➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*६८
चापा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_वंगहार
जनपदामध्ये एका प्रमुख पारध्याच्या कुटुंबात चापेचा जन्म झाला होता. *भगवान बुद्ध
संबोधि प्राप्तीनंतर धम्मचक्र प्रवर्तन करण्यासाठी वाराणसीला जात होते. उपक नावाचा
आजीवक तपस्वी त्यांना रस्त्यात भेटला.* उपक तपस्व्याने भगवान बुद्धाचा शुद्ध वर्ण
व लावण्यमय शरीर पाहून त्यांना विचारले, *“मित्रा! तू कोणत्या कारणाने संसार त्याग
केला आहेस? तुझा गुरु कोण? व तुला कोणाचा धर्म आवडतो? भगवान बुद्धाने उत्तर दिले.,
“मी सर्वांवर विजय मिळविला आहे. सर्व जाणणारा, तृष्णेचा नाश करून मी विमुक्त झालो
आहे. मी स्वतःच दिव्यज्ञान प्राप्त केले आहे. माझा कोणीही गुरु नाही. माझ्यासारखा
दुसरा कोणी नाही. यावेळी मी धम्मचक्र प्रवर्तन करण्यासाठी वाराणसीला जात आहे.
विमुक्तीचा सिंहनाद करून मी झोपलेल्या व आंधळ्या प्रजेला जागे करीन.”* यावर उपक
तपस्वी म्हणाला, “तुझा उद्देश सफल होवो” अशा प्रकारची सदिच्छा वक्त करून उपक
तपस्वी दुसऱ्या वाटेने वंगहार प्रदेशाकडे निघून गेला. पारध्याच्या सरदाराच्या घरी
तो अतिथी म्हणून राहिला. त्या पारध्याचीच *चापा. मुलगी होती. पारध्याच्या सरदाराने
त्या तपस्व्याचा यथोचित आदरसत्कार केला. अशाप्रकारे उदक तपस्वी त्या पारध्याच्या
घरी राहत असतांना एके दिवशी तो पारधी सरदार आपले पुत्र व भाऊ ह्यांना बरोबर घेऊन
शिकारीसाठी अरण्यात गेला. जातेवेळी त्याने आपली मुलगी चापा हिला तपस्व्याची सेवा
करण्यास सांगितले. चापा अतिशय सुंदर असल्यामुळे तपस्वी तिच्यावर मोहित झाला.
जेवणाचा त्याग करून त्याने प्रतिज्ञा केली कि, जर मला चापा मिळाली तरच मी जिवंत
राहीन अन्यथा आत्मघात करीन. पारध्यांचा सरदार काही दिवसांनी परत आला. त्याने
मरणाच्या वाटेला लागलेल्या तपस्व्याला पहिले. त्याची सेवा करीत असता त्याला
विचारले “आपल्याला कोणता आजार झाला आहे? माझ्याकडून जे होईल ते मी अवश्य करीन”
तेव्हा उपकाने आपल्या मनातील हेतू पारध्याला सांगितला. सरदाराने त्याला विचारले,
“तुम्हाला काही शिल्प / कला धंदा येते काय?” यावर उपकाने “नाही” असे उत्तर दिले.
