➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_आयुर्वेदाचार्य जीवक_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2020/04/blog-post_29.html
*संकलन -* *महेश कांबळे*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*आचार्य जीवक हे बुद्धाच्या समकालीन प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य होते. बर्याच बौद्ध ग्रंथांमध्ये त्याच्या वैद्यकीय ज्ञानाची व्यापक स्तुती केली जाते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जीवंत सापडले म्हणून त्यांचे नाव ‘जीवक’ ठेवण्यात आले होते.*
तथागत बुद्धांच्या काळात वैशाली एक अत्यंत संपन्न गणराज्य होते. तेथे गणिका आम्रपाली अभिरूप, परम रूपवती, नृत्य, गीत, गायन आणि वादनात प्रवीण होती. *एका प्रसिद्ध श्रेष्टीने राजा बिंबीसाराला सुचविले की राजगृहात सुद्धा वैशाली सारखी एखादी गणिका असावी. शोध घेतल्यानंतर "सालवती (शालवती)" नावाची रूपवान मुलगी सापडली.*
_सालवती (शालवती) ही वैशालीतील आम्रपाली सारखीच सौंदर्यवती होती. काही दिवसात ती नृत्य कलांत निपुण होत ती राजा बिंबीसाराच्या राज्यातील राजगृहातील नृत्यांगना झाली._ *_ती कुमारी असतांना गर्भवती राहिली. आपल्या बदनामीच्या भीतीने तीने नवजात बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून दिले. "राजकुमार अभय" यास दिसल्यानंतर त्यांनी त्या बाळास राजवाड्यात आणले. "अभयने" त्याला दत्तक घेतले व त्याचे पालनपोषण केले. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जीवंत सापडले म्हणून त्यांचे नाव ‘जीवक’ पडले._*
_जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली, त्याला वाटले राजवाड्यात राहण्यासाठी एखादे शिल्प असल्याशिवाय जगणे कठीण आहे. म्हणून त्याने काही तरी शिल्प शिकण्याचे ठरविले, त्याकाळी तक्षशिलात एक प्रख्यात वैद्य राहत होते. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती._ एकेदिवशी *जीवक कोणालाही न विचारता तक्षशिला येथे पोहचला. त्यानंतर जीवक ने ७ वर्षेपर्यंत तक्षशिलेत वैद्यक शास्त्राचा अभ्यास केला.*
सतत सात वर्ष अभ्यास केल्यानंतर जीवकला असे वाटले की मी खूप अभ्यास करत आहे. मी जो अभ्यास करत आहे त्याचा अंत माहित नव्हता…म्हणून जीवक आपल्या आचार्य वैद्याकडे जाऊन मी सात वर्षांपासून अभ्यास करतोय…केंव्हा या शिल्पाचा अंत माहित होईल.
आचार्य म्हणाले…’जीवक, कुदळ घेऊन जा आणि तक्षशिलाच्या सर्व सर्व दिशांनी फिरून जे *(अभैषज्य)* औषधासाठी उपयुक्त नसलेले ते पहा आणि त्याला घेऊन ये’ मात्र जीवकाला तक्षशिलेच्या सर्व दिशेला एकही अभैषज्य काहीही मिळाले नाही. आचार्य जवळ जीवकाने तसे सांगितले, आचार्य म्हणाले जीवक आता तू आता शिकला आहेस, ते तुझ्या जीविकेसाठी पुरेसे आहे’
*_अभ्यास पूर्ण करुन जीवक तक्षशिलेतून राजगृहाला परत येण्यास निघाले. साकेत जवळ आले असता त्यांच्याजवळील पैसे संपले. पुढील प्रवासासाठी पैसे जमवावे या उद्देशाने त्यांनी साकेतमध्ये कोणी आजारी आहे काय याची चौकशी केली. साकेत येथील नगरश्रेष्ठीची सेठानी सात वर्षांपासून डोके दु:खीच्या आजाराने पीडीत होती. अनेक वैद्यानी उपचार करूनही तिला आराम झाला नव्हता. जीवकने आपण तिचा आजार बरा करू शकतो असे सांगितले. मात्र कंजुष सेठानीचा त्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा जीवक म्हणाले की. “आजार बरा झाल्यावरच पैसे द्यावे. “सेठानी तयार झाल्यावर जीवकने तिचा आजार ओळखून औषध दिले. ते औषध नाकातून ओढून तोंडातून बाहेर काढण्यास सांगितले. ती पूर्णत : निरोगी झाली. तेव्हा तिने जीवकास मोबदला देऊन सत्कार केला._*
