भिक्खूव्दारेच बौध्द धम्माची मशाल पेटवली गेली. त्यामुळेच गोव्यात नेरूल जवळील एका *गावाचे नाव पूर्णा* आहे असे म्हटले जाते.


मौर्यानंतर त्यांचे क्षत्रप असलेले सातवाहन राजे यांनी स्वतंत्र राज्य केले. गोवा ही त्यांच्या साम्राज्यात मोडत होता. सातवाहनांनी त्यांचे नाविक बळ वाढविले तसेच रोमन साम्राज्याबरोबर समुद्रमार्गे होणारा आपला व्यापारही वाढवला. तेव्हापासूनच गोव्याशी ग्रीकांचा संपर्क येऊ लागला. सातवाहनांच्या पतनानंतर भोजांनी गोव्यावर आपले अधिपत्य स्थापित केले. त्यांच्याकाळात समुद्रमार्गे होणारा व्यापार मंदावला व काही ग्रीक व्यापारी दरम्यानच्या काळात गोव्यातच स्थायिक झाले व बुध्दधम्माचे अनुयायी बनले. 


*हिरगुत्ती*( उत्तर कानडा ) येथे सापडलेल्या इसवी सन ६ व्या शतकातील ताम्रपटांवरून गोव्याचा भोज असन्तिकवर्मन याने बौध्द विहारांना देणगी दिल्याच्या नोंदी आहेत. 


सेंट झेवियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. फादर हेरास यांनी *कोळवले येथील मुशीरा वड्डो* येथे उत्खनन केले असता त्यांना चौथ्या शतकातील बुध्दाची मुर्ती सापडली. ती आता सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथे ठेवली आहे. 

दुसरी फक्त शिर्ष असलेली ब्रान्झ धातूची मुर्ती *पणजी येथील म्हामई कामत* यांच्या घरात आढळली. ती आता गोवा राज्यातील संग्रहालयात सुरक्षित आहे. 

तिसरी मुर्ती *रिवोना* येथे सापडली. सदर मुर्ती ही शिर्षहिन अवस्थेतील भूमिस्पर्श मुद्रा आहे. 


*रिवोना* येथे एक बुध्द लेणी सुध्दा सापडली आहे. ज्यामध्ये बुध्द आणि बोधिसत्वांच्या मुर्ती पहावयास मिळतात. 


*बिचोलीम जवळील लामगांव* येथे दोन लेणी सापडल्या असून गावाचे नाव लामगांव हे सुध्दा तिबेटी बौध्द गुरू लामावरून पडले आहे असा अंदाज आहे. 

येथील काही लेण्यांचे नंतर हिंदू शैव मंदिरात रूपांतर झाल्याचे दिसते.


*खांदेपर लेणी* हि पोंडा तालुक्यात खांदेपर नदीच्या काठी आहे. हि अकराव्या ते बाराव्या शतकातील लेणी असून ती डोंगराच्या कातळात खोदली नसून एकाच शिलेत जमिनीच्या वर आहे. हिचे स्थापत्यशास्त्र पाहता काही विद्वानांच्या मते ही एक बौध्द लेणी आहे. 


*अर्वीलम* येथे सुध्दा लेणी सापडल्या असून तेथील लोक पांडवलेणी असे संबोधतात. इसवी सन ५ ते ७ व्या शतकात कोरलेल्या या लेण्या गोव्यातील प्राचीन| बौध्द संस्कृती ची साक्ष देतात.  


आपण सर्वजण केव्हा न केव्हा गोव्याला जातोच. गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्दी पावले आहे. परंतु पुढल्या वेळी जाताना ह्या बौध्दलेणींना भेट देण्याचे विसरू नका. ज्याने करून या बौध्द पर्यटन / उपासना स्थळांनाही चालना मिळेल व त्यांच्या सुरक्षा संवर्धन संदर्भात काही पावले उचलली जातील. 


संदर्भ ग्रंथ - 

2500 Years of Buddhism,पी. व्ही बापट. 

भारतातील बुध्दधम्माचा इतिहास, मा. श. मोरे. 

Internet. 


अरविंद भंडारे

- पालि रिसर्च इन्स्टिट्यूट








Tuesday, 5 July 2022

भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक

 *भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक*

Buddha and Mahavir


भगवान बुद्ध आणि महावीर दोघेही समकालीन होते. बुद्धांचा जन्म बिहार-नेपाळ सीमेजवळ असलेल्या लुंबिनी मध्ये झाला तर महावीर यांचा जन्म बिहार मधील वैशाली येथे झाला. महावीर यांचा जीवनकाल इ.स.पूर्व ५४० ते ४६८ असा मानला जातो. तर भगवान बुद्धांचा जीवनकाल इ.स.पूर्व ५६३-४८३ असा मानला गेला आहे. त्या काळात प्रामुख्याने श्रमण आणि वैदिक संस्कृती अस्तित्वात होती. भगवान बुद्ध व महावीर दोघेही राजपुत्र होते. बुद्धांनी २९ व्या वर्षी राज्य सोडले, तर महावीर यांनी ३० व्या  वर्षी राज्य सोडले. सिद्धार्थ गौतम यांना ज्ञानप्राप्ती झाल्यावर 'भगवान बुद्ध' म्हटले गेले. भगवान महावीर यांना 'निगन्ठ नाथपुत्त' म्हणत होते. शरीराला क्लेश देऊन शुद्धी, मोक्ष साधता येऊ शकते असे त्यांचे मत होते. तर बुद्धांनी मध्यम मार्ग अनुसरून अष्टांगिक मार्गाची शिकवण जगाला दिली. महावीर यांचे निर्वाण वयाच्या ७२ व्या वर्षी पावापुरी, बिहार येथे झाले तर भगवान बुद्ध यांचे महापरिनिर्वाण ८० व्या वर्षी कुशिनारा, उत्तर प्रदेश येथे झाले. 