सरदार पुनः म्हणाला, “शिल्प न जाणणारा घर कसे सांभाळू शकेल?” यावर उपकाने उत्तर
दिले, “तुम्ही आणलेली शिकार खरेदी करून बाजारात विक्री करीन.” यानंतर सरदाराने
आपली मुलगी उपकाला देण्याचे मान्य केले व त्या दोघांचे लग्न लावून दिले. काही
दिवसांनी चापेला मुलगा झाला. त्याचे *”सुभद्र”* असे नाव ठेवण्यात आले. मुल रडायला
लागले कि चापा त्याला गप्प करतांना पतीचा उपहास करीत नेहमी म्हणत असे, “हे
उपकाच्या मुला, गप्प हो, हे तपस्व्याच्या मुला गप्प हो. हे मांसाचा व्यवहार
करनाऱ्याच्या मुला, गप्प हो.” उपकाला ऐकून फार वाईट वाटत असे. एके दिवशी कंटाळून
आपल्या बायकोला समजाविण्याच्या स्वरात म्हणाला, “चापे! तू असे समजू नकोस कि मी अगदी
न कमविणारा आहे व माझा या जगात कोणीच मित्र नाही. सर्वांवर विजय मिळविलेल्या
महापुरुषाबरोबर माझी मैत्री आहे. मी त्यांच्याकडे जाईन.” असे नवऱ्याने
समजावूनसुद्धा ती त्याची थट्टा करण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे वारंवार म्हणत
असे. एके दिवशी उपकाला राग आला व तो गृहत्याग करण्याकरिता निघाला. चापेने त्याला
अडविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु व्यर्थ. उपकाने खरोखरच गृहत्याग केला.
त्यावेळी भगवान बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन विहारात विहार करीत होते. तेथे हा गेला.
भगवंतांनी त्याला ओळखले व आतापर्यंत कोठे होता याविषयी चोकशी केली. तेव्हा उपकाने
घडलेली सर्व हकीकत भगवंतांना सांगितली व प्रव्रज्या देण्याविषयी त्यांना विनंती
केली. शास्त्याच्या आदेशानुसार तो प्रव्रजित झाला. ध्यानभावना करीत राहू लागला.
चापेला या घटनेमुळे अत्यंत दुःख झाले. तिने आपल्या मुलाला त्याच्या आजीकडे
सोपविले. श्रावस्तीमध्ये जाऊन ती भिक्खुणी संघात प्रव्रजित झाली. उपक आणि चापा
यांचा संवाद खालीलप्रमाणे झाला. तो चापेने गाथाबद्द केला व स्वतःचा पूर्वानुभव
म्हणून ती गाऊ लागली. :-_
*_उपक_*
*_”पुर्वी दंडधारी तपस्वी होतो. मी आज पारधी झालो
आहे. तृष्णेच्या घोर चिखलात फसल्यामुळे बाहेर निघण्याकरिता असमर्थ झालो आहे.
||२९१||_*
*_”आपल्या सौंदर्यावर मोहित झालो” असे समजून मला
चापा माझा उपहासपूर्वक उल्लेख करीत मोठ्या खुशीत मुलाला शांत करीत असे. चापेचे
बन्धन तोडून मी पुनः प्रव्रजित होईन.” ||२९२|_*
*_चापा_*
*_”हे महावीर! माझ्यावर रागावू नका. ह महामुनी!
माझ्यावर रागावू नका. क्रोधाच्या अधीन झालेल्यांना आत्मशुद्धी व तप प्राप्त होत
नाही.” ||२९३||_*
*_उपक_*
*_”मी ह्या ‘नाला’ नावाच्या गावातून निघून जाईन. आता कोण ह्या नाला गावात राहील? येथे धर्मजीवी श्रमण स्त्री-सौंदर्याने बांधले जातात. ||२९४||_*
*_चापा_*
*_”हे काळ्या परत ये. पूर्वीप्रमाणेच तू कामसुखाचा
उपभोग घे. मी तुझी दासी आहे व माझे नातलगसुद्धा तुझे दास्यत्व पतकरतात.||२९५||_*
*_उपक_*
*_”हे चापे! ज्याप्रमाणे तू म्हणतेस त्याप्रमाणे याचा चतुर्थांश भाग जरी तुझ्यावर अनुरक्त झालेल्या पुरुषाला मिळाला तरी ती एक मोठी गोष्टच होईल. ||२९६||_*
*_चापा_*
*_”हे काळ्या! गिरिशिखरावर फुललेल्या हृदयाच्या
वृक्षाप्रमाणे, फुललेल्या डाळींबाच्या फांदिप्रमाणे अथवा बेटावर उत्पन्न झालेल्या
पाटलीप्रमाणे मी सौंदर्य व तारुण्यसंपन्न आहे. ||२९७||_*
*_शरीलाला पिवळ्या चंदनाचा लेप लावणाऱ्या, काशीचे उत्तम वस्त्र परिधान करणाऱ्या मला सोडून तू का जात आहेस? ||२९८||_*
*_उपक_*
*_”पक्षिणीला पकडणाऱ्या शिकाऱ्याप्रमाणे तू मला बांधू इच्छितेस परंतु सौंदर्यसंपन्न रूपाने तू मला बाधा करू शकणार नाहीस.” ||२९९||_*
*_चापा_*
*_”हे काळ्या! तू उत्पन्न केलेले हे माझे पुत्रफळ
आहे. अशाप्रकारे पुत्रवती असणाऱ्या मला सोडून तू का जातोस?” ||३००||_*
*_उपक_*
*_”ज्ञानी लोक पुत्र, नातलग आणि धनाचा त्याग करतात व ते महावीर बंधन तोडून मुक्त होणाऱ्या हत्तीप्रमाणे प्रव्रज्या घेतात.” ||३०१||_*
*_चापा_*
*_जर मी आताच तुज्या ह्या पुत्राला काठीने अथवा
सुरीने मारून खाली जमिनीवर पाडले तर तू पुत्रशोकामुळे जाणार नाहीस?” ||३०२||_*
*_उपक_*
*_जर तू पुत्राला कोल्ह्याच्या अथवा शिकारी
कुत्र्याच्या पुढे टाकलेस तरी हे दुष्टे! तू मला पुत्राकरिता परत फिरवू शकणार
नाहीस.” ||३०३||_*
*-चापा_*
*_”हाय! हे काळ्या आता तू जा; तुझे कल्याण होवो,
परंतु तू कोणत्या गावाला, कोणत्या नगराला, आणि कोणत्या राजधानीला जाणार ते सांग.”
||३०४||_*
*_उपक_*
*_”मी पुर्वी श्रमन नसून सुद्धा स्वतःला श्रमन
मानीत असे व गणात राहत असे. एका गावाहून दुसर्या गावाला, नगरला आणि राजधानीला
विचरण करीत असे.” ||३०५||_*
*_ते भगवान बुद्ध नेरंजरा नदीच्या किनाऱ्यावर सर्व
प्राणी मात्रांना सर्व दुःखापासून मुक्त
करण्याकरिता धम्माचा उपदेश करतात. मी त्यांच्याच जवळ जाईन, तेच माझे शास्ते
होतील.” ||३०६||_*
*_चापा_*
*_”श्रेष्ठ लोकनाथ भगवान बुद्धांना माझे वंदन सांग
आणि प्रदक्षिणा करून माझी आदराची दक्षणा निवेदन कर.” ||३०७||_*
*_उपक_*
*_”हे चापे! हे जे तू बोलतेस, तो आमचा लाभ आहे.
श्रेष्ठ लोकनाथ भगवान बुद्धाला मी तुझे वंदन सांगेन आणि प्रदक्षिणा घालून त्यांना
तुझी आदराची दक्षणा निवेदन करीन.” ||३०८||_*
*_त्यानंतर काळ तेथून निघाला व नेरंजरा नदीच्या
किनाऱ्यावर आला. तेथे त्याने अमृतपदाचा उपदेश करणाऱ्या भगवान बुद्धांना पहिले.
||३०९||_*
*_दुःख, दुःखाची उत्पत्ती, दुःखावर मात आणि दुःख
नाशाचा आर्त अष्टांगिक मार्ग ह्यांचा भगवान बुद्ध उपदेश करीत होते. ||३१०||_*
*_त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना प्रदक्षिणा
करून चापेचा आदेश देऊन प्रव्रजित होऊन बेघर झाला. तीन विद्या प्राप्त केल्या आणि
बुद्धाच्या शासनाप्रमाणे आचरण केले. ||३११||_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*०३/०२/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment