!! धम्मध्वज जातक कथा !!
महेश कांबळे
5yrs Integrated Course
at Kalina University
Dt. 08/04/2023
१) परिचय : -
धम्मध्वज जातक कथा निवडण्यामागे सर्वांत महत्त्वाचे कारण हे आहे कि, कित्येक जातक कथा ह्या त्यावेळी जसे समाज मनाचे आरसे दाखविण्याचे काम करतात तशीच हि जातक कथा हि
समाज जीवनाचे अंतर्गत मन दाखविण्याचे कार्य करते. आजही समाज जरी प्रगल्भ झाला असला
तरी त्याच्या मनाविरुद्ध काहि घडले, तो जे काही कार्य करीत आहे
ते जरी चुकीचे असले तरी त्यास कोणी बोलू नये त्याच्या कार्यात कोणीही अडथळा आणू
नये असे त्यास वाटते. पण जर कोणी त्यामध्ये खोडा टाकला तर त्यास ते पचत नाही आणि
तो जो कोणी याच्या वाईट कामाच्या मध्ये आला तर तो द्वेषबुद्धीने पेटून उठतो आणि
ज्याने कोणी हे कृत्य केले तर त्याचा संपूर्ण नाश कसा होईल या चिंतेत तो कोणत्याही
मार्गाने इतर चांगल्या व्यक्तींच्या मनात त्या व्यक्तीविरुद्ध वाईट भरून त्या
व्यक्तीच्या विरुद्ध उभे करतो. कधी कधी मधे घेतलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर बंदूक
ठेवून तो त्याचे कार्य करीन राहतो असे करतांना स्वत: मात्र नामनिराळा राहून आपले
इच्छित द्वेषयुक्त कर्म करीत राहतो.
पण अशाही परिस्थितीत हि आपला विवेक जागृत ठेवून पंचशीलांचे अष्टशीलांचे
पालन करून कित्येक कठिन परिस्थितीमधून सम्यक मार्ग निघू शकतो... परिस्थिती कितीही बिकट
असो अशा परिस्थितीत कोणीतरी सखा,
मित्र आपल्या पाठिशी खंबीरपणे
उभा राहतो आणि अशा कठिण परिस्थितीतून बाहेर आपणांस काढण्यासाठी सहाय्य करतो... आणि
शेवटी विजय सन्मार्गाचा -शिलाचाराने वागणाऱ्याचा होतो. आज समाजात खेकडा वृत्ती वाढीस
लागली आहे. जर कोणी चांगले कार्य करीत असेल तर त्यास कसे खाली खेचले जाईल यासाठी
समाजातील एक वर्ग नेहमी कार्यरत असतो त्यासाठी ते कोणत्याही थराला जातात हे
समाजातील वास्तव्य आहे. ह्या सर्व बाबी धम्मध्वज जातक कथेतून तथागत आपणांस सांगतात.
ज्या प्रकारे बोधिसत्व आलेल्या परिस्थितींना तोंड देतात आणि आलेल्या संकटातून सही
सलामत बाहेर येतात हे सर्व प्रकार आजच्या युगात हि प्रेरणादायक असल्यामुळेच मी हा
विषय घेतला आहे.
२)
उद्देश :-
व्यक्ती कितीही सामंजस्य, इतरांना सहकार्य करणारा, मैत्रीपूर्वक असला तरी त्याचा हा स्बभाव इतराना आवडेलच आवडेलच असे
नाही. त्याचे विरोधक त्याच्या कामात खोडा घालण्याचे कार्य करीत राहतील पण
त्यातूनही आपण सहिसलामत निघून आपले कार्य करीत राहू शकतो हे हि जातक कथा दाखवून
देते.
३) पद्धत :-
हि जातक कथा हि पाली साहित्यातील सुत्तपिटकामधील खुद्द्क निकायामधील
१५ ग्रंथापैकी १० नंबरचे जातक हा ग्रंथ असून त्यामधील आहे. बौद्ध वाड्मयातील जग
प्रसिद्द जातक कथेतील निवडक जातकांचे मराठी रुपांतर लेखक नितीन धनराज धनवते, व
धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेले “जातक कथा संग्रह (भाग १,२,३) यामधील भाग १/७६ वी
हि जातक कथा आहे. धर्मानंद कोसंबी यांनी त्या कथेस 'अधिकाऱ्याचे चार गुण ( धम्मध्वज जातक कथा) असे नाव दिले आहे
४)
विश्लेषणात्मक :-
धम्मध्वज जातक कथा हि जातक कथा मा ४ भागात विभागली असून पहिल्या
भागात सदर कथा वारावासी येथील यशपाणी राजाच्या काळात घडलेली असून त्या नगरात राजाचा
पुरोहित म्हणून बोधीसत्व, सेनापती काळक ह्यांचे वर्णन आले आहे. काळक सेनापती हा
लाचखोर असल्यामुळे लाचेखातर तो एका गरीबावर अन्याय करतो जो अन्याय सहन न
झाल्यामुळे बोधीसत्व योग्य मार्गाने त्या गरीबास न्याय मिळवून देतो. बोधिसत्वाच्या
अशा कृत्यामुळे सेनापतीचे मन दुखावते आणि तो बोधीसत्वाचा कायमचा शत्रू बनतो. सेनापती
बोधीसत्वाचा नायनाट करण्यासाठी राजाचे कान भरतो आणि राजाहि अनाहूतपणे सेनापतीच्या
जाळ्यात अडकतो आणि तो बोधीसत्वाला सेनापतीच्या क्रूक कार्यात सहाय्य करतो
दुसऱ्या भागात सेनापतीने नाना कारवाया करूतो पण बोधीसत्व इंद्राच्या
सहाय्याने प्रत्येक गोष्टीचा तोडगा काढतो. बोधीसत्वाकडे सेनापतीच्या कुरापतींचे
उत्तर असल्यामुळे सेनापती चिडतो आणि अधिक कठोर क्रूर द्वेषपूर्ण विचार राजाच्या
मनान बिंबवतो त्यामुळे बोधीसत्व चिंतेत येतो.
तिसऱ्या भागात आपले कुसल कम्म कसे आपणांस सहाय्य करते आणि परिस्थिती
कितीही बिकट असो पण अशा प्रसंगी कुसल व शांत चित्ताने आपण त्यामधूनहि मार्ग काढू शकतो.
चवथ्या भागात शेवटी विजय सत्याचा होतो हे जे वारंवार आपणांस
सांगण्यात येते ते येथे खरंच दिसून येते. राजाला त्याची चूक उमगून तो सेनापतीस
शिक्षा देऊन बोधीसत्वाचा यथोचित सन्मान करतो
५)
निरीक्षण :-
ह्या कथेत तथागतांनी सांगितलेले वाणीचे प्रकार उदा. मुसावाचा, पिसून
वाचा व इतर शिलांची मांडणी केलेली दिसून येते. खोटे बोलू नये, चहाडी-चुगली करू नये
हे दर्शविते. आपले चित्त हे नेहमी कुसल असावे, त्यात द्वेषभावना असू नये, कारण अकुसल
चित्ताने केलेल्या कर्माचा विपाक हा नेहमी अकुसलच मिळतो. सेनापतीने द्वेषपूर्ण
चित्ताने कम्म केले म्हणून त्यास राजाकडून देहांत शिक्षा मिळाली तर बोधीसत्वाने
कुसल चित्ताने शीलांचे आचरण करत कुसल भावना ठेवल्यामुळेच त्याचा विपाक बोधीसत्वाला
चांगलाच मिळाला.
६) निष्कर्ष :-
जेव्हा कोणत्याही परिणामांची चिंता न करता आपण एखादयास सहाय्य करतो.
पण आपल्या या कृत्यामुळे एखाद्याचे कळत न कळतपणे मन दुखावले जाते आणि तो कुठल्याही
परिस्थितितीत त्या व्यक्तीच्या नाशासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतो. पण जर आपले
चित्त शील योग्य असले आणि त्याचे आचरण योग्य पद्धतीने करण्यामुळे, आपले चित्ताची नेहमी कुसल भावना ठेवल्यामुळे शिलांच्या सदाचरणामुळे
कुसल चित्तामुळे त्यामधून मिळणारा विपाक हा तसाच मिळतो, आजही आपण समाजात पाहतो एखादा जर चांगले कर्म / काम करीत असेल तर त्याचे
पाय खेचणारे अनेक असतात पण अशा स्थितीतही जर आपण 'बुद्धांनी सांगीतलेल्या मार्गावर चालत राहिलो तर सुरवातीला जरी त्रास
झाला तरी अंत्य हा चांगलाच होतो. चित्ताची एकाग्रतेमध्ये भंग होईल पण बुद्धांच्या
मार्गाचा परिपूर्ण अभ्यास करून आचरणात आणले तर चित्ताची एकाग्रता भक्कम होईल आणि
येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत आपण सुखरूपपणे बाहेर पडू शकतो आणि त्या कृत्याचा
यथोचित सन्मान समाज केल्याशिवाय राहणार नाही.
भगवान बुद्धांची शिकवण आजही हत्ती
सारख्या दिसणाऱ्या अडथळ्यांवर मात कसे करावे याची शिकवण देत होती देत आहे आणि देत
राहील पण त्यासाठी बुद्धांच्या शिकवणीचे पटीवेदन करणे खूप गरजेचे आहे.
धम्मध्वज कथेतील काही
संक्षिप्तपणे खालील मुद्दे आले आहेत ते आपण आत्ता पाहुया :
१)
कथेतील आकर्षक परिच्छेद.
१. "महाराज, पुरोहित तुमचा नाश करू पाहत
आहे. सगळ्या राष्ट्रांतील लोकांना वश करून घेण्याची त्याने खटपट चालविली
आहे."
२. 'एक गोष्ट केली म्हणून देवता सर्वच करीत असें नाही, भक्ताने "दुसरा वर मागितला तर रागावून त्या त्यांचाच नाश करतात.
भक्त देवतेकडे नवीन वर मागत गेला तर ती देवताच रागावून त्याचा नाश करून टाकील"
२) कथेतील पात्र परिचय.
धम्मध्वज जातक कथा हि वाराणसी नगरीत घडलेली असून तेथे 'यशपाणी नावाचा राज्य करीत होता. सेनापती 'काळक' त्यांचा पुरोहित 'बोधीसत्व' यांच्यामधील हि "कथा
असून, "राज्यातील एका गरीब माणसावर
'झालेला अन्याय आणि तो अन्याय दूर करण्यासाठी 'बोधीसत्व' मदत करतो. पुढे सेनापतीच्या
कानभरणीमुळे राजाने 'बोधीसत्वाकडे केलेली मागणी
आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी 'इंद्राने' केलेली मदत शेवटी कथेच्या शेवटी 'छत्रपाणी नावाचा हुजरा
यांच्या भोवती हि कथा गुंफण्यात घालेली आहे.
३) कथेचा दृष्टीकोन
धम्मध्वज जातक कथा माणसांच्या स्वभावाविषयी कथन करते. माणसांचे
वेगवेगळे स्वभाव उदा. स्वार्थीपणा, लालचीपणा, संशयीवृत्ती, सर्वांना समान न्याय असावा अशा
वृती बद्दल भाष्य करते.
४) कथेतील अर्थपूर्णसंवाद
१)
"बा पंडिता काल तू सभास्थानांत योग्य निवाडा दिला अशी बातमी सर्व
ठिकाणी पसरली आहे ती खरी आहे का?
२) " पुरोहित तुमचा नाश करू पाहत आहे सगळ्या राष्ट्रांतील लोकांना वश करून
घेण्याची त्याने खटपट चालविली आहे.
३) "
महाराज, हे काम अगदीच सोपें आहे. राजाला कोणत्याही गृहस्थाला 'दंड करावयाचा असेल तर हजार कारणे शोधून काढता येतात.
४) भक्त आपल्या देवतेकडे नवीन
वर मागत गेली तर देवताच रागावून भक्ताचा नाश करून टाकील.
५) माझ्या राजासाठी शक्राला प्रसन्न
करून घेऊन मी पुष्कळ गोडी केल्या परंतु त्याची तृप्ती न होता तो चतुर्गुण
संपन्न उद्यानपाल मागत आहे.
६) राजाच्या पदरी एक हुजर्या
आहे त्याला उद्यानपाल नेमा
७) दुसऱ्याचा मत्सर न करणे, मद्यपानापासून निवृत्ती, न्यायकठोरता आणि सर्वांवर
समबुद्धि ठेवणे, अधिकाऱ्याच्या अंगी या चार
गुणांची फार आवश्यकता आहे
५) कथेतील भावना दर्शविणारे संवाद.
१) गरीब माणूस रडून बोधिसत्वासोबत
संभाषण करतो.
२)
राजा आकार्यचकीत होऊन बोधीसत्वाला विचारणा करतो
३)
काळक सेनापती मत्सरतेने राजास सांगतो
४)
शंकेने राजा काळकासोबत चर्चा करतो
५)
कालक बोधीसत्वाविरुद्ध राजाच्या कानी कत्सितपणे व द्वेष भावनेने,
मत्सरभावनेने सांगतो
६)
इंद्र काळजीपुर्वक बोधीसत्वाला विचारतो
७)
बोधीसत्व इंद्राला चिंतेने ग्रस्त होऊन उत्तर देतो.
