Monday, 30 June 2025

भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*॥  भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत  ॥*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_30.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
                                                     
जगात वेगवेगळ्या धर्म संस्थापकांनी वेगवेगळे धर्म सिद्धांत मांडले आहेत. आपण भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत पाहू या.
      भगवान बुद्धाने सांगितलेला कर्म सिद्धांत जगातील अन्य धर्मांच्या कर्म सिद्धांतापेक्षा भिन्न आहे. त्याचा उद्देश मानवाचे कल्याण करण्याचा आहे. भगवान बुद्धांच्या शिकवणीचा सर्व जोर कुशल कर्म करणे म्हणजेच क्रियाशील राहणे यावर आहे. धम्म मूर्तीत नाही. विहारात नाही किंवा धम्म ग्रंथात सुद्धा नाही, तर धम्म आचरणात आहे. कर्म करताना बरे-वाईट, खरे-खोटे, सत्य-असत्य, कुशल- अकुशल, हितकारी-अहितकारी इत्यादीचा सारासार विचार केला पाहिजे. भगवान बुद्धाचा धम्म स्वतःसाठी आहे आणि सर्व मानवजातीसाठी आहे. कारण वाईट कर्माने स्वतःला दुःख होते आणि दुस-यालाही दुःख होते. भगवान बुद्ध धम्म उपदेश देताना म्हणतात, "कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे." असे म्हणणे मानणे म्हणजे धम्म. ह्या जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे, ती खालील घटनांनी सिद्ध होते.
१) आकाशातील ग्रहगोलाच्या चलनवलनात - गतीत-  एक प्रकारची सुव्यवस्था आहे.
२) ऋतूचक्रमानामध्ये ही सुव्यवस्था आहे.
३) काही विशिष्ट व्यवस्थेनुसार बीजाचे वृक्ष होतात, वृक्षापासून फळ उत्पन्न होते आणि फळापासून पुन्हा बीज निर्माण होते. या व्यवस्थेला नियम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शविणा-या नियमाला ऋतूनियम, बीजनियम असे म्हणतात. समाजामध्ये याच प्रकारचा नैतिक क्रम आहे. तो कसा उत्पन्न होतो? कसा राखला जातो? जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही, त्यांचे उत्तर सरळ आहे. ईश्वर वादी म्हणतात, 'संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने हा संसार निर्माण केला आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धर्ता आहे. तो भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आहे. त्यांच्या मते नैतिक नियम माणसांच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे. आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो. या ईश्वरवादी समूहाच्या व्याख्येमुळे समाधान होत नाही. कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल, तर ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत ही तोच असेल आणि माणसाला ईश्वरी आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते?
१) भगवान बुद्ध म्हणतात - माझ्या धम्माचा हेतू मनुष्य सत्कर्मी व्हावा. ह्या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार आहे? ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर काय अधिकार आहे? हे संयुक्तिक प्रश्न आहेत, परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे म्हणतात त्यांच्या जवळ या प्रश्नांचे उत्तर नाही. सृष्टीचा नैतिक क्रम कसा राखला जातो? या प्रश्नाचे भगवान बुद्धाने दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे. भगवान बुद्ध म्हणतात, 'सृष्टीची नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती कर्म नियमाप्रमाणे सांभाळली जाते. निसर्ग नियमाने सांभाळली जाते तिथे ईश्वराचा संबंध नाही. ती नैतिक व्यवस्था माणसाच्या कर्मावर असते.
*कर्म :* कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल, तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल, तर मनुष्य कुशल कर्म करीत आहे असे समजावे. भगवान बुद्ध म्हणतात - दिवसामागून रात्र येते, त्याचप्रमाणे कर्मा मागून त्याचा परिणाम येतो. हा एक नियम आहे. कर्म आणि कर्माचा होणारा परिणाम - या दोहोमध्ये काही कालांतर असते. असे बहुधा घडते.
                                                      कर्माचे तीन भाग आहेत, ते खालीलप्रमाणे -
१) दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म - म्हणजे तात्काळ फळ देणारे कर्म,
२) उपज्ज वेदनीय कम्म - म्हणजे ज्याचा परिणाम फार काळाने होतो,
३) अपरा परिवेदनीय कम्म - म्हणजे अनिश्चित काळाने फळ देणारे कर्म.
                                                    काही कर्म असे घडते की त्याचा परिणाम काहीच होत नाही. त्याला अहोसी कर्म असे म्हणतात. इतर प्रबळ कर्मामुळे या चौथ्या कर्माचे परिणाम दिसून येत नाहीत किंवा इतर कर्मामुळे ते कर्म बाद होते. निसर्गातील बिज नियम व ऋतुनियम या अतूट व चिरस्थायी नियमाप्रमाणे भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत आहे म्हणजेच कम्मनियम हा अतूट व कायम स्वरुपात आहे. त्या नियमांना प्रतित्य समुत्पाद म्हणतात.
      म्हणजेच 'कार्य कारण भाव'. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. नशीब किंवा ईश्वर यांचा माणसाच्या कर्माशी काही संबंध नाही.
                                                               *॥ कम्म नियम-कर्माचा नियम ॥*
 १) कर्म हे चराचर सृष्टीच्या अस्तित्वाचे आणि विनाशाचे मूळ कारण आहे.
२) कोणतेही कारण किंवा हेतू असल्याशिवाय कर्म घडत नाही.
३) प्रत्येक कर्माला शेवटी फळ असतेच किंवा त्यांचा परिणाम किंवा परिपाक असतो.
४) जसे कर्म तसे फळ : या नियमात फरक होत नाही. ते नियमबद्ध असते म्हणून चांगल्या कर्माचे फळ चांगले व वाईट कर्माचे फळ वाईट मिळते. हे विसरु नये, हा धम्माचा नियम आहे.
५) जसे निरनिराळ्या बीजानुसार निरनिराळी वनस्पती व त्याची फुले, फळे निर्माण होतात तसे भिन्न-भिन्न कर्म बिजानुसार त्यांची बरी-वाईट फळे मिळतात. या कर्म बिजाच्या व त्यांच्या फळाशी किंवा परिणाम स्वरुप वनस्पतीशी आहे. तुमच्या कुठल्याही देव देवतांचा संबंध नसतो आणि म्हणूनच कम्म बिजानुसार माणसाचे अस्तित्व त्याची जीवन अवस्था व त्याचे स्वभाव भिन्न-भिन्न प्रकारचे दिसून येतात.
त्याच्या अवस्थेला पूर्व जन्मातील कर्माचे कारण लावणे चुकीचे आहे. भगवान बुद्धाने पूर्व जन्म नाकारला आहे. या जीवनातील कर्माला मानले आहे.
६) कर्म - संगतीची अवस्था व परिस्थिती यावर कर्म फळाच्या पूर्णत्वाचा कालावधी अवलंबून असतो. त्यानुसार काही कर्माचे फळ थोड्या उशीराने मिळते किंवा अंतर्गत कारणांमुळे काहीचे फळ मिळत नाही. परंतु इतके निश्चित की, ब-या-वाईट कर्मांची बरी-वाईट फळे मिळणारच. ते कोणीही थांबवू शकत नाही. यांनाच कम्म नियम तथा या कम्म प्रक्रियेला प्रतित्य समुत्पाद म्हणतात. उदा. तात्काळ फळ                                    १) आपण एखाद्याला 'अरे' म्हटले की तो मनुष्य 'कारे' म्हणणार, हे तात्काळ फळ.
२) वडिलांनी लावलेल्या आंब्याचे रोपटे व त्याला येणारी फळे ही उशिरा येतात किंवा वडील हयात असताना येत नाहीत. मग त्याच्या मुलांना मिळतात इ. कर्माचा हेतू व उद्दीष्टं आहेत. हेतू दोन प्रकारचे आहेत. या कर्माचा हेतू असा की, काया, वाचा, मने माणसाच्या हातून कुशल, परिशुद्ध कर्म व कर्मचरण घडून त्याला सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावे असा बुद्ध धम्माचा हेतू आहे. चांगले कर्म करा, वाईट कर्म करू नका, सत्यहित जाणून डोळसपणे कर्म करा. अंद्धश्रद्धेने गैर कर्म करू नका. म्हणून भगवान बुद्ध उपदेश करतांना खालील गाथा म्हणतात-
                                                         *सब्ब पापस्स अकरणं ।*
*कुसलस्स उपसंपदा ॥*
*सचित्त परियोदपनं ।*
*एतं बुद्धानु सासनं ॥*
      सर्व पापांपासून दूर राहा, पुण्य कर्माचा संचय करा, मनाला शुद्ध ठेवा, हेच धम्माचे शासन आहे.
                                                        मनुष्याच्या मनातील वैरभाव हे सर्व अकुशल कर्माचे उगमस्थान आहे. म्हणून वैरभाव सोडून बंधुभाव जोडा. मैत्री करा. असे भगवान बुद्ध म्हणतात.
*न हि वेरेन वेरानि, सम्मतीध कुदाचनं ।*
*अवेरेन च सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ॥*
अर्थ - 'वैराने वैर शमत नाही, तर अधिकच वाढत जाते. बदल्याची भावना निर्माण होते, ते अवैरानेच शमन पावते. म्हणून आपल्या मनामध्ये दुस-या विषयी संपूर्ण आदर व मैत्री भावना असणे गरजेचे आहे. वैर भावनेने आपले व दुस-याचेही नुकसान होते.
                                                       
भगवान बुद्ध आपला कर्मसिद्धांत सांगताना म्हणतात,
*'अत्ता हि अत्तनो नाथो को हि नाथो परो सिया ।*
*अत्तना 'व सुदन्तेन नाथं लभति दुल्लभं ॥*
१) माणसाचे वाईट कर्म स्वतःकडून घडते.
२) माणसाचा स्वतःमुळेच अधःपात होतो.
३) माणूस स्वतःच वाईट कर्मापासून दूर राहू शकतो.
४) माणसाला स्वतःमुळेच पावित्र्य, शुद्धी वा मुक्ती मिळते.
५) माणसाला पावित्र्य किंवा अपावित्र्यता स्वतःमुळेच मिळते.
६) दुसरा कोणीही माणसाला पवित्र करू शकणार नाही.
७) प्रज्ञा, शील, करुणा व समाधी प्राप्त करून घेण्यासाठी पराकाष्ठा करून आपले कर्म शुद्ध, सतर्क व संयमित करण्यासाठी प्रयत्न करणे, हाच भगवान बुद्धाचा खरा कर्मसिद्धांत आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत व त्याचे उद्दीष्ट व त्यातील मार्गदर्शक अशी काही तत्त्वे भगवान बुद्धांनी सांगितली आहेत. यावरून असे सिद्ध होते की, भगवान बुद्धांनी कर्मसिद्धांत किती तर्कशुद्ध सांगितला आहे. मानवाला अकुशल कर्मापासून परावृत्त करणारा व कुशल कर्म करण्यास सांगणारा आहे. त्यामुळे मनुष्य कल्याण मार्गावर आरुढ होतो हे सत्य आहे.
                                                   
  सत्यनारायण गोयंका (कर्माविषयी) काही दोह्यांत म्हणतात-
*मन के करम सुधार ले, मन ही प्रमुख प्रधान ।*
*कायिक, वाचिक कर्म तो, मन की है संतान ।*
*कर्म हमारा पुत्र है, कर्म हमारा बाप ।*
*कर्म हमारा रुप है, कर्म स्वयं हम आप ॥१॥*
*अपने अपने कर्म पर, अपनाही अधिकार ।*
*स्वयं बना ले कर्म पंथ, स्वयं मिटवन हार ।*
*अपने दुषित कर्म ही, लाते हैं दुख पैगाम ।*
*त्यो बेचारे देव को, करे व्यार्थ बदनाम ।*
*अपने मन की सरलता, अपना सुख सार ।*
*अपने मन की कुटिलता, अपने ही सिरभार ।*
                                                       
*भगवान बुद्ध भिक्षुंना कर्म सिद्धांत सांगताना म्हणतात-*
      भिक्षुंनो, कर्म हे मनुष्याचा आधार आहे, म्हणून प्रत्येकाने असे समजावे की, जसे आपण कर्म करू तसे फळ मिळणारच. म्हणजेच 'कराल तसे भराल' हे विसरू नये.
१) मी कर्मस्वकिय आहे- म्हणजेच माझे कर्मच मला स्वकिय.
२) मी कर्मदायाद आहे- म्हणजेच जसे कर्म तसे फळ मिळेलच.
३) मी कर्मयोगी आहे- म्हणजेच माझा कर्मामुळेच जन्म झाला.
४) मी कर्म बंधू आहे- म्हणजे संकटात माझे कर्मच माझे बांधव आहे.
५) मी कर्मप्रतिशरण आहे- म्हणजे कर्मच माझे रक्षण करील. अशा प्रकारे आपला कर्म सिद्धांत भगवान बुद्धाने भिक्षूंना सांगितला आहे.
                                                               
माणसाचं भलं किंवा वाईट जगातील कुठलीही शक्ती किंवा देव ईश्वर करीत नसतो. आपले बरे-वाईट आपणच करीत असतो व पूर्व जन्माच्या नावाने टाहो फोडून आपले समाधान करून घेतो. वर्तमान जीवनात पूर्व जन्माच्या कर्माचा काही संबंध नाही.
 संत कबीर म्हणतात-
                                                      
  *"नर करे करनी तो नर का नारायण बन जाए"*
*आपण जसे कर्म करतो तसेच त्याचे परिणाम असतात.*
*तुच तुझा साथी वेड्या, तुच तुझा साथी !*
*सोने किंवा माती होणे, आहे तुझ्या हाती ॥१॥*
                                                      
आपण आपल्या जीवनाचे सोने करायचे की माती करायची हे आपणच ठरवावे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत हा त्यांच्या वर्तमान जीवनापुरताच मर्यादित आहे. मरणानंतर काहीही सांगितले नाही. याच जीवनात चांगले कर्म करा आणि त्याची चांगली फळे चाखा.
                                                     
 *॥ याच देही याच डोळा पहा आपल्या मुक्तीचा सोहळा ॥*
      भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत हा हिंदू धर्माच्या किंवा ब्राह्मणी धर्माच्या सिद्धांतासारखाच आहे, असा आरोप करण्यात आला. परंतु हे सर्व मुद्दे तथागतांनी खोडून टाकले व बौद्ध धम्मात 'आत्मा' याला तिलांजली दिली. आणि ज्यांनी ज्यांनी आरोप केलेत त्यांना उदाहरणासह पटवून सांगितले.
      हिंदू धर्माचा कर्म सिद्धांत आत्म्यावर आधारलेला आहे. भगवान बुद्धाने आत्मा नाकारला आहे, हे लक्षात ठेवावे.
      गरीबी, श्रीमंती ही गत जन्मीचे दुष्कर्म किंवा पुण्यकर्म असे सांगणे हे दुष्टपणाचे आहे व लोकांना अज्ञानात ठेवणारे आहे. *असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काही अर्थ राहणार नाही.* गत जन्माच्या कर्मामुळेच ही अवस्था भोगत आहोत, असे म्हटले तर या जन्मी माणूस काहीच प्रयत्न करणार नाही. व अधिकाधिक दारिद्र्यात जाईल. म्हणून या जन्माचा परिणाम याच जन्मात भोगावा लागतो. मेल्यानंतर काहीच शिल्लक राहात नाही. असे भगवान बुद्धांनी सांगितले आहे.
      हिंदू धर्माचा कर्म सिद्धांत हा पूर्ण आत्म्यावर अवलंबून आहे. आपण जे करतो त्याचा आत्म्यावर ठसा उमटतो. आपण मेल्यावर आत्मा दुस-याच्या शरीरात जातो. तुम्ही या जन्मी श्रीमंत असाल तर मागच्या जन्मी तुमचे पुण्यकर्म असेल म्हणूनच श्रीमंताच्या घरात जन्म घेतलात असे समजणे ही अंधश्रद्धा आहे. लोकांना अज्ञानी ठेवण्याचे हे षडयंत्र आहे. ते भगवान बुद्धाने नाकारले आहे.
      प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचा समाजावर, देशावर परिणाम होत असतो. मंत्र्याचा भ्रष्टाचार, अधिका-यांचा भ्रष्टाचार असो, तो इतरांनाही भोगावा लागतो. उदा. गावात दुष्काळ पडून किंवा अतिवृष्टीमुळे अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. अशा वेळी व्यापा-यांनी धान्यसाठा लपवून ठेवला व भरमसाठ भाव वाढवून पैसे कमवू लागले. काही माणसे अन्नावाचून मरु लागली. मरतांना त्यांच्या वेदनेत व्यापा-यांनी घेतलेल्या पैशाचा खुळखुळाट दिसत असतो. त्या व्यापा-यांबद्दल समाजाला आपुलकी वाटेल काय? नाही. कारण त्याचेकडे मानवता, करुणा, मैत्री भावना नाही. माणुसकी नाही, दया भावना नाही, तो लोभी असतो.
      सर्वात वाईट कृत्य कोणी केले असेल की त्यामुळे संपूर्ण देशावर, राष्ट्रावर परिणाम झाला. तो म्हणजे दुस-या महायुद्धात अमेरिकेने नागासाकी व हिरोशिमा या देशांवर अणुबाॅम्ब टाकून राष्ट्र बेचिराख केले.
      तसेच एका मनु नावाच्या ब्राह्मणांनी चार वर्ण तयार करून माणसाला जातीयतेत, दारिद्र्यात ढकलून आमच्या हजारो पिढ्या बर्बाद केल्या.
      तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यकर्मामुळे त्यांना वैयक्तिक फळ मिळाले. म्हणजेच सायमन कमिशन, गोलमेज परिषद व जागतिक धम्म परिषदेकरिता सन्मापूर्वक बोलावले, कायदा मंत्री पद मिळाले व भारतीय घटनाकार म्हणून त्यांना बहुमान मिळाला. हे त्याच्या कर्माचे फळ आहे.
      या सत्कर्मामुळेच या देशातील कोटी-कोटी माणसं समतेच्या रथात बसली आहेत. ती माणसं विकसित झालीत व गुलाम समजणारी माणसं शक्तिशाली झालीत, असंघटित असणारे संघटित झालेत, अज्ञानी असणारे ज्ञानी झाले. गरीब असणारे श्रीमंत झाले. एवढी गरुड भरारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यकर्मांनी झाली. म्हणून माणसाने नेहमी चांगले करावे.
             

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
धन्यवाद! जयभिम!!
               
लेखक  : एम. डी. सरोदे
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Sunday, 29 June 2025

बोधिवृक्ष आणि इतर

बोधिवृक्ष आणि इतर

- राजेश चंद्रा -

बौद्ध लोक बुद्ध वंदना करताना एक गाथा म्हणतात:

ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता।

पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सब्बदा।।

 * जे बुद्ध भूतकाळात होऊन गेले, जे भविष्यात बुद्ध होतील आणि जे बुद्ध सध्या उपस्थित आहेत - अहं वन्दामि सब्बदा - त्या सर्व बुद्धांना आम्ही वंदन करतो.

आपल्या सध्याच्या कल्पामधील, म्हणजे भद्र कल्पामधील बुद्ध गौतम बुद्ध आहेत. ही बुद्धांची परंपरा आहे की ते आपल्या पूर्वीच्या बुद्धांचे स्मरण करतात, त्यांचे आख्यान करतात आणि भविष्यातील बुद्धांची घोषणा करतात.

त्रिपिटकातील खुद्दकनिकायमधील 'बुद्धवंश' नावाच्या ग्रंथात भगवान स्वतःच्या पूर्वीच्या बुद्धांचे सविस्तर आख्यान करतात. ते पूर्वीच्या बुद्धांचे नाव-धाम, कुळ-गोत्र, वंश, माता-पिता इत्यादींचे सविस्तर वर्णन करतात. त्यांना (गौतम बुद्धांना) पिंपळाच्या झाडाखाली बुद्धत्व प्राप्त झाले, तसेच पूर्वीच्या बुद्धांना वेगवेगळ्या कल्पांमध्ये वेगवेगळ्या वृक्षांखाली बुद्धत्व प्राप्त झाले, असेही वर्णन करतात. त्यामुळे पूर्वीच्या कल्पांमध्ये बोधिवृक्ष भिन्न-भिन्न होते.

केवळ एकच पिंपळाचे झाड नाही, तर वेगवेगळ्या कल्पांमध्ये वेगवेगळ्या बुद्धांचे आश्रयस्थान राहिलेली वीस झाडे बोधिवृक्ष आहेत:

 * कपित्थ (कवठ)

   भगवान दीपंकर बुद्धांना कपित्थ अर्थात कवठाच्या झाडाखाली बुद्धत्व प्राप्त झाले, म्हणून त्यांच्या कल्पामध्ये कवठाचे झाड बोधिवृक्ष होते.

 * शालकल्याणिवृक्ष किंवा साखू

   भगवान कौण्डिण्य बुद्धांना शालकल्याणि वृक्षाच्या आश्रयाने बुद्धत्व प्राप्त झाले, म्हणूनच ते भगवान यांच्या कल्पामध्ये शालकल्याणि वृक्ष बोधिवृक्ष होते.

 * नाग वृक्ष किंवा नागकेशर

   वेगवेगळ्या कल्पांमध्ये भगवान मंगल, भगवान सुमन, भगवान रेवत आणि भगवान शोभित बुद्धांना नागवृक्षाच्या छायेत बुद्धत्व प्राप्त झाले, या कारणास्तव या चारही बुद्धांच्या काळात नागवृक्ष बोधिवृक्ष होते.

 * अर्जुन वृक्ष

   भगवान अनोमदस्सी बुद्ध, प्रियदर्शी बुद्ध यांच्या काळात ककुध अर्थात अर्जुनाचे झाड बोधिवृक्ष होते.

 * महासोण वृक्ष

   भगवान पद्म आणि भगवान नारद बुद्ध यांच्या वेळी महासोणचे झाड बोधिवृक्ष होते.

 * सरल (पाईन) वृक्ष

   पद्मोत्तर बुद्धांच्या कल्पामध्ये सरल अर्थात पाईनचे झाड बोधिवृक्ष होते.

 * नीप (कदंब) वृक्ष

   भगवान पुष्य बुद्ध यांच्या युगात नीप अर्थात कदंबाचे झाड बोधिवृक्ष होते.

 * वेणु (बांबू) वृक्ष

   भगवान सुजात बुद्ध यांच्या काळात वेणु अर्थात बांबूचे झाड बोधिवृक्ष होते.

 * चंपक वृक्ष

   भगवान अत्थदस्सी बुद्ध यांच्या काळात चंपकाचे झाड बोधिवृक्ष होते.

 * कुरवक (भटकटैया) वृक्ष

   धम्मदस्सी बुद्धांच्या कल्पामध्ये कुरवट अर्थात भटकटैयाच्या झाडाला बोधिवृक्ष म्हणत असत, कारण भगवानांना या झाडाच्या छायेत बुद्धत्व प्राप्त झाले होते.

 * कणिकार वृक्ष

   सिद्धार्थ बुद्धांच्या युगात कणिकारचे झाड बोधिवृक्ष होते.

 * असन (पिवळसर शाल) वृक्ष

   भगवान तिष्य बुद्ध यांच्या युगात असन अर्थात पिवळसर शालाचे झाड बोधिवृक्ष होते.

 * आमलक वृक्ष

   भगवान पुष्य बुद्धांना आमलक वृक्षाच्या छायेत बुद्धत्व प्राप्त झाले, म्हणूनच ते भगवान यांच्या कल्पामध्ये आमलकाचे झाड बोधिवृक्ष होते.

 * पाटलि (पाढळ) वृक्ष

   भगवान विपस्सी बुद्धांना पाटलि अर्थात पाढळ झाडाच्या छायेत बुद्धत्व प्राप्त झाले. पाटलि वृक्ष आता गुलाबाच्या नावाने लोकप्रिय आहे. अशाप्रकारे भगवान विपस्सी बुद्ध यांच्या काळात गुलाबाचे झाड बोधिवृक्ष होते.

 * शिरीष (शिरस) वृक्ष

   भगवान ककुछन्द बुद्धांच्या कल्पामध्ये शिरीषचे झाड बोधिवृक्ष होते, ज्याला आता शिरसचे झाड म्हणतात.

 * उदुम्बर (उंबर) वृक्ष

   भगवान कोणागमन बुद्ध यांच्या वेळी उदुम्बर म्हणजे उंबराचे झाड बोधिवृक्ष होते.

 * पुंडरीक वृक्ष

   भगवान शिखी बुद्धांना पुंडरीकाच्या झाडाच्या छायेत बुद्धत्व प्राप्त झाले, म्हणूनच त्या युगात पुंडरीकाचे झाड बोधिवृक्ष होते.

 * शालवृक्ष

   भगवान वेस्सभु बुद्ध यांच्या काळात शालवृक्ष बोधिवृक्ष होते.

 * वट वृक्ष

   भगवान काश्यप बुद्धांना न्यग्रोध अर्थात वट वृक्षाच्या छायेत बुद्धत्व प्राप्त झाले, म्हणूनच ते भगवान यांच्या कल्पामध्ये वट वृक्ष बोधिवृक्ष होते.

 * अश्वत्थ (पिंपळ)

   आणि सध्याचा भद्र कल्प, ज्या कल्पामध्ये आपण श्वास घेत आहोत, त्यामध्ये भगवान गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाच्या छायेत बुद्धत्व प्राप्त झाले, म्हणूनच या युगात पिंपळाचे झाड बोधिवृक्ष आहे.

शेकडो वर्षांच्या अंतराने हा देश आपला इतिहास विसरला आहे, परंतु लोकपरंपरांमध्ये त्याची चिन्हे अजूनही अस्तित्वात आहेत.

भारताच्या पारंपरिक समाजांमध्ये लग्नाच्या वेळी एक विधी असतो, ज्याला 'छई-छुई' किंवा 'छई-दरेती' किंवा 'छै-दरेती' म्हणतात. जवळपास सारख्या नावांनी किंवा भिन्न नावांनी हा विधी संपूर्ण भारतात प्रचलित आहे. लग्न सुरू होण्याच्या सहा दिवसांपूर्वी हा विधी होतो. या विधीमध्ये सहा झाडांच्या लाकडांचे तुकडे आणि त्यांची पाने गोळा केली जातात, त्यांना विवाह मंडपातील मध्य स्तंभाला बांधले जाते, सजवले जाते. लाकडांना मध्य स्तंभाला बांधले जाते. मध्य स्तंभाला लोकभाषेत 'थंब' म्हणतात. त्याच दिवसापासून लग्न लागते, म्हणजे वर आणि वधू यांना आपापल्या घरी हळद आणि उटणे लावणे सुरू होते.

मुख्य गोष्ट ही आहे की ती लाकडे ज्या झाडांची असतात, ती सर्वच्या सर्व बोधिवृक्ष असतात.

आदर्श तर हा आहे की सर्व वीस बोधिवृक्षांचे लाकूड आणि पाने गोळा करावीत, परंतु सर्व ठिकाणी सर्व झाडे मिळणे शक्य नाही. त्यामुळे बौद्ध भक्तांनी एक व्यावहारिक मध्यम मार्ग काढला की किमान सहा झाडांचे लाकूड मिळाले तरी पूर्वीच्या बुद्धांचे स्मरण आणि त्यांची तात्विक उपस्थितीची भावना पूर्ण होते. प्राचीन काळात त्यावेळी अठ्ठावीस बुद्धांच्या वंदना अर्थात 'अट्ठवीस परित्त'च्या पाठाने मांगलिक कार्यांची सुरुवात होत असे. आता तर सर्व काही रुढींच्या स्वरूपात होत आहे. ज्या झाडाचे लाकूड आणि पान मिळेल, त्यानेच विधी पूर्ण करतात. आणि अठ्ठावीस बुद्धांच्या वंदनेची गोष्ट तर लोक विसरूनच गेले आहेत.

या देशाची ही निष्ठा आहे की तो पूर्वीच्या बुद्धांच्या स्मरणार्थ आपल्या जीवनातील मांगलिक कार्यक्रमांची सुरुवात करत राहिला आहे. जेव्हा लोक इतिहास आणि त्याचे कारण विसरतात, तेव्हा विधींना रुढी असे म्हटले जाऊ लागते. पण या देशातील रुढीवादी लोकही धन्य आहेत, जे इतिहासाला विधींमध्ये जिवंत ठेवले आहेत!

"प्राचीन भारतात क्रांती आणि प्रतिक्रांती" या अध्यायात बाबासाहेब म्हणतात:

"प्राचीन भारताच्या इतिहासाचा बराचसा भाग अजिबात इतिहास नाही. असे नाही की प्राचीन भारत इतिहासाशिवाय आहे. प्राचीन भारताला खूप इतिहास आहे. पण त्याने आपले स्वरूप गमावले आहे. महिला आणि मुलांचे मनोरंजन करण्यासाठी याला पौराणिक आख्यान बनवले आहे."

याच अध्यायात ते एक निष्कर्षात्मक ओळ लिहितात:

"बौद्ध साहित्यावरून बराचसा कचरा हटवून, त्याच्या खाली लपलेले घटक स्पष्टपणे पाहण्यास मदत होते."

ते पुन्हा पहिल्या अध्यायाच्या समारोप ओळी लिहितात:

"या ढिगाऱ्याच्या उत्खननामुळे आपण प्राचीन भारतीय इतिहासाला एका नव्या प्रकाशात पाहू शकतो."

रुढींना निंदण्यापूर्वी त्यात लपलेले कारण शोधण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. अनेकदा अतार्किक वाटणाऱ्या विधींमागे काहीतरी सार्थक कारणही असते.

बौद्ध भक्त अठ्ठावीस बुद्धांचे स्मरण आणि त्यांची वंदना करण्यासाठी 'अट्ठवीस परित्त'चा पाठ करतात:

अट्ठवीस परित्त

तण्हंकरो महावीरो, मेधंकरो महायसो।।

सरणंकरो लोकहितो, दीपंकरो जुतिन्दधरो।।1।।

कोण्डञ्ञो जनपामोक्खो, मंगलो पुरिसासभो।।

सुमनो सुमनो धीरो, रेवतो रति वद्धनो।।2।।

सोभितो गुणसम्पन्नो, अनोमदस्सी जनुत्तमो।।

पदुमो लोकपज्जोतो, नारदो वरसारथी।।3।।

पदुमुत्तरो सत्तसारो, सुमेधो अग्गपुग्गलो।।

सुजातो सब्ब लोकग्गो, पियदस्सी नरासभो।।4।।

अत्थदस्सी कारुणिको, धम्मदस्सी तमोनुदो।।

सिद्धत्थो असमो लोके, तिस्सो वरदसंवरो।।5।।

फुस्सो वरद सम्बुद्धो, विपस्सी च अनुपमो।।

सिखी सब्बहितो सत्था, वेस्सभू सुखदायको।।6।।

ककुसन्धो सत्थवाहो, कोणागमनो रणञ्जहो।।

कस्सपो सिरिसम्पन्नो, गोतमो सक्यपुंगवो।।7।।

तेसं सच्चेन सीलेन खन्ती मेत्त बलेन च ।।

तेपि त्वं अनुरक्खन्तु आरोग्येन सुखेन च ।।8।।

अट्ठवीस परित्त

(अनुवाद)

तृष्णेचा नाश करणारे महावीर, महायशस्वी मेधंकर, लोकांचे हित करणारे शरणंकर, तेजस्वी दीपंकर।।1।।

जनांमध्ये प्रमुख असलेले कौण्डिन्य, पुरुषांमध्ये श्रेष्ठ मंगल, सुंदर मनाचे धीरवान सुमन, आनंद वाढवणारे रेवत।।2।।

गुणसंपन्न शोभित, जनांमध्ये उत्तम अनोमदस्सी, लोकांमध्ये प्रकाशमान पद्म, श्रेष्ठ सारथी नारद।।3।।

प्राण्यांमध्ये सारस्वरूप पद्मोत्तर, श्रेष्ठतम पुद्गल अर्थात प्राण्यांमध्ये श्रेष्ठ सुमेध, लोकात सर्वश्रेष्ठ सुजात, नरांमध्ये श्रेष्ठ प्रियदर्शी।।4।।

करुणा करणारे अत्थदस्सी, अंधाराचा नाश करणारे धम्मदस्सी, लोकात अतुलनीय सिद्धार्थ, वर देणारे संयमी तिष्य।।5।।

वरदान देणारे संबुद्ध पुष्य, अनुपम विपस्सी, सर्वांचे हित करणारे शास्ता शिखी, सुख देणारे वेस्सभू।।6।।

संघाचे महानायक ककुसन्ध, रणांगणावर विजय मिळवणारे कोणागमन, श्रीसंपन्न कस्सप, शाक्यांमध्ये श्रेष्ठ गौतम।।7।।

त्या सर्व बुद्धांच्या सत्य, शील, शांती-सहनशीलता आणि मैत्रीच्या बळावर तुमची रक्षा होवो आणि तुम्हाला आरोग्य व सुख प्राप्त होवो.

सर्व मंगल होवो...


Saturday, 28 June 2025

सहायकसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सहायकसुत्तं_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_28.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_हे भगवान बुद्धांनी उपदेशलेलं एक लघु पण अर्थपूर्ण सुत्त आहे._

१. *सहवासाचे महत्त्व:*  

   - _हे सूत्र दोन भिक्षूंच्या सहवासाचे (सहायकता) महत्त्व सांगते. ते दीर्घकाळ एकत्र साधना करतात आणि एकमेकांना ध्यान, शील आणि प्रज्ञेसाठी प्रेरणा देतात._  

   - _बुद्ध सांगतात की सत्संग आणि उच्च आध्यात्मिक सहवास हे मोक्षमार्गाला गती देतात._  

- _ह्या सुत्तात 'सहायक' म्हणजे सवंगडी, सहचारी, एकमेकांना धर्मप्रवासात मदत करणारे भिक्खू._

             _येथे दोन भिक्खू महाकप्पिनाच्या सोबतीने विहार करत आहेत – म्हणजेच ते एकमेकांच्या साधनेस पूरक व सहाय्यक आहेत. हे ध्यानसाधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते._

२. *ध्यान आणि समाधीची परिपूर्णता:*  

   - _या भिक्षूंनी सर्व प्रकारच्या समाधी (ध्यानाच्या उच्च अवस्था) प्राप्त केल्या आहेत. हे दर्शवते की ते ध्यानात पूर्णत्वाला पोहोचले आहेत._

३. *ब्रह्मचर्याचा शेवट (निर्वाण):*  

   - _बुद्ध सांगतात, या भिक्षूंनी धम्माचा साक्षात्कार केला आहे आणि ते मार (तृष्णा, अविद्या) आणि त्याच्या सेनेवर विजय मिळवला आहे._  

   - _*"अन्तिम देह"* म्हणजे त्यांचे हे शेवटचे जन्म, कारण ते पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त झाले आहेत._

४. *गुरू-शिष्य परंपरा:*  

   - _भिक्षूंना महाकप्पिनाने (त्यांचे गुरू) योग्य मार्गदर्शन दिले, ज्यामुळे ते धम्माच्या शिकवणीत दृढ झाले._  

५. *धम्मातील सख्यभाव*

_बुद्ध हे इथे दाखवतात की – केवळ वैयक्तिक साधना पुरेशी नाही, तर जेव्हा साधक परस्परांना आधार, मार्गदर्शन आणि मदत करतात, तेव्हा त्यांचा आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग सुलभ आणि प्रभावी होतो._

६. *महाकप्पिनाचे महत्त्व*

_महाकप्पिन हे प्रबुद्ध, प्रभावी भिक्खू होते. त्यांच्या शिष्यत्वाखाली हे दोघं भिक्खू प्रशिक्षित झाले. त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी मार (मायावी मोह/आसक्ती/मृत्यू) वर मात केली आणि अंतिम देहात (शेवटचा जन्म) जीवन संपवणारे झाले – म्हणजेच अरहंत बनले._

७. *सामाजिक आणि अध्यात्मिक संदेश*

_हे सुत्त सामाजिक जीवनातील एक शाश्वत मूल्य अधोरेखित करतं – *मैत्री, सहकार्य, आणि एकत्रित साधना.* अध्यात्मात देखील, एकमेकांच्या प्रगतीस हातभार लावणं, योग्य मार्ग दाखवणं हे मुक्तीच्या मार्गावर एक मोलाचं कार्य आहे._

८. *बुद्धांचा श्लोक:*  

   - _शेवटच्या दोन ओळींमध्ये बुद्ध सांगतात की, सतत साधना, सद्धर्माचे अनुसरण आणि सहवास यामुळे हे भिक्षू निर्वाणाप्रत पोहोचले._  

..............

*शिकवण:*  

अ. *सत्संगाचे महत्त्व:* _उत्तम सहवास आणि गुरूचे मार्गदर्शन हे आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे._  

आ. *ध्यान आणि प्रज्ञा:* _केवळ बाह्य अनुष्ठाने न करता, ध्यान आणि प्रज्ञेने मनाचा विजय करावा._

इ. *अंतिम लक्ष्य:* _धम्माच्या मार्गाने जाऊन तृष्णा आणि अज्ञानावर विजय मिळवून निर्वाण प्राप्त करावे._

ई. *साधक एकमेकांचे साथी असावेत.*

उ. *धम्मात दृढता निर्माण करणं ही गुरुची भूमिका आहे.*

ऊ. *महाकप्पिन सारखे गुरू मार्ग दाखवतात, जे धर्मात पूर्णपणे स्थिर झाले, ते शेवटचा देह धारण करतात (अर्थ: पुनर्जन्म संपतो)*

_हे सूत्र *भिक्षूंच्या आदर्श जीवनाचे वर्णन करते आणि साधकांना सहवास, साधना आणि ध्यानाचे महत्त्व पटवून देते.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन : महेश कांबळे_*

*_दिनांक : २९/०६/२०२५_*

*_संदर्भ : सूत्त पिटक - संयुत्त सूत्त - निदानवग्ग पाळी - १० भिक्खू संयुत्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Friday, 27 June 2025

महाकप्पिनसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महाकप्पिनसुत्तं_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_27.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

         _भगवान सावत्थी (श्रावस्ती) येथे निवास करत होते. त्यावेळी *आयुष्मान महाकप्पिन* भगवंतांकडे जात होता. महाकप्पिन हे एक महान श्रावक (भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्य) होते. भगवान बुद्ध स्वतः त्यांच्या गुणांचे गौरव करत आहेत. *ते एक अत्यंत उच्च आध्यात्मिक (समापत्ती) गाठलेले भिक्षु होते, जी साधारण भिक्षूंना सहज मिळत नाही.*_

– _त्यांनी गृहत्याग करून, संन्यास घेतल्यावर, *निर्वाणप्राप्ती (धम्माचे अंतिम ध्येय)* प्राप्त केली आहे._

– _तीही *इहलोकी (याच जन्मात), स्वतःच्या अनुभवातून.*_

१. *महाकप्पिन भिक्षूचे गुण:*  

   - _भगवंतांनी महाकप्पिन भिक्षूच्या शारीरिक वर्णनावरून त्याच्या आध्यात्मिक उंचीची ओळख करून दिली._

   - _तो सर्व प्रकारच्या समाधी (ध्यानस्थिती) मध्ये निपुण होता आणि त्याने निर्वाण प्रत्यक्ष अनुभवले होते._

  

२. *संन्यास धर्माचे महत्त्व:*  

   - _घर सोडून संन्यास घेणाऱ्या व्यक्तीचे ध्येय म्हणजे *"अनुत्तर ब्रह्मचर्य"* (मोक्ष), जे महाकप्पिनने साध्य केले होते._

   - _भिक्षूंना सांगितले की, ज्ञानी संन्याशी देव आणि मानवांपेक्षा श्रेष्ठ असतो._

🔹 *वास्तविक श्रेष्ठ कोण?*:

_समाजात जातीनुसार श्रेष्ठत्व दिलं जातं – क्षत्रिय श्रेष्ठ, ब्राह्मण तपस्वी इत्यादी. पण बुद्ध सांगतात की,_

  • _जो *विज्ञान (ज्ञान)* आणि *सदाचार (चरित्र)* यांनी सज्ज आहे,_

  • _तोच खरोखर *सर्वश्रेष्ठ* आहे – केवळ समाजात नव्हे तर *देव-मानवांमध्येही.*_

🔹 *बुद्धांची तेजस्विता:*

_सूर्य, चंद्र, क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचे तेज विशिष्ट वेळी आणि कार्यात चमकते. पण *बुद्धांचे तेज* – ज्ञानाचे आणि करुणेचे – *दिवसरात्र अखंडपणे तळपत* असते. हे तेज म्हणजे *प्रज्ञा, करुणा, नि:स्वार्थपणा व मोक्षमार्गाचे प्रकाशदर्शन.*_

*शिकवण:*  

१. _बाह्य जातीपेक्षा *आंतरिक शुद्धता आणि ज्ञानाचे महत्त्व* अधिक आहे._

२. *ध्यान, संयम, त्याग आणि आत्मज्ञान* यानेच माणूस श्रेष्ठ होतो._

३. _आणि अशा महान व्यक्तिमत्त्वांची स्वतः बुद्धही प्रशंसा करतात – जसे महाकप्पिन._

४. _संन्यास धर्माचे अंतिम लक्ष्य *निर्वाण* आहे, जे महाकप्पिन सारख्या योग्यांनी प्राप्त केले._

५. _बुद्धांचे तेज (प्रज्ञा) हे सर्वात उज्ज्वल आहे, जे अज्ञानाचा अंधार दूर करते._

_ह्या सुत्रातून *आध्यात्मिक श्रेष्ठत्वाचे* महत्त्व स्पष्ट केले आहे._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन : महेश कांबळे_*

*_दिनांक : २८/०६/२०२५_*

*_संदर्भ : सूत्त पिटक - संयुत्त सूत्त - निदानवग्ग पाळी - १० भिक्खू संयुत्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 26 June 2025

थेरनामकसुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_थेरनामकसुत्त_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_26.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

‌_"थेरनामक सुत्त" (Theranāmaka Sutta) हे भिक्खुसंयुत्त (Bhikkhusaṁyutta) मधील एक सुत्त आहे, जे पालि संयुत्त निकाय (Saṁyutta Nikāya) मध्ये येते. हे बुद्धाच्या एका भिक्खूविषयी केलेल्या संवादाचे वर्णन करते, जो एकट्याने विहार करणारा आहे._

१. *बाह्य एकांत vs आंतरिक एकांत*: _थेर भिक्खू समजत होता की एकटे राहणे, एकटे भ्रमण करणे म्हणजे एकांतवास. पण *भगवान सांगतात की खरा एकांत म्हणजे मनाचा निर्मळ होणे – भूतकाळाच्या आसक्तीतून, भविष्यकाळाच्या चिंतेतून आणि वर्तमानाच्या तृष्णेतून मुक्त होणे.*_

२. *तृष्णेचा त्याग*: _खरा एकांतवासी तोच जो इच्छा-राग (तण्हा) पासून मुक्त आहे. बाहेरच्या शांततेपेक्षा आंतरिक शांती महत्त्वाची आहे._

३. *परिपूर्ण मुक्ती*: _गाथेत भगवान स्पष्ट करतात की जो सर्व ज्ञानी, सर्व बंधनांमधून मुक्त आणि तृष्णारहित आहे, तोच खरा एकांतवासी._

*साधकासाठी शिकवण*

- _केवळ शारीरिक एकांत पुरेसा नाही, मनाचे एकाग्र होणे आवश्यक आहे._

- _भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या विचारांनी मन व्याकुळ करू नये._

- _वर्तमान क्षणातील सजगता आणि तृष्णेचा नाश हेच खऱ्या एकांताचे लक्षण आहे._

_हे सूत्त *विपस्सना (सजगता) आणि तृष्णेचा नाश* यावर भर देऊन बौद्ध धम्माचा मूलभूत संदेश स्पष्ट करतो._

_या सुत्तात बुद्ध *एकांत जीवन* म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट करतात. *केवळ शरीराने किंवा कृतीने एकटा असणे (जसे की एकट्याने चालणे, राहणे, ध्यान करणे) म्हणजे खरा एकांत नाही.* खरा एकांत तोच जो..._

  • _भूतकाळाच्या आठवणींमध्ये गुंतलेला नाही._

  • _भविष्यकाळाच्या अपेक्षांमध्ये हरवलेला नाही._

  • _वर्तमानात असलेल्या गोष्टींवर (स्वतःच्या शरीर, भावना, संकल्प, समज) आसक्त नाही._

  • _सर्व कामना आणि तृष्णा (तण्हा) यांचा पूर्णतः अंत केला आहे._

_हा खरा *"एकविहार”* आहे – जो अंतःकरणातील एकांत आहे, फक्त बाह्य कृतींमधील नाही._

📌 *_मुख्य शिकवण:_*

१. _*बाह्य एकांत पुरेसा नाही* – _अंतर्मन स्वच्छ, तण्हारहित आणि वर्तमानाशी सजग असावे लागते._

२. *वास्तविक साधना म्हणजे मानसिक बंधनमुक्तता* – _भूतकाळ, भविष्यकाळ, आणि वर्तमानातील आसक्तींपासून मुक्त होणे._

३. *सच्चा एकविहारी कोण?* – _जो तृष्णा आणि आसक्तींपासून पूर्ण मुक्त आहे._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन : महेश कांबळे_*

*_दिनांक : २७/०६/२०२५_*

*_संदर्भ : सूत्त पिटक - संयुत्त सूत्त - निदानवग्ग पाळी - १० भिक्खू संयुत्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 25 June 2025

तिस्ससुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_तिस्ससुत्तं_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_54.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*“किं नु कुज्झसि मा कुज्झि, अक्कोधो तिस्स ते वरं।* *कोधमानमक्खविनयत्थञ्हि, तिस्स ब्रह्मचरियं वुस्सती”*

_"तू राग का धरतोस? राग धरू नकोस. राग न करणे हेच तुझ्यासाठी श्रेष्ठ आहे, तिस्स. कारण रागी व्यक्तीचा स्वभाव जिंकणे आणि राग न करणे – ह्याचसाठी ब्रह्मचर्य जीवन (संन्यास जीवन) योग्य ठरते, हेच त्याचा उद्देश आहे."_

_तिस्स हा भगवान बुद्धांचा पितुच्छा पुत्र होता. तो भिक्षुसंघात होता, पण इतर भिक्षूंनी त्याला तिरस्कारपूर्ण वाणीने छळले. यामुळे तो दुःखी झाला आणि भगवानांकडे गेला. तिस्स भिक्खूला इतर भिक्खूंकडून ज्या प्रकारे वागणूक मिळाली, त्यातून तो दुखावला गेला आणि भावनिकरीत्या कोसळला. त्याने भगवंतांकडे तक्रार केली._

*भगवानांचे शिकवण*

_बुद्ध सांगतात की, जर कोणी संन्यास घेतला आहे, तर त्याला केवळ बोलणंच नव्हे, तर दुसऱ्यांचं बोलणंही सहन करण्याची ताकद असली पाहिजे. भावनिक सहनशीलता, संयम आणि समत्व हे संन्यासी जीवनाचे आधारस्तंभ आहेत._

- *वचनसहिष्णुता:* _भगवान सांगतात की, संन्यस्त जीवनात इतरांचे कठोर शब्द सहन करणे हे आवश्यक आहे. जर आपण स्वतः बोलतो, पण दुसऱ्यांचे बोलणे ऐकू शकत नाही, तर ते अयोग्य आहे._

- *क्रोधाचा त्याग:* _भगवान दाखवतात की, क्रोध केल्याने मनुष्य आध्यात्मिक पातळीवरून खाली येतो. क्रोधामुळे ब्रह्मचर्य (शांत व नियंत्रित मन) नष्ट होते._

- _राग धरल्याने काहीही साध्य होत नाही. रागावर नियंत्रण मिळवणे म्हणजेच संन्यासीपणाचा खरा अर्थ आहे. "राग नाही" हीच श्रेष्ठता आहे. तिस्ससारख्या भिक्खूला हे शिकवले जाते._

मुख्य मुद्दे:

  • *_बौद्ध धम्मात "कोध" (राग) ही एक बाधक वृत्ती मानली गेली आहे._*

  • *_"वत्ता नो च वचनक्खमो" – म्हणजे "स्वतः बोलतो पण दुसऱ्याचं ऐकून सहन करू शकत नाही" – हे एक कमजोरपणाचं लक्षण आहे._*

  • _*संयम, सहनशीलता आणि समतेने वागणं हे बौद्ध संन्यास जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे.*_

*सामान्य जीवनातील उपयोग*

- *संघर्ष व्यवस्थापन:* _जेव्हा आपल्यावर टीका होते, तेव्हा ती सहन करण्याची सवय हीच खरी शक्ती आहे._

- *मनःशांती:* _क्रोध केल्याने समस्या सुटत नाही, उलट ती वाढते. म्हणून शांत राहणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे._

*४. सूत्ताचा अर्थ*

_भगवानांच्या शेवटच्या ओळीत सांगितले आहे:_

- *"का रागावतोस? रागावू नकोस. तिस्सा, राग न करणे हेच तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे."*

- *"रागामुळे ब्रह्मचर्य (आध्यात्मिक शिस्त) नष्ट होते."*

हे सूत्र आपल्याला शिकवते की, *सहनशीलता, क्रोधाचा त्याग आणि शांतता* यांमध्येच खरी आंतरिक शक्ती आहे.  