*_मगध नरेश बिंबीसार भंगदर रोगाने त्रस्त होते. जीवकाने त्यांचा आजार पूर्णपणे बरा केला, तेव्हा त्यांनी जीवकास भरपूर अलंकार दिले. परंतु ते न स्वीकारता फक्त माझी शुश्रुषा तेवढी लक्षात ठेवावी एवढेच जीवकाने म्हटले. बिंबीसाराने जीवकाच्या वैद्यकीय ज्ञानाने प्रभावीत होवून तथागत बुद्धाच्या सेवेसाठी जीवकाला नियुक्त केले. जीवकांनी तथागत बुद्धांची व त्यांच्या भिक्खू संघाची आरोग्य विषयी काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली व जीवकाने ती सहर्ष स्वीकारली._*
*मगधराजा बिंबीसाराने जीवकास राजवैद्य म्हणून घोषित केले होते.*
*_जीवकाने राजगृहातील नगरश्रेष्टींचे डोकेदुखी त्याच्या डोक्याचे ऑपरेशन करून बरी केली. बनारस येथील एका श्रेष्टीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया. जीवकाने केलेल्या अनेक ऑपरेशनबद्दलची माहिती महावग्गामध्ये आहे. यावरून लक्षात येते की त्यावेळी जीवकाकडे भूल देण्याची कला अवगत केली होती._*
*_एकदा तथागत बुद्धांचे शरीर दोषग्रस्त झाले होते. तथागत बुद्ध जुलाबाचे औषध घेऊ इच्छित होते. त्याप्रमाणे जीवकाकडे निरोप पाठवला. जीवकाने प्रथम तथागतांचे शरीर स्निग्ध करण्यास सांगितले. नंतर जीवकाने तथागतांना जुलाबाचे औषध दिले. तथागत बुद्ध बरे झाले. पालि ग्रंथात अनेक वेळा जीवकाने तथागत बुद्धांच्या आजारांवर उपचार केल्याचे वर्णन केले आहे. तसेच जेव्हा देवदत्तने तथागत बुद्धांना जीवे मारण्यासाठी उंच भागावरून मोठा दगड ढकलला होता, त्यात एक छोटा तुकडा बुद्धाच्या पायावर पडून रक्तस्त्राव झाला होता. त्यावेळी जीवकाने त्यांच्यावर उपचार केले होते. याबाबत तिबेटियन ग्रंथात माहिती दिली आहे._*
*जीवकाने अंवती राजा प्रद्योत हा पांडुरोगाने त्रस्त होता याला सुद्धा बरे केले होते. अवंती राजा हा तापट स्वभावाचा होता परंतु जीवकाच्या उदार सेवेमुळे राजा प्रद्योतच्या तापट स्वभावात बदल झाला आणि शेवटी तथागताला शरण गेला व बौद्ध झाला.*
*_वरील जीवकाच्या वैद्यक कथावरून त्याकाळात सुद्धा हे शास्त्र किती प्रगत होते याची कल्पना करता येईल._*
*_राजा प्रद्योताने जीवकास अत्यंत मूल्यवान शालजोडी अर्पण केली. जीवकाने ती स्वीकारावयाची भगवंतांना विनंती केली आणि सोबतच सर्व भिक्खुंनीदेखील उकिरड्यावरील वस्त्रांऐवजी चिवरे वापरावयाची अनुमती देण्याची विनंती केली; ज्यामुळे रोगराई प्रमाण कमी व्हावे. भगवंतांनी विनंती मान्य केली. तेव्हापासून भिक्खुंनी चिवरांचे दान स्वीकारणे सुरू केले व त्यांची रोगराईची समस्या बरीच कमी केली._*
*_बिंबीसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू यांच्या पदरी राहिला; आणि आजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंतांकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला._*
*_जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा भिषग्वर जीवक दिवसातून दोन वेळा त्यांच्याकडे जात असे. बिंबिसार राजाने दान केलेले वेळूवन फार दूर असल्याचे त्याला जाणवले. राजगृहात जीवकाच्या निवासानजीक त्यांच्या मालकीचे "आम्रवन" नावाचे उद्यान होते. तिथे एक सर्वांगीण विहार बांधावा आणि आम्रवनासहित तथागतांना त्याचे दान करावे असे त्याला वाटले. ह्या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतांपाशी गेला आणि आपली इच्छा परिपुर्ण करण्याची त्याने अनुज्ञा मागितली. तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली._*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