६) कथेत येणाऱ्या वेगवेगळ्या
जागा, महत्वपूर्ण बाब
प्राचीन काळी वाराणसी नगरीतील हि कथा घडली होती. राजाचा राजदरबार
न्यायालय हया ठिकाणी बोधीसत्वाचा वावर, राजासाठी बोधसत्वाने
इंद्राच्या मदतीने उद्यान, तलाव, हस्तीदंत ग्रह निर्माण केले.
राजाच्या राजदरबारात-न्यायालयात काळक सेनापतीच्या मनात बोधीसत्वाबद्दल
निर्माण झालेला द्वेष, बोधीसत्वाच्या घरी इंद्राने
प्रकट होऊन त्याला मदत करणे, शेवटी राजदरबारात छत्रपाणी हुजरा
येऊन अधिकाऱ्याच्या अंगी असलेले गुण सांगणे... अशा प्रकारे ही कथा वेगवेगळ्या
ठिकाणी घडत जाते.
७) कथा कशी गुंफण्यात आली
काळक सेनापती लालसेपोटी एका गरीबाला चुकीचा निर्णय देतो आणि तो गरीब
मनुष्य बोधीसत्वाला जाऊन ते तो सांगतो. बोधीसत्व सर्व एकूण त्या गरीबाला न्याय
मिळवून देतो आणि त्या प्रसंगामुळे काळक बोधीसत्वाचा द्वेष करायला लागतो.
बोधीसत्वाचा नाश व्हावा यासाठी राजाचे कान भरण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करून हि तो
त्यामध्ये यशस्वी होत नाही.
कळकाच्या कारस्थानातून इंद्र बोधीसत्वाला वाचविण्यासाठी सर्वोतोपरी
सहकार्य करतो आणि शेवरी राजाला त्याची चुक समजते आणि राजा कळकास दंड देऊन
बोधीसत्वाचा सन्मान करतो.
८) कथेतील ताण तणाव
बोधिसत्व पुरोहिताचे काम करून हि न्यायदानाच्या कामात एका गरीबाला
न्याय मिळावा म्हणून हस्तक्षेप करतो आणि सर्वांसमोर काळक नावाच्या सेनापतीला
सर्वांसमोर उपडे पाडतो. यामुळे बोधीसत्वाचा नाश करण्यासाठी सुडभावनेने-द्वेषभावनेने
सेनापती पेटून उठतो. नानाप्रकारे प्रयत्न कळकाचे सुरू असतांना राजाची राजाज्ञा
पूर्ण करण्यासाठी बोधीसत्वाची धडपड या कथेन दिसते.
९) कथेतील संकटे व त्यामधून काढलेला मार्ग
चतुर्गुणी उद्यानपाल चोवीस तासांच्या आत आणण्याची मागणी जेव्हा काळक यशपाणी
राजाद्वारे करतो तेंव्हा इंद्र बोधीसत्वाला एक कल्पना सांगतो आणि चोवीस तासांच्या
आत छत्रपाणी नावाच्या हुजऱ्याला चतुर्गुणी उद्यानपाल म्हणून राजा समोर हजर करतो तो
धत्रपाणी राजाला अधिकाऱ्याचे चार गुण सांगतो तेव्हा राजाचे डोळे उघडतात आणि तो काळकाला
दंड देतो आणि बोधीसत्वाच्या सल्ल्याने आपला राज्यकारभार चालवतो.
१०) कथेतून मिळणारा उपदेश / कथा
काय सांगते
चांगल्या - मैत्रीयुक्त भावनेने आपण एखाद्याचे भले करतो. पण आपल्या
या कृतीने कळत-नकळतपणे एखादा नाराज होतो आणि तो द्वेषयुक्त भावनेने आपल्या वाईटावर
उठतो. पण जर आपण मैत्री भावनेने युक्त, शील, सदाचाराच्या मार्गावर आरूढ असू तर त्या त्या कठीण परिस्थितीतीही
आपल्याला संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग आपल्याला प्राप्त होतात. आणि त्या
मार्गावरून चालल्यावर विजय हा नेहमी सत्याचा – मैत्रीचा होतो हे ह्या जातक कथेतून
शिकण्यास मिळते.