*_त्रिसरण म्हणण्यास कधी सुरवात झाली?_*
*_बुद्धं सरणं गच्छामि!_*
*_धम्मं सरणं गच्छामि!!_*
*_संघं सरणं गच्छामि !!!_*
_वरील त्रिसरणाला बौद्ध धम्मात अनन्य महत्व आहे याची प्रचिती आपण बौद्ध साहित्य आणि बौद्ध धम्मातील आर्ट अँड आर्किटेक्चरचा अभ्यास करताना येते._
_हे त्रिसरण म्हणण्यास कधी सुरवात झाली याबद्दल काहींच्या मनात शंका आहेत तर त्याचे उत्तर *बुद्ध यांच्या ह्ययातीतच त्रिसरण म्हणण्यास सुरवात झाली*._
_उरुवेला म्हणजे आताचे बोधगया या ठिकाणी ज्ञानप्राप्ती करून घेतल्यानंतर बुद्ध यांनी पंचवर्गीय भिखूना धम्माचे प्रथम मार्गदर्शन केले त्यामध्ये *कौंडीन्य प्रथम 'अर्हत' झाले.*_
*_पुढे यश यांच्यासह ६० भिख्खूना बुद्ध यांनी प्रवजा दिल्यानंतर सांगितले की, धम्माचा चारी दिशेला जाऊन प्रचार आणि प्रसार करा, परंतु जेव्हा हे भिख्खू चारी दिशेला गेले तेव्हा इतरांना धम्म मार्गदर्शन केल्यानंतर प्रत्येकाला बुद्ध यांच्या कडून घेऊन जाणे आणि त्यांना प्रवज्जा देणे अवघड होऊ लागत आहे हे समजून आल्यानंतर बुद्ध यांनी प्रत्येक भिख्खूला स्वतः प्रवज्जा देण्यास सांगितले आणि हे करत असताना_*
*_बुद्धं सरणं गच्छामि!_*
*_धम्मं सरणं गच्छामि!!_*
*_संघं सरणं गच्छामि !!!_*
म्हणण्यास सांगितले, बुद्ध म्हणतात *_“भिक्षू हो, यापुढें भिन्न भिन्न राष्ट्रांत तुह्मींच प्रव्रज्या द्या व तुह्मीच उपसंपदा (संघांत घेण्याचा विधि) करा, पुढील नियमास अनुरून प्रवज्या आणि उपसंपदा करा. त्यानें (उमेदवारानें) मुंडन करावें व काषाय वस्त्रांनीं अंग आच्छादावें. नंतर मांडी न घालतां त्याला खालीं बसवावें, व हात जोडून बुध्दं सरणं गच्छामि,धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि असें त्रिवार ह्मणायास लावावें. याप्रमाणें प्रव्रज्या आणि उपसंपदा करण्यास मी तुह्मांस परवानगी देतों.”_*
*_मैत्रेय दिपक यांच्या वॉल वरून_*
No comments:
Post a Comment