Thursday, 30 December 2021

विचार

 विचार


एकदा वेगवेगळ्या गावातील दोन मित्र, दुसऱ्या गावातील एका झेन आचार्यांकडे गेले. नवीन गावाचे निरीक्षण करीत ते विहारात पोहोचले. सुरुवातीचे संभाषण झाल्यानंतर एक जण म्हणाला,

"आचार्य, हे गाव छान दिसतंय. मला वाटतं येथे येऊन राहावं. कसं आहे हे गाव?

आचार्य म्हणाले, "तुझं आधीचे गाव कसे होते?

तो उत्तरला,"अतिशय वाईट लोकं होती. रागीट आणि भांडखोर होती."

आचार्य म्हणाले,"इथली लोकं तर त्यापेक्षा ही वाईट आहेत. फार भयानक. तू तेथेच रहा"


आचार्यांनी दुसऱ्याला विचारले,"तुझ्या गावची लोकं कशी आहेत?

दुसरा उत्तरला,"खूपच चांगली आहेत लोकं. सर्वजण एकमेकांशी प्रेमळ वागतात, मदत करतात आणि मंगल कामना करतात"

आचार्य म्हणाले,"इथली लोकं देखील अशीच आहेत. तुझे या गावात स्वागत आहे"


बुद्ध म्हणतात -


मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया ।

मनसा चे पदुट्ठेन भासति वा करोति वा ।


जसे तुम्हीं विचार करता तसे वातावरण तुम्हीं तयार करता व इतरांना देखील तसेच पाहता.....एस धम्मो सनन्तनो

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...