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन : महेश कांबळे_*

*_दिनांक : २६/०६/२०२५_*

*_संदर्भ : सूत्त पिटक - संयुत्त सूत्त - निदानवग्ग पाळी - १० भिक्खू संयुत्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Tuesday, 24 June 2025

नन्दसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_नन्दसुत्तं_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_24.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_हे संयुत्त निकाय या पाली सूत्तावर आधारित आहे. हे सूत्त श्रावस्ती येथे घडलेलं असून, भगवान बुद्धांनी आपल्या भावाला – आयुष्मान नंद याला दिलेली शिकवण यात आहे._

   - _भगवान बुद्ध नंदाला सांगतात की संन्यस्त जीवनात भौतिक ऐश्वर्य, शृंगार आणि विलासिता यांना स्थान नाही. संन्यासी म्हणजे साधे, निस्पृह आणि इंद्रियनिग्रही जीवन जगणारा._  

   - _नंदाने केलेला बाह्य आडंबर (किमती वस्त्रे, अंजन, चांदीचे पात्र) हा संन्यास धर्माशी विसंगत आहे._  

१. *_खऱ्या संन्यास्याचे लक्षण:*  

           _भगवान बुद्ध भिक्षुजीवनामध्ये साधेपणा, विरक्ती आणि वैराग्य अपेक्षित मानतात. जर कोणी भिक्षु होऊनसुद्धा संसारिक ऐश्वर्य, सौंदर्यप्रेम किंवा सुखभोगाची आसक्ती बाळगत असेल, तर त्याचं वर्तन परिपूर्ण नाही. नंदाने मौल्यवान वस्त्रे घालणं, अंजन लावणं, सजलेली थाळी वापरणं ही गोष्ट त्याच्या विरक्तीविरोधात जात होती._

*_आरञ्ञिको’, ‘पिण्डपातिको’, ‘पंसुकुलिको’, ‘कामेसु च अनपेक्खो_*

अ. *अरण्यवासी (आरञ्ञिको):* _मनाच्या शांततेसाठी निसर्गाच्या एकांतात राहणे._  

आ. *भिक्षान्नावर निर्वाह (पिण्डपातिक):* _लोभ आणि संग्रहीकरणाचा त्याग._

  इ. *फाटक्या कपडे (पंसुकूलिक):* _बाह्य दर्जाच्या ऐवजी आंतरिक शुद्धतेवर भर._  

  इ. *कामवासनांपासून दूर (कामेसु च अनपेक्खो):* _इंद्रियसुखांपासून मुक्तता._

२. *नंदाचे परिवर्तन:*  

   - _नंदाने भगवंतांच्या उपदेशानुसार आपला जीवनशैली बदलली आणि खऱ्या अर्थाने संन्यस्त झाला. हे दर्शवते की *बुद्धांचा मार्ग केवळ बाह्याचा नसून आंतरिक परिवर्तनावर भर देतो.*_

३. *गाथेतील आशय:*  

   - _गाथा भिक्षूंच्या अपेक्षा व्यक्त करते की नंद खरोखरच साधे, निर्लोभी आणि मनःशुद्धीच्या मार्गावर चालेल._

४. *शिकवण:*  

- _*साधेपणा आणि निस्पृहता* हे आध्यात्मिक प्रगतीचे मूलभूत तत्त्व आहे._  

- _बाह्य दाखवेपणा (show-off) आणि भौतिकता हे आत्मसाक्षात्कारात अडथळे आहेत._

- _खरा संन्यास म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण आणि मनाची शुद्धता._

- _कामवासना किंवा इंद्रियसुखांच्या ओढीपासून मुक्त होणं हे बौद्ध भिक्षुजीवनाचं मुख्य अंग आहे. जर कोणी संसारिक आकर्षणातून मुक्त होत नसेल, तर त्याचं संन्यास अधूरं राहिलं._

🌼 *_तात्पर्य:_*  

१. _ह्या सूत्तामुळे आपल्याला जीवनातील आवश्यक आणि अनावश्यक गोष्टींमधील फरक समजतो, आणि आध्यात्मिक प्रवासासाठी साधेपणा किती महत्त्वाचा आहे हे ध्यानात येते._

२. _हे सूत्त हे एक आदर्श भिक्षुजीवनाचं उदाहरण आहे. नंद सुरुवातीस संन्यास घेत असतानाही संसारिकतेत गुंतलेला होता. पण भगवान बुद्धाच्या थेट आणि प्रेमळ उपदेशानंतर, त्याने खरे संन्यासीव्रत स्वीकारले आणि अखेरीस तो वैराग्यसंपन्न, विरक्त साधू झाला._

३. _हे सूत्त आत्मपरीक्षण करायला शिकवते — आपण खरोखरच जे घोषित करतो, त्यानुसार वागत आहोत का?_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन : महेश कांबळे_*

*_दिनांक : २५/०६/२०२५_*

*_संदर्भ : सूत्त पिटक - संयुत्त सूत्त - निदानवग्ग पाळी - १० भिक्खू संयुत्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Monday, 23 June 2025

विसाखसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_विसाखसुत्तं_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_23.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_“नाभासमानं जानन्ति, मिस्सं बालेहि पण्डितं।_

_भासमानञ्च जानन्ति, देसेन्तं अमतं पदं॥_

*_“जे ज्ञानी आहेत पण बोलत नाहीत (गप्प आहेत), अशांना मुर्ख लोक ओळखू शकत नाहीत. पण जे बोलतात, आणि अमृतासारखा (निर्वाणाला नेणारा) धर्म सांगतात, त्यांना लोक ओळखतात.”_*

_भासये जोतये धम्मं, पग्गण्हे इसिनं धजं।_

_सुभासितधजा इसयो, धम्मो हि इसिनं धजो”ति॥_

*_“जो धर्म सांगतो, जो प्रकाश पेरतो, जो ऋषींच्या ध्वजाला उचलतो – असे ऋषी हे सुबोध, सुंदर वाणीच्या ध्वजाने ओळखले जातात. कारण धर्म हेच ऋषींचे चिन्ह (ध्वज) आहे.”_*

१. *विसाखाचे धर्मोपदेशन:*  

   - _विसाख हा एक ज्ञानी भिक्खू आहे जो इतर भिक्खूंना स्पष्ट, प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण भाष्य करून धर्म शिकवतो. तो केवळ ज्ञान सांगत नाही, तर त्यामध्ये समजावून सांगणे (सन्दस्सेति), प्रेरणा देणे (समुत्तेजेति), आनंद देणे (सम्पहंसेति) या गोष्टी सामील आहेत. त्याच्या शब्दांमध्ये खोली आणि प्रभाव आहे._  

   

२. *_वाणीचे महत्त्व:_*

_भगवंत स्पष्ट करतात की ज्ञान असले तरी जर ते योग्य वाणीने सांगितले नाही, तर सामान्य लोक ओळखू शकत नाहीत. त्यामुळे *"सत्पुरुषाच्या वाणीला सुंदरता असावी"* असे संकेत देतात._

- _भगवान बुद्ध त्याच्या कौशल्याची प्रशंसा करतात, ज्यामुळे हे स्पष्ट होते की धर्मशिकवण देण्यात स्पष्टता आणि ओजस्विता महत्त्वाची आहे._  

३. *ज्ञानी आणि मूर्ख यांचा फरक:*  

   - _बुद्धांनी सूत्तामध्ये सांगितले आहे की मूर्ख लोक ज्ञानी पुरुषाला ओळखू शकत नाहीत, जेव्हा तो मौन धारण करतो. परंतु जेव्हा तो धर्म बोलतो, तेव्हा तो अमृततुल्य सत्याचा मार्ग दाखवतो._  

   - _याचा अर्थ असा की ज्ञानी व्यक्तीचे वास्तविक गुण त्याच्या विचारांत आणि उपदेशात दिसून येतात, न की बाह्य आडंबरात._

  

४. *धर्म हा ज्ञानी पुरुषांचा ध्वज (इसिनं धजं):*  

   - _ज्ञानी लोक धर्माचा प्रचार करून समाजाला प्रकाश देतात. त्यांचे ज्ञान आणि आचरण हाच त्यांचा खरा "ध्वज" (ओळख) असतो._

   - _यातून शिक्षण मिळते की आपल्या जीवनात धर्म (सत्य, नीती, करुणा) हाच आपला मार्गदर्शक असावा._

- _धर्म हीच ऋषींची ओळख आहे – त्यांनी कोणते वस्त्र घातले, किंवा ते कुठे राहतात, यावरून नव्हे, तर ते धर्माचे ध्वजवाहक आहेत की नाही, यावरून त्यांची खरी ओळख ठरते._

५. *उपदेशाची नीती:*

_*धर्म सांगताना तो निःस्वार्थ, अडथळ्याविना, प्रामाणिक हेतूने, सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत असावा* – ही शिक्षणपद्धती विसाखने उत्तम पद्धतीने अंगीकारली होती, त्यामुळे त्याचे बुद्धांनी स्तुती केली._

*सारांश:*  

_ह्या सूत्रातून धर्मोपदेशाचे महत्त्व, ज्ञानी व्यक्तीची ओळख आणि सत्याचा प्रसार यांचे महत्त्व सांगितले आहे. विसाख सारखे ज्ञानी शिष्य बुद्धांच्या मार्गावर चालतात आणि इतरांना प्रकाश देतात. *"धर्म हाच खरा ध्वज"* हे या सूत्राचे मुख्य संदेश आहे._

🚩 *"ज्ञानीजन धर्माचा ध्वज उंच करतात, कारण धर्म हाच त्यांचा खरा तपाचा परिणाम आहे."*

_विसाखसुत्त हे केवळ विसाख भिक्खूच्या प्रशंसेपुरते मर्यादित नाही, तर हे सूत्त सांगते की *योग्य रीतीने, स्पष्टपणे आणि प्रामाणिक हेतूने धर्म सांगणारा व्यक्तीच खरा साधू असतो.* बुद्धवाणीतील संदेश आजच्या काळातसुद्धा लागू होतो – ज्ञान असले तरी ते सुसंवादाने आणि सुसंस्कृतपणे मांडले गेले पाहिजे._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन : महेश कांबळे_*

*_दिनांक : २४/०६/२०२५_*

*_संदर्भ : सूत्त पिटक - संयुत्त सूत्त - निदानवग्ग पाळी - १० भिक्खू संयुत्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Sunday, 22 June 2025

लकुण्डकभद्दियसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लकुण्डकभद्दियसुत्तं_*    

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_59.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

         _ही कथा आर्य लकुण्डकभद्दिय नावाच्या भिक्खूविषयी आहे. ते शरीराने लहान, कुरूप आणि दुर्बळ होते. त्यांच्या दिसण्यामुळे इतर भिक्खू त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष करायचे किंवा त्यांना महत्त्व द्यायचे नाही._

📌 _*भगवान बुद्धांचा दृष्टिकोन:*_

            _भगवान बुद्ध मात्र थेट त्यांनी त्यातील अंतर्गत शक्ती आणि आध्यात्मिक उंची ओळखली. ते भिक्खूंना सांगतात की – *एखाद्याच्या शरीरिक रूपावरून त्याची खरी क्षमता, साधना किंवा बौद्धिक पातळी ठरवता येत नाही.* लकुण्डकभद्दिय अत्यंत महान साधक आहेत, त्यांनी उच्चतम ध्यान स्थिती (समापत्ती) अनुभवली आहे. त्यांनी निर्वाणाचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे ते खरे महान आहेत._

*_“हंसा कोञ्चा मयूरा च, हत्थयो पसदा मिगा।_*

*_सब्बे सीहस्स भायन्ति, नत्थि कायस्मिं तुल्यता॥_*

*_“एवमेव मनुस्सेसु, दहरो चेपि पञ्ञवा।_*

*_सो हि तत्थ महा होति, नेव बालो सरीरवा”ति॥_*

🪷 गाथेचा मराठी अनुवाद:

*_"हंस, कोकिळ, मोर, हत्ती, घोडे आणि हरिण — हे सर्व सिह (सिंह) समोर भीतीने थरथरतात, कारण त्यांच्या शरीराची तुलना सिंहाशी होऊ शकत नाही."_*

*_"तसंच, मनुष्यांमध्ये जर कोणी बुद्धिमान असेल, जरी तो वयाने लहान असला तरीही, तो खरोखर महान ठरतो. केवळ शरीराने मोठा असून उपयोग नाही, जर तो मूर्ख असेल."_*

_गाथेतून उदाहरण दिले आहे की जसे सगळे प्राणी सिंहापुढे भीतीने मागे हटतात कारण सिंह श्रेष्ठ आहे — त्याचप्रमाणे मनुष्यसमुहात देखील कोणी वयाने लहान असला तरी बुद्धिमान असेल, तर तो खरा महान आहे. फक्त शरीराने मोठा असून उपयोग नाही, जर मनाने तो मूर्ख असेल._

*तात्पर्य आणि स्पष्टीकरण:*

१. *बाह्य स्वरूपाची मूल्ये नसतात:*  

          _भद्दिय भिक्षू बाह्यतः कुरूप आणि दुर्बळ दिसत असला, तरी त्याच्या आंतरिक गुणांमुळे (ज्ञान, सिद्धी) तो महान होता. हे सांगून बुद्ध म्हणतात— *माणसाची खरी महत्ता त्याच्या शरीराने नसून, त्याच्या ज्ञान, चारित्र्य आणि आध्यात्मिक साधनेने ठरते.*_

२. *प्राण्यांमधील निसर्गदत्त श्रेष्ठत्व:*  

   _गाथेत हंस, मोर, हत्ती इ. प्राणी सिंहाला घाबरतात, पण सिंह शारीरिकदृष्ट्या सर्वात मोठा नसतो. तसेच, माणसांमध्ये शरीरापेक्षा बुद्धीचे वजन असते._

३. *आध्यात्मिक साधनेचे महत्त्व:*  

   _भद्दियाने ब्रह्मचर्याचे अंतिम फळ (अर्हत्पद) प्राप्त केले होते. हे सूत्त सांगते की, बाह्य आडंबर किंवा समाजातील प्रतिमा योग्य मार्गदर्शक नाहीत. खरा मार्ग म्हणजे आत्मसाधना आणि ध्येयाची एकनिष्ठा._

४. *समाजाच्या पूर्वग्रहांवर टीका:*  

   _बुद्ध येथे समाजाच्या बाह्य दृष्ट्या केलेल्या न्यायावर प्रहार करतात. भद्दियाला इतर भिक्षूंनी कमी लेखले, पण बुद्धांनी त्याच्या आंतरिक योग्यतेचे कौतुक केले._

५. *जीवनाचा संदेश:*  

   - _व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन बाह्यतेवरून करू नका._  

   - _आध्यात्मिक प्रगती ही शारीरिक सामर्थ्यापेक्षा श्रेष्ठ असते._  

   - _लहान किंवा दुर्बळ दिसणाऱ्यामध्येही महान गुण दडले असू शकतात._

✨ *_मुख्य संदेश:_*

_१. *दिसणे व व्यक्तिमत्त्व यावरून मनुष्याचे मूल्य ठरवू नये.*_

_२. *शरीर मोठं असून उपयोग नाही, जर ज्ञान, विवेक आणि साधना नसेल.*४_

_३. *खरा मोठेपणा हा आध्यात्मिक उंची आणि अनुभवातून येतो.*_

_४. *बुद्धिमत्ता, साधना आणि आत्मदर्शन हे खरे आदर्श आहेत.*_

_५. *आपल्याला एखाद्याचे आंतरिक सामर्थ्य आणि गुण ओळखण्याची क्षमता विकसित करावी लागते.*_

*निष्कर्ष:*

_हे सूत्त आपल्याला *गुण, ज्ञान आणि आचरण यांना प्राधान्य देण्याचा संदेश देतं. बाह्य स्वरूपापेक्षा आंतरिक शुद्धता आणि साधना हीच खरी ऐहिक आणि पारमार्थिक यशाची गुरुकिल्ली आहे.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन : महेश कांबळे_*

*_दिनांक : २३/०६/२०२५_*

*_संदर्भ : सूत्त पिटक - संयुत्त सूत्त - निदानवग्ग पाळी - १० भिक्खू संयुत्त - ६ लकुण्डकभद्दियसुत्तं_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

भिक्खु, भदंत आणि उरगेन

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भिक्खु, भदंत आणि उरगेन_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_22.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भिक्खू_*

_*'भिक्खू' हा पाली भाषेतील शब्द आहे, ज्याला संस्कृतमध्ये 'भिक्षु' म्हणतात.* भाषिक अर्थाने भिक्खू किंवा भिक्षु म्हणजे याचक किंवा भीक मागणारा. परंतु *बौद्ध अर्थाने भिक्खू म्हणजे भीक मागणारा नव्हे, तर 'जो धम्माचा याचक आहे' तो होय. भगवान बुद्धांसमोर जो धम्माची याचना करत असे, त्याला भगवान 'एहि भिक्खवे' (ये भिक्षू) असे म्हणून दीक्षा देत, म्हणजेच संघात सामील करत असत.*_

*_भदंत_*

_त्याचप्रमाणे, पाली भाषेत *'भद्द'* हा शब्द आहे, ज्यापासून संस्कृतमध्ये *'भद्र'* शब्द बनला आहे, *ज्याचा अर्थ 'भला, कल्याणकारी, सुंदर' असा होतो.*_

_याप्रकारे, '*भदन्त' या शब्दाचा अर्थ 'भद्रतेचा अंत' म्हणजे कल्याणकारीतेची पराकाष्ठा गाठलेला व्यक्ती 'भदन्त' होय.* जसा महानतेची पराकाष्ठा गाठलेला व्यक्ती 'महंत' म्हणवला जातो, त्याचप्रमाणे *भद्रतेची पराकाष्ठा प्राप्त केलेल्या व्यक्तीला 'भदन्त' म्हणतात.*_

*_स्थविर_*

_*स्थविरचा साधा-सोपा शाब्दिक अर्थ आहे - जो स्थिर आहे तो स्थविर आहे. आध्यात्मिक अर्थ आहे - ज्याचे चित्त स्थिर झाले आहे, चित्ताची व्याकुळता नाहीशी झाली आहे, तो स्थविर आहे. जो स्थविरांमध्ये स्थविर आहे, तो महास्थविर आहे.*_

_प्रचलित अर्थांमध्ये स्थविराची वरिष्ठता तीन प्रकारची असते:_

_१. *वय (आयुष्य):* अर्थात वयाने वरिष्ठ._

_*२. वर्षावास:* अर्थात वर्षावासांच्या संख्येने वरिष्ठ._

_*३. ज्ञान:* अर्थात स्रोतापन्न, सकृतागामी इत्यादी अवस्थेमुळे वरिष्ठ._

*_उरगेन_*

_आजच्या तारखेत *'उरगेन' हा तिबेटी भाषेतील शब्द आहे, जो 'गुरू, ज्ञानी, पूजनीय, शांत, पावन' इत्यादी अर्थांनी वापरला जातो. परंतु या शब्दाची मूळ उत्पत्ती भारतातील 'उदुंबर' या शब्दापासून झाली आहे.* जशी 'झेन' शब्दाची मूळ उत्पत्ती 'झान' किंवा 'ध्यान' या शब्दापासून झाली आहे._

१. _*पाली भाषेतील 'झान' हा शब्द संस्कृतमध्ये 'ध्यान' झाला.*_

२. _*संस्कृतमधील 'ध्यान' हा शब्द चिनी भाषेत 'चा'न' झाला.*_

३. *_चिनी भाषेतील 'चा'न' तिबेटी भाषेत 'घान' झाला._*

४. *_तिबेटीतील 'घान' कोरियन भाषेत 'सोनजान' झाला._*

५. *_कोरियातून व्हिएतनामी भाषेत तो 'थियेन' झाला._*

६. *_व्हिएतनाममधून जपानमध्ये पोहोचल्यावर हा शब्द 'झेन' झाला._*

_ज्या क्रमाने लिहिले आहे, त्याच क्रमाने या देशांमध्ये बुद्ध धम्माची यात्रा झाली आहे._

_त्याचप्रमाणे 'उरगेन' हा शब्द 'उदुंबर' किंवा 'औदुंबर' पासून बनला आहे, ज्याचा अर्थ 'गूलर' (अंजीर) असा होतो._

_सध्याच्या *ओडिशा किंवा ओडीशाचे प्राचीन नाव 'उड्डियान' होते.* गूलरला उदुंबर किंवा औदुंबर म्हणतात. उदुंबर किंवा औदुंबरचे अपभ्रंशित रूप 'उड्डियान' आहे. *ओडिशाच्या पुरीपासून नालंदापर्यंत गूलरच्या झाडांची बहुतायत होती, त्यामुळे या संपूर्ण भूभागाला 'उड्डियान' म्हटले जात असे.* एवढेच नाही, तर *हा संपूर्ण भूभाग बौद्धांची तंत्रभूमी देखील मानला जातो. बौद्धांचे तंत्रयान याच भूभागातून तिबेटमध्ये हस्तांतरित झाले. त्यामुळे तिबेटी भाषेत या भूभागातून आलेल्या पूजनीय आचार्यांसाठी तिबेटी भाषा व उच्चारात 'उरगेन' हे संबोधन वापरले गेले आहे.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखक : श्री राजेश चंद्रा सर_*

*_मराठि अनुवादक / संकलन : महेश कांबळे_*

*_दिनांक : २२/०६/२०२५_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 21 June 2025

सुजातसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सुजातसुत्तं*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_21.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_श्रावस्ती नगरीत भगवान बुद्ध विहार करत होते. तेव्हा *भिक्खू सुजात* त्यांच्या दर्शनाला आला. भगवान बुद्धांनी त्याला दूरूनच पाहिले आणि आपल्या आजूबाजूच्या भिक्खूंना म्हणाले...._

_"भिक्खूंनो, हा सुजात नावाचा गृहत्याग केलेला युवक दोन्ही प्रकारांनी खरोखरच शोभतो —_

१) _तो अत्यंत सुंदर, मनोहर, प्रसन्नवदन आणि उत्कृष्ट सौंदर्याने संपन्न आहे._  

२) _त्याच्या प्रेरणेने अन्य कुलपुत्र घराचा त्याग करून संन्यास धारण करतात आणि_

३) _अखेरच्या ब्रह्मचर्याच्या परिपूर्तीपर्यंत (निर्वाणापर्यंत) धर्मात राहून, स्वतः प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करून ते साक्षात्कार करतात."_  

_त्यानंतर भगवान हे सूत्त म्हणाले –_  

>  _"हा भिक्षु (सुजात) शोभून दिसतो, कारण त्याचे मन निष्कपट आणि सरळ आहे._

> _तो सर्व आसक्तीपासून मुक्त आहे, संसाराच्या बंधनांतून मुक्त झाला आहे._

> _त्याने मार (कामना) आणि त्याच्या सेनेला पराभूत केले आहे._  

> _आता तो अंतिम शरीर धारण करून निर्वाणाच्या मार्गावर आहे."_  

*सुत्ताचा आशय व विस्तृत स्पष्टीकरण:*

_*सुजातसुत्त हे सुत्त गुणगौरव सुत्तांपैकी आहे,* ज्यामध्ये भगवान बुद्ध आपल्या एका शिष्याच्या साधनेची प्रशंसा करतात. या ठिकाणी सुजात नावाचा भिक्खू, जो पूर्वी गृहस्थ होता, त्याने संसाराचे त्याग करून मोक्षसाधना केली आणि निर्वाण प्राप्त केले._

१. *सुजातचे व्यक्तिमत्त्व:*  

   अ) सुजात हा केवळ बाह्य सौंदर्यानेच नव्हे, तर आंतरिक शुद्धतेनेही भरलेला होता. त्याच्या प्रेरणेने इतर गृहस्थ संन्यासी होत असत.  

   आ) बुद्धांनी त्याच्या *"सौंदर्य आणि सद्गुण"* या दोन्ही गोष्टींची प्रशंसा केली.  

२. *आध्यात्मिक सिद्धी:*  

    अ) सुजात *निःसंगता (विप्पयुत्त)* आणि *कामनांपासून मुक्तता (विसंयुत्त)* या अवस्थेत पोहोचला होता.  

   आ)  त्याने *मार (मृत्यू, इच्छा, अज्ञान)* याचा पराभव केला होता आणि तो *निर्वाणाच्या जवळ* पोहोचला होता.  

३. *सुत्ताचा भावार्थ:*  

   अ) *"गाथेत "उजुभूतेन चेतसा"* — _म्हणजे "सरळ मन", ही विशेषतः सांगितले आहे. अर्थात, निर्वाणासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरळ, प्रामाणिक आणि आसक्तीमुक्त चित्त._

आ) *"अनुपादाय निब्बुतो"* — _याचा अर्थ आहे: सर्व प्रकारच्या धरून ठेवण्याच्या वृत्तीपासून (उपादान) मुक्त होऊन तो निर्वाण प्राप्त करतो._

इ) *"धारेति अन्तिमं देहं"* — _सुजात आता शेवटचा जन्म घेत आहे, कारण त्याने सर्व इच्छांच्या मूळाला, म्हणजे 'मार' ला (मार म्हणजे मृत्यूचे व आसक्तीचे प्रतीक) पूर्णपणे जिंकले आहे._

४. *शिकवण:*  

_सुजातसुत्त आपल्याला हे शिकवतो की —_

   अ) _बाह्य सौंदर्यापेक्षा *आंतरिक शुद्धता* महत्त्वाची आहे._

   आ) _संन्यस्त जीवनातील *निःसंगता आणि समाधी* हीच खरी यशाची खूण आहे._  

   इ) _अंतिम ध्येय *निर्वाण* प्राप्त करणे, यासाठी इच्छा आणि अहंकाराचा त्याग आवश्यक आहे._  

   ई) _त्याग, साधना आणि अंतःकरणाची निर्मळता — हे खरे सौंदर्य आहे._

   उ) _कोणतीही गोष्ट धरून न ठेवणे (अलिप्तता) आणि मनाची सरळता — मोक्षप्राप्तीचे मुख्य साधन आहे._

    ऊ) _जो खरा साधक आहे, तो या जन्मातच मुक्त होतो — त्याला पुन्हा जन्म घेण्याची गरज राहत नाही._

_ह्या सुत्तात *आदर्श भिक्षूचे गुण* सांगितले आहेत – बाह्य आणि आंतरिक पवित्रता, निष्कामता आणि निर्वाणाकडे केंद्रित मन._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन : महेश कांबळे_*

*_दिनांक : २२/०६/२०२५_*

*_संदर्भ : सूत्त पिटक - संयुत्त सूत्त - निदानवग्ग पाळी - १० भिक्खू संयुत्त - ५ सुजात सूत्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Friday, 20 June 2025

नवसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

"नवसुत्तं"

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_20.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_श्रावस्ती नगरात भगवान बुद्ध वास्तव्यास होते. त्या काळात, एक *नवीन भिक्खू* दुपारच्या जेवणानंतर भिक्षा घेऊन परत विहारात येतो, शांत असतो, एकटाच असतो आणि काही बोलत नाही. तो *चिवर (वस्त्र) तयार करण्याच्या काळातही* इतर भिक्खूंची मदत करत नाही._

_तेव्हा काही भिक्खू बुद्धांजवळ येतात, वंदन करून एक बाजूस बसतात आणि म्हणतात: *"भगवंत, येथे एक नवीन भिक्खू आहे, तो भिक्षाटन करून परत आल्यावर एकांतवासात राहतो, बोलत नाही, आणि चिवर तयार करताना इतरांना मदतही करत नाही."*_

_तेव्हा भगवंत एका भिक्खूला सांगतात: *"जा आणि त्या भिक्खूला सांग की, 'सत्था (बुद्ध) तुला बोलावत आहेत'."* भिक्खू त्या नवीन भिक्खूकडे जाऊन सांगतो आणि तो भिक्खू बुद्धांजवळ येतो, वंदन करतो आणि एक बाजूस बसतो._

_तेव्हा बुद्ध त्याला विचारतात: *"हे खरे आहे का की तू दुपारनंतर परत आल्यानंतर एकांतवासात जातोस, शांत राहतोस आणि इतरांची मदत करत नाहीस?"*_

_तो भिक्खू उत्तर देतो: *"हो, भगवंत. मी स्वतःचं कार्य करत असतो."*_

_तेव्हा बुद्ध इतर भिक्खूंना उद्देशून म्हणतात: *"हे भिक्खूंनो, तुम्ही या भिक्खूवर टीका करू नका. कारण हा भिक्खू चार ध्यानांत रमलेला आहे — जे मनाने प्राप्त होणारे, इहलोकी आनंददायक आणि सहज प्राप्त होणारे ध्यान आहेत. हेच ते अंतिम ब्रह्मचर्य आहे ज्यासाठी श्रेष्ठ घरातील पुत्र घरत्याग करून संन्यास घेतात. हा भिक्खू ते लक्ष्य प्रत्यक्ष जाणून अनुभवत आहे."*_

_यानंतर बुद्धांनी ह्गा गाथा म्हणल्या:_

*_“हे निःसंगपणे, दुर्बलतेने किंवा थोड्या प्रयत्नांनी प्राप्त होणारे नाही. निर्वाण प्राप्त करणे, सर्व दु:खातून मुक्त होणे सोपे नाही._*

_हा तरुण भिक्खू — *हा एक उत्तम पुरुष आहे. त्याने मारा (मृत्यू/वासना)चा पराभव केला आहे आणि आपला शेवटचा जन्मधारी शरीर धारण केले आहे.”*_

🔹 *_परिस्थिती:_*

_हे सुत्त एका नवभिक्षुच्या आचरणावरून इतर भिक्खूंमध्ये निर्माण झालेल्या शंका व बुद्धांच्या त्या उत्तराविषयी आहे. नवीन भिक्खू लोकांपासून दूर राहून शांत बसतो आणि इतर भिक्खूंची मदत करत नाही म्हणून त्याच्याविषयी इतरांना राग येतो._

🔹 _बुद्धांचा दृष्टिकोन:_

_बुद्धांनी इतरांना समजावले की "प्रत्येक भिक्खू बाहेरून कसा वागतो त्यावरून त्याचा आंतरिक आध्यात्मिक प्रगतीचा अंदाज लावता येत नाही. हा भिक्खू ध्यानात मग्न आहे — त्याने चार झान (ध्यानस्थिती) प्राप्त केली आहेत. झान ही उच्चतम मानसिक स्थिती आहे ज्यात मन शांत, एकाग्र आणि आनंदमय होते. ही स्थिती निब्बान (निर्वाण) प्राप्तीची दिशा दाखवते.*_

*_चार झानं म्हणजे काय?_*

_"झान" (Pali: jhāna, संस्कृत: ध्यान) म्हणजे अशी ध्यानावस्था जी अतिशय उच्च स्तराची मानसिक एकाग्रता व अंतर्मुखता दर्शवते. बुद्धांनी ध्यानाच्या चार स्तरांचा अभ्यास केला होता आणि ते निर्वाणाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानले जातात._

🔸 _१. *पहिलं झान (Paṭhama Jhāna):*_

लक्षणे:

अ. _विवेक (विचार) आणि विचार (पुनःपुन्हा मनन) — म्हणजे विषयावर लक्ष केंद्रित करून विचार सुरू ठेवणे.

पीती (आनंद) आणि सुख (शांती)._

आ. _मन: आतल्या समाधानात रममाण, बाह्य जगापासून दूर, पण अजून विचार/निर्णय चालू आहे._

🔸 _२. *दुसरं झान (Dutiya Jhāna):*_

अ. _विवेक व विचारा नाहीसा होतो — म्हणजे विचार थांबतात._

आ. _पीती व सुख अधिक स्थिर होतात._

इ. _मन: अधिक स्थिर, भावना स्पष्ट आणि शांतता गडद._

🔸 _३. *तिसरं झान (Tatiya Jhāna):*_

अ. पीती कमी होते, पण सुख (मनोशांती) वाढते.

आ. _"उपेक्षा" (equanimity) — म्हणजे सर्व गोष्टींवर समता बाळगणं._

इ. _मन: पूर्ण शांत, ना आनंद ना दुःख — फक्त समत्व._

🔸 _४. *चौथं झान (Catuttha Jhāna):*_

अ. _सुखसुद्धा नाही, पीतीसुद्धा नाही._

आ. _फक्त "उपेक्षा" आणि "एकाग्रता"._

इ. _मन: अतिशय स्थिर, भावनातीत, शुद्ध आणि निर्विकारी._

🔹 मुख्य संदेश:

१. _*आंतरिक साधना* जरी बाह्य कर्मकांडांपासून वेगळी वाटू शकते, तरी तिचं महत्त्व प्रचंड असतं._

२. _*इतरांवर टीका करण्याआधी त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचा विचार करायला हवा.*_

३. _*निर्वाण प्राप्त करणे* हे सुलभ नाही. त्यासाठी अपार परिश्रम, सातत्य आणि अंतरंग ध्यान लागते._

४. _जे *मार (वासना, मोह, अज्ञान)* यांचा पराभव करतात तेच खरे अर्थाने “उत्तम पुरुष” होत._

*_तात्पर्य:_*

अ. _हे सुत्त आपल्याला शिकवतो की *बाह्य शांतता किंवा मौन म्हणजे आळस नसतो; कधी कधी तो आत्मविकासाचा मार्ग असतो.*_

आ. _समाज किंवा समुदायात, जे लोक शांत किंवा वेगळे राहतात त्यांचं मूल्यांकन केवळ त्यांच्या वागण्यावरून न करता, त्यांच्या आंतरिक स्थितीवरून करायला हवं._

इ. _तसेच, ध्यान व अंतर्मुखता ही *ब्रह्मचर्याचे (संन्यासाचे) सर्वोच्च फलित* मानली आहे._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन : महेश कांबळे_*

*_दिनांक : २१/०६/२०२५_*

*_संदर्भ : सूत्त पिटक - संयुत्त सूत्त - निदानवग्ग पाळी - १० भिक्खू संयुत्त -४ नव सूत्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 19 June 2025

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_घट सुत्त_* 

*_(संयुक्त निकाय)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*संदर्भ*: सारिपुत्त व महामोग्गलान यांचा संवाद_

_*स्थान*: राजगृह, वेळुवन विहार_

_१.* सुत्ताचा संदर्भ व पार्श्वभूमी:*_

• _भगवान बुद्ध श्रावस्ती नगरीतील जेतवनात विहार करत होते._

• _त्याचवेळी पूज्य सारिपुत्त व पूज्य महामोग्गलान राजगृह येथे वेळुवन विहारात राहत होते._

• _संध्याकाळी ध्यानातून उठल्यावर सारिपुत्त महामोग्गलान यांना भेटतात, आणि एक आपुलकीचा संवाद घडतो._

_२. *संवादातील मुख्य आशय:*_

२.१ *इंद्रियशांतीचे निरीक्षण:*

• _सारिपुत्त महामोग्गलानांचे प्रसन्न आणि शांत इंद्रिय पाहून विचारतात की त्यांनी विशेष ध्यान केले का._

_महामोग्गलान सांगतात की ध्यान साधारण होते, पण त्यांच्याशी एक *धम्म चर्चा* झाली._

२.२ *भगवंतांसोबत संवाद:*

• _सारिपुत्त आश्चर्यचकित होतात – कारण बुद्ध श्रावस्तीमध्ये असून महामोग्गलान राजगृहात होते._

• _महामोग्गलान स्पष्ट करतात की त्यांनी ना प्रवास केला, ना बुद्ध आले; पण त्यांच्या *दिव्यचक्खू*  आणि *दिव्यसोत* शक्तीमुळे संवाद शक्य झाला._

_३. *धम्म चर्चा: "आरद्धवीरिय" म्हणजे काय?*_

३.१ *महामोग्गलान बुद्धांना विचारतात:*

_"भन्ते, *‘आरद्धवीरिय’ (प्रयत्नशील साधक)* असे कोणाला म्हणावे?"_

३.२ *बुद्धांचे उत्तर:*

_"जो साधक असा निर्धार करतो — *त्वचा, स्नायू, हाडे झिजू द्या, पण जोपर्यंत अंतिम ध्येय (निब्बान) गाठले जात नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही — तो खरा आरद्धवीरिय आहे."*_

३.३ *या शब्दांचे अर्थ:*

• *वीरिय*: _धैर्य, प्रयत्न_

• *आरद्धवीरिय*: _संकल्पबद्ध, पराक्रमी, न थांबणारा तपस्वी_

४. *परस्पर गौरव व उपमा:*

४.१ *सारिपुत्त → महामोग्गलान यांच्याबद्दल:*

_"तुम्ही हिमालय पर्वताजवळचा एक लहानसा दगड आहात, पण तुमच्यात अपार शक्ति आहे. इच्छिल्यास तुम्ही एक कल्प जगू शकता."_

४.२ *महामोग्गलान → सारिपुत्त यांच्याबद्दल:*

_"तुम्ही मीठाच्या ढिगातलात एक छोटा खडा आहात – पण संपूर्ण स्वाद तुमच्यात आहे. तुम्हाला बुद्धांनी अनेकवेळा गौरवले आहे."_

५. *बुद्धांचे सारिपुत्तावर गौरवोद्गार:*

*_"सारिपुत्तच प्रज्ञेने, शीलाने व उपशमाने श्रेष्ठ आहे._*

_*जो भिक्खू अंतिम पार गाठतो, तोही सारिपुत्तसारखाच असतो."*_

६. *निष्कर्ष (Conclusion):*

• _*ध्यान, धैर्य व अनंत प्रयत्न* हे बौद्ध मार्गाचे मुख्य आधारस्तंभ आहेत._

• _*महामोग्गलान* हे ध्यान-शक्तीचे मूर्त रूप, तर *सारिपुत्त* हे प्रज्ञेचे मूर्त रूप होते._

• _बौद्ध धर्मात *"आरद्धवीरिय"* ही संकल्पना प्रत्येक साधकाने आत्मसात करावी अशी आहे._

• _सुत्ताच्या शेवटी, हे दोन्ही *"महान नाग"* एकमेकांच्या गूढ आणि प्रेरणादायक भाष्याचे अनुमोदन करतात._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन : महेश कांबळे_*

*_दिनांक : २९/०६/२०२५_*

*_संदर्भ : सूत्त पिटक - संयुत्त सूत्त - निदानवग्ग पाळी - १० भिक्खू संयुत्त -२ घट सूत्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

योग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_योग_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_19.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_भगवंतांनी संबोधी मार्गातील *दहा संयोजने म्हणजेच बंधने* सांगितली आहेत. ती बंधने तोडून साधक संबोधी प्राप्त करतो._

१. सत्कायदिट्ठिका (अस्तित्वविषयक दृढ समजूत)

२. विचिकिच्चा (संशय)

३. शीलव्रतपरामर्श (केवळ कर्मकांड आणि व्रतांमध्ये अडकून राहणे)

४. कामराग (कामासक्ती)

५. व्यापाद (द्वेष)

६. रूपराग (रूपलोकाची आसक्ती)

७. अरूपराग (अरूपलोकाची आसक्ती)

८. मान (अहंकार)

९. औधत्य (उद्धटपणा)

१०. अविद्या (अज्ञान)


१. _पहिले तीन बंधने तोडल्याने साधकाला *स्रोतापत्ती* फळ प्राप्त होते._

२. _पहिली पाच बंधने तोडल्याने आणि चौथे-पाचवे बंधन काही प्रमाणात शिथिल झाल्याने *सकृतगामी* अवस्था प्राप्त होते._

३. _सात बंधने खंडित केल्याने *अनागामी* अवस्था प्राप्त होते आणि_

४. _दहाही बंधने खंडित केल्याने साधक *अर्हत्पद* प्राप्त करतो._

          _*स्थविर पोटिल त्रिपिटकधर होते.* त्यांना आठवे बंधन तोडता येत नव्हते, कारण त्यांना त्रिपिटक कंठस्थ होते. चारही बाजूंनी त्यांची स्तुती होत होती. मोठे-मोठे वरिष्ठ भिक्खू देखील त्यांच्याबद्दल गुरुतुल्य आदरभाव बाळगत असत. भगवंतांनी हे देखील सांगितले की, ते पूर्वीच्या सात बुद्धांच्या काळापासून त्रिपिटकधर होते. *त्यांना मिळणारा अपर आदरच त्यांच्या आध्यात्मिक मार्गात अडथळा बनला होता.* भगवान करुणामय होते. त्यांनी हा अडथळा दूर करण्याचा उपाय शोधला. जेव्हाही पोटिल भगवंतांना वंदन करण्यास येत, तेव्हा भगवान त्यांना सर्वांसमक्ष '*या, तुच्छ पोटिल*' असे संबोधत. पोटिल यांच्या आठव्या गाठीला धक्का बसत असे. त्यांनी आत्मनिरीक्षण केले, त्यांना आपली उणीव दिसली. ते मान खाली घालून जाऊ लागले, तरीही भगवंतांनी त्यांना *'तुच्छ पोटिल'* असेच संबोधले. मान खाली घालून ते तीस योजन चालत गेले, अशा अरण्यात जिथे *तीस क्षीणस्रव भिक्खू विहार करत होते, सर्वजण अर्हत होते, त्या संघात श्रमणेर देखील अर्हत होते.*_

             _स्थविर पोटिल सर्वात वरिष्ठ भिक्खूंकडे जाऊन नम्रपणे मान खाली घालून उभे राहिले. त्यांनी विनंती केली - कृपा करून आपण अर्हत्पदाच्या साधनेत माझे आश्रयदाता व्हा, मला मार्गदर्शन करा._

_भिक्खू म्हणाले - पोटिल, आपण आम्हाला लज्जित करू नका, आपल्या आश्रयाने तर आम्ही साधना केली आहे, आपण महान धम्मकथिक-धम्मोपदेशक आहात, आपल्या देशना ऐकून आम्ही प्राप्त केले आहे..._

*_मान, अहंकाराचा हा देखील आग्रह असतो की माझे मार्गदर्शन वरिष्ठतम गुरूने करावे._*

_स्थविर पोटिल यांनी खूप आग्रह केला तेव्हा वरिष्ठतम भिक्खूंनी आपल्या कनिष्ठ भिक्खूकडे निर्देश केला की, आपण कृपया त्यांना प्रार्थना करावी._

_कनिष्ठ भिक्खू आणखीनच संकोचले - जेव्हा माझे गुरुवर तुम्हाला आश्रय देण्यात संकोच करत आहेत, तेव्हा मी कसे धाडस करू शकतो!_

_परंतु स्थविर पोटिल यांना आपले छिद्र दिसले होते. ते कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊन आपली समस्या दूर करू इच्छित होते. *भगवंतांनी त्यांच्यात धम्म संवेग जागृत केला होता.*_

_कनिष्ठ भिक्खूंनी आपल्याहूनही कनिष्ठाकडे निर्देश केला. असे करत करत ते तीसव्या भिक्खूकडे गेले जे फक्त सात वर्षांचे श्रमणेर होते._

_सात वर्षांच्या श्रमणेरासमोर आश्रय होण्याची याचना करतानाच स्थविर पोटिल यांची आठवी गाठ 'मान' पूर्णपणे सैल झाली._

_श्रमणेराने स्थविर पोटिल यांच्यासमोर अट ठेवली - मी तुमचा आश्रयदाता बनण्यास तयार आहे, पण तुम्हाला माझा प्रत्येक आदेश मानावा लागेल._

_स्थविर पोटिल म्हणाले - तुम्ही मला डोंगरावरून उडी मारण्याचा आदेश द्याल तरीही संकोच करणार नाही._

_त्या दृश्याची कल्पना केली जाऊ शकते की, तीन पिटकांचा ज्ञाता असलेला विख्यात धम्मकथिक सात वर्षांच्या एका श्रमणेरासमोर समर्पित झाला आहे._

_श्रमणेराने स्थविर पोटिल यांना खरोखरच आदेश दिला - तुम्ही समोरच्या सरोवरात चीवर घातलेले असतानाच उडी मारा._

_स्थविर पोटिल यांची मोठी प्रतिष्ठा होती. श्रद्धाळू उपासक त्यांना मौल्यवान वस्त्रांचे चीवर दान करत असत. त्यांनी खूप मौल्यवान चीवर धारण केले होते._

_श्रमणेराचा आदेश मिळताच ते सरोवरात उडी मारण्यास तत्पर झाले. त्यांच्या चीवरचा किनारा पाण्यात भिजला होता, तेवढ्यात श्रमणेराने त्यांना हाक मारून थांबवले. *स्थविर एका बालकाप्रमाणे सात वर्षांच्या श्रमणेराच्या आदेशाचे पालन करत होते.*_

_*स्थविर यांचे चित्त मृदू होत असलेले पाहून श्रमणेर म्हणाले - जर सहा छिद्रे असलेल्या वारुळातून साप आत जाताना दिसला तर त्याला कसे पकडाल? पाच छिद्रे बंद कराल, सापाला बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यावरच पकडू शकाल... तसेच षडद्वारांच्या या कायेचे पाच द्वार रोखून फक्त मनोद्वाराने साधना करावी.*_

_*एवढे ऐकताच स्थविर यांचे मन प्रकाशित झाले. ते म्हणाले - जसे अंधारात दिवा प्रज्वलित व्हावा, तसे आपण माझे मार्गदर्शन केले.*_

_बस, या एवढ्या मार्गदर्शनाचा आधार घेऊन ते साधनेत लीन झाले. *आयुष्यभर धम्मोपदेश करणारा व्यक्ती पहिल्यांदा साधना करत होता. पोटिल स्थविर यांना मनोयोगपूर्वक साधनेत लागलेले पाहून प्रसन्न भगवंत म्हणाले:*_

*_योगा वे जायती भूरि अयोगा भूरिसंखयो ।_*

*_एतं द्वेधापथं ञत्वा भवाय विभवाय च।_*

_*तथात्तानं निवेसेय्य यथा भूरि पवड्ढति।।*_

  • *_योगाने महाप्रज्ञा (विपुल ज्ञान) उत्पन्न होते, योग न केल्याने प्रज्ञाचा क्षय होतो. योग-अयोग, उत्पत्ती-विनाशाच्या या दुहेरी मार्गाला चांगल्या प्रकारे जाणून त्याप्रमाणे त्याचे सेवन करावे, ज्यामुळे प्रज्ञेची वाढ होते._*

_भगवंतांचा एवढा संकेत मिळताच स्थविर पोटिल थोड्याच वेळात अर्हत्पदाला प्राप्त झाले._

_हा प्रसंग *त्रिपिटकातील खुद्दकनिकायच्या धम्मपद अट्ठकथेत सविस्तर आहे.* प्रसंग अनेक आहेत, परंतु तात्पुरते उदाहरण म्हणून येथे एक प्रसंग दिला आहे._

_भगवान भिक्खू पोटिल यांना योग करण्यास प्रेरित करत आहेत, *पण हा तो योग नाही ज्याच्या नावावर योग दिवस लोकप्रिय होत आहे.*_

_खरं तर, *भगवान बुद्धांच्या आर्य अष्टांग मार्गाच्या लोकप्रियतेच्या तुलनेतच महर्षी पतंजलींनी अष्टांग योगाची रचना केली, ज्यात ईश्वरप्राणिधानाचा समावेश करून त्याला आपले मौलिक स्वरूप देण्याची स्थापना केली, कारण बुद्धांचा धम्म अनीश्वरवादी आहे आणि विपश्यनेला प्राणायामाचे स्वरूप दिले. भगवान बुद्ध ज्या योगाची गोष्ट करत आहेत त्याचे लक्ष्य संबोधी प्राप्त करणे आहे आणि आज ज्या योगाची चर्चा आहे तो सहज योगासन आहे, हठयोग आहे, तरीही याचे अंतिम लक्ष्य समाधी आहे. विवेच्य विषय हा आहे की बुद्ध धम्म आणि इतर संप्रदायांमध्ये प्रचलित समान ध्वनी असलेल्या शब्दांचे अर्थ समान नाहीत. हा फरक समजला नाही तर गोंधळाची स्थिती सतत कायम राहील. भगवान बुद्धांच्या अनेक संज्ञा नावांमध्ये एक नाव महायोगी देखील आहे. बोधगया येथील महाविहाराला पारंपरिक भाषेत अजूनही वज्रासन म्हणतात. वज्रासन ही योगाची एक मुद्रा आहे.*_

_*जगभरात लोकप्रिय असलेल्या युद्धकला, जसे की जूडो, कराटे, कुंगफू, तायक्वांडो इत्यादी, या वर्तमान योगाचेच उन्नत स्वरूप आहेत आणि याचे जनक बौद्ध आचार्य मानले जातात, ज्यात आचार्य बोधिधम्म इत्यादी आचार्य मानले जातात, ज्यांनी चीनमध्ये ही विद्या स्थापित केली. चीनमधील शाओलिन डोंगरावरील युद्धकला अकादमी जगविख्यात आहे, ज्याची स्थापना आचार्य बोधिधम्म यांनी केली होती.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखक : श्री राजेश चंद्रा सर_*

*_मराठि अनुवादक / संकलन : महेश कांबळे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

राहुलवत्थु

राहुलवत्थु अथ खो भगवा राजगहे यथाभिरन्तं विहरित्वा येन कपिलवत्थु तेन चारिकं पक्कामि। मग भगवान बुद्ध, राजगृह येथे त्यांना आवडेपर्यंत राहिल्यान...