त्यांच्या नंतर शिष्यांद्वारे त्यांची शिकवण भारतात सगळीकडे हळूहळू पसरू लागली. चारशे वर्षानंतर भगवान बुद्धांची प्रतिमा मूर्ती आणि शिल्पांद्वारे घडविणे चालू झाले. तसेच महावीर यांचीही मूर्ती घडविली जाऊ लागली. दोघेही श्रमण संस्कृतीतील असल्याने त्यांच्या मूर्ती या ध्यानमुद्रा अवस्थेतील घडविल्या गेल्या. बुद्धांची आणि महावीरांची मूर्ती या दोन्ही सारख्याच दिसत असल्या तरी त्यातील सूक्ष्म फरक हा सामान्यांना लवकर आकलन होत नाही. यामुळे भगवान बुद्धांच्या मूर्तीला महावीरांची मूर्ती समजले जाते. काहीतर मुद्दामहून बुद्धमूर्तीला बेलाशक महावीर यांची सांगून लोकांत भ्रम पसरवितात. असंख्य सामान्य वाचक या मुळे गोंधळून जातो. यास्तव दोघांच्या मूर्तीमध्ये व शिल्पाकृतीमध्ये काय फरक आहे ते खालील प्रमाणे स्पष्ट करण्यात येत आहे. 


१) भगवान बुद्ध यांची मूर्ती घडविताना अंगावर नेहमी चिवर परिधान केलेले दाखविले जाते. मात्र महावीर यांची ध्यानस्थ मूर्ती ही वस्त्रहीन दाखविण्यात येते. हा पहिला महत्वाचा फरक आहे.


२) भगवान बुद्धांची मूर्ती व शिल्प यावर चिवर वस्त्र परिधान केल्याची खूण म्हणून खांद्या पासून कमरेपर्यंत आडव्या धाग्यासारखी वस्त्र किनार दाखविलेली आढळते. महावीरांच्या मूर्तीवर ही वस्त्रांची कडा दिसून येत नाही. हा महत्वाचा सूक्ष्म फरक अनेकांच्या लक्षात येत नाही.


३) महावीर आणि भगवान बुद्ध या दोघांच्याही ध्यानस्थ मुद्रेमध्ये डाव्या हातावर उजवा हाथ ठेवलेला आढळतो. मात्र महावीरांच्या छातीवर श्रीवत्सं चिन्ह ( कमलपुष्प ) दर्शविलेले असते. तसे भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या शरीरभागावर बिलकुल आढळत नाही. हा दुसरा महत्वाचा फरक आहे.


४) भगवान बुद्धांच्या शिरावर केश उश्नी ( गोलाकार केशगाठ किंवा चुंबळ) दिसून येते. तशी महावीरांच्या शिरावर  दिसून येत नाही. काही मूर्तीवर जरी ती दिसून आली तरी ती बुद्धांसारखी मोठी ठळक नसते.


५) कमलपुष्प आणि त्रिरत्न ही बौद्ध संस्कृतीची महत्त्वाची चिन्हे आहेत. भगवान बुद्ध यांची मूर्ती ही नेहमी कमलपुष्पात व पद्मासनात असते. व तीच्या विविध मुद्रा दाखविल्या जातात. महावीरांची मूर्ती फक्त पद्मासनात ध्यानस्थ दाखविली जाते. हा एक तिसरा महत्वाचा फरक आहे.


६) उभी असलेल्या अवस्थेतील बुद्धमूर्तीच्या हातात भिक्षापात्र असते किंवा विविध मुद्रा दाखविली जाते. मात्र महावीरांची आणि अनेक तीर्थंकारांची मूर्ती ही वस्त्रहीन आणि दोन्ही हात बाजूला सरळ ठेवलेल्या अवस्थेत असतात. हा चौथा महत्वाचा फरक आहे. 


७) भगवान बुद्धांच्या कानाच्या पाळ्या खांद्यापर्यंत आलेल्या दाखविल्या जातात. बत्तीस लक्षणांपैकी ते एक लक्षण आहे.तसे महावीरांचे दाखविले जात नाही. 


८) महावीर आणि तीर्थकांरांच्या मूर्तीजवळ सिंह आणि शंख दाखविला जातो. भगवान बुद्धांच्या प्रतिमेजवळ सिंह आणि शंख नसतात. हा पाचवा महत्वाचा फरक आहे.


ह्या व्यतिरिक्त सुद्धा बुद्धमूर्ती आणि महावीर मूर्ती यामध्ये काही महत्वाचे फरक असल्यास वाचकांनी जरूर सांगावेत. म्हणजे काहीजण बुद्धमूर्तीला महावीर मूर्ती असल्याचा भ्रम पसरवितात त्याला आळा बसेल. 


--- संजय सावंत ( नवी मुंबई )


⚛⚛⚛









कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...