*_प्रश्न ४०-
पुनर्जन्माबाबत मराठी व इंग्लिश मध्ये बरीच
खात्रीलायक पुरावे देणारी माहिती वाचावयास मिळते पुनर्जन्म कसा मिळतो ?_*
*उत्तर* वृत्तपत्र चालविणे हा एक व्यवसाय आहे. व्यावसायिक मंडळी
सत्यापेक्षा व्यवसाय महत्वाचा मानतात. अज्ञानावर आधारलेल्या रूढी कालबाह्य असल्या तरी बहुसंख्य लोक अशा रूढी मानत असतील, तर वृत्तपत्रे
अशा रुढींच्या विरोधी लिखाण छापत नाहीत. उलट अशा टाकाऊ परंपरा जपणारी मंडळी
वृत्तपत्रसृष्टीत प्रभाव गाजवितात. किर्लोस्कर सारखी अपवादात्मक मासिके व काही
मोजकी वृत्तपत्रे, जी सत्याला
अग्रक्रम देतात ती संख्येने कमीच .
पुनर्जन्माबाबत लोकांमध्ये कुतूहल असते. पुनर्जन्माबाबतच्या हकिकती वाचण्यात लोकांना रस असतो. हमखास खपणारा माल म्हणून वृत्तपत्रे अश्या
बातम्यांना भरपूर प्रसिद्धी देतात. अशा वृत्तपत्रीय घटनांची काळजीपूर्वक तपासणी केली, तर बनावट हकीकतीचे कच्चे दुवे सापडतात. पुनर्जन्माचा दावा करणारी
व्यक्ती, तिचे या जन्मीचे व पूर्वजन्मीचे कुटुंब
यांच्यात अगोदरचा संबंध आहे हे लक्षात येते. ज़न्म, मरण, लग्न यांच्या नोंदी पुनर्जन्म झालेल्या
व्यक्तीने केलेली वर्णने यात विसंगती असल्याचे आढळून येते. तथाकथित खात्रीलायक
पुराव्यात तथ्य नसल्याचे आढळून येते.
राजस्थान विद्यापीठाने पुनर्जन्माच्या ७०० घटनांचा अभ्यास केला. या अभ्यासक्रमातून
काहीही निष्पन्न झाले नाही. म्हणून हा विभागाच बंद करण्यात आला . पुनर्जन्म शक्य
नाही कारण शरीराशिवाय जीव ही कल्पना असंभवनीय आहे.
